शहरं
Join us  
Trending Stories
1
हिजाब वादानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवली, पोलिसांनी व्यक्त केली भीती
2
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
3
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
4
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
5
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
6
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
7
ठाकरेंचा शिलेदार भाजपामध्ये... संजोग वाघेरेंचा राजीनामा, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भूकंप
8
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
9
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
10
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
11
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
12
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
13
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
14
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
15
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
16
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
17
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
18
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
19
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
20
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
Daily Top 2Weekly Top 5

संघर्षाशिवाय पर्याय नाही

By admin | Updated: December 6, 2014 22:56 IST

त्याग आणि संघर्षाशिवाय उन्नती नाही, असा येथे आयोजित स्मृती पर्वातील परिसंवादाचा सूर होता. विविध वक्त्यांनी यावेळी आपले मत मांडले. यावेळी अध्यक्षस्थानी साहेबराव खडसे होते.

परिसंवाद : स्मृती पर्वात विविध विषयांवर मंथनयवतमाळ : त्याग आणि संघर्षाशिवाय उन्नती नाही, असा येथे आयोजित स्मृती पर्वातील परिसंवादाचा सूर होता. विविध वक्त्यांनी यावेळी आपले मत मांडले. यावेळी अध्यक्षस्थानी साहेबराव खडसे होते. विदर्भ तेली समाज महासंघ, गुरू रविदास विचार मंच, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मारक समितीच्या संयोजनात परिसंवाद घेण्यात आला. महाराष्ट्रात तेली समाजाची संख्या २० टक्के आहे. परंतु या समाजाला ओबीसी प्रवर्गातील सवलती मिळतात. समाजाची आर्थिक, राजकीय आणि शैक्षणिक स्थिती अतिशय दयनीय आहे. आरक्षणाचा टक्का वाढला तरच या समाजाची प्रगती शक्य आहे, असे सांगून महात्मा फुले, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे शैक्षणिक तथा सामाजिक विचार या समाजाने अंगिकारावे, असे मत विदर्भ तेली समाज महासंघाचे अध्यक्ष रमेश पिसे यांनी मांडले. ‘गुरू रविदासांचा वैज्ञानिक दृष्टिकोन’ या विषयावर आर.एम. चंदनकर, अमर तांडेकर, लोकेश मालखेडे यांनी विचार मांडले. ‘मातंग समाजाची शैक्षणिक अवस्था व फुले, आंबेडकर, अण्णाभाऊ साठेंची विचारधारा’ या विषयावर प्रा.बाळकृष्ण सरकटे, रामचंद्र भराळे, राजेश मानकर यांनी विचार मांडले. या विषयावर बोलताना राजेश मानकर म्हणाले, आंबेडकरी आंदोलनात शहीद झालेल्यांमध्ये मातंग समाजाची संख्या अधिक आहे. त्यांची आर्थिकस्थिती दिवसागणिक खालावत चालली आहे. उस्ताद लहूजी साळवे, मुक्ता साळवे आणि अण्णाभाऊ साठेंचे हे अनुयायी जोपर्यंत बाबासाहेबांच्या विचारांची कास धरत नाही, तोपर्यंत त्यांना इतर समाजाच्या बरोबरीने येता येणार नाही. प्रगती केवळ आरक्षणाने शक्य नाही. त्यासाठी संघर्षाची गरज आहे, असे ते म्हणाले. यावेळी मंचावर ज्ञानेश्वर रायमल, अजय समरित, संजय कांबळे, मनोज रणखांब, इंदूताई कांबळे, सुनीता काळे आदी उपस्थित होते. (वार्ताहर)