शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbra Train Accident: लोकल ट्रेनमधून पडले, किडे-मुंग्यांसारखा गेला जीव, मृत्यू झालेले कोण? नावे आली समोर
2
"देशात माणसांची किंमत नाही, रेल्वेमंत्र्यांनी तिथं जाऊन ..."; मुंबई लोकल दुर्घटनेवर राज ठाकरे संतापले
3
पती, पत्नी आणि हत्याकांड! राजा रघुवंशीप्रमाणेचे 'या' तरुणांचाही पत्नीने काढला काटा
4
मुंब्र्याच्या 'त्या' धोकादायक वळणाबाबत मनसे कार्यकर्त्याने दिलं होतं पत्र; अपघातात त्यानेच गमावले पाय
5
मुंब्रा अपघात: "प्रवाशांवरच त्यांच्या मृत्यूचे खापर फोडून चालणार नाही"; शरद पवारांचे रोखठोक मत
6
NCP अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्याचा मृतदेह स्वत:च्या कारमध्येच आढळला; नेमकं काय घडलं?
7
Mumbai Train Accident: "घटना दुर्दैवी, 'रेल्वे'कडून अपघाताची चौकशी सुरू"; मुख्यमंत्र्यांनी दिली महत्त्वाची माहिती
8
Raja Raghuvanshi :'सोनम माझ्यासोबत बोलत नाही, मला लग्न करायचं नाही'; लग्नाआधीच राजा रघुवंशीने आईला सांगितलं होतं
9
"दुआ लिपासोबत मुलं जन्माला घालायचीत", वादग्रस्त वक्तव्यावर बादशाहचं स्पष्टीकरण, म्हणाला...
10
IND vs ENG: 'तो बुमराहपेक्षाही भारी...' माजी क्रिकेटपटूनं घेतलं 'या' गोलंदाजाचं नाव!
11
Madhavi Latha : कष्टाचं फळ! १७ वर्षांच्या कठोर परिश्रमानंतर चिनाब पुलाचं स्वप्न साकार; कोण आहेत माधवी लता?
12
Swami Samartha: राशीनुसार करा स्वामींची उपासना मिळेल सुख-शांती आणि मिटेल वासना!
13
अचानक मुलगा बनला ८० कोटींचा मालक; १९९५ साली वडिलांनी खरेदी केले होते 'या' कंपनीचे शेअर्स
14
Raja Raghuvanshi : कोणी केला होता राजा रघुवंशीवर पहिला वार? खुनाच्या रात्री नेमकं काय घडलं? 
15
लग्नानंतर घरी कोणालाच बोलवलं नाही, कारण...; उषा नाडकर्णी म्हणाल्या - "घाणेरड्या बिल्डिंगमध्ये राहायला गेले आणि"
16
"प्रवाश्यांनी शिस्त पाळावी एवढीच विनंती"; किरीट सोमय्यांची मुंब्रा रेल्वे अपघातावर प्रतिक्रिया
17
'बेवफा सोनम'नंतर राज कुशवाहला अटक, पण खरा मारेकरी कोण? इंदूर पोलीस म्हणाले...
18
Mumbai Train Accident: ठाण्याजवळ रेल्वे दुर्घटना! धावत्या ट्रेनमधून ट्रॅकवर पडले प्रवासी, चार जणांचा मृत्यू; जखमींवर उपचार सुरु
19
ठाकरे बंधूंच्या युतीची चर्चा अन् थोड्याच वेळात मनसेचा एकनिष्ठ नेता करणार शिंदेसेनेत प्रवेश
20
UIDAI नं विद्यार्थ्यांसाठी आणली इंटर्नशिप ऑफर, महिन्याला मिळणार २० ते ५० हजार रुपये; कधी अर्ज करता येणार

आर्णीत कचरा उचलायला यंत्रणाच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2021 04:48 IST

आर्णी : ५० हजार लोकसंख्या असलेल्या आर्णी शहरात सध्या अस्वच्छतेचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. यासोबतच सध्या डेंग्यू, मलेरियाचा ...

आर्णी : ५० हजार लोकसंख्या असलेल्या आर्णी शहरात सध्या अस्वच्छतेचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. यासोबतच सध्या डेंग्यू, मलेरियाचा आजारही पसरत आहे. तरीही प्रशासन साफसफाईकडे दुर्लक्ष करीत आहे. कारण कचरा उचलण्यासाठी यंत्रणाच नाही.

आर्णी शहरात साथरोगाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळत आहे. ग्रामीण रुग्णालय, खासगी रुग्णालयात दररोज रुग्ण येत आहेत. प्रत्येक कुटुंबात एखादा रुग्ण, अशी भयावह परिस्थिती आहे. नगरपरिषदेकडून यावर पाहिजे तशी उपाययोजना होताना दिसत नाही. गंभीर म्हणजे, आर्णी नगर परिषदेला कायमस्वरुपी मुख्याधिकारी नाही. नगरपरिषदेकडून कचरा उचलण्यासाठी सात मालवाहू गाड्या आहेत. यापैकी दोन गाड्या बंद आहे. पाच गाड्यांच्या भरवशावर शहरातील कचरा उचलण्याचे काम सुरू आहे. यातही या पाच वाहनांवर चालक नाहीत. सफाई कर्मचारीच या गाड्या चालवीत आहेत. त्यामुळे दररोज कचरा उचलला जात नाही. एकदा कचरा उचलला की, तिथे परत तीन ते चार दिवस गाडी फिरकत नाही. शहरात अनेक ठिकाणी नाल्यांची सफाई नाही, कचराही रस्त्यावर पडलेला आहे. डेंग्यू, मलेरिया रोखण्यासाठी यावर ताबडतोब उपाययोजना करण्याची गरज आहे.

कोट

नगरपरिषदेकडे उपलब्ध असलेल्या यंत्रणेचा वापर करून दररोज कचरा उचलणे सुरू आहे. गाड्या कमी असल्याने प्रत्येक भागात दररोज कचरा उचलणे शक्य होत नाही.

- मंगला रमेश ठाकरे, आरोग्य सभापती, नगर परिषद आर्णी

कोट

शहरात साथरोग मोठ्या प्रमाणावर आहे. रुग्णालयात दररोज मेंदूज्वर, डेंग्यू, मलेरिया, निमोनिया अशा विविध आजारांचे शंभरावर रुग्ण येत आहेत. त्यामुळे लोकांनी काळजी घेणे गरजेचे आहे.

- डॉ. सुनील भवरे, वैद्यकीय अधीक्षक, ग्रामीण रुग्णालय आर्णी

200921\img_20210920_140209.jpg

आर्णीत शहरात पडलेला कचरा