शहरं
Join us  
Trending Stories
1
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
2
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
3
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
4
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
5
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
6
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
7
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
8
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
9
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
10
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
11
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
12
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
13
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
14
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 
15
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
16
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
17
Ramayana: साई पल्लवी नव्हे तर ही अभिनेत्री बनली असती सीता, म्हणाली - "मी स्वतःच दिला नकार..."
18
पाकिस्तानी खेळाडूