शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK Final : "ते स्वतः स्ट्राइकवर येऊन..." PM मोदींसंदर्भात नेमकं काय म्हणाला सूर्यकुमार यादव?
2
विघ्नहर्ता बाप्पा संकटात धावला! श्री सिद्धीविनायक मंदिर अतिवृष्टीबाधितांसाठी १० कोटी देणार
3
ठाकरे बंधू अधिकृतपणे एकत्र येण्याआधीच ठाकरे गट-मनसेत महापौर पदावरून रस्सीखेच? नेत्यांचे दावे
4
“देवाभाऊ जाहिरातींचा खर्च पूरग्रस्तांना द्यायला हवा होता”; ठाकरे गटाचा भाजपावर पलटवार
5
Video - गरबा खेळताना हार्टअटॅक! नवऱ्यासोबत नाचताना पडली अन्...; ४ महिन्यांपूर्वी झालेलं लग्न
6
मंदिराजवळ कुणी बिगर हिंदू प्रसाद विकत असेल तर त्याला...; साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांचं वादग्रस्त विधान
7
करुर येथील चेंगराचेंगरीसाठी पोलिसांनी विजयला ठरवले जबाबदार, म्हणाले तो सभेला जाणीवपूर्वक उशिरा आला कारण...
8
संवेदनशील पूर परिस्थितीत एसटी मुख्यालयात हजर नसलेल्या ३४ आगार प्रमुखांवर कारवाई होणार!
9
"सूर्यकुमारने माझ्याशी दोन वेळा हस्तांदोलन केले, पण जगासमोर..."; पाकिस्तानी कर्णधाराचा दावा
10
मौलाना तौकीर रजा, पेट्रोल बॉम्ब, अवैध शस्त्रास्त्रं अन्...; FIR मध्ये पोलिसांनी केले मोठे खुलासे, तुम्हालाही धक्का बसेल!
11
Tamil Nadu Stampede: हेमा मालिनींच्या नेतृत्वात एनडीएचे शिष्टमंडळ करणार ४१ जणांच्या मृत्यूची चौकशी; पीडित कुटुंबांची घेणार भेट
12
Navratri 2025: नवरात्रीचे शेवटचे दोन दिवस महत्त्वाचे; घरी कुंकुमार्चन करून मिळवा देवी कृपा!
13
"राहुल गांधींच्या केसाला धक्का लावाल तर याद राखा’’, गोळ्या झाडण्याच्या धमकीनंतर काँग्रेसचा इशारा 
14
शाब्बास पोरा! ६ वेळा नापास, ३ वेळा UPSC क्रॅक; शेतकरी वडिलांच्या सल्ल्याने लेक झाला IPS
15
Navratri 2025: अश्विन शुद्ध सप्तमीला सरस्वतीला आवाहन आणि दशमीला पूजन; ३ दिवसांचा शारदोत्सव का?
16
सलग ७ व्या दिवशी शेअर बाजारात पडझड! तरीही गुंतवणूकदारांनी कमावले १.१८ लाख कोटी! काय आहे कारण?
17
ट्रम्प टॅरिफचा परिणाम नाही! 'या' मल्टीबॅगर स्टॉकला लागलं अपर सर्किट; १ वर्षात ११२१% चा रिटर्न
18
ऐश्वर्याला पाहताच चाहती भावुक झाली, रडायलाच लागली अन्...; अभिनेत्रीच्या कृतीचं होतंय कौतुक
19
खोल, अंधाऱ्या विहिरीत पडली महिला, तब्बल ५४ तास दिली मृत्यूशी झुंज, अखेरीस...  
20
"...तर विचारधारा बदलत नाही"; RSS च्या व्यासपीठावर जाण्यास कमलताईंचा नकार, पण मुलगा राजेंद्र गवईंची वेगळी भूमिका

२१३ जलाशयांमध्ये थेंबही उरला नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2019 21:39 IST

जिल्ह्यातील पाणीटंचाईची स्थिती गंभीर आहे. जिल्हा परिषदेची २१३ जलाशये कोरडी पडली आहेत. तर पाटबंधारे विभागाच्या १३ लघु प्रकल्पांनी तळ गाठला आहे. टंचाई निवारणासाठी ६२ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले. तर पाण्याचे स्त्रोत नसणाऱ्या १९ गावांना टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे.

