शहरं
Join us  
Trending Stories
1
...म्हणून तर आज सीमेवर शांतता नव्हती ना? भारत-पाकिस्तान युद्धविरामावर DGMO आज चर्चा करणार
2
मृत्यूने गाठण्यापूर्वी 'ती' "मला जगायचंय" एवढेच म्हणत राहिली अन् अखेरचा घेतला श्वास
3
ट्रम्पनी म्हटलं खूप छान, चीननं केलं उलट काम; असं काय चाललंय ज्याचा भारतावर थेट होऊ शकतो परिणाम?
4
India Pakistan War:भारत - पाकिस्तानमधील तणाव निवळतोय, रात्री कोणताही हल्ला झाला नाही; लष्कराने दिली माहिती
5
भारत-पाकिस्तान तणाव कमी करण्यासाठी अमेरिकेनं खरंच मध्यस्थी केली? जाणून घ्या, पडद्यामागे नेमकं काय घडलं?
6
९ हवाई तळ उद्ध्वस्त, ४० सैनिक ठार; पाकचा विजयाचा दावा, पण भारताने जिरवली, पुराव्यासह उत्तर
7
मुलांसाठी Post Office ची खास स्कीम, गॅरंटीड रिटर्न; विमा कव्हरसह बोनसही, अनेकांना याबद्दल कल्पनाही नाही
8
कुठलाही भारतीय पायलट ताब्यात नाही, आमच्या एका विमानाचं नुकसान; पाक लष्कराची कबुली
9
आजचे राशीभविष्य १२ मे २०२५ : हरवलेली वस्तू अचानकपणे सापडेल, कोणाच्या नशिबात काय...
10
वहां से गोली चलेगी, तो यहां से गोला चलेगा: PM मोदी; लष्कराला मुभा, ऑपरेशन सिंदूर संपले नाही
11
भारताने बदला घेतला अन् पाकला ‘औकात’ दाखवली; पहलगामनंतर आतापर्यंत काय घडले? संपूर्ण घटनाक्रम
12
हेअर ट्रान्सप्लांट करणं इंजिनिअरच्या जीवावर बेतलं; इंफेक्शनमुळे मृत्यू, डॉक्टरवर गुन्हा दाखल
13
ऑपरेशन सिंदूर: रात्र शांततेत गेली, पण तणाव कायम; सीमाभागात जनतेस सतर्कतेचे आदेश
14
शस्त्रसंधीचे उल्लंघन करणे महागात; पाकचे १६ सैनिक ठार, ८ बंकर व ६ चौक्याही गमावल्या
15
गणपती बाप्पाच्या पुष्टिपती विनायक अवताराबाबत तुम्हाला माहिती आहे का? जाणून घ्या कथा
16
“भारत दहशतवादाविरुद्ध तडजोड करणार नाही, पाकच्या कुरापती...”; एकनाथ शिंदे थेट बोलले
17
अश्रूंच्या अक्षतांमध्ये चढली अभिमानाची वर्दी, हळदीच्या अंगाने गाठली युद्धभूमी!
18
युद्धविराम म्हणजे सुटका नाही! पाकवर दबाव कायम; भारताचे ‘ते’ ६ मोठे निर्णय अद्यापही लागू
19
युद्ध संपलं, तरी नागरी संरक्षण दल मुंबईत अलर्ट मोडवर; सोसायट्यांमध्ये मॉक-ड्रिल
20
मुंबईत महिनाभर फटाके, रॉकेट उडविण्यास पोलिसांची मनाई; ११ मे ते ९ जूनपर्यंत आदेश लागू

संघर्षाशिवाय पर्याय नाही

By admin | Updated: December 6, 2014 22:56 IST

त्याग आणि संघर्षाशिवाय उन्नती नाही, असा येथे आयोजित स्मृती पर्वातील परिसंवादाचा सूर होता. विविध वक्त्यांनी यावेळी आपले मत मांडले. यावेळी अध्यक्षस्थानी साहेबराव खडसे होते.

परिसंवाद : स्मृती पर्वात विविध विषयांवर मंथनयवतमाळ : त्याग आणि संघर्षाशिवाय उन्नती नाही, असा येथे आयोजित स्मृती पर्वातील परिसंवादाचा सूर होता. विविध वक्त्यांनी यावेळी आपले मत मांडले. यावेळी अध्यक्षस्थानी साहेबराव खडसे होते. विदर्भ तेली समाज महासंघ, गुरू रविदास विचार मंच, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मारक समितीच्या संयोजनात परिसंवाद घेण्यात आला. महाराष्ट्रात तेली समाजाची संख्या २० टक्के आहे. परंतु या समाजाला ओबीसी प्रवर्गातील सवलती मिळतात. समाजाची आर्थिक, राजकीय आणि शैक्षणिक स्थिती अतिशय दयनीय आहे. आरक्षणाचा टक्का वाढला तरच या समाजाची प्रगती शक्य आहे, असे सांगून महात्मा फुले, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे शैक्षणिक तथा सामाजिक विचार या समाजाने अंगिकारावे, असे मत विदर्भ तेली समाज महासंघाचे अध्यक्ष रमेश पिसे यांनी मांडले. ‘गुरू रविदासांचा वैज्ञानिक दृष्टिकोन’ या विषयावर आर.एम. चंदनकर, अमर तांडेकर, लोकेश मालखेडे यांनी विचार मांडले. ‘मातंग समाजाची शैक्षणिक अवस्था व फुले, आंबेडकर, अण्णाभाऊ साठेंची विचारधारा’ या विषयावर प्रा.बाळकृष्ण सरकटे, रामचंद्र भराळे, राजेश मानकर यांनी विचार मांडले. या विषयावर बोलताना राजेश मानकर म्हणाले, आंबेडकरी आंदोलनात शहीद झालेल्यांमध्ये मातंग समाजाची संख्या अधिक आहे. त्यांची आर्थिकस्थिती दिवसागणिक खालावत चालली आहे. उस्ताद लहूजी साळवे, मुक्ता साळवे आणि अण्णाभाऊ साठेंचे हे अनुयायी जोपर्यंत बाबासाहेबांच्या विचारांची कास धरत नाही, तोपर्यंत त्यांना इतर समाजाच्या बरोबरीने येता येणार नाही. प्रगती केवळ आरक्षणाने शक्य नाही. त्यासाठी संघर्षाची गरज आहे, असे ते म्हणाले. यावेळी मंचावर ज्ञानेश्वर रायमल, अजय समरित, संजय कांबळे, मनोज रणखांब, इंदूताई कांबळे, सुनीता काळे आदी उपस्थित होते. (वार्ताहर)