शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
2
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
3
“कुणीही एकत्र येऊ शकते, पण मराठी माणूस हा पूर्णपणे भाजपाच्या पाठीशी उभा आहे”; कुणाचा दावा?
4
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
5
घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयची धडपड; बाजारात विकले तब्बल....अब्ज डॉलर
6
सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले, आज सर्व जुने रेकॉर्ड मोडले! पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेटपर्यंतचे 'लेटेस्ट रेट'
7
मृत्यूच्या खोलीतलं 'ते' भयंकर 'सत्य'! अभिषेकने भिंतीवर का चिटकवले सोनमचे फोटो आणि चॅट्स?
8
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधूंबद्दलही बरंच बोलले
9
IND W vs SL W 2nd T20I Live Streaming : कॅप्टन हरमनप्रीतची नाराजी दूर करण्यासाठी मैदानात उतरणार टीम इंडिया!
10
इराणमध्ये नवीन संकट येणार! ७ लाख वर्षांपासून निष्क्रिय असलेला ज्वालामुखी उद्रेकाच्या तयारीत
11
“आमचा लढा भाजपाशी नाही, तर...”; जर्मनीत राहुल गांधींचे मोठे विधान, मतचोरीवरही स्पष्ट भाष्य
12
ना मंदिर, ना मूर्तिपूजा; संपूर्ण शरीरावर फक्त 'रामनाम', या आदिवासी समाजाची अनोखी परंपरा
13
'प्रियंका गांधींना पंतप्रधान बनवा', काँग्रेस नेत्याची मागणी; राहुल गांधींचे काय होणार? म्हणाले...
14
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
15
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
16
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
17
ज्ञानदा रामतीर्थकरचं लग्न ठरलं! अभिनेत्रीने गुपचूप साखरपुडाही केला, आता लवकरच होणार शुभमंगल सावधान
18
Astrology: नावात बरंच काही आहे! बाळाचे नाव ठेवताना 'ही' काळजी घ्या, नाहीतर लोक नावं ठेवतील
19
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
20
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रवादी वाढविण्यासाठी विदर्भात प्रयत्न झाले नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2017 23:25 IST

राष्ट्रवादी काँग्रेस विदर्भात वाढविण्यासाठी फार कष्ट घेतले नाही, याची खंत आहे. मात्र आता ही पोकळी आम्ही भरून काढू, असा विश्वास खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केला.

ठळक मुद्देसुप्रिया सुळे यांची खंत : पोकळी भरून काढणार

गजानन अक्कलवार ।ऑनलाईन लोकमत कळंब : राष्ट्रवादी काँग्रेस विदर्भात वाढविण्यासाठी फार कष्ट घेतले नाही, याची खंत आहे. मात्र आता ही पोकळी आम्ही भरून काढू, असा विश्वास खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केला. राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे काढण्यात आलेली हल्लाबोल पदयात्रा शनिवारी येथे दाखल झाली. यावेळी त्यांनी प्रस्तुत प्रतिनिधीशी बातचित केली.यावेळी त्यांनी विविध विषयांना हात घातला. भाजपाला राष्ट्रवादीचा छुपा पाठींबा असल्याची शंका वारंवार घेतली जाते. परंतु, या सरकारविरूद्ध राष्टÑवादीनेच वारंवार आवाज उठविला. सरकारच्या धोरणांवर अनेकदा टिका केली. शिवसेना वेळेवर शेपूट घालणारा पक्ष आहे. सरकारमध्ये राहून सरकारविरूद्ध भूमिका घेताना आम्ही कधी पाहीले नाही. सरकारमधून बाहेर पडण्याची हिंमत शिवसेनेत नाही, असा त्यानी खासदार सुळे यांनी केला.या शासनाने गरिबांची थट्टा चालविली आहे. कर्जमाफीवरून शेतकºयांना जेरीस आणले जात आहे. कीटकनाशकांच्या फवारणीतून झालेल्या विषबाधाप्रकरणी शासन संवेदनाशून्य आहे. मुख्यमंत्री यवतमाळात लपून येतात व कोणाशीही न बोलता निघून जातात. यावरून या शासनाची असंवेदनशिलता अधोरेखित होते. आता झोपेचे सोंग घेतलेल्या शासनाला जागे करण्यासाठी हल्लाबोल आंदोलन सुरु करण्यात आले, असे त्यांनी स्पष्ट केले. यवतमाळ जिल्ह्यात सर्वाधिक शेतकºयांच्या आत्महत्या झाल्या. फवारणीतून विषबाधा झाल्याने अनेक शेतकरी मृत्युमुखी पडले. त्यामुळे हे आंदोलन यवतमाळातून सुरू करण्यात आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.विषबाधेतून मृत्युमुखी पडलेल्यांना दोन लाखांचा धनादेश देऊन सरकारने आपली जबाबदारी झटकली. परंतु राष्टÑवादी मात्र आधार देण्याचे काम करणार आहे. काल एका कुटुंबाची संपूर्ण जबाबदारी घेण्याची भूमिका पक्षाने घेतली. सरकारनेही इतर कुटुंबांची जबाबदारी घेतली पाहिजे, असे त्यांनी सांगितले. यवतमाळमधये कृषि विभागात ५०% जागा रिक्त आहे. याला कोण जबाबदार आहे, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. मुख्यमंत्र्यांनी सर्व शेतकºयांना सुरक्षा कोट देण्याचे आश्वासन दिले होते. परंतु ते पूर्ण केले नाही. त्यामुळे या सरकराच्या थापांना यापुढे बळी पडू नका, असे आवाहन त्यांनी केले.शिवसेनेच्या दुटप्पी भूमिकेचा समाचारशिवसेना अथवा त्यांच्या मंत्र्यांनी केलेली पाच चांगली कामे सांगावी, असे आव्हान सुप्रिया सुळे यांनी दिले. महाराष्टÑाच्या उभारणीत शिवसेनेचे योगदान काय ?, असा सवाल करीत त्यांनी शिवसेनेच्या दुट्टप्पी भूमिकेचा चांगलाच समाचार घेतला.केंद्र व राज्य सरकार आश्वासन विसरलेमागील तीन वर्षात केंद्र व राज्य सरकारने एकही आश्वासन पूर्ण केले नाही. त्यामुळेच सर्वसामान्यांच्या प्रश्नांवर सरकारला जागे करण्यासाठी हल्लाबोल पदयात्रा सुरू करण्यात आल्याचे खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या.

टॅग्स :Supriya Suleसुप्रिया सुळे