शहरं
Join us  
Trending Stories
1
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
2
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?
3
झेलेन्स्की यांना बोलावले, पुतिन यांच्याशीही पुन्हा चर्चा करणार; अलास्का बैठकीनंतर डोनाल्ड ट्रम्प यांची नवी तयारी
4
घर खरेदीचा प्लॅन करत असलेल्यांच्या स्वप्नांना SBI चा मोठा झटका...; RBI नं दिलासा देऊनही होम लोनचा टक्का वाढवला!
5
'शोले'तल्या भूमिकेसाठी या मराठमोळ्या अभिनेत्याला पैशांऐवजी देण्यात आलेला फ्रिज, वाचा हा किस्सा
6
Trump Putin: डोनाल्ड ट्रम्प यांनी पुतीन यांना दिलं पत्नी मेलानिया यांचं पत्र; 'त्या' पत्रात काय लिहिलंय?
7
५ हजारांपासून ४० हजार कोटींपर्यंतचा प्रवास: 'बिग बुल' राकेश झुनझुनवालांना उगाचचं नव्हते म्हणत दलाल स्ट्रीटचे जादूगार
8
आता स्टील आणि सेमीकंडक्टरवरही टॅरिफ लावणार ट्रम्प? अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचं उत्तर ऐकून वाढेल संपूर्ण जगाचं टेन्शन!
9
'विरोधकांची विकास विरोधी हंडी जनतेने फोडली'; उपमुख्यमंत्री शिंदेंचा महाविकास आघाडीवर हल्ला
10
Barvi Dam: ठाणेकरांची चिंता मिटली! बारवी धरण १०० टक्के भरले; सात दरवाजे उघडले
11
‘बंगाल फाइल्स’चा ट्रेलर लॉन्च होताच कोलकात्यात वाद, बोलवावे लागले पोलीस, विवेक अग्निहोत्री म्हणाले...  
12
Shravan Somvar 2025: इच्छित मनोकामनापूर्तीसाठी शेवटच्या श्रावणी सोमवारी चुकवू नका 'हा' उपाय!
13
'वाळवा तालुका स्वाभिमानी, सहजासहजी वाकत नाही, लढाई शेवटपर्यंत...', जयंत पाटलांचा अजितदादांसमोर टोला
14
NCERT: भारताच्या फाळणीला तीन नेते जबाबदार; एनसीआरटीच्या पुस्तकात कुणाची नावे?
15
HDFC Bank च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; कॅश पासून फ्री चेकबुकपर्यंतचे नियम बदलले, जाणून घ्या
16
दहीहंडी २०२५: पहिला १० थरांचा विश्वविक्रम; जोगेश्वरीच्या कोकण नगर गोविंदा पथकाचा पराक्रम
17
गणेशोत्सव २०२५: यंदा श्रीगणेश चतुर्थीचा शुभ मुहूर्त कधी? पाहा, महत्त्व अन् काही मान्यता
18
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा GST रिफॉर्म; दूध, दही, टीव्ही, सायकल सर्वकाही स्वस्त होणार?
19
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
20
तुम्हाला माहित्येय? बाइक अथवा कारमागे का धावतात कुत्रे? जाणून घ्या, होईल फायदा...!

बोगस डॉक्टरांवर कारवाईच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2017 01:22 IST

तालुक्यात मोठ्याप्रमाणात बोगस डॉक्टरांचे पेव फुटले आहे. आरोग्य प्रशासनाकडून कोणतीही कारवाई केली जात नाही.

आदेशाची पायमल्ली : राळेगाव आरोग्य विभागाकडे माहितीचा अभाव लोकमत न्यूज नेटवर्कराळेगाव : तालुक्यात मोठ्याप्रमाणात बोगस डॉक्टरांचे पेव फुटले आहे. आरोग्य प्रशासनाकडून कोणतीही कारवाई केली जात नाही. उल्लेखनीय म्हणजे यामध्ये जिल्हाधिकाऱ्याच्या आदेशाचीही पायमल्ली होत असल्याचे चित्र आहे. जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांनी ८ जानेवारी २०१७ रोजी यवतमाळ येथे जिल्ह्यातील आरोग्य अधिकाऱ्यांची बैठक घेऊन त्यांना परिसरात कार्यरत असलेल्या बोगस डॉक्टरांची माहिती घेऊन त्यांच्याविरुद्ध एफआयआर दाखल करण्याचे बजावले होते. आज सहा ते सात महिन्यांनंतरही बहुतांश ठिकाणी बोगस डॉक्टरांवर गुन्हे दाखल झालेले नाहीत. केवळ चालढकल सुरू आहे. याबाबत माहिती कायद्यांतर्गत माहिती घेतली असता राळेगाव, कळंब, बाभूळगाव व केळापूर तालुक्यातील आरोग्य विभागाकडे पत्र पाठवून त्यांना माहिती देण्याचे प्रशासनाकडून सूचित करण्यात आले होते. परंतु काही आरोग्य केंद्रातून ही माहिती अद्यापही पुरविण्यात आली नाही. तर काही आरोग्य केंद्रांनी त्यांच्या अखत्यारीतील उपकेंद्रांना ती पुरविण्याबाबत कळविले. एकंदरीत जिल्हा व तालुका आरोग्य अधिकाऱ्यांकडे जिल्ह्यातील बोगस डॉक्टरांची नेमकी माहितीच उपलब्ध नसल्याचे यावरून स्पष्ट होते. दहेगाव प्राथमिक आरोग्य केंद्रांकडून तीन बोगस डॉक्टरांवर गुन्हा दाखल करण्यात आल्याचे कळविले, परंतु त्याची तारीख त्यांच्याकडे उपलब्ध नाही. वरध प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत तीन बोगस डॉक्टर कार्यरत असल्याचे दर्शवून विविध कारणे सांगितल्या गेली. यामध्ये एफआयआर दाखल करण्याबाबत संदिग्ध भूमिका घेण्यात आली. धानोरा प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गतही तीन बोगस डॉक्टर कार्यरत असल्याचे कळविण्यात आले. तेथेही अशाच प्रकारे झाकाझाक करण्यात आली. वाढोणा प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत सहा बोगस डॉक्टर आहेत. तेथे एका बोगस डॉक्टरचा दवाखाना सुरू असून, पाच बंद असल्याचे सांगण्यात आले. परंतु कारवाईबाबत मौन बाळगण्यात आले. मादणी येथे पाच वर्षापासून बोगस डॉक्टर सक्रीय असल्याचे सांगण्यात आले. पण कारवाईबाबत मौन बाळगण्यात आले. याचप्रमाणे करळगाव, उमरी, सावरगाव आदी ठिकाणीही संदिग्ध परिस्थिती आढळून आली. ग्रामीण भागातील रुग्णांच्या जीविताशी खेळजिल्ह्यात मोठ्या प्रमाणात बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट झाला असून यातून ते केवळ पैशासाठी ग्रामीण भागातील गोरगरीब रुग्णांच्या जिविताशी खेळ करीत आहे. उल्लेखनिय म्हणजे प्रचंड गंभीर असलेल्या या प्रकाराबाबत आरोग्य विभाग पाहिजे तसे गंभीर दिसत नाही. आरोग्य विभागाकडे याबाबत आवश्यक ती माहितीसुद्धा उपलब्ध नाही. ठोस कारवाईसुद्धा यामध्ये झाल्याचे दिसून येत नाही. त्यामुळेच अशा बोगस डॉक्टरांचा गोरखधंदा जिल्ह्यात राजरोसपणे सुरू आहे.