ठळक मुद्देसंडे अँकर । ७५५ गावांमध्ये पाणीटंचाई, ६२ विहिरींचे अधिग्रहण, १९ टँकरने पाणीपुरवठा

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्ह्यातील पाणीटंचाईची स्थिती गंभीर आहे. जिल्हा परिषदेची २१३ जलाशये कोरडी पडली आहेत. तर पाटबंधारे विभागाच्या १३ लघु प्रकल्पांनी तळ गाठला आहे. टंचाई निवारणासाठी ६२ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले. तर पाण्याचे स्त्रोत नसणाऱ्या १९ गावांना टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. प्रकल्पामध्ये केवळ २३ टक्के जलसाठा आहे. यामुळे भूजलाच्या पातळीत घट नोंदविण्यात आली आहे.जिल्ह्यातील २०४० गावापैकी ७५५ गावांमध्ये पाणीटंचाई आहे. जिल्हा प्रशासनाने साडेचार कोटी रूपयांचा पाणीटंचाई कृती आराखडा मंजूर केला आहे. या माध्यमातून विहीर अधिग्रहण, खोलीकरण, गाळ काढणे, झिरी घेणे, नळ योजनेची विशेष दुरूस्ती करणे, नवीन सिंचन विहिरी घेणे, हातपंप दुरूस्त करणे, विद्युत पंप लावणे ही कामे जिल्हा परिषदेने प्रस्तावित केली आहे.मेच्या पहिल्या आठवड्यात ८१ गावांमधील भीषण पाणीटंचाई निवारण्यासाठी उपाययोजना करण्यात आल्या आहेत. यामध्ये ६२ गावात विहिरी अधिग्रहित करण्यात आल्या. यामध्ये वणी ९, दारव्हा ८, पुसद ९, नेर १०, यवतमाळ १४, बाभूळगाव २ तर आर्णीमध्ये १० विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले.१९ गावांत टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. यामध्ये बाभूळगाव २, पुसद ७, नेर ३, आर्णी १, महागाव १ आणि यवतमाळ तालुक्यात ३ टँकरच्या मदतीने पाणी पुरवठा सुरू करण्यात आला आहे. इतर ठिकाणावरून मागणी येताच पाहणी करून तत्काळ उपाययोजना करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने दिले आहेत. जिल्हा परिषदेच्या अखत्यारीतील २१३ पाझर तलाव कोरडे पडले आहेत. जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही निर्माण झाला आहे.यवतमाळ शहरात कृत्रिम पाणीटंचाईजिल्ह्यात भीषण टंचाई असताना जिल्हा मुख्यालयाचे ठिकाण असलेल्या यवतमाळ शहरातही टंचाई भेडसावत आहे. शहराला पाणीपुरवठा करणाºया निळोणा प्रकल्पात २८ आणि चापडोह प्रकल्पात ५५ टक्के जलसाठा आहे. गतवर्षी मृतसाठाही संपला होता. गतवर्षीच्या तुलनेत मुबलक पाणी असूनही प्राधिकरणाचे वेळापत्रक सतत कोलमडत आहे. यामुळे नागरिकांना पाणीटंचाई सहन करावी लागत आहे.जिल्ह्याची भिस्त केवळ २३ टक्के जलसाठ्यावरजिल्ह्याच्या मोठ्या, मध्यम आणि लघु प्रकल्पात २३ टक्के जलसाठा शिल्लक आहे. पूस २७.५०, अरूणावती १४.२० , बेंबळा ३३.७३, तर अडाण १४.१, नवरगाव ३७.७४, गोकी २४.१२, वाघाडी २२.१०, सायखेडा २२.४८, अधरपूस २४.५० तर बोरगाव प्रकल्पात १२.१५ टक्के जलसाठा शिल्लक आहे. याच मोजक्या जलसाठ्यावर जिल्ह्यातील ग्रामीण भागाची भिस्त आहे.पाटबंधारेचे १३ तलाव कोरडेपाटबंधारे विभागच्या अखत्यारीतील ६३ प्रकल्पांपैकी १३ लघु प्रकल्प कोरडे पडले आहे. यामध्ये उमर्डा, हातोला, लोहतवाडी, नेर, देवगाव, रुई, इटाळा, किन्ही, पहूर (ई), म्हैसदोडका, बोर्डा, तरोडा, पोफाळी या प्रकल्पांचा समावेश आहे. उर्वरित ५० प्रकल्पांमध्येही केवळ १५ टक्के पाणी शिल्लक आहे.

टॅग्स :water shortageपाणीटंचाई