शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange: '...तोपर्यंत मुंबई सोडणार नाही', नोटीसनंतर मनोज जरांगेंचा मुख्यमंत्री फडणवीसांना इशारा
2
आंदोलनात बेकायदेशीर कृत्ये, लवकरात लवकर मैदान रिकामं करा; मनोज जरांगेंना पाठवलेल्या पोलिसांच्या नोटीसमध्ये काय?
3
Manoj Jarange Patil Maratha Morcha Live: आंदोलन सुरूच राहणार, सर्व मागण्या पूर्ण झाल्याशिवाय मुंबई सोडणार नाही: मनोज जरांगे
4
Punjab Flood: अर्धा पंजाब पाण्यात! १३०० गावांना पुराचा वेढा, हजारो लोक बेघर; २९ जणांचा मृत्यू
5
Maharashtra Rain: राज्यात पाऊस पुन्हा धुमाकूळ घालणार, आठ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
6
गणेशोत्सव साजरा करत नाही आलिया? ट्रोल झाल्यानंतर दिलं सडेतोड उत्तर; फोटो शेअर करत म्हणाली...
7
अनंत चतुर्दशी २०२५: गणेशोत्सवाची सांगता; पाहा, मान्यता, २०२६ मध्ये कधी येणार गणपती बाप्पा?
8
Mitchell Starc T20I Retirement : आगामी टी-२० वर्ल्ड कप आधी स्टार गोलंदाजाने घेतला निवृत्तीचा निर्णय; जाणून घ्या त्यामागचं कारण
9
४ राजयोगात परिवर्तिनी एकादशी: ९ राशींचे कल्याण-भरभराट, सुबत्ता-शुभ-लाभ; धनलक्ष्मी प्रसन्न!
10
'ही' आंतरराष्ट्रीय बँक भारतातून गाशा गुंडाळण्याच्या तयारीत? ग्राहकांच्या पैशांचं काय होणार?
11
Mumbai: मुंबईत मोठी वाहतूक कोंडी; कार्यालय गाठता गाठता नोकरदारांच्या नाकीनऊ!
12
तुम्हाला कन्नड येते का? मुख्यमंत्र्यांच्या प्रश्नावर राष्ट्रपतींचे चोख प्रत्युत्तर; म्हणाल्या,'प्रत्येकाने आपली भाषा...'
13
Maratha Reservation: मराठा आरक्षणाबाबत सरकारचा मसुदा तयार, लवकरच निर्णय!
14
१५ राज्ये, अनेक बँका अन् ओटीपीशिवाय खात्यातून काढले २९ कोटी; ६ आरोपींचे हादरवणारे कृत्य
15
लेख: मतभेद पुसून न टाकता ऐक्य साधता येईल काय?
16
हेमा मालिनी यांनी विकले मुंबईतील दोन आलिशान फ्लॅट्स, १२.५ कोटींची कमाई अन् आता...
17
Raigad Accident: रायगडमध्ये रिक्षाला अपघात, ब्रेक फेल झाल्याने दिशादर्शकाला धडक, तीन ठार
18
Sudan Landslide: अख्खं गावचं गिळलं, १००० लोकांचा मृत्यू, फक्त एक मुलगा वाचला! सुदानमध्ये भुस्खलनाचा प्रकोप
19
आजचे राशीभविष्य, ०२ सप्टेंबर २०२५: प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल, स्वकियांशीच खटके उडतील
20
आजचा अग्रलेख: अमेरिका विरुद्ध सर्व? ट्रम्प यांच्या दादागिरीला उत्तर देण्यासाठी अनेक देश एकत्र

चार वर्षांत ‘एडीओं’चे दौरेच नाहीत

By admin | Updated: July 22, 2016 02:08 IST

जिल्हा परिषदेच्या कृषी विकास अधिकाऱ्यांनी गेल्या चार वर्षांत कोणत्याही प्रकारचे दौरेच केले नसल्याचे वास्तव उघडकीस आले आहे

धक्कादायक वास्तव : जिल्हा परिषद उपाध्यक्षांनी उघडकीस आणला प्रकार यवतमाळ : जिल्हा परिषदेच्या कृषी विकास अधिकाऱ्यांनी गेल्या चार वर्षांत कोणत्याही प्रकारचे दौरेच केले नसल्याचे वास्तव उघडकीस आले आहे. जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष बाळासाहेब मांगुळकर यांनी मागितलेल्या माहितीनंतर हे धक्कादायक वास्तव समोर आले. जिल्हा परिषद कृषी विकास अधिकारी म्हणून ३ डिसेंबर २०१२ पासून जे.आर.राठोड कार्यरत आहेत. राज्य शासनाने जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांसाठी परिपत्रक क्रमांक परांस/१0८५/प्र.क्र.-१२२९/५७, दिनांक २१ जुलै १९८६ नुसार दौरे व रात्रीचे मुक्काम विहित केले आहे. तसेच दौरे करताना दौरा दैनंदिनी, संभाव्य दौरा दैनंदिनी दर महिन्याला सक्षम अधिकाऱ्यांकडे विहीत मुदतीत सादर करण्याचे बंधन घातले आहे. याच परित्रकाचा आधार घेत उपाध्यक्ष बाळासाहेब मांगुळकर यांनी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे राठोड यांच्या दौऱ्यांची माहिती मागितली. उपाध्यक्षांच्या पत्रानंतर मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी सामान्य प्रशासन विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना माहिती मागितली. त्यांनी या संदर्भात कृषी अधिकारी कार्यालयाकडे माहिती मागितली. त्यात पत्रातून कृषी अधिकाऱ्यांनी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडून दौरा दैनंदिनी मंजूर करून घेतली असल्यास मंजुरीचे पत्र तीन दिवसांच्या आत सादर करण्याचे निर्देश दिले. कृषी विभागाने चक्क या संदर्भात कार्यालयीन दस्तऐवज व अभिलेखांची पडताळणी केली असता, जे.आर.राठोड यांनी संभाव्य दौरा दैनंदिनी, प्रत्यक्ष दौरा दैनंदिनी कार्यालयात सादरच केल्या नसल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे हा सर्व प्रकार उघडकीस आला. आता या प्रकरणी राठोड यांच्याविरूद्ध कोणती कारवाई होते, याबाबत जिल्हा परिषद वर्तुळात उत्सुकता लागली आहे. (शहर प्रतिनिधी) शिस्तभंग कारवाईसाठी प्रशासनाकडे जोर ४उपाध्यक्ष बाळासाहेब मांगुळकर यांनी कृषी विकास अधिकाऱ्यांनी गेल्या चार वर्षांत दौरा दैनंदिनी व संभाव्य दौरा दैनंदिनी सादर न करणे, ही अत्यंत गंभीर बाब असल्याचे म्हटले आहे. याप्रकरणी शासन परिपत्रकानुसार राठोड यांच्याविरूद्ध नियमानुसार शिस्तभंगाची कारवाई करण्याची मागणी केली. तसेच दौरा दैनंदिनी विहित मुदतीत सादर न केल्यामुळे त्यांना वेतनसुद्धा अनुज्ञेय ठरत नसून त्यांच्या वेतनाचीही वसुली करण्याची मागणी केली. याबाबत मांगुळकर यांनी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना पत्र दिले आहे.