शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट निवडणुकीचा ‘निकाल’ लागताच राज ठाकरे-CM फडणवीस भेट; पाऊण तास चर्चा, तर्कांना उधाण
2
“ठाकरे ब्रँड कोमात, स्वदेशी देवाभाऊ जोमात”; बेस्ट निवडणूक निकालावर शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
3
"श्री गणेश करते हैं..."; जेव्हा रशियन राजदूतांनी हिंदीमध्ये सुरू केली पत्रकार परिषद! 'सुदर्शन चक्र'चा उल्लेख करत दिलं मोठं आश्वासन, बघा VIDEO
4
हाय स्पीड कॅमेरे, सेन्सर अन् 3D मोशन कॅप्चर टेक्नॉलॉजीसह या गोलंदाजाची अ‍ॅक्शन रेकॉर्ड केली जाणार
5
इंजिनीअर तरुणाने आईच्या मदतीने पत्नीला संपवलं, मृतदेह चादरीत गुंडाळला अन्...; कारण ऐकून होईल संताप!
6
ड्रीम११ आणि My11Circle चे भविष्य धोक्यात? ऑनलाइन गेमिंग बिलामुळे 'हे' प्लॅटफॉर्म कायमचे बंद होणार?
7
"आपलं टार्गेट चीन, तर भारताच्या रुपाने...!", निक्की हेली यांनी ट्रम्प प्रशासनाला फटकारलं; स्पष्टच बोलल्या
8
Coconut Oil : नारळ तेल बनलं VIP प्रोडक्ट; दोन वर्षांत तीन पटींनी वाढली किंमत
9
पत्नीचा मृतदेह पाहून पतीला बसला धक्का, एका कोपऱ्यात बसला आणि तासाभरातच...  
10
Ramayana चित्रपटातील 'राम' Ranbir Kapoor नं 'या' कंपनीत केली मोठी गुंतवणूक; शेअर करुन देतोय जबरदस्त कमाई
11
Ganesh Chaturthi 2025: बाप्पा आपल्या भेटीला येतोय, पण कधी 'या' गुप्त गणेश मंदिरात बाप्पाची भेट घ्या!
12
शिल्पा शेट्टीच्या रेस्टॉरंटमध्ये पोहोचली 'सावली', प्राप्ती रेडकरचा ग्लॅम लूक; सोबत दिसली 'भैरवी'
13
शाळेत मारल्याच्या रागातून नववीतील विद्यार्थ्याने शिक्षकावर झाडली गोळी, लंच बॉक्समधून आणला कट्टा आणि...  
14
भारत अमेरिकेला आणखी एक झटका देण्याच्या तयारीत; कच्च्या तेलानंतर रशियासोबत करू शकतो ‘ही’ डील
15
OMG! आर्यन खानची पहिलीच सीरिज आग लावणार, प्रीव्ह्यूच्या शेवटी 'त्या' डायलॉगने वेधलं लक्ष
16
अमेरिकेची 'मोस्ट वॉन्टेड' महिला अखेर भारतात सापडली, एफबीआयने केली मोठी कारवाई!
17
BEST Election Results: ठाकरे बंधूंच्या सपशेल पराभवावर CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
18
Stock Market Today: शेअर बाजाराची मजबूत सुरुवात, Nifty २५,१०० च्या वर; NBFCs, रियल्टी शेअर्समध्ये तेजी
19
डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफवर रामबाण तोडगा सापडला, हे मित्र बनणार भारतासाठी ढाल
20
सत्काराच्या शालीने वकिलाचा न्यायालयातच गळफास; खिशात चिठ्ठी, पण पोलिसांनी माहिती दडवली

५९० गावे झाली तंटामुक्त

By admin | Updated: May 19, 2014 23:54 IST

गावगाड्यातील तंटे समोपचाराने मिटवून गावागावात शांततेचे वातावरण निर्माण करण्यासाठी शासनाने सुरू केलेल्या महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेंतर्गत जिल्ह्यात

यवतमाळ : गावगाड्यातील तंटे समोपचाराने मिटवून गावागावात शांततेचे वातावरण निर्माण करण्यासाठी शासनाने सुरू केलेल्या महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेंतर्गत जिल्ह्यात ५९० गावे संपूर्ण तंटामुक्त झाली आहे. गावांमध्ये स्थापन झालेल्या तंटामुक्त समित्यांनी तब्बल १९ हजार तंटे समोपाराने मिटविले आहे. या योनेंतर्गत गावातच तंटे मिटत असल्याने न्यायालयाचे उंबरठे झिजविण्यासोबतच होणार्‍या आर्थिक आणि मानसिक त्रासापासून या योजनेने दिलासा दिला आहे. या योजनेच्या अंमलबजावणीसाठी मोहिमेचे अध्यक्ष तथा जिल्हाध्यक्ष अश्विन मुद्गल व पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांनी नियोजनपूर्वक काम केल्याने जिल्ह्यात आतापर्यंत तब्बल ५९० गावे पूर्णपणे तंटामुक्त झाली आहे. यापैकी १२९ गावांचे मूल्यमापन झाले असून घोषणा तितकी शिल्लक आहे. पूर्वीच्या या गावांना उत्कृष्ट कामगिरीबद्दल राज्य शासनाच्यावतीने पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. तर यापैकी सात गावांना विशेष पुरस्कार देण्यात आले आहे. जिल्ह्यात एकूण १२०७ ग्रामपंचायती असून या सर्व ग्रामपंचायतींच्या ठिकाणी तंटामुक्त गाव समित्या स्थापन झाल्या आहे. गावकर्‍यांना तंटामुक्त मोहिमेचे महत्त्व कळावे तसेच योजनेची योग्य अंमलबजावणी होऊन तंटे समोपचाराने सोडविण्यासाठी सर्व गावांना शासन निर्णय व त्या अनुषंगाने शासनाने निर्गमित केलेले आदेश गावकर्‍यांपर्यंत पोहचूवन त्याबाबत गावकर्‍यांना मार्गदर्शन करण्यात येते. गावगाड्यात निर्माण झालेल्या वादातून प्रकरण पोलिसात जाते व नंतर न्यायालयात प्रकरणाची सुनावणी सुरू होते. यासाठी तक्रारकर्ते व ज्यांच्या विरोधात तक्रार आहे अशांना पोलीस ठाणे व नंतर न्यायालयाचे उंबरठे झिजवावे लागते. न्यायालयात अनेक वर्ष प्रकरण सुरू राहात असल्याने दोनही पक्षांना आर्थिक व मानसिक त्रासाला सामोरे जावे लागते. तंटामुक्त अभियानाने मात्र या सर्व बाबींपासून गावकर्‍यांची सुटका केली आहे. या योजनेचे महत्त्व पटल्याने गावकरी स्वत:हून आपले छोटे-मोठे तंटे तंटामुक्त गाव समितीसमोर ठेवून ते निकाली काढून घेत असल्याचे चांगले चित्र गावागावात पाहावयास मिळते. गावकर्‍यांमध्ये झालेली जनजागृती व प्रशासनाच्यावतीने होत असलेल्या योग्य अंमलबजावणीमुळे जिल्ह्यातील अनेक गावातच या योजनेच्या माध्यमातून सोडविण्यात आले आहे. पहिल्या वर्षी तंटामुक्त झालेल्या गावांना २५ लक्ष रुपये बक्षिसाच्या रूपात वितरित करण्यात आले. दुसर्‍या वर्षी २००८-०९ मध्ये दोन कोटी २४ लाख, २००९-१० मध्ये एक कोटी १४ लाख, २०१०-११ मध्ये तीन कोटी ८९ लाख, २०११-१२ मध्ये दोन कोटी २३ लाख इतकी रक्कम गावांना वितरित करण्यात आली. २०१२-१३ मधील १२९ गावांची घोषणा झाल्यानंतर त्या गावांनाही रक्कम वितरित केली जातील. या रकमेतूनही गावात विकासाची कामे करण्यास मोलाचा हातभार लागला आहे. (शहर प्रतिनिधी)