शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती तुटली! पुण्यात भाजपा-NCP वेगळे लढणार; अजित पवार म्हणाले, "मी माझं सर्वस्व..."
2
प्रशासकराज संपणार : १५ जानेवारीला मतदान, तर १६ जानेवारीला निकाल! महापालिकांचा महासंग्राम
3
Plane Crash Mexico Video: इमर्जन्सी लँडिंगआधीच विमान कोसळले; भयंकर अपघातात १० जण ठार
4
TV खरेदीचा विचार करत असाल तर आत्ताच करा, जानेवारीपासून किंमत वाढवण्याची तयारी; कारण काय?
5
आचारसंहिता लागण्यापूर्वी सत्ताधाऱ्यांची धावपळ; प्रकल्पाची उद्घाटने, भूमिपूजन अन् घोषणांचा सपाटा
6
कोट-पँट घालून फिरलात तर अटक अटळ! शिक्षा लेखी नाही, पण चाबकाचे फटकारे अन्...
7
आजचे राशीभविष्य, १६ डिसेंबर २०२५: सरकारी कामात यश, अचानक धनलाभ; सुखाचा दिवस
8
पाकिस्तानमध्ये शिजला पहलगाम हल्ल्याचा कट, सहा जणांविरोधात १,५९७ पानांचे आरोपपत्र!
9
क्रिकेटवेड्या देशाने मेस्सीवर जीव टाकला... पुढे? भारतीय फुटबॉलच्या विकासासाठी काय?
10
इंडिगो गोंधळाबाबतच्या याचिकेवर सुनावणी घेण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार; दिल्ली उच्च न्यायालयात दाद मागण्याचे आदेश
11
एक कोटी मतदार बजावणार हक्क; मुंबई महापालिका निवडणूक : एक लाख दुबार मतदार तपासणीत वगळले जाण्याची शक्यता
12
ऑर्डर कॅन्सल करण्याच्या कारणावरून वाद; डिलिव्हरी बॉयचा मित्रावर चाकूहल्ला
13
संपादकीय : यत्र, तत्र, पाकिस्तान सर्वत्र! ऑस्ट्रेलियातील हल्ल्याचे पाकिस्तानी कनेक्शन
14
शत्रूला दिसणारच नाही भारताचे लढाऊ विमान, जळगावच्या बहिणाबाई विद्यापीठाचे संशोधन
15
...जेव्हा गुंडच पोलिसांच्या कॉलरला हात घालतात; कांदिवलीत ५ अटकेत
16
सर्वोच्च न्यायालयाचा सल्ला-उत्तर कमी, गुंता अधिक! न्यायालयीन सल्ल्यामुळे राजकीय अनिश्चितता वाढली
17
आचारसंहितेच्या आधीच निधीचे जीआर, उद्घाटने अन् भूमिपूजनाचा सपाटा; आयोगाची करडी नजर
18
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
19
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
20
भाजपचा विजयी चौकार की काँग्रेस ठरणार ‘गेमचेंजर’? शिवसेना, राष्ट्रवादीसाठी अस्तित्वाची लढाई
Daily Top 2Weekly Top 5

वृक्ष लागवड योजनेचा हिशेबच नाही

By admin | Updated: April 20, 2015 00:14 IST

ग्रामपंचायत स्तरावर पर्यावरण संतुलित ग्रामसमृध्दीसह इतर योजनेतून विविध जातीच्या वृक्षांची लागवड करण्यात आली.

गणना कागदावरच : कळंब तालुक्यात वृक्ष लागवडीवर कोट्यवधी रुपयांचा खर्चकळंब : ग्रामपंचायत स्तरावर पर्यावरण संतुलित ग्रामसमृध्दीसह इतर योजनेतून विविध जातीच्या वृक्षांची लागवड करण्यात आली. महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेतूनही गावागावात वृक्षारोपण करण्यात आले. सामाजिक वनिकरण आणि वनविभागही यात मागे नव्हता. परंतु आता लावलेली वृक्षच गायब झाल्याची ओरड होत आहे. मात्र किती वृक्ष लावण्यात आली आणि किती जिवंत आहेत, हे सांगायला कोणीही तयार नाही. वृक्ष लागवडीसाठी किती निधी वापरण्यात आला आणि प्रत्यक्ष किती वृक्ष जिवंत आहे, हे वृक्षगणनेनंतर उघड होते. परंतु त्यालाही हरताळ फासला गेला. ग्रामपंचायत स्तरावर विविध योजनेतून लाखो वृक्षांची लागवड करण्यात आली. यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करण्यात आले. मात्र जिवंत वृक्षांची संख्या बोटावर मोजण्याइतकी आहे. राज्यातील तत्कालीन आघाडी सरकारने वृक्षगणना करण्याचे ठरविले आहे. परंतु ही गणना कागदावरच असल्याचे स्पष्ट होते.जणगणना, पशुगणनेच्या धर्तीवर वृक्षगणना केली जाणार होती. ही जबाबदारी ग्रामसेवकाकडे सोपविण्यात आली. परंतु ती प्रामाणिकपणे पाळली गेली नाही. गावाच्या सर्वांगिण विकासासाठी शासनाने पर्यावरण विकासावर भर दिलेला आहे. यासाठी पर्यावरण संतुलित ग्रामसमृध्दी योजना, लोकसंख्येच्या प्रमाणात कर वसुली, प्लास्टिकमुक्त गाव, लोकसंख्येच्या ५० टक्के वृक्षारोपण, ७० टक्केच्यावर करवसुली, पाणीपट्टी वसुली, गोबरगॅस, घनकचरा व्यवस्थापन आदी निकष लावलेले आहे. यासाठी पंचायत समिती स्तरावरून ग्रामपंचायतीला थेट निधीचा वाटप केला जातो. परंतु वृक्षांचे अस्तित्वच दिसत नाही. कोणत्या विभागाने किती वृक्ष लावले आणि त्यातील किती जिवंत आहेत याची गणना व्हावी, अशी मागणी तालुक्यातील नागरिकांमधून करण्यात येत आहे. (तालुका प्रतिनिधी)वृक्षप्रेमींकडून पाठपुरावापर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी वृक्ष लागवडीचा उपक्रम हाती घेण्यात आला. मात्र ज्यांच्याकडे ही जबाबदारी सोपविण्यात आली त्यांनी केवळ खड्डे खोदून ठेवले. परिणामी योजनेची वाट लागली. याप्रकरणी सखोल चौकशी व्हावी, या मागणीसाठी तालुक्यातील वृक्षप्रेमींनी पाठपुरावा सुरू केला आहे.