शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीकडून खेळताना किंग कोहलीची ‘विराट’ कामगिरी! नव्या विश्वविक्रमासह ऑस्ट्रेलियन दिग्गजाला धोबीपछाड
2
"धर्म आणि विज्ञान यांच्यात कुठलाही संघर्ष नाही; दोघांचेही ध्येय एकच...!" नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
पुतण्यानेच रचला चुलत्याच्या हत्येचा कट; पराभवाचा बदला घेण्यासाठी मंगेश काळोखेंची हत्या, तटकरेंच्या निकटवर्तीयावरही गुन्हा दाखल
4
"लोकं अडकून पडलेत, मुलांचं शिक्षण रखडलंय"; H1B व्हिसा मुद्द्यावर भारताची अमेरिकेशी चर्चा
5
जावळ काढण्याच्या प्रथेत आईचेही बळजबरीने मुंडन; दौंडमधील महिलांची राज्य महिला आयोगाकडे तक्रार
6
Viral Video: "ही कार आहे... बाईक नाही!" नको त्या कारणावरून जोडप्यामध्ये पेटला वाद, व्हिडीओ व्हायरल
7
पदकं फेकली, प्रमाणपत्रं फाडली, भाजपा खासदारांच्या क्रीडा महोत्सवात खेळाडूंचा संताप, कारण काय?
8
"दोषींना शिक्षा झालीच पाहिजे..."; बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येवरून भारताने सुनावलं
9
थरकाप उडवणारा VIDEO! चिनी शस्त्रांची पुन्हा पोलखोल, थायलंड विरोधात वापरताना रॉकेट सिस्टिमचाच स्फोट; कंबोडियाच्या 8 जवानांचा मृत्यू
10
GenZ पिढीच्या मुलांवर माझा विश्वास, हीच मुलं भारताला 'विकसित राष्ट्र' बनवतील- पंतप्रधान मोदी
11
४५ वर्षाचा गड कोसळला, भाजपानं रचला इतिहास; १ मत फिरवलं अन् 'या' महापालिकेत बसवला महापौर
12
भाजपा आमदारांच्या ‘ब्राह्मण भोजना’मुळे उत्तर प्रदेशच्या राजकारणात खळबळ, भाजपामध्ये चाललंय काय? 
13
काही केलं तरी रात्री झोपच येत नाही? मग करा 'हे' एक छोटसं काम; १० मिनिटांत व्हाल डाराडूर
14
Shehnaaz Gill : "इथे सगळे राक्षस, मी खूप स्ट्रगल...", शहनाज गिलची झाली फसवणूक, इंडस्ट्रीबद्दल मोठा खुलासा
15
उद्धव ठाकरेंच्या भेटीत काय ठरले? जागावाटपाबाबत बैठकीत चर्चा झाली का?; जयंत पाटील म्हणाले...
16
अडीच वर्षातील काम जनता विसरणार नाही; शिवसेनेत येताच प्रकाश महाजनांचे शिंदेंबाबत कौतुकोद्गार
17
रिपल इफेक्ट : ग्राहकांच्या सवयी बाजाराच्या हालचालींवर कशा परिणाम करतात?
18
"राजकारण बंद करेन, पण आता..."; काँग्रेसमध्ये प्रवेश करताच प्रशांत जगतापांनी मांडली भूमिका
19
पाकिस्तानला अजूनही 'ऑपरेशन सिंदूर'ची भीती! सीमेवर अँटी-ड्रोन सिस्टीम बसवले
Daily Top 2Weekly Top 5

आर्णीत अद्यापही कापूस खरेदी नाही

By admin | Updated: November 20, 2015 02:57 IST

मागील वर्षी यवतमाळ जिल्ह्यात सर्वाधिक एक लाख ५७ हजार क्विंटल कापूस खरेदी झालेल्या आर्णी तालुक्यात यावर्षी अद्यापही शासनाने कापसाची खरेदी सुरू केलेली नाही.

आर्णी : मागील वर्षी यवतमाळ जिल्ह्यात सर्वाधिक एक लाख ५७ हजार क्विंटल कापूस खरेदी झालेल्या आर्णी तालुक्यात यावर्षी अद्यापही शासनाने कापसाची खरेदी सुरू केलेली नाही. त्यामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये चांगलाच रोष व्यक्त होत आहे. आर्णी तालुक्यात ९० टक्के शेतकरी हा कापूस उत्पादक असताना शासकीय खरेदी यावेळी सुरू करण्यात आलेली नाही. त्यामुळे खासगी व्यापारी अत्यंत कमी भावात कापूस घेऊन शेतकऱ्यांची लूट करीत असल्याचे चित्र दिसून येत आहे. शासनाने कापूस खरेदी सुरू करावी यासाठी २०० हून अधिक शेतकऱ्यांच्या स्वाक्षरीचे निवेदन पणनच्या यवतमाळ येथील विभागीय कार्यालयाला देण्यात आले. त्यानंतर कृषी उत्पन्न बाजार समिती पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन शासकीय कापूस खरेदी सुरू करण्याची मागणी केली होती. त्यानंतरही शासनस्तरावर अद्याप ही बाब गंभीरतेने घेतलीच गेली नाही. यासंदर्भात कृषी उत्पन्न बाजार समिती व खासगी बाजार समिती फेडरेशनचे प्रतिनिधी आदींची तालुकास्तरावर एक संयुक्त बैठकही घेण्यात आली. परंतु या बैठकीत योग्य तोडगा निघालेला नाही. युवक काँग्रेसच्यावतीने याबाबत मोर्चा काढून तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. या सर्व बाबी शेतकरी विरोधात होत असताना तालुक्यातील व जिल्ह्यातील जबाबदार पदाधिकारी व लोकप्रतिनिधी या प्रश्नाकडे लक्ष देण्यास तयार नाही. (शहर प्रतिनिधी)एसडीओंचा अल्टीमेटमआर्णी येथे कापूस खरेदीबाबत खासगी बाजार समितीकडून मनमानी सुरू आहे. शासकीय बाजार समितीकडे स्वत:चे जिनिंग नाही. गुरुवारी उपविभागीय अधिकारी विकास माने यांनी आर्णी येथे भेट देऊन याबाबत तत्काळ निर्णय घ्या व मला उद्या कळवा अन्यथा याबाबत कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास कारवाईचे संकेत दिले.