शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
5
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
6
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
7
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
8
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
9
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
10
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
11
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
12
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
13
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
14
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
15
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
16
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
17
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

आदिवासी शाळांमध्ये पुस्तके आलीच नाहीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2018 22:02 IST

आदिवासी आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना शासकीय योजनेतून पाठ्यपुस्तके दिली जातात. त्याकरिता मागणी नोंदविली जाते. यावर्षीच्या सत्रात मुख्याध्यापकांनी विद्यार्थ्यांचे नाव नोंदविल्यानंतरही पाठ्यपुस्तके मिळाली नाही. यामुळे नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे.

ठळक मुद्देप्रकल्पाची दिरंगाई : विद्यार्थ्यांचे नुकसान

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : आदिवासी आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना शासकीय योजनेतून पाठ्यपुस्तके दिली जातात. त्याकरिता मागणी नोंदविली जाते. यावर्षीच्या सत्रात मुख्याध्यापकांनी विद्यार्थ्यांचे नाव नोंदविल्यानंतरही पाठ्यपुस्तके मिळाली नाही. यामुळे नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे.प्रक ल्प कार्यालयाच्या अनागोंदी कारभाराविरोधात विद्यार्थी, पालक आणि शिक्षकही आता संताप नोंदवित आहे. शाळा सुरू होऊन चार महिने झाले. त्यापूर्वीच आश्रमशाळेच्या मुख्याध्यापकांनी प्रकल्प कार्यालयाकडे विद्यार्थ्यांच्या संख्येची नोंदणी केली. मात्र आॅक्टोबर महिना आला तरी नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांची पाठ्यपुस्तके जिल्ह्यातील आश्रमशाळेत पोहचले नाही.जिल्ह्यातील १३ आश्रमशाळेत नववीमध्ये ४५० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. तर अकरावीमध्ये ३०० विद्यार्थी आहे. आश्रमशाळेकडून प्रकल्प कार्यालयाला वारंवार विचारणा होत आहे. मात्र प्रकल्प कार्यालयाने आजपर्यंत पुस्तके दिली नाही. यामुळे हे विद्यार्थी परीक्षा देणार कशी, असा पेच निर्माण झाला आहे. आदिवासी बहुल जिल्ह्यातील गोरगरीब विद्यार्थी आश्रमशाळांमध्ये आहे. मात्र प्रथम सत्राची परीक्षा तोंडावर आलेली असताना विद्यार्थ्यांच्या हाती पुस्तकेच नाही. त्यामुळे ते अनुत्तीर्ण झाल्यास याची जबाबदारी कोण घेणार असा प्रश्न पालकांनी उपस्थित केला आहे.दहावी, बारावीची पुस्तके १४ आॅगस्टलाबोर्डाची परीक्षा म्हणून विद्यार्थी उन्हाळ्यात अभ्यासाला प्रारंभ करतात. मात्र आश्रमशाळेच्या विद्यार्थ्यांना दहावी आणि बारावीची पुस्तके १४ आॅगस्टला मिळाली. या संपूर्ण प्रकारामुळे आदिवासी विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड रोष आहे.