शहरं
Join us  
Trending Stories
1
हास्यास्पद! पाऊस पडतोय म्हणून नाही आणले...; एअर इंडियाची दोन विमाने लगेज न घेताच आली
2
"इराण भारताचा जुना मित्र, दुसरीकडे इस्त्रायल..."; मध्य पूर्वेतील युद्धावर सोनिया गांधी स्पष्ट बोलल्या
3
Air India :'या' तीन कर्मचाऱ्यांना तात्काळ बडतर्फ करा'; अहमदाबाद विमान अपघातानंतर एअर इंडियाला डीजीसीएचे आदेश
4
"संपूर्ण युक्रेन आमचा..."; पुतिन यांनी झेलेन्स्की यांच्या संपूर्ण देशावरच ठोकला दावा! मिळालं असं उत्तर
5
ऑफिसला न जाताच कर्मचाऱ्याला मिळाले २६ लाख रुपये; कोर्टाने दिला मोठा निर्णय
6
"मी इनसाइडर असते तर बरं झालं असतं", इंडस्ट्रीतील स्ट्रगलवर लोकप्रिय अभिनेत्रीची क्रिप्टिक पोस्ट
7
"गोयंकाजी पाहताय ना?’’, इंग्लंडमध्ये पंतच्या फटकेबाजीनंतर फॅन्सनी घेतली लखनौच्या मालकांची शाळा  
8
हनीमुनचा प्लॅन, रसगुल्लामध्ये विष भरले अन्...; बेवफा सोनमपेक्षाही खतरनाक आहे खूनी 'मुस्कान'
9
NSE चा IPO कधी येणार? सेबीचे अध्यक्ष म्हणाले, "आयपीओ आणण्यात कोणताही अडथळा..."
10
Air India Plane Crash: "१४ वर्षांनी घरी लक्ष्मी जन्मली अन् विमान दुर्घटनेत दुर्दैवाने तिलाच गमावले..."
11
गळफास लावलेल्या स्थितीत सापडला भाजपा नेत्याचा मृतदेह, दोरीने बांधलेले होते दोन्ही हात, संशयास्पद मृत्युमुळे खळबळ
12
भीषण अपघात! नवी मुंबईत मुलीने मर्सिडीजने दुचाकीला उडवले; महिलेचा जागेवर मृत्यू, एकजण गंभीर जखमी
13
८ वर्षांपूर्वी आई गेली, नुकतेच बाबाही गेले; रीमा लागूंच्या वाढदिवसानिमित्त लेकीची भावुक पोस्ट
14
"मी शांततेसाठी कितीही प्रयत्न केले तरी...!"; काँगो-रवांडा शांतता करारानंतर ट्रम्प यांचं दुःख, बोलून दाखवली नोबेल पुरस्काराची इच्छा
15
Israel-Iran War: भारतासाठी कायपण ! परतीसाठी इराणने आपले हवाई क्षेत्र उघडले, आणखी दोन विमाने नवी दिल्लीत पोहोचणार
16
पाकिस्तानमध्ये चार हिंदू भावंडांचे अपहरण, जबरदस्तीने धर्म बदलण्यास भाग पाडले; आईकडून न्यायाची मागणी
17
Ashadhi Ekadashi 2025: ईश्वरभेटीची सोपी वाट दाखवणार्‍या गुरुंचे आपल्या आयुष्यातील योगदान जाणून घ्या!
18
अहमदाबादमधील विमान अपघातात वाचलेल्या विश्वासला अभिनेत्रीनं म्हटलं 'खोटारडा', ट्रोल झाल्यावर घेतला युटर्न
19
कर्मचाऱ्याला सॅलरीतून मिळाले १४ कोटी तर झाला अवाक्; नंतर जे काही झालं त्याचा विचारही केला नसेल
20
R Madhavan घरबसल्या कमावणार महिन्याला ६.५ लाख रुपये; भाड्यानं दिला १७.५ कोटींचा फ्लॅट, एकूण किती कमाई करणार?

२० तालुक्यात नऊ महिन्यात एकही ट्रॅप नाही

By admin | Updated: September 30, 2014 23:40 IST

राज्यात सर्वत्र लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची धुमधडाक्यात मोहीम सुरू असताना अमरावती विभागातील तब्बल २० तालुके मात्र त्याला अपवाद ठरले आहेत. सन २०१४ मध्ये जानेवारीपासून आतापर्यंत

अ‍ॅन्टी करप्शन : महासंचालकांचे अमरावती एसपींना पत्र यवतमाळ : राज्यात सर्वत्र लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची धुमधडाक्यात मोहीम सुरू असताना अमरावती विभागातील तब्बल २० तालुके मात्र त्याला अपवाद ठरले आहेत. सन २०१४ मध्ये जानेवारीपासून आतापर्यंत या तालुक्यांमध्ये एकही ‘ट्रॅप’ (सापळा) न झाल्याने पोलीस महासंचालकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांनी २५ सप्टेंबर रोजी एसीबीचे अमरावती येथील पोलीस अधीक्षक आर.एस. तडवी यांना पत्र पाठविले. त्यात २० तालुक्यांमध्ये जानेवारी २०१४ पासून एकही ट्रॅप दाखल झाला नसल्याबाबत लक्ष वेधण्यात आले. उपरोक्त तालुक्यांमध्ये अधिकाधिक सापळे लावून लाचखोरांना पकडण्याच्या सूचना द्याव्या, असे दीक्षित यांनी आदेशात नमूद केले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने तक्रारी नोंदविण्यासाठी टोल फ्री क्रमांक (१०६४) जाहीर केला आहे. प्रत्येक तालुक्यातील आठवडीबाजारांच्या दिवशी हा क्रमांक तेथे ठळकपणे कुणालाही दिसेल अशा पद्धतीने प्रदर्शित करावा, हा क्रमांक अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचावा, त्या माध्यमातून सापळे रचण्याकरिता फायदा होईल, असेही दीक्षित यांनी नमूद केले. उपरोक्त तालुक्यांमध्ये सापळे यशस्वी करून त्याचा अहवाल ७ आॅक्टोबर २०१४ पर्यंत सादर करण्याचे निर्देश एसीबीच्या एसपींना देण्यात आले आहे. उपरोक्त २० तालुक्यात चालू वर्षात एकही ट्रॅप न झाल्याने तेथे लाचेशिवाय शासकीय कामकाज सुरू आहे का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. राज्यात सर्वच जिल्ह्यात एसीबीची कामगिरी उंचावली आहे. वार्षिक टार्गेट अवघ्या सहाच महिन्यात पूर्ण झाले आहे. त्यातही कनिष्ठ कर्मचाऱ्यासह पहिल्यांदाच वरिष्ठही जाळ्यात अडकू लागले आहेत. एसीबीच्या या ट्रॅपची शासकीय यंत्रणेत दहशत पहायला मिळत आहे. अमरावतीमध्ये भारतीय वनसेवेचे अधिकारी (आयएफएस) तर यवतमाळात उपजिल्हाधिकारी दर्जाचे अधिकारी जाळ्यात अडकले आहेत. नागपूर विभागातील ट्रॅप शंभरावर तर यवतमाळातील दोन डझनावर गेले आहे. असे असताना उपरोक्त २० तालुके या ट्रॅपमधून सुटलेच कसे, हाच मुख्य प्रश्न आहे. अकोला जिल्ह्यात सर्वच तालुक्यात ट्रॅप यशस्वी झाल्याचे पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांच्या पत्रावरून दिसून येते. कारण या पत्रात अकोला जिल्ह्याचा कोणताही उल्लेख नाही. (जिल्हा प्रतिनिधी)