शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये Gen-Z आंदोलन, 19 जणांचा मृत्यू, नैतिक जबाबदारी घेत गृहमंत्र्यांचा राजीनामा; आता PM ओलींवर दबाव!
2
भीतीपोटी खैरात वाटतायेत...! नितीश कुमारांच्या घोषणांवरून प्रशांत किशोर यांचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले...
3
मग काय वाळू खाणार? आरक्षण दिले नाही तर मुंबईचा भाजीपाला, दूध बंद करू; जरांगेंचा इशारा
4
Video: अंजली कृष्णा यांच्यानंतर कारवाईला गेलेल्या महसूल अधिकाऱ्याला गावकऱ्यांकडून मारहाण
5
सावधान...! लाखात पगार असूनही ५ वर्षांपासून चुकीच्या पद्धतीने रेशन घेताय? जाणून घ्या, किती दंड भरावा लागेल?
6
Tiktok पुन्हा सुरू होणार? केंद्रीय आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांनी स्पष्ट केली सरकारची भूमिका
7
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीपूर्वीच दोन पक्षांची मोठी घोषणा; मतदानापासून दूर राहणार...! पण का...?
8
AIIMS मध्ये पहिल्यांदाच झाले गर्भदान; संशोधन आणि वैद्यकीय शिक्षणाला मिळणार नवी दिशा
9
'सत्ते पे सत्ता' अन् शुबमन गिलच्या 'बेबी' या टोपण नावामागची खास गोष्ट
10
नवा आजार चिमुकल्यांना घालतोय विळखा; Hand Foot Mouth Disease म्हणजे काय?
11
आश्चर्यच...! एका झटक्यात तब्बल ₹ 20.8 लाखांनी स्वस्त झाली 'ही' लक्झरीअस SUV, यापूर्वी असं कधीच घडलं नाही!
12
रोहित पवारांनी आरोप सिद्ध करावा, नाही तर राजकीय संन्यास घ्यावा ; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा पलटवार
13
उपराष्ट्रपती निवडणुकीत विरोधकांचा विजय कठीण; पण कुणाचा खेळ बिघडवणार 'क्रॉस व्होटिंग'?
14
मॉकड्रिल्स, तंत्रज्ञान असूनही कारखान्यांत स्फोट का? 'पेसो'सारख्या यंत्रणांना कार्यप्रणालीत बदल करण्याची गरज?
15
टाटा-महिंद्रासह आटो सेक्टरमध्ये मोठी वाढ! पण, आयटीतील 'या' कंपन्यांनी केली निराशा, कोण किती घसरलं?
16
पाकिस्तानच्या पावलावर पाऊल ठेवतोय बांगलादेश; IMFकडे पसरले हात, मागितले 'इतके' पैसे
17
भारत-पाक नव्हे तर श्रीलंकेच्या नावे आहे Asia Cup स्पर्धेतील हा खास रेकॉर्ड
18
रांगेत भाविकांचा छळ अन् चंद्रग्रहणात विसर्जन, लालबागचा राजा मंडळाविरोधात आता थेट CM फडणवीसांकडे तक्रार!
19
पंजाबमधील पूरपरिस्थिती पाहून सलमान खान झाला भावुक, दिला मदतीचा हात
20
एका झटक्यात स्वस्त झाली सर्वात पॉप्युलर फॅमिली कार; GST कपातीनंतर Maruti Ertiga कितीला मिळणार?

संघर्षाशिवाय पर्याय नाही

By admin | Updated: December 6, 2014 22:56 IST

त्याग आणि संघर्षाशिवाय उन्नती नाही, असा येथे आयोजित स्मृती पर्वातील परिसंवादाचा सूर होता. विविध वक्त्यांनी यावेळी आपले मत मांडले. यावेळी अध्यक्षस्थानी साहेबराव खडसे होते.

परिसंवाद : स्मृती पर्वात विविध विषयांवर मंथनयवतमाळ : त्याग आणि संघर्षाशिवाय उन्नती नाही, असा येथे आयोजित स्मृती पर्वातील परिसंवादाचा सूर होता. विविध वक्त्यांनी यावेळी आपले मत मांडले. यावेळी अध्यक्षस्थानी साहेबराव खडसे होते. विदर्भ तेली समाज महासंघ, गुरू रविदास विचार मंच, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मारक समितीच्या संयोजनात परिसंवाद घेण्यात आला. महाराष्ट्रात तेली समाजाची संख्या २० टक्के आहे. परंतु या समाजाला ओबीसी प्रवर्गातील सवलती मिळतात. समाजाची आर्थिक, राजकीय आणि शैक्षणिक स्थिती अतिशय दयनीय आहे. आरक्षणाचा टक्का वाढला तरच या समाजाची प्रगती शक्य आहे, असे सांगून महात्मा फुले, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे शैक्षणिक तथा सामाजिक विचार या समाजाने अंगिकारावे, असे मत विदर्भ तेली समाज महासंघाचे अध्यक्ष रमेश पिसे यांनी मांडले. ‘गुरू रविदासांचा वैज्ञानिक दृष्टिकोन’ या विषयावर आर.एम. चंदनकर, अमर तांडेकर, लोकेश मालखेडे यांनी विचार मांडले. ‘मातंग समाजाची शैक्षणिक अवस्था व फुले, आंबेडकर, अण्णाभाऊ साठेंची विचारधारा’ या विषयावर प्रा.बाळकृष्ण सरकटे, रामचंद्र भराळे, राजेश मानकर यांनी विचार मांडले. या विषयावर बोलताना राजेश मानकर म्हणाले, आंबेडकरी आंदोलनात शहीद झालेल्यांमध्ये मातंग समाजाची संख्या अधिक आहे. त्यांची आर्थिकस्थिती दिवसागणिक खालावत चालली आहे. उस्ताद लहूजी साळवे, मुक्ता साळवे आणि अण्णाभाऊ साठेंचे हे अनुयायी जोपर्यंत बाबासाहेबांच्या विचारांची कास धरत नाही, तोपर्यंत त्यांना इतर समाजाच्या बरोबरीने येता येणार नाही. प्रगती केवळ आरक्षणाने शक्य नाही. त्यासाठी संघर्षाची गरज आहे, असे ते म्हणाले. यावेळी मंचावर ज्ञानेश्वर रायमल, अजय समरित, संजय कांबळे, मनोज रणखांब, इंदूताई कांबळे, सुनीता काळे आदी उपस्थित होते. (वार्ताहर)