शहरं
Join us  
Trending Stories
1
Amit Shah: इतक्या वर्षांत महाराष्ट्रासाठी, मुंबईसाठी तुम्ही काय केले? अमित शाहांची काँग्रेसवर टीका
2
आजचे राशीभविष्य - २१ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना आज सामाजिक, आर्थिक तसेच कौटुंबिक क्षेत्रात लाभ होतील
3
Iran Israel War : इराण मागे हटेना! अमेरिकेसोबत बोलण्यास नकार, इस्त्रायलने अनेक इराणी लष्करी तळ उद्ध्वस्त केले
4
Nana Patole: निवडणुकीच्या 'या' नियमात मोठा बदल; पटोलेंचा केंद्र अन् निवडणूक आयोगाला थेट सवाल!
5
लोकलमध्ये दोन महिलांत डोकं फुटेपर्यंत हाणामारी; नेमकं कशामुळं पेटलं भांडण? खरं कारण आलं समोर
6
Nagpur: राजधानी एक्सप्रेसवर दगडफेक, प्रवाशांमध्ये दहशत 
7
Elections: आगामी निवडणुका एकत्र की स्वतंत्र? महाआघाडीमध्ये अद्यापही सूर जुळेना!
8
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
9
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
10
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
11
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
12
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
13
International Yoga Day: देशभरात आज साकारणार विश्वविक्रमी योग!
14
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
15
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
16
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
17
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
18
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
19
Tejasvee Ghosalkar: तेजस्वी घोसाळकर मुंबै बँकेच्या संचालकपदी
20
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना

२१३ जलाशयांमध्ये थेंबही उरला नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2019 21:39 IST

जिल्ह्यातील पाणीटंचाईची स्थिती गंभीर आहे. जिल्हा परिषदेची २१३ जलाशये कोरडी पडली आहेत. तर पाटबंधारे विभागाच्या १३ लघु प्रकल्पांनी तळ गाठला आहे. टंचाई निवारणासाठी ६२ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले. तर पाण्याचे स्त्रोत नसणाऱ्या १९ गावांना टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे.

ठळक मुद्देसंडे अँकर । ७५५ गावांमध्ये पाणीटंचाई, ६२ विहिरींचे अधिग्रहण, १९ टँकरने पाणीपुरवठा

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्ह्यातील पाणीटंचाईची स्थिती गंभीर आहे. जिल्हा परिषदेची २१३ जलाशये कोरडी पडली आहेत. तर पाटबंधारे विभागाच्या १३ लघु प्रकल्पांनी तळ गाठला आहे. टंचाई निवारणासाठी ६२ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले. तर पाण्याचे स्त्रोत नसणाऱ्या १९ गावांना टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. प्रकल्पामध्ये केवळ २३ टक्के जलसाठा आहे. यामुळे भूजलाच्या पातळीत घट नोंदविण्यात आली आहे.जिल्ह्यातील २०४० गावापैकी ७५५ गावांमध्ये पाणीटंचाई आहे. जिल्हा प्रशासनाने साडेचार कोटी रूपयांचा पाणीटंचाई कृती आराखडा मंजूर केला आहे. या माध्यमातून विहीर अधिग्रहण, खोलीकरण, गाळ काढणे, झिरी घेणे, नळ योजनेची विशेष दुरूस्ती करणे, नवीन सिंचन विहिरी घेणे, हातपंप दुरूस्त करणे, विद्युत पंप लावणे ही कामे जिल्हा परिषदेने प्रस्तावित केली आहे.मेच्या पहिल्या आठवड्यात ८१ गावांमधील भीषण पाणीटंचाई निवारण्यासाठी उपाययोजना करण्यात आल्या आहेत. यामध्ये ६२ गावात विहिरी अधिग्रहित करण्यात आल्या. यामध्ये वणी ९, दारव्हा ८, पुसद ९, नेर १०, यवतमाळ १४, बाभूळगाव २ तर आर्णीमध्ये १० विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले.१९ गावांत टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. यामध्ये बाभूळगाव २, पुसद ७, नेर ३, आर्णी १, महागाव १ आणि यवतमाळ तालुक्यात ३ टँकरच्या मदतीने पाणी पुरवठा सुरू करण्यात आला आहे. इतर ठिकाणावरून मागणी येताच पाहणी करून तत्काळ उपाययोजना करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने दिले आहेत. जिल्हा परिषदेच्या अखत्यारीतील २१३ पाझर तलाव कोरडे पडले आहेत. जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही निर्माण झाला आहे.यवतमाळ शहरात कृत्रिम पाणीटंचाईजिल्ह्यात भीषण टंचाई असताना जिल्हा मुख्यालयाचे ठिकाण असलेल्या यवतमाळ शहरातही टंचाई भेडसावत आहे. शहराला पाणीपुरवठा करणाºया निळोणा प्रकल्पात २८ आणि चापडोह प्रकल्पात ५५ टक्के जलसाठा आहे. गतवर्षी मृतसाठाही संपला होता. गतवर्षीच्या तुलनेत मुबलक पाणी असूनही प्राधिकरणाचे वेळापत्रक सतत कोलमडत आहे. यामुळे नागरिकांना पाणीटंचाई सहन करावी लागत आहे.जिल्ह्याची भिस्त केवळ २३ टक्के जलसाठ्यावरजिल्ह्याच्या मोठ्या, मध्यम आणि लघु प्रकल्पात २३ टक्के जलसाठा शिल्लक आहे. पूस २७.५०, अरूणावती १४.२० , बेंबळा ३३.७३, तर अडाण १४.१, नवरगाव ३७.७४, गोकी २४.१२, वाघाडी २२.१०, सायखेडा २२.४८, अधरपूस २४.५० तर बोरगाव प्रकल्पात १२.१५ टक्के जलसाठा शिल्लक आहे. याच मोजक्या जलसाठ्यावर जिल्ह्यातील ग्रामीण भागाची भिस्त आहे.पाटबंधारेचे १३ तलाव कोरडेपाटबंधारे विभागच्या अखत्यारीतील ६३ प्रकल्पांपैकी १३ लघु प्रकल्प कोरडे पडले आहे. यामध्ये उमर्डा, हातोला, लोहतवाडी, नेर, देवगाव, रुई, इटाळा, किन्ही, पहूर (ई), म्हैसदोडका, बोर्डा, तरोडा, पोफाळी या प्रकल्पांचा समावेश आहे. उर्वरित ५० प्रकल्पांमध्येही केवळ १५ टक्के पाणी शिल्लक आहे.

टॅग्स :water shortageपाणीटंचाई