शहरं
Join us  
Trending Stories
1
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
2
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
3
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
4
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
5
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
6
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
7
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
8
अयोध्या राम मंदिरात ७० नवे पुजारी घेतले जाणार, ट्रस्टचा निर्णय; परिसरातील मंदिरात सेवा करणार
9
२१ डिसेंबर रोजी सुरु होणार पौष मास 'भाकड मास' का म्हटला जातो? शुभ कार्यालाही लागतो विराम!
10
पतीनं पत्नीकडून घरखर्चाचा हिशोब मागणं क्रूरता?; सुप्रीम कोर्टाने सुनावला महत्त्वाचा निकाल
11
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
12
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
13
Tarot Card: 'ऐकावे जनाचे, करावे मनाचे' याची प्रचिती देणारा आठवडा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य 
14
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
15
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
16
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
17
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
18
अकोला महापालिका: भाजप-शिंदेंच्या शिवसेनेचं युतीबाबत निर्णय कधी? ठाकरेंची शिवसेना-मनसेची बोलणी सुरू
19
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
20
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामपंचायतींमध्ये आता चारशे आॅनलाईन सेवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2017 22:09 IST

राज्य शासनाकडून डिजिटल महाराष्ट्र साकार करण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरु असून ग्रामीण भागातील जनतेला गावातच एकाच छताखाली सर्व योजनेचे लाभ देण्याचे नियोजन शासनाने केले आहे.

ठळक मुद्देग्रामीण जनतेला दिलासा : एकाच छताखाली सर्व योजनांचा लाभ

लोकमत न्यूज नेटवर्कतळणी : राज्य शासनाकडून डिजिटल महाराष्ट्र साकार करण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरु असून ग्रामीण भागातील जनतेला गावातच एकाच छताखाली सर्व योजनेचे लाभ देण्याचे नियोजन शासनाने केले आहे. त्याचाच एक भाग म्हणून राज्य शासनाने ग्रामपंचायतमध्ये स्थापन केलेल्या ‘आपले सरकार सेवा केंद्रा’मार्फत ग्रामविकास विभागाच्या सेवांसह महसूल व इतर विभागाच्या सुमारे चारशे सेवा १ नोंव्हेबर पासून देणे सुरु केले आहे.यामुळे ग्रामीण भागातील नागरीक व विद्यार्थी यांचा वेळ व पैसा वाचणार आहे. ग्रामविकास विभागाच्या माध्यमातून सन २०११ पासून राज्यात संग्राम प्रकल्प सुरु करून शासनाने डिजिटल कडे पाऊल टाकले होत. त्यात काम करणाºया कार्यक्षम असलेल्या संगणक परिचालकांनी तुटपुंज्या मानधनावर प्रमाणिक काम करून सलग तीन वर्ष केंद्र सरकारचा ई पंचायत मधील प्रथम पुरस्कार याच संगणक परिचालकानी मिळवून दिला. ग्रामपंचायतीने स्वतंत्र आपले सरकार सेवा केंद्र घेतल्यास त्या केंद्रामध्ये नियमित काम करण्यासाठी एक संगणक परिचालक मिळेल. त्यामुळे गावातील नागरिकांना पाहिजे त्यावेळी सातबारा, आठ अ सह सर्व दाखले मिळतील.जर ग्रामपंचायतींनी एकापेक्षा जास्त गावांमध्ये मिळून एक केंद्र घेतले तर संगणक परिचालक दरदिवशी एकाच गावात हजर राहू शकत नाही. यामुळे नागरिकांच्या कामामध्ये अडथळा निर्माण होतो.मिळणारे दाखलेग्रामपंचायतीचे सर्व लेखे आॅनलाईन करणे, ११ आज्ञावली मध्ये माहिती भरणे, रहिवासी, जन्म-मृत्यू, नाहरकत, बांधकाम परवाना, जागेची नक्कल, विवाह नोंदणी प्रमाणपत्र यांसह ३३ प्रकारचे दाखले देण्यात येतात. याबरोबरच महसूल विभागासह इतर विभागाचे सुमारे ४०० पेक्षा जास्त सेवा ग्रामपंचायतींमधूनच उपलब्ध होणार आहे.गरज प्रामाणिक अंमलबजावणीचीग्रामीण भागातील नागरिकांच्या हितासाठी शासनाच्या अनेक योजना आहेत. परंतु या योजनांची प्रामाणिक अंमलबजावणी होताना दिसत नाही. त्यामुळे मूळ हेतुला शासनातील अधिकारी, कर्मचाºयांकडूनच हरताळ फासल्या जातो. बऱ्याचवेळा तांत्रिक अडथडे येतात. संभाव्य अडचणी लक्षात घेऊन तसेच अधिकारी, कर्मचाऱ्यांची योजना राबविण्यासाठी योग्य तयारी असणे गरजेचे आहे. याकडे लक्ष दिल्यास ग्रामीण जनतेला निश्चितच दिलासा मिळू शकेल. अन्यथा हा उपक्रमसुद्धा केवळ कागदांवर राहिल.