शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

राज्यपालांच्या दत्तक गावात रस्ताच नाही

By admin | Updated: August 17, 2016 01:06 IST

तालुक्यातील मांगुर्डा ग्रामपंचायतीअंतर्गत येणाऱ्या आदिवासी बहुल व जंगलाने वेढलेल्या माकोडा पोड या कोलाम वस्तीसाठी..

 गावात विविध समस्या : शासनाविरूद्ध तीव्र रोष, माकोडा पोडाला घनदाट जंगलाचा वेढा पांढरकवडा : तालुक्यातील मांगुर्डा ग्रामपंचायतीअंतर्गत येणाऱ्या आदिवासी बहुल व जंगलाने वेढलेल्या माकोडा पोड या कोलाम वस्तीसाठी स्वातंत्र्यानंतरही गावाकडे जाण्यास रस्ताच नाही. विशेष म्हणजे माकोडा हे गाव गेल्यावर्षी महामहीम राज्यपालांनी दत्तक घेतले होते. दुर्गम भागातील माकोडा पोड या गावाला जाण्यासाठी रस्ता निर्माण करून मुलभूत सुविधा देण्याचे कुणालाही गरज नसल्याचे यावरून दिसून येत आहे. गावात शिरण्यासाठी ग्रामस्थांना चिखल तुडवत जावे लागते. त्यातच हिंस्त्र प्राण्यांचीसुद्धा भिती असते. या गावात जाताना मधात एक नाला आहे. तो पावसाळ्यात तुडूंब भरून वाहतो. त्यामुळे ग्रामस्थांना घराकडे जाताच येत नाही. पूर उतरेपर्यंत त्यांना जंगलातच थांबावे लागते. माकोडा पोड या गावाची लोकसंख्या ११० असून १०० टक्के कोलाम सजामाचे नागरिक वास्तव्यास आहे. या समाजबांधवांच्या अज्ञान व अंध:कारपणाचा लोकप्रतिनिधी लाभ घेऊन मुलभूत सुविधापासून वंचित ठेवत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. एकीकडे रेल्वे मार्गासाठी कोट्यवधी रूपये मंजूर केले जातात, तर दुसरीकडे पायदळ चालण्यासाठीदेखिल सुविधा मिळत नाही, यालाच ‘अच्छे दिन’ म्हणतात काय? असा प्रश्न संतप्त नागरिक विचारत आहे. प्राथमिक शिक्षणाची सुविधा वगळता या गावात एकही सुविधा नाही. अंगणवाडी केंद्राची इमारत नसल्यामुळे पूर्व प्राथमिक शिक्षणाचा बट्ट्याबोळ झाला आहे. पिण्याच्या पाण्याची जी विहीर आहे, तीसुद्धा नाल्याच्या समोर आहे. त्यामुळे पावसाळ्यात नाल्याला पूर आल्यास पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होतो. विशेष म्हणजे गावात जाण्यासाठी रस्त्याची सुविधा नसल्यामुळे माकोडावासीय संतप्त झाले आहे. राज्यपालांनी माकोडा गाव दत्तक घेतल्यानंतर ग्रामस्थांच्या आशा पल्लवीत झाल्या होता. मात्र एक वर्षाचा कालावधी लोटूनही साधा रस्ता उपलब्ध करून न दिल्यामुळे दत्तक गाव योजना कुणाच्या कामाची? असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. शासनाने या गंभीर बाबीकडे लक्ष देऊन गावातील समस्या सोडवाव्या, अशी मागणी माधव मेश्राम, भिमा टेकाम, गुलाब टेकाम, सुरेश आत्राम आदींसह गावकऱ्यांनी केली आहे. (वार्ताहर)