शहरं
Join us  
Trending Stories
1
Cough Syrup Case : विषारी 'कोल्ड्रिफ' कफ सिरप बनवणाऱ्या कंपनीच्या मालकाला अटक! औषध प्यायल्याने २० मुलांचा मृत्यू
2
तेजस्वी मुख्य चेहरा, एक-दोन नव्हे तर एवढे उपमुख्यमंत्री...! बिहारमध्ये महाआघाडीनं तयार केला जागा वाटपाचा असा फॉर्म्यूला
3
बिहार निवडणुकीपूर्वी NDA मध्ये रस्सीखेच; स्वत:ला मोदींचा हनुमान म्हणवणारा नेता का आहे नाराज?
4
अफगाणिस्तानचे परराष्ट्र मंत्री पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर; भारतीय अधिकाऱ्यांसमोर मोठा पेच, कारण काय?
5
पुण्यात पुन्हा दहशतवादी?; ATS आणि पुणे पोलिसांकडून कोंढवा परिसरात रात्रभर सर्च ऑपरेशन
6
इस्रायल-हमास शांतता करार: डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा दोघांचीही सही मिळविली, युद्ध थांबणार?
7
आजचे राशीभविष्य-९ ऑक्टोबर २०२५: आनंदोत्सव साजरा करण्याचा दिवस; व्यवसाय-नोकरीत होईल लाभ!
8
दोन शिवसेनेतल्या सततच्या भांडणांचा फायदा कोणाला?
9
संपादकीय: दिलासा तूर्त, चिंता शाश्वत! कर्जमाफीचा उच्चार न करता दिलेले पॅकेज...
10
पाकवर हल्ला कोणाच्या सांगण्यामुळे राेखला? पंतप्रधान नरेंद्र माेदी यांचा काॅंग्रेसला सवाल
11
उद्योगांवर विजेचा ‘गुपचुप’ हल्ला, राज्यात स्थिती आणखी बिकट; प्रति युनिट दर ११.१५ रुपयांवर 
12
वाहनचालकांनो सावधान! विना हेल्मेट, राँग साइड, प्रखर दिव्यांविरुद्ध कठोर कारवाई करा : सुप्रीम कोर्ट
13
इलेक्ट्रिक कार विक्रीत दुप्पट वाढ; सप्टेंबरमध्ये नवा विक्रम; १५ हजार इव्हींची विक्री
14
‘६० कोटी जमा करा, मग याचिकेवर विचार’; शिल्पा शेट्टीवर न्यायालय संतापले...
15
शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाण कुणाचा? १२ नोव्हेंबरला सुनावणी   
16
भाजपकडून लोकप्रिय चेहऱ्यांना संधी; गायिका मैथिलीस पक्षाची उमेदवारी? डॅमेज कंट्रोल मोड ऑन
17
एक जीबी डेटा आता चहाच्या एका कपापेक्षाही स्वस्त झाला आहे : मोदी
18
आता स्मार्ट चष्म्याने पाहा, बोला अन् पैसे द्या; फोनशिवाय अन् पिन न टाकता करता येणार व्यवहार 
19
प्रा. कितागावा, रॉबसन अन् याघी यांना नोबेल; मेटल-ऑर्गेनिक फ्रेमवर्कसाठी रसायनशास्त्रातील पुरस्कार 
20
भारताशी युद्ध झाल्यास आम्हीच बाजी मारणार; पाकचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची दर्पोक्ती

गंभीर गुन्ह्यांतील पोलिसांना निलंबनमुक्ती नाहीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2019 14:01 IST

लाचलुचपत प्रतिबंधक खात्याचा ट्रॅप, बेहिशेबी मालमत्ता या सारख्या गंभीर गुन्ह्यातील पोलीस निरीक्षक व त्याखालील अधिकारी-कर्मचाऱ्यांना निलंबनमुक्त करण्यात येऊ नये, असे राज्याचे अपर पोलीस महासंचालक एस. जगन्नाथन यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केले आहे.

ठळक मुद्दे आढाव्याबाबत सुधारित मार्गदर्शक सूचना जारीअन्य गुन्ह्यांमध्ये मात्र दिलासा

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : लाचलुचपत प्रतिबंधक खात्याचा ट्रॅप, बेहिशेबी मालमत्ता या सारख्या गंभीर गुन्ह्यातील पोलीस निरीक्षक व त्याखालील अधिकारी-कर्मचाऱ्यांना निलंबनमुक्त करण्यात येऊ नये, असे राज्याचे अपर पोलीस महासंचालक एस. जगन्नाथन यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केले आहे. निलंबन आढाव्यासंबंधी सुधारित मार्गदर्शक सूचना त्यांनी १४ जूनच्या आदेशान्वये जारी केल्या.पोलीस निरीक्षक व त्या खालील दर्जाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या निलंबन प्रकरणात आढावा घेताना काय दक्षता घ्यावी, याबाबतच्या मार्गदर्शक सूचना एस. जगन्नाथन यांनी जारी केल्या आहेत. त्यानुसार बेहिशेबी मालमत्ता, नैतिक अध:पतन, लाचलुचपत, खून, खुनाचा प्रयत्न, बलात्कार यासारख्या गंभीर प्रकरणात फौजदारी गुन्हा दाखल झाल्यामुळे अथवा गैरवर्तन, कसुरीमुळे निलंबन कारवाई केली जाते. अशा प्रकरणात विभागीय चौकशी किंवा न्यायालयीन प्रकरण निकाली निघत नाही तोपर्यंत संबंधित पोलीस अधिकारी, कर्मचाºयाला निलंबनमुक्त करण्यात येऊ नये, अशा स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत. ‘उपरोक्त गुन्ह्यांव्यतिरिक्त’ अन्य प्रकरणात दाखल गुन्ह्यातील न्याय निर्णयाची प्रतीक्षा न करता विभागीय चौकशी लवकरात लवकर पूर्ण करून त्याबाबतचा अंतिम निर्णय घेण्यात यावा, असे अपर पोलीस महासंचालक एस. जगन्नाथन यांनी राज्यातील सर्व पोलीस प्रमुखांना कळविले आहे .कुणाच्या येरझारा, कुणाची फिल्डींगराज्यात दरदिवशी कुठे ना कुठे ट्रॅप, बेहिशेबी मालमत्तेचा गुन्हा दाखल होतो. त्यात पोलिसांची संख्या अधिक राहते. शिवाय पोलिसांच्या वर्तणुकीबाबत नेहमीच जनतेतून ओरड केली जाते. दारू पिऊन धिंगाणा घालण्याचे प्रकार नेहमीच घडतात. अशा प्रकरणात त्यांना निलंबित केले जाते. मग हे पोलीस अधिकारी निलंबन तातडीने रद्द व्हावे म्हणून प्रयत्न करतात. कुणी पोलीस महासंचालक कार्यालयाच्या येरझारा मारतो, तर कुणी राजकीय नेत्यांमार्फत फिल्डींग लावतो. म्हणून नेमक्या कोणत्या गुन्ह्यातील सहभागी पोलिसांचा निलंबनमुक्त करण्याबाबत विचार करू नये व कोणत्या प्रकरणात करावा, याबाबत स्पष्ट मार्गदर्शक सूचना नव्याने जारी करण्यात आल्या आहेत.मार्गदर्शक सूचनांमध्ये सुधारणासर्वोच्च न्यायालयाने अशोककुमार अग्रवाल, संजीव राजन, एन. श्रीनिवास, दीपककुमार भोला, खेमचंद, आर.पी. कपूर आणि व्ही.पी. गिद्रोनिया या प्रकरणात कायद्याची स्थायिक स्थिती ठरवून दिली आहे. त्यानुसार मार्गदर्शक सूचनांमध्ये सुधारणा करण्याचे पोलीस महासंचालक कार्यालयाच्या विचाराधीन होते. अखेर १४ जूनला या सुधारित मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या.

टॅग्स :Policeपोलिस