शहरं
Join us  
Trending Stories
1
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
2
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
3
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
4
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
5
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
6
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
7
Tarot Card: 'ऐकावे जनाचे, करावे मनाचे' याची प्रचिती देणारा आठवडा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य 
8
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
9
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
10
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
11
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
12
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
13
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
14
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
15
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
16
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
17
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
18
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
19
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
20
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

कोठूनच ग्राऊंड रिपोर्ट नाही, कृषी, आरोग्य, महसूलच्या कर्तव्यदक्षतेवर प्रश्नचिन्ह, कृषी सचिव संतापले 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2017 22:27 IST

संपूर्ण जिल्ह्यात फवारणीतून विषबाधेचे रुग्ण उपचारार्थ दाखल होत असताना गाव आणि तालुकास्तरावरील कृषी, आरोग्य, महसूल व पोलीसची यंत्रणा एवढी गाफील कशी राहिली, असा सवाल राज्याचे प्रधान कृषी सचिव बिजयकुमार यांनी विचारला. 

 - राजेश निस्ताने यवतमाळ - संपूर्ण जिल्ह्यात फवारणीतून विषबाधेचे रुग्ण उपचारार्थ दाखल होत असताना गाव आणि तालुकास्तरावरील कृषी, आरोग्य, महसूल व पोलीसची यंत्रणा एवढी गाफील कशी राहिली, असा सवाल राज्याचे प्रधान कृषी सचिव बिजयकुमार यांनी विचारला. पिकावर फवारणी करताना विषबाधा होऊन जिल्ह्यात आतापर्यंत १८ शेतकरी-शेतमजुरांचा मृत्यू झाला असून  ८०० जण बाधित झाले आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे प्रधान सचिव (कृषी) बिजयकुमार, कृषी आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह (पुणे) सोमवारी जिल्ह्यात धडकले. यावेळी त्यांनी आढावा बैठक घेतली. त्यात जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी आणि शासनाच्या जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाºयाला चांगलेच धारेवर धरले. तालुका स्तरावर कृषी अधिकारी, विस्तार अधिकारी, गाव स्तरावर कृषी सहायक आहेत. त्यांच्या सोबतीला समकक्ष आरोग्य, महसूल विभागाची यंत्रणा आहे. पोलिसांचीही गुप्तचर व खुफिया यंत्रणा कार्यरत आहेत. असे असताना यापैकी एकाही यंत्रणेने फवारणीतून विषबाधा होत असल्याबाबतचा ग्राऊंड रिपोर्ट जिल्हा कार्यालयाला सादर करू नये, याबाबत सचिवांनी आश्चर्य व्यक्त केले. जुलैपासून विषबाधेचे रुग्ण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हाभरातील ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय व प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारार्थ दाखल होत होते. परंतु प्रत्यक्षात या विषबाधा बळी व रुग्णांची चर्चा २५ सप्टेंबरनंतर होऊ लागली. यावरून गाव व तालुकास्तरावरील कृषी, आरोग्य, महसूल, पोलीस यंत्रणा किती गाफिल व निष्क्रीय असल्याचे स्पष्ट होते. फवारणीतून होणाºया विषबाधेचे बळी व रुग्ण संख्या दडपण्याचा तर या यंत्रणेचा इरादा नव्हता ना, अशी शंकाही व्यक्त केली जात आहे. सचिवांनी एसएओ आणि एडीओ यांच्या एकूणच कारभारावर व त्यांच्या विभागावर तीव्र नाराजी व्यक्त केल्याचे सांगितले जाते.  किटकनाशके सदोष तर नाही ? सचिवांची शंकाकृषी विभागाने जिल्ह्यात कृषी केंद्रांना कीटकनाशके विक्रीचा परवाना दिला आहे. परंतु त्या परवान्याआड या केंद्रांमधून वेगळेच औषध विकले तर जात नाही ना, अशी शंका कृषी सचिव व आयुक्तांनी बोलून दाखविली. परवानाधारक नेमके काय विकतो हे तपासण्याची जबाबदारी कृषीच्या यंत्रणेची नाही का, असा सवालही उपस्थित करण्यात आला. ‘पीकेव्ही’चे कुलगुरू, संचालक आहेत कुठे ?फवारणीमुळे होणारे मृत्यू राज्यभर गाजत असताना अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे (पीकेव्ही) उच्च पदस्थ अधिकारी मात्र अद्यापही यवतमाळकडे फिरकलेले नाही. वास्तविक आतापर्यंत पीकेव्हीचे कुलगुरू डॉ. विलास भाले, कीटकशास्त्र संशोधन संचालक डॉ. दिलीप मानकर यांच्या येथे भेटी अपेक्षित होत्या. मात्र पीकेव्हीचे उच्च पदस्थ अद्यापही विभाग प्रमुख व स्थानिक यंत्रणेवरच अवलंबून असल्याचे दिसते. रक्त चाचणी का नाही?जिल्ह्यात फवारणीतून झालेल्या विषबाधेच्या कोणत्याही रुग्णाच्या रक्त नमुन्याची अद्याप रासायनिक चाचणी करण्यात आलेली नाही. त्याबाबत कृषी विभागानेसुद्धा मागणी केल्याची नोंद नाही. ही चाचणी झाली असती तर कीटकनाशकातील नेमका कोणता घटक शरीरात भिनला याचे निदान लावणे व वापरलेल्या कीटकनाशकाच्या नमुन्यातील रासायनिक घटकांची पडताळणी करणे सहज शक्य झाले असते.

टॅग्स :Farmerशेतकरी