शहरं
Join us  
Trending Stories
1
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
2
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
3
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
4
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
5
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण
6
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
7
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
8
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
9
बाजार सपाट पातळीवर बंद; रिलायन्सचा शेअर पुन्हा आला धावून, 'या' सेक्टरवर दबाव
10
ATM मधून वारंवार पैसे काढायची सवय असेल तर ती बदला, नाहीतर १ मे पासून होईल नुकसान
11
अण्वस्त्रांची धमकी देणाऱ्या पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांचे तोंड भारताने केले बंद; एक्स अकाउंटवर घातली बंदी
12
Viral Video: बिबट्या थेट पोलीस ठाण्यातच आला! पोलिसाने पाहिलं, पण नंतर काय घडलं?
13
इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी देण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
14
...म्हणून मुलाचं नाव बॉबी ठेवलं! किशोरी शहाणेंनी सांगितलं कारण, म्हणाल्या- "मी मराठी, नवरा पंजाबी आणि सासू..."
15
Mumbai Accident: ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न अंगलट; दुचाकीवर पाठी बसलेल्या तरुणीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू
16
पाकिस्तानने कुठे लपवलाय अण्वस्त्रांचा साठा? 'या' अहवालाने केली पाकची पोलखोल...
17
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
18
डॉलरच्या तुलनेत रुपयाची जोरदार कामगिरी; आशियातील सर्वात मजबूत चलन, ही आहेत ५ कारणे
19
टक्केवारीच्या आरोपानंतर परभणीचे जिल्हा नियोजन अधिकारी कार्यमुक्त; अधिकाऱ्यांमध्ये खळबळ
20
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  

२१३ जलाशयांमध्ये थेंबही उरला नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2019 21:39 IST

जिल्ह्यातील पाणीटंचाईची स्थिती गंभीर आहे. जिल्हा परिषदेची २१३ जलाशये कोरडी पडली आहेत. तर पाटबंधारे विभागाच्या १३ लघु प्रकल्पांनी तळ गाठला आहे. टंचाई निवारणासाठी ६२ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले. तर पाण्याचे स्त्रोत नसणाऱ्या १९ गावांना टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे.

ठळक मुद्देसंडे अँकर । ७५५ गावांमध्ये पाणीटंचाई, ६२ विहिरींचे अधिग्रहण, १९ टँकरने पाणीपुरवठा

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्ह्यातील पाणीटंचाईची स्थिती गंभीर आहे. जिल्हा परिषदेची २१३ जलाशये कोरडी पडली आहेत. तर पाटबंधारे विभागाच्या १३ लघु प्रकल्पांनी तळ गाठला आहे. टंचाई निवारणासाठी ६२ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले. तर पाण्याचे स्त्रोत नसणाऱ्या १९ गावांना टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. प्रकल्पामध्ये केवळ २३ टक्के जलसाठा आहे. यामुळे भूजलाच्या पातळीत घट नोंदविण्यात आली आहे.जिल्ह्यातील २०४० गावापैकी ७५५ गावांमध्ये पाणीटंचाई आहे. जिल्हा प्रशासनाने साडेचार कोटी रूपयांचा पाणीटंचाई कृती आराखडा मंजूर केला आहे. या माध्यमातून विहीर अधिग्रहण, खोलीकरण, गाळ काढणे, झिरी घेणे, नळ योजनेची विशेष दुरूस्ती करणे, नवीन सिंचन विहिरी घेणे, हातपंप दुरूस्त करणे, विद्युत पंप लावणे ही कामे जिल्हा परिषदेने प्रस्तावित केली आहे.मेच्या पहिल्या आठवड्यात ८१ गावांमधील भीषण पाणीटंचाई निवारण्यासाठी उपाययोजना करण्यात आल्या आहेत. यामध्ये ६२ गावात विहिरी अधिग्रहित करण्यात आल्या. यामध्ये वणी ९, दारव्हा ८, पुसद ९, नेर १०, यवतमाळ १४, बाभूळगाव २ तर आर्णीमध्ये १० विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले.१९ गावांत टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. यामध्ये बाभूळगाव २, पुसद ७, नेर ३, आर्णी १, महागाव १ आणि यवतमाळ तालुक्यात ३ टँकरच्या मदतीने पाणी पुरवठा सुरू करण्यात आला आहे. इतर ठिकाणावरून मागणी येताच पाहणी करून तत्काळ उपाययोजना करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने दिले आहेत. जिल्हा परिषदेच्या अखत्यारीतील २१३ पाझर तलाव कोरडे पडले आहेत. जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही निर्माण झाला आहे.यवतमाळ शहरात कृत्रिम पाणीटंचाईजिल्ह्यात भीषण टंचाई असताना जिल्हा मुख्यालयाचे ठिकाण असलेल्या यवतमाळ शहरातही टंचाई भेडसावत आहे. शहराला पाणीपुरवठा करणाºया निळोणा प्रकल्पात २८ आणि चापडोह प्रकल्पात ५५ टक्के जलसाठा आहे. गतवर्षी मृतसाठाही संपला होता. गतवर्षीच्या तुलनेत मुबलक पाणी असूनही प्राधिकरणाचे वेळापत्रक सतत कोलमडत आहे. यामुळे नागरिकांना पाणीटंचाई सहन करावी लागत आहे.जिल्ह्याची भिस्त केवळ २३ टक्के जलसाठ्यावरजिल्ह्याच्या मोठ्या, मध्यम आणि लघु प्रकल्पात २३ टक्के जलसाठा शिल्लक आहे. पूस २७.५०, अरूणावती १४.२० , बेंबळा ३३.७३, तर अडाण १४.१, नवरगाव ३७.७४, गोकी २४.१२, वाघाडी २२.१०, सायखेडा २२.४८, अधरपूस २४.५० तर बोरगाव प्रकल्पात १२.१५ टक्के जलसाठा शिल्लक आहे. याच मोजक्या जलसाठ्यावर जिल्ह्यातील ग्रामीण भागाची भिस्त आहे.पाटबंधारेचे १३ तलाव कोरडेपाटबंधारे विभागच्या अखत्यारीतील ६३ प्रकल्पांपैकी १३ लघु प्रकल्प कोरडे पडले आहे. यामध्ये उमर्डा, हातोला, लोहतवाडी, नेर, देवगाव, रुई, इटाळा, किन्ही, पहूर (ई), म्हैसदोडका, बोर्डा, तरोडा, पोफाळी या प्रकल्पांचा समावेश आहे. उर्वरित ५० प्रकल्पांमध्येही केवळ १५ टक्के पाणी शिल्लक आहे.

टॅग्स :water shortageपाणीटंचाई