शहरं
Join us  
Trending Stories
1
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
2
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
3
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
4
टीम इंडियाला ज्या ज्या कंपन्यांनी स्पॉन्सर केले, त्यापैकी तीन कंपन्या बुडाल्या, बंद झाल्या...
5
'जत्रा २' येणार का? दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "मनापासून इच्छा आहे पण..."
6
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर; ३१ जानेवारी २०२६ पर्यंत मुदतवाढ, सुप्रीम कोर्टात काय घडलं?
7
बाजारात 'सुपर' तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
8
भारतावर आणखी टॅरिफ लावण्याची धमकी अमेरिकेवरच उलटू शकते, जाणून घ्या का?
9
गायीने कहरच केला... धावता-धावता उडी मारून थेट कौलावरच चढली, Video पाहून व्हाल थक्क
10
Pitru Paksha 2025: पितृ पक्षात एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? काय करावे उपाय? वाचा
11
सोन्याच्या किंमतीनं रचला इतिहा, विक्रमी पातळीवर पोहोचला भाव; पटापट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट!
12
झोमॅटोने रचला नवा विक्रम! टाटा-अदानी समुहातील मोठ्या कंपन्यांनाही 'या' बाबतीत टाकलं मागे
13
"जे झालं ते अचानक अन् चुकून झालं"; BMW कार अपघातातील आरोपी मागतेय जामीन
14
अपोलो टायर्स प्रत्येक मॅचमागे ४.५ कोटी रुपये मोजणार; टीम इंडियाला नवा स्पॉन्सर मिळाला
15
इस्राइल-गाझाचं उदाहरण देत शाहिद आफ्रिदीने भारताविरोधात ओकली गरळ, मोदींबाबत म्हणाला... 
16
धोक्याची घंटा! कच्ची केळी बादलीत टाकली अन् १ मिनिटात पिकली; लोकांच्या जीवाशी खेळ?
17
दबंग सून... मध्यरात्री गुंडांना घेऊन सासरी आली आणि केला धडाधड गोळीबार, त्यानंतर...  
18
IND vs PAK: पाकिस्तान जय शाहला घाबरला; आधी 'बड्या बाता' केल्या, आता गपचूप बसला, काय घडलं?
19
स्विगीने खास पुणेकरांसाठी लाँच केले 'Toing' ॲप; केवळ ५० रुपयांत मिळणार भरपेट जेवण, काय आहे वैशिष्ट्ये?

५० ग्रामपंचायतीत वीजपुरवठाच नाही

By admin | Updated: January 25, 2015 23:29 IST

एकीकडे शासन सर्व ग्रामपंचायतींना आॅनलाईन करीत असताना दुसरीकडे मात्र पुसद तालुक्यातील ५० हून अधिक ग्रामपंचायतींमध्ये अद्याप वीज जोडणी नसल्याचे धक्कादायक

पुसद : एकीकडे शासन सर्व ग्रामपंचायतींना आॅनलाईन करीत असताना दुसरीकडे मात्र पुसद तालुक्यातील ५० हून अधिक ग्रामपंचायतींमध्ये अद्याप वीज जोडणी नसल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. त्यामुळे शासनाने प्रत्येक ग्रामपंचायतीला पुरविलेले संगणकही धूळ खात पडले आहे. तालुक्यातील असंख्य ग्रामपंचायतींची अवस्था अतिशय वाईट आहे. अनेक ग्रामपंचायतींचा कारभार पारावरच होतो. तालुक्यातील ११९ ग्रामपंचायतींपैकी ८० ग्रामपंचायतींच्या स्वतंत्र इमारती असून ३९ ग्रामपंचायती गावातील शाळा अथवा इतर शासकीय इमारतीत कामकाज चालवितात. ग्रामपंचायतींमध्ये वीज नसल्यामुळे जिल्हा परिषदेने पुरविलेले संगणक सरपंच अथवा ग्रामसेवकांच्या घरी पडलेले आहेत. ग्रामपंचायतींच्या कारभारात सुसूत्रता यावी, नागरिकांची कामे जलदगतीने व्हावी या हेतूने सर्व ग्रामपंचायतींना संगणकाचे वितरण करण्यात आले आहे. याच सोबत सर्व ग्रामपंचायती आॅनलाईनने जोडण्यात आलेल्या आहेत. परंतु हे सर्व पुसद तालुक्यात तरी कागदोपत्रीच दिसत आहे. ५० पेक्षा अधिक ग्रामपंचायतींमध्ये वीज जोडणी नसल्यामुळे या ठिकाणचे संगणक कोठे गेले, हा प्रश्न आहे. वीज जोडणीसाठी आतापर्यंत कुणी व कसे प्रयत्न केले, हे मात्र गुलदस्त्यात आहे. सरपंच, सचिव व ग्रामसेवक नेमके काय करतात, हासुद्धा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे. वीज जोडणीच नसल्याने संगणक सरपंच, ग्रामसेवकांच्या घरी राहणार, हे यातून स्पष्ट होते. संबंधित लोकप्रतिनिधींचेदखील याकडे लक्ष नाही. त्यामुळे आॅनलाईन योजनेला हरताळ फासला जात असून लाखो रुपये पाण्यात जात आहे. (तालुका प्रतिनिधी)