शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
4
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
5
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
6
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
7
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
8
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
9
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
10
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
11
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
12
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
13
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
14
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
15
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
16
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
17
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
18
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
19
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
20
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता

गंभीर गुन्ह्यांतील पोलिसांना निलंबनमुक्ती नाहीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2019 14:01 IST

लाचलुचपत प्रतिबंधक खात्याचा ट्रॅप, बेहिशेबी मालमत्ता या सारख्या गंभीर गुन्ह्यातील पोलीस निरीक्षक व त्याखालील अधिकारी-कर्मचाऱ्यांना निलंबनमुक्त करण्यात येऊ नये, असे राज्याचे अपर पोलीस महासंचालक एस. जगन्नाथन यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केले आहे.

ठळक मुद्दे आढाव्याबाबत सुधारित मार्गदर्शक सूचना जारीअन्य गुन्ह्यांमध्ये मात्र दिलासा

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : लाचलुचपत प्रतिबंधक खात्याचा ट्रॅप, बेहिशेबी मालमत्ता या सारख्या गंभीर गुन्ह्यातील पोलीस निरीक्षक व त्याखालील अधिकारी-कर्मचाऱ्यांना निलंबनमुक्त करण्यात येऊ नये, असे राज्याचे अपर पोलीस महासंचालक एस. जगन्नाथन यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केले आहे. निलंबन आढाव्यासंबंधी सुधारित मार्गदर्शक सूचना त्यांनी १४ जूनच्या आदेशान्वये जारी केल्या.पोलीस निरीक्षक व त्या खालील दर्जाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या निलंबन प्रकरणात आढावा घेताना काय दक्षता घ्यावी, याबाबतच्या मार्गदर्शक सूचना एस. जगन्नाथन यांनी जारी केल्या आहेत. त्यानुसार बेहिशेबी मालमत्ता, नैतिक अध:पतन, लाचलुचपत, खून, खुनाचा प्रयत्न, बलात्कार यासारख्या गंभीर प्रकरणात फौजदारी गुन्हा दाखल झाल्यामुळे अथवा गैरवर्तन, कसुरीमुळे निलंबन कारवाई केली जाते. अशा प्रकरणात विभागीय चौकशी किंवा न्यायालयीन प्रकरण निकाली निघत नाही तोपर्यंत संबंधित पोलीस अधिकारी, कर्मचाºयाला निलंबनमुक्त करण्यात येऊ नये, अशा स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत. ‘उपरोक्त गुन्ह्यांव्यतिरिक्त’ अन्य प्रकरणात दाखल गुन्ह्यातील न्याय निर्णयाची प्रतीक्षा न करता विभागीय चौकशी लवकरात लवकर पूर्ण करून त्याबाबतचा अंतिम निर्णय घेण्यात यावा, असे अपर पोलीस महासंचालक एस. जगन्नाथन यांनी राज्यातील सर्व पोलीस प्रमुखांना कळविले आहे .कुणाच्या येरझारा, कुणाची फिल्डींगराज्यात दरदिवशी कुठे ना कुठे ट्रॅप, बेहिशेबी मालमत्तेचा गुन्हा दाखल होतो. त्यात पोलिसांची संख्या अधिक राहते. शिवाय पोलिसांच्या वर्तणुकीबाबत नेहमीच जनतेतून ओरड केली जाते. दारू पिऊन धिंगाणा घालण्याचे प्रकार नेहमीच घडतात. अशा प्रकरणात त्यांना निलंबित केले जाते. मग हे पोलीस अधिकारी निलंबन तातडीने रद्द व्हावे म्हणून प्रयत्न करतात. कुणी पोलीस महासंचालक कार्यालयाच्या येरझारा मारतो, तर कुणी राजकीय नेत्यांमार्फत फिल्डींग लावतो. म्हणून नेमक्या कोणत्या गुन्ह्यातील सहभागी पोलिसांचा निलंबनमुक्त करण्याबाबत विचार करू नये व कोणत्या प्रकरणात करावा, याबाबत स्पष्ट मार्गदर्शक सूचना नव्याने जारी करण्यात आल्या आहेत.मार्गदर्शक सूचनांमध्ये सुधारणासर्वोच्च न्यायालयाने अशोककुमार अग्रवाल, संजीव राजन, एन. श्रीनिवास, दीपककुमार भोला, खेमचंद, आर.पी. कपूर आणि व्ही.पी. गिद्रोनिया या प्रकरणात कायद्याची स्थायिक स्थिती ठरवून दिली आहे. त्यानुसार मार्गदर्शक सूचनांमध्ये सुधारणा करण्याचे पोलीस महासंचालक कार्यालयाच्या विचाराधीन होते. अखेर १४ जूनला या सुधारित मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या.

टॅग्स :Policeपोलिस