शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel-Iran War: भारतासाठी कायपण ! परतीसाठी इराणने आपले हवाई क्षेत्र उघडले, आणखी दोन विमाने नवी दिल्लीत पोहोचणार
2
भीषण अपघात! नवी मुंबईत मुलीने मर्सिडीजने दुचाकीला उडवले; महिलेचा जागेवर मृत्यू, एकजण गंभीर जखमी
3
Devendra Fadnavis: "बोल बच्चन भैरवी असणाऱ्यांना मी उत्तरे देत नाही" फडणवीसांची उद्धव ठाकरेंवर टीका
4
मराठमोळ्या अभिनेत्याने केली आत्महत्या, काम मिळत नसल्याने उचललं टोकाचं पाऊल
5
Amit Shah: इतक्या वर्षांत महाराष्ट्रासाठी, मुंबईसाठी तुम्ही काय केले? अमित शाहांची काँग्रेसवर टीका
6
बिझनेसमन संजय कपूर यांना मैदानावरच देण्यात आलेला CPR, शेवटचा Video समोर
7
आता विका जिकडे विकायचंय.., पाकिस्तान 'याचा' जगातील सर्वात मोठा उत्पादक, भारतानं नाकारलं आता अन्य देशांचे दरवाजे ठोठावतोय
8
अहमदाबादमधील विमान अपघातात प्रसिद्ध चित्रपट निर्मात्याचा मृत्यू, DNA चाचणीमधून झालं उघड  
9
आजचे राशीभविष्य - २१ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना आज सामाजिक, आर्थिक तसेच कौटुंबिक क्षेत्रात लाभ होतील
10
FD पेक्षा अधिक रिटर्न, रिस्कही कमी! 'याला' म्युच्युअल फंडाचं सेफ झोन म्हणतात, तुमच्यासाठी योग्य आहे का?
11
Iran Israel War : इराण मागे हटेना! अमेरिकेसोबत बोलण्यास नकार, इस्त्रायलने अनेक इराणी लष्करी तळ उद्ध्वस्त केले
12
अक्षय कोठारीला मिळालं बालपणीचं प्रेम, 'लक्ष्मीच्या पावलांनी' फेम अभिनेता अडकला विवाहबंधनात
13
Air India च्या भाड्यात १५% पर्यंतची घसरण; अहमदाबाद विमान अपघातानंतर बुकिंग मोठ्या प्रमाणात घटलं
14
Air India Plane Crash: ‘त्या’ विमानात कोणताही बिघाड नव्हता, एअर इंडियाचे सीईओ कॅम्पबेल विल्सन यांची ग्वाही
15
Nana Patole: निवडणुकीच्या 'या' नियमात मोठा बदल; पटोलेंचा केंद्र अन् निवडणूक आयोगाला थेट सवाल!
16
Navi Mumbai: मुलीवरून चिडवल्याने मित्राचा कापला गळा, नवी मुबईतील घटनेने खळबळ!
17
लोकलमध्ये दोन महिलांत डोकं फुटेपर्यंत हाणामारी; नेमकं कशामुळं पेटलं भांडण? खरं कारण आलं समोर
18
Nagpur: राजधानी एक्सप्रेसवर दगडफेक, प्रवाशांमध्ये दहशत 
19
Elections: आगामी निवडणुका एकत्र की स्वतंत्र? महाआघाडीमध्ये अद्यापही सूर जुळेना!
20
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!

नगरपरिषदेसाठी साडे चार लाख मतदार

By admin | Updated: October 20, 2016 01:36 IST

नगरपरिषदांच्या निवडणुकीसाठी जिल्ह्यात चार लाख ६९ हजार ८३१ मतदारांना मतदानाचा हक्क राहणार आहे.

६२२ केंद्र : महिलांची संख्या पुरूषांच्या बरोबरीने, आॅनलाईन उमेदवारी अर्जाची सोययवतमाळ : नगरपरिषदांच्या निवडणुकीसाठी जिल्ह्यात चार लाख ६९ हजार ८३१ मतदारांना मतदानाचा हक्क राहणार आहे. यात पुरुषांच्या बबरोबरीने महिला मतदारांची संख्या आहे. मतदानासाठी ६२२ केंद्र राहणार असून दोन हजार ४८८ कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी सचिंद्र पतापसिंग यांनी बुधवारी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.जिल्ह्यात यवतमाळसह वणी, पुसद, दिग्रस, घाटंजी, आर्णी, दारव्हा आणि उमरखेड नगरपरिषदेची निवडणूक २७ नोव्हेंबरला होत आहे. जिल्ह्यात आदर्श आचारसंहिता लागू झाली. या आठ ठिकाणी निवडणूक निर्णय अधिकारी व सहाय्यक निवडणूक अधिकाऱ्यांची नियुक्ती झाली आहे. याशिवाय निवडणूक आयोगातर्फे तीन निरीक्षकांची नियुक्ती केली जाणार आहे. ६२२ केंद्राध्यक्षांसह दोन हजार ४८८ मतदान कर्मचाऱ्याची नियुक्ती करण्यात आली आहे. यवतमाळात २९४, पुसद६५, घाटंजी २७, उमरखेड ४८, वणी ७५, दिग्रस ४२, दारव्हा ३६, तर आर्णीत ३५ मतदान केंद्र राहणार आहे. मतदारांना ‘नोटा’चा पर्याय उपलब्ध राहणार आहे. निवडणूक विभागातर्फे मतदारांना छायाचित्रासह त्यांचा मतदार क्रमांक, परिसर असलेली स्लीप देण्यात येईल, अशी माहिती सचिंद्र प्रतापसिंग यांनी दिली. यवतमाळात सर्वाधिक दोन लाख ३३ हजार ४0५ मतदार असून पुसद ५५ हजार ७६९, घाटंजी १५ हजार ५४३, उमरखेड ३६ हजार ९३९, वणी ४५ हजार ९२३, दिग्रस ३१ हजार ७८७, दारव्हा २७ हजार ७२, तर आर्णीत २३ हजार ३९३ मतदार आहेत. एकूण पुरूष मतदारांची संख्या दोन लाख ३८ हजार ८३0 असून महिला मतदारांची संख्या दोन लाख ३0 हजार ८२२ आहे. पुरूष मतदारांच्या तुलनेत महिलांची संख्या केवळ आठ हजारांनी कमी आहे. उमेदवारांना आॅनलाईन पद्धतीने उमेदवारी अर्ज दाखल करता येईल. त्यासाठी मदत केंद्र असेल. २७ नोव्हेंबरला सकाळी ७.३0 ते सायंकाळी ५.३0 पर्यंत मतदान होईल, दुसऱ्या दिवशी २८ नोव्हेंबरला सकाळी १0 वाजतापासून मतमोजणी होईल. आचारसंहितेचा भंग झाल्याची तक्रार प्राप्त होताच कारवाई केली जाईल, अशी ग्वाही सचिंद्र प्रतापसिंग यांनी दिली. पत्रपरिषदेला निवासी उपजिल्हाधिकारी राजेश खवले, महाजन, माहिती अधिकारी मंगेश वरकड, दिलीप कडासने आदी उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)