शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

सार्वजनिक उत्सवात ध्वनी प्रदूषण नको

By admin | Updated: July 31, 2015 00:05 IST

सार्वजनिक उत्सव काळातील ध्वनी प्रदूषणावर नियंत्रणासाठी उच्च न्यायालयाने मापदंड घालून दिले आहे.

जिल्हा पोलीस अधीक्षक : मापदंडांचे पालन करा, तक्रारी तत्काळ निकाली काढणार यवतमाळ : सार्वजनिक उत्सव काळातील ध्वनी प्रदूषणावर नियंत्रणासाठी उच्च न्यायालयाने मापदंड घालून दिले आहे. याच्या अंमलबजावणीसाठी प्राधिकृत अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शिवाय ध्वनीची क्षमता मोजण्यासाठी २३ डेसीबल मशीन वापरली जाणार आहे. यासाठी नागरिकांनी सहाकार्य करावे, असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक अखिलेशकुमार सिंग यांनी येथे पत्रपरिषदेत केले.ध्वनी प्रदूषण थांबविण्यासाठी चार झोन ठरवून दिले आहे. त्यासाठी डेसीबलही निश्चित करण्यात आले आहे. सायलन्स झोन असलेल्या भागात ५० ते ४० डेसीबल, वसाहतीसाठी ५५ ते ४५ डेसीबल, कमर्शियल झोनसाठी ६५ ते ५५ डेसीबलची मर्यादा आणि औद्योगिक भागासाठी ७५ ते ७० डेसीबल ध्वनी ठेवण्याची सूट देण्यात आली आहे. याच मापदंडाची पयमल्ली झाल्यास थेट कारवाई केली जाणार आहे. ध्वनीची तीव्रता मोजून गुन्हे दाखल केले जाणार आहे. उत्सवांमधून डीजेवर पूर्णत: बंदी शक्य नसल्याचे पोलीस अधीक्षक अखिलेशकुमार सिंग यांनी सांगितले. यापूर्वी पूर्ण बंदीचा प्रयत्न केला होता. मात्र डीजे व्यावसायिकांनी उच्च न्यालयात धाव घेतली. त्यांना व्यवसाय हक्कानुसार नियमाप्रमाणे व्यवसाय करण्याचा अधिकार आहे, हे यापूर्वीच न्यायालयाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे आता नियंत्रणासाठी प्रयत्न केले जात आहे. यासाठी न्यायालयाच्या मापदंडाचा आधार घेतला जाणार आहे. नागरिकांना पोलिसांना १०० क्रमांकावर ध्वनिप्रदूषणाची तक्रार करता येणार आहे. शिवाय यवतमाळ जिल्हा पोलीस दलाच्या संकेतस्थळावर प्राधिकृत अधिकाऱ्यांची मोबाईल क्रमांकासह यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. पोलीस अधिकाऱ्यांवर काही आरोपींनी हल्ला केल्याचा मुद्दा पत्रकारांनी उपस्थित केला. यावर पोलीस अधीक्षक म्हणाले, हल्ला होण्याची ही पहिली वेळ नाही, अशा प्रवृत्तीचा बंदोबस्त करण्याचा पुरेपूर प्रयत्न सुरू आहे. यवतमाळ शहरातील अनेक गुन्हे अजूनही उघडकीस आले नाहीत, त्यासाठी शोध पथकांना विशेष सूचना देण्यात आल्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक अखिलेशकुमार सिंग यांनी सांगितले. पत्रपरिषदेला स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजय पुज्जलवार आदी उपस्थित होते. (कार्यालय प्रतिनिधी) लग्न वरातीसाठीही पोलीस परवानगी आवश्यकग्रीन झोनप्रमाणे आता लग्नाची वरात काढतानाही पोलिसांची परवानगी घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. अशा पद्धतीने परवानगी न घेता कार्यक्रम केल्यास गुन्हे दाखल करता येणार आहे. बरेचदा तक्रार केल्यानंतर पोलीस येईपर्यंत कार्यक्रम आटोपलेला असतो. परंतु अशावेळी संबंधितांनी परवानगी घेतली की, नाही याची खातरजमा करून कारवाई करता येणार आहे, असे अपर पोलीस अधीक्षक काकासाहेब डोळे यांनी सांगितले. ‘मुस्कान’मध्ये पाच मुलांचा लागला शोध जिल्ह्यात १ ते ३१ जुलैदरम्यान आॅपरेशन मुस्कान राबविण्यात आले. यात १८ वर्षाखालील १६ बेपत्ता मुलांपैकी ५ मुले मिळाली. शिवाय रेकॉर्डवर नसलेली १२७ मुले सापडली आहेत. यात ११७ मुले आणि १० मुली आढळून आल्या. परिसरातील गावातूनच कामासाठी चहा, टपरी, धाबा येथे काम करताना ही मुले आढळून आली. २०१० ते २०१५ मध्ये अपहरण झालेल्या ३४२ बालकांपैकी २८३ जणांचा शोध लागला आहे. अजूनही ५९ मुलांचा शोध लागलेला नाही. आॅपरेशन मुस्कानमुळे बेपत्ता मुले आणि धोकादायक स्थितीत काम करणाऱ्या मुलांना त्यांच्या पालकांच्या स्वाधीन करण्यात आले. या अभियानाचे अनेक सकारात्मक परिणाम पुढे येत असल्याचे पोलीस अधीक्षकांनी सांगितले.