शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

२० तालुक्यात नऊ महिन्यात एकही ट्रॅप नाही

By admin | Updated: September 30, 2014 23:40 IST

राज्यात सर्वत्र लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची धुमधडाक्यात मोहीम सुरू असताना अमरावती विभागातील तब्बल २० तालुके मात्र त्याला अपवाद ठरले आहेत. सन २०१४ मध्ये जानेवारीपासून आतापर्यंत

अ‍ॅन्टी करप्शन : महासंचालकांचे अमरावती एसपींना पत्र यवतमाळ : राज्यात सर्वत्र लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची धुमधडाक्यात मोहीम सुरू असताना अमरावती विभागातील तब्बल २० तालुके मात्र त्याला अपवाद ठरले आहेत. सन २०१४ मध्ये जानेवारीपासून आतापर्यंत या तालुक्यांमध्ये एकही ‘ट्रॅप’ (सापळा) न झाल्याने पोलीस महासंचालकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांनी २५ सप्टेंबर रोजी एसीबीचे अमरावती येथील पोलीस अधीक्षक आर.एस. तडवी यांना पत्र पाठविले. त्यात २० तालुक्यांमध्ये जानेवारी २०१४ पासून एकही ट्रॅप दाखल झाला नसल्याबाबत लक्ष वेधण्यात आले. उपरोक्त तालुक्यांमध्ये अधिकाधिक सापळे लावून लाचखोरांना पकडण्याच्या सूचना द्याव्या, असे दीक्षित यांनी आदेशात नमूद केले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने तक्रारी नोंदविण्यासाठी टोल फ्री क्रमांक (१०६४) जाहीर केला आहे. प्रत्येक तालुक्यातील आठवडीबाजारांच्या दिवशी हा क्रमांक तेथे ठळकपणे कुणालाही दिसेल अशा पद्धतीने प्रदर्शित करावा, हा क्रमांक अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचावा, त्या माध्यमातून सापळे रचण्याकरिता फायदा होईल, असेही दीक्षित यांनी नमूद केले. उपरोक्त तालुक्यांमध्ये सापळे यशस्वी करून त्याचा अहवाल ७ आॅक्टोबर २०१४ पर्यंत सादर करण्याचे निर्देश एसीबीच्या एसपींना देण्यात आले आहे. उपरोक्त २० तालुक्यात चालू वर्षात एकही ट्रॅप न झाल्याने तेथे लाचेशिवाय शासकीय कामकाज सुरू आहे का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. राज्यात सर्वच जिल्ह्यात एसीबीची कामगिरी उंचावली आहे. वार्षिक टार्गेट अवघ्या सहाच महिन्यात पूर्ण झाले आहे. त्यातही कनिष्ठ कर्मचाऱ्यासह पहिल्यांदाच वरिष्ठही जाळ्यात अडकू लागले आहेत. एसीबीच्या या ट्रॅपची शासकीय यंत्रणेत दहशत पहायला मिळत आहे. अमरावतीमध्ये भारतीय वनसेवेचे अधिकारी (आयएफएस) तर यवतमाळात उपजिल्हाधिकारी दर्जाचे अधिकारी जाळ्यात अडकले आहेत. नागपूर विभागातील ट्रॅप शंभरावर तर यवतमाळातील दोन डझनावर गेले आहे. असे असताना उपरोक्त २० तालुके या ट्रॅपमधून सुटलेच कसे, हाच मुख्य प्रश्न आहे. अकोला जिल्ह्यात सर्वच तालुक्यात ट्रॅप यशस्वी झाल्याचे पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांच्या पत्रावरून दिसून येते. कारण या पत्रात अकोला जिल्ह्याचा कोणताही उल्लेख नाही. (जिल्हा प्रतिनिधी)