शहरं
Join us  
Trending Stories
1
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
2
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
3
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
4
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
5
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
6
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
7
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
8
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
9
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
10
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
11
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
12
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
13
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
14
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
15
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
16
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
17
काश्मीरला जाण्यासाठी अनेक महिने पैसे साठवले; आनंद, स्वप्न पूर्ण करायला गेले अन् घात झाला 
18
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
19
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
20
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर

यवतमाळ जिल्ह्याचा निकाल किंचित सुधारला, बारावीच्या परीक्षेत ९३ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण

By अविनाश साबापुरे | Updated: May 21, 2024 14:02 IST

मुलींची आघाडी यंदाही कायम : वणी उपविभाग यंदाही पिछाडीवर

यवतमाळ : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने इयत्ता बारावी परीक्षेचा निकाल मंगळवारी दुपारी १ वाजता जाहीर केला. यात यवतमाळ जिल्ह्याचा निकाल ९३.०५ टक्के इतका लागला आहे. जिल्ह्यातील एकंदर ३१ हजार ३५७ विद्यार्थ्यांपैकी २९ हजार १७९ विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा उत्तीर्ण केली आहे. मागील वर्षीपेक्षा जिल्ह्याचा निकाल किंचित सुधारला आहे. मागील वर्षी ९१.९८ टक्के निकाल लागला होता.

राज्य मंडळामार्फत यंदा २१ फेब्रुवारी ते १९ मार्च या कालावधीत इयत्ता बारावीची परीक्षा घेण्यात आली होती. जिल्ह्यातील १२४ परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा सुरळीत पार पडली. मंगळवारी या परीक्षेचा निकाल जाहीर होताच यशस्वी विद्यार्थ्यांनी आनंद व्यक्त केला.

बारावीच्या परीक्षेसाठी एकंदर ३१ हजार ५९५ नियमित विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यातील ३१ हजार ३५७ जणांनी प्रत्यक्ष परीक्षा दिली. त्यापैकी २९ हजार १७९ विद्यार्थी उत्तीर्ण झालेत. यामध्ये १५ हजार १३५ मुले तर १४ हजार ४४ मुली यशस्वी झालेल्या आहेत. मुलांच्या उत्तीर्णतेची टक्केवारी ९१.२६ इतकी असून  ९५.०६ टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहेत.

अमरावती विभागातून यंदा यवतमाळ जिल्ह्याची कामगिरी सुधारली आहे. मागील वर्षीच्या बारावीच्या निकालात जिल्हा चौथ्या क्रमांकावर होता. तर यंदा यवतमाळ विभागात तिसऱ्या क्रमांकावर आहे. अमरावती विभागात सर्वाधिक निकाल वाशिम जिल्ह्याचा ९५.६९ टक्के आहे. अकोला ९३.३७, यवतमाळ ९३.०५, अमरावती ९२.३३ तर बुलडाणा जिल्ह्याचा निकाल ९१.७८ टक्के आहे. जिल्ह्याच्या निकालाचा तालुकानिहाय विचार करता नेर, महागाव, आर्णी या तालुक्यांनी यंदाही निकालात आघाडी घेतली आहे. तर वणी उपविभागातील वणीसह मारेगाव, पांढरकवडा, झरी हे तालुके यंदाही पिछाडीवर राहिले आहेत.

तालुकानिहाय निकालयवतमाळ :         ९२.२७नेर :                    ९८.३५दारव्हा :              ९२.५०दिग्रस :                ९४.२०आर्णी :                 ९६.२७पुसद :                  ९३.१७उमरखेड :            ९४.८८महागाव :              ९७.६६बाभूळगाव :          ९७.५२कळंब :                 ९३.१२राळेगाव :              ९४.०९मारेगाव :               ८७.५५पांढरकवडा :         ८८.९८झरी जामणी :        ८८.६०वणी :                    ८३.६०घाटंजी :                ९२.६७

टॅग्स :YavatmalयवतमाळResult Dayपरिणाम दिवस