शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

कोट्यवधी खचरूनही आदिवासींचा विकास नाही

By admin | Updated: June 5, 2014 00:04 IST

आदिवासी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी स्थापन करण्यात आलेल्या प्रकल्प कार्यालयामार्फत आत्तापर्यंत शेकडो योजना राबविण्यात आल्या. या योजनांवर करोडो रुपयांचा खर्च करण्यात आला.

यवतमाळ : आदिवासी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी स्थापन करण्यात आलेल्या प्रकल्प कार्यालयामार्फत आत्तापर्यंत शेकडो योजना राबविण्यात आल्या. या योजनांवर करोडो रुपयांचा खर्च करण्यात आला. परंतु आदिवासी बांधवाचा पाहिजे तसा विकास झालाच नाही.आदिवासी बांधवांचा सर्वांगीण विकास व्हावा, समाज सुशिक्षित व्हावा, यासाठी महाराष्ट्र शासनाने १९७२ मध्ये पांढरकवडा येथे एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाची स्थापना केली. त्यानंतर पुसद येथेही आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय देण्यात आले आहे. परंतु आदिवासीबहुल असलेल्या या भागातील आर्थिक परिस्थिती, आरोग्य विषयक उपलब्धता, सामाजिक व शैक्षणिक जागृती बघता शासनाच्या या सर्वसमावेशक योजनांमुळे आदिवासी बांधवांचा कोणता विकास झाला? मागील ४0 वर्षांत या योजनांचे फलित काय? असा प्रश्न उपस्थित होतो. आदिवासी विकास प्रकल्पामार्फत शेकडो योजना राबविण्यात येतात. तरी या योजना आदिवासींपर्यंत पूर्णत पोहोचत नसल्याची वस्तुस्थिती आहे. प्रत्यक्ष लाभाचा विषय वेगळा असला तरी योजना राबविणार्‍या या यंत्रणेतील कमतरता, त्रुट्या अद्याप दूर करण्यात आल्या नाहीत. दरवर्षी या प्रकल्प कार्यालयाला कोट्यवधींचा निधी मिळतो. संपूर्ण जिल्हय़ाच्या अंदाजपत्रकाखालोखाल प्रकल्प कार्यालयाचे अंदाजपत्रक असते. दरवर्षी अनुसूचित जमाती अनुदानातून कोट्यवधी रुपये बांधकामावर खर्च केले जातात. यात विविध आश्रमशाळा व वसतिगृहांच्या बांधकामांचा समावेश आहे. आदिवासी भागातील विकास कामे ही ठक्कर बाप्पा योजनेअंतर्गत केली जातात. परंतु ही कामे करण्यासाठी व त्यावर लक्ष ठेवण्यासाठी प्रकल्प विभागाजवळ स्वतची यंत्रणा नाही. त्यामुळे दुसर्‍या कोणत्याही यंत्रणेला अनुदान देऊन मोकळे व्हावे लागते. पांढरकवडा प्रकल्प कार्यालयांतर्गत शासकीय व खासगी अनुदानित अशा शेकडो आदिवासी आश्रमशाळा आहेत. परंतु काही खासगी अनुदानित आश्रमशाळा सोडल्या तर बहुतेक आश्रमशाळांचा दर्जा हा अतिशय निकृष्ट आहे. प्रकल्प कार्यालयात अनेक वर्षांंपासून मोठय़ा प्रमाणावर कर्मचार्‍यांच्या जागा रिक्त आहेत. या प्रकल्पामार्फत आदिवासींसाठी अनेक योजना राबविल्या जात असल्या तरी, त्या योजनांचा लाभ त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही. त्यामुळे कोट्यवधी रुपये खर्च करूनही त्यांची स्थिती ‘जैसे थे’च आहे.  (कार्यालय प्रतिनिधी)