शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
2
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
3
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
4
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
5
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
6
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
7
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
8
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
9
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
10
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
11
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
12
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
13
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
14
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
15
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
16
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
17
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
18
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
19
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
20
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले

राज्यपालांच्या दत्तक गावात रस्ताच नाही

By admin | Updated: August 17, 2016 01:06 IST

तालुक्यातील मांगुर्डा ग्रामपंचायतीअंतर्गत येणाऱ्या आदिवासी बहुल व जंगलाने वेढलेल्या माकोडा पोड या कोलाम वस्तीसाठी..

 गावात विविध समस्या : शासनाविरूद्ध तीव्र रोष, माकोडा पोडाला घनदाट जंगलाचा वेढा पांढरकवडा : तालुक्यातील मांगुर्डा ग्रामपंचायतीअंतर्गत येणाऱ्या आदिवासी बहुल व जंगलाने वेढलेल्या माकोडा पोड या कोलाम वस्तीसाठी स्वातंत्र्यानंतरही गावाकडे जाण्यास रस्ताच नाही. विशेष म्हणजे माकोडा हे गाव गेल्यावर्षी महामहीम राज्यपालांनी दत्तक घेतले होते. दुर्गम भागातील माकोडा पोड या गावाला जाण्यासाठी रस्ता निर्माण करून मुलभूत सुविधा देण्याचे कुणालाही गरज नसल्याचे यावरून दिसून येत आहे. गावात शिरण्यासाठी ग्रामस्थांना चिखल तुडवत जावे लागते. त्यातच हिंस्त्र प्राण्यांचीसुद्धा भिती असते. या गावात जाताना मधात एक नाला आहे. तो पावसाळ्यात तुडूंब भरून वाहतो. त्यामुळे ग्रामस्थांना घराकडे जाताच येत नाही. पूर उतरेपर्यंत त्यांना जंगलातच थांबावे लागते. माकोडा पोड या गावाची लोकसंख्या ११० असून १०० टक्के कोलाम सजामाचे नागरिक वास्तव्यास आहे. या समाजबांधवांच्या अज्ञान व अंध:कारपणाचा लोकप्रतिनिधी लाभ घेऊन मुलभूत सुविधापासून वंचित ठेवत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. एकीकडे रेल्वे मार्गासाठी कोट्यवधी रूपये मंजूर केले जातात, तर दुसरीकडे पायदळ चालण्यासाठीदेखिल सुविधा मिळत नाही, यालाच ‘अच्छे दिन’ म्हणतात काय? असा प्रश्न संतप्त नागरिक विचारत आहे. प्राथमिक शिक्षणाची सुविधा वगळता या गावात एकही सुविधा नाही. अंगणवाडी केंद्राची इमारत नसल्यामुळे पूर्व प्राथमिक शिक्षणाचा बट्ट्याबोळ झाला आहे. पिण्याच्या पाण्याची जी विहीर आहे, तीसुद्धा नाल्याच्या समोर आहे. त्यामुळे पावसाळ्यात नाल्याला पूर आल्यास पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होतो. विशेष म्हणजे गावात जाण्यासाठी रस्त्याची सुविधा नसल्यामुळे माकोडावासीय संतप्त झाले आहे. राज्यपालांनी माकोडा गाव दत्तक घेतल्यानंतर ग्रामस्थांच्या आशा पल्लवीत झाल्या होता. मात्र एक वर्षाचा कालावधी लोटूनही साधा रस्ता उपलब्ध करून न दिल्यामुळे दत्तक गाव योजना कुणाच्या कामाची? असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. शासनाने या गंभीर बाबीकडे लक्ष देऊन गावातील समस्या सोडवाव्या, अशी मागणी माधव मेश्राम, भिमा टेकाम, गुलाब टेकाम, सुरेश आत्राम आदींसह गावकऱ्यांनी केली आहे. (वार्ताहर)