शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
2
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
3
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
4
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
5
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
6
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
7
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
8
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
9
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
10
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
11
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
12
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
13
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
14
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
15
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
16
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
17
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
18
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
19
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
20
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?

माणसांचा बाजार अन् कष्टाचा लिलाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2022 05:00 IST

सकाळी ८ वाजतापासून ते १० वाजतापर्यंत हे कामगार चौकात रोजगार मिळावा म्हणून उभे असतात. प्रत्येकजण रोजगारासाठी आतूर असतो. कुणीतरी एखादा मालक रोजमजूर हवा म्हणून या चौकात येताे. तो कंत्राटदाराशी सौदा करताे. त्यानंतर कामासाठी आवश्यक ते मजूर घेऊन मालक परत निघताे. मात्र, तेथे गोळा झालेल्यांपैकी मोजक्याच हातांना काम मिळते. इतरांना रोज मजुरीसाठी प्रतीक्षा करावी लागते. 

रूपेश उत्तरवारलोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : ‘विंचवाचे बिऱ्हाड पाठीवर’ असते असे म्हणतात. तीच गत मजूर वर्गाची झाली आहे. गावात काम मिळत नाही म्हणून यवतमाळलगतच्या गावातील काही मजूर पहाटेच येथील कामगार चौकात गोळा होतात. आपल्याला रोजगार देण्यासाठी कुणी तरी नक्की येईल म्हणून कामगार  दोन ते तीन तास ताटकळत बसतात. मात्र प्रत्येकांच्या वाट्यालाच रोजंदारी मिळेलच, याचा नेम नसतो. त्यांना दररोजच्या भाकरीची कायम चिंता असते. अनेकांना तर काम न मिळाल्याने रिकाम्या हाताने गावी परत जावे लागते.यवतमाळातील कामगार चौक म्हणून प्रसिद्ध असलेल्या पूनम चौक आणि वडगाव नाक्यावर दररोज पहाटेपासून मजुरांची गर्दी पहायला मिळते. सकाळी ८ वाजतापासून ते १० वाजतापर्यंत हे कामगार चौकात रोजगार मिळावा म्हणून उभे असतात. प्रत्येकजण रोजगारासाठी आतूर असतो. कुणीतरी एखादा मालक रोजमजूर हवा म्हणून या चौकात येताे. तो कंत्राटदाराशी सौदा करताे. त्यानंतर कामासाठी आवश्यक ते मजूर घेऊन मालक परत निघताे. मात्र, तेथे गोळा झालेल्यांपैकी मोजक्याच हातांना काम मिळते. इतरांना रोज मजुरीसाठी प्रतीक्षा करावी लागते.   यवतमाळलगतच्या बाभूळगाव, कळंब, घाटंजी, नेर, दारव्हा तालुक्यातील मालखेड, सावर, गळव्हा, जवळा, नेर, मंगरूळ, माणिकवाडा, चाणी, कामठवाडा, चिकणी, लिंगा, बोरजई यांसह अनेक गावातून मजूर या ठिकाणी भल्या पहाटेच हजर होतात. पहाटेपासूनच मजुरांची यवतमाळकडे धाव सुरू होते. त्याकरिता प्रत्येक मजूरदार कुटुंबाची पहाटेच धावपळ सुरू होते. दुचाकी, टेम्पो, टॅक्सी, एसटी यांसारख्या वाहनाने कामगार यवतमाळात दाखल होतात. त्यामुळे पहाटेपासूनच सुसाट वेगाने यवतमाळचे रस्ते हाऊसफुल्ल झाल्याचे चित्र पहायला मिळते. 

आधी गांधी चौक आता पूनम चौक, वडगाव नाकाकामगार चौकाला एक इतिहास आहे. प्रारंभी गांधी चौकात कामगारांची गर्दी होत  होती. आता हे ठिकाण बदलून पूनम चाैक आणि वडगाव नाक्यावर गेले आहे. या दोन्ही ठिकाणी ते गोळा होतात. कारण हेच ठिकाण त्यांच्या घरची चूल पेटविते. मजुरी लागल्यास, चूल पेटते. मजुरी न लागल्यास रिकाम्या हाताने परत जाताना पुन्हा उद्याची चिंता सतावत असते. 

 ठेकेदाराला द्यावे लागते परसेंटेज यवतमाळात येणाऱ्या प्रत्येक मजुराला काम मिळाल्यावर ठेकेदाराला परसेंटेज द्यावे लागते. मात्र, काम न मिळाल्यास रिकाम्या हाताने परतावे लागते. त्याची शाश्वती ठेकेदार घेत नाही. अनेक कामगार कामाच्या शोधात दुपारपर्यंत ठाण मांडून बसतात. तोपर्यंत काम न लागल्यास घरी परतात. परतताना चिमुकल्यांसाठी ‘भातकं’ नेण्यासाठीही त्यांच्याकडे पैसे नसतात.

 

टॅग्स :Unemploymentबेरोजगारी