शहरं
Join us  
Trending Stories
1
'दादा, कर्जमाफी करा ना'; अजित पवार संतापले; म्हणाले, "आम्ही काय इथे गोट्या खेळायला आलोय का?" (Video)
2
IND vs WI: भारताचा कसोटी संघ जाहीर! पडीक्कलला संधी; श्रेयस अय्यर, करूण नायरला वगळले
3
'शेतकऱ्यांना मदतीसाठी पंचांग पाहणार का?'; उद्धव ठाकरेंचा सरकारला थेट सवाल
4
समोर मृत्यू आला पण त्यांनी संघर्ष निवडला; गुराख्याने परतवला वाघ आणि बछड्यांचा हल्ला
5
पंतप्रधान मोदी आणि नेतन्याहू यांच्या मैत्रीवरून सोनिया गांधींनी उपस्थित केला सवाल, म्हणाल्या...
6
AI बिनधास्त वापरा, पण त्याआधी 'या' गोष्टी लक्षात ठेवा! नाहीतर स्वतःच अडचणीत सापडाल
7
५ राशींवर दुर्गा देवीची कायम लक्ष असते, लाभते विशेष कृपा; हाती राहतो पैसा, शुभ-कल्याण-भरभराट!
8
कोळशांच्या खाणीतून काय बाहेर पडले? भारतीय शास्त्रज्ञही चकीत झाले...! युरेनियमचा अजस्त्र साठा सापडला
9
सेन्सेक्सलाही टाकले मागे! सरकारी कंपनीचा शेअर महिन्यात ४०% नी वधारला; तेजीचे कारण काय?
10
लेक राहासाठीही आहे वेगळी व्हॅनिटी व्हॅन, आलियाचा प्रश्न ऐकून महेश भटही झाले शॉक
11
भयावह! "आमची कबर इथेच..."; गाझामध्ये ३ मुलींसह अडकलेल्या आईची मन सुन्न करणारी गोष्ट
12
डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल पुरस्कार हवा, पण अर्धी अमेरिकाच नाखूश! सर्वेक्षणात झाला धक्कादायक खुलासा 
13
IND vs PAK: 'इतका राग होता तर खेळलाच कशाला?' हस्तांदोलन न करण्यावर शशी थरूर संतापले!
14
शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांना योग्य भाव का मिळत नाही? नितीन गडकरी यांनी कारण सांगितले
15
वाढीव मदतीचा प्रस्ताव कॅबिनेटसमोर मांडू; मंत्री मकरंद पाटील यांचे शेतकऱ्यांना आश्वासन
16
भाजपाच्या अध्यक्षपदासाठी नाव आघाडीवर, कशी असेल पुढची वाटचाल? फडणवीस यांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
17
भगवा कुर्ता, कपाळी भस्म; संजय दत्तने घेतलं महाकालेश्वरचं दर्शन, भक्तीत तल्लीन झाला अभिनेता
18
'रशियाचे लष्कर कागदी वाघासारखेच'; डोनाल्ड ट्रम्प यांनी पुतीन यांना डिवचले, रशियानेही केला पलटवार
19
कारगिल युद्धावेळीही आपण पाकिस्तानसोबत..., हस्तांदोलन वादावरून शशी थरूर यांनी दिला टीम इंडियाला सल्ला

आदिवासी शाळांमध्ये पुस्तके आलीच नाहीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2018 22:02 IST

आदिवासी आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना शासकीय योजनेतून पाठ्यपुस्तके दिली जातात. त्याकरिता मागणी नोंदविली जाते. यावर्षीच्या सत्रात मुख्याध्यापकांनी विद्यार्थ्यांचे नाव नोंदविल्यानंतरही पाठ्यपुस्तके मिळाली नाही. यामुळे नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे.

ठळक मुद्देप्रकल्पाची दिरंगाई : विद्यार्थ्यांचे नुकसान

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : आदिवासी आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना शासकीय योजनेतून पाठ्यपुस्तके दिली जातात. त्याकरिता मागणी नोंदविली जाते. यावर्षीच्या सत्रात मुख्याध्यापकांनी विद्यार्थ्यांचे नाव नोंदविल्यानंतरही पाठ्यपुस्तके मिळाली नाही. यामुळे नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे.प्रक ल्प कार्यालयाच्या अनागोंदी कारभाराविरोधात विद्यार्थी, पालक आणि शिक्षकही आता संताप नोंदवित आहे. शाळा सुरू होऊन चार महिने झाले. त्यापूर्वीच आश्रमशाळेच्या मुख्याध्यापकांनी प्रकल्प कार्यालयाकडे विद्यार्थ्यांच्या संख्येची नोंदणी केली. मात्र आॅक्टोबर महिना आला तरी नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांची पाठ्यपुस्तके जिल्ह्यातील आश्रमशाळेत पोहचले नाही.जिल्ह्यातील १३ आश्रमशाळेत नववीमध्ये ४५० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. तर अकरावीमध्ये ३०० विद्यार्थी आहे. आश्रमशाळेकडून प्रकल्प कार्यालयाला वारंवार विचारणा होत आहे. मात्र प्रकल्प कार्यालयाने आजपर्यंत पुस्तके दिली नाही. यामुळे हे विद्यार्थी परीक्षा देणार कशी, असा पेच निर्माण झाला आहे. आदिवासी बहुल जिल्ह्यातील गोरगरीब विद्यार्थी आश्रमशाळांमध्ये आहे. मात्र प्रथम सत्राची परीक्षा तोंडावर आलेली असताना विद्यार्थ्यांच्या हाती पुस्तकेच नाही. त्यामुळे ते अनुत्तीर्ण झाल्यास याची जबाबदारी कोण घेणार असा प्रश्न पालकांनी उपस्थित केला आहे.दहावी, बारावीची पुस्तके १४ आॅगस्टलाबोर्डाची परीक्षा म्हणून विद्यार्थी उन्हाळ्यात अभ्यासाला प्रारंभ करतात. मात्र आश्रमशाळेच्या विद्यार्थ्यांना दहावी आणि बारावीची पुस्तके १४ आॅगस्टला मिळाली. या संपूर्ण प्रकारामुळे आदिवासी विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड रोष आहे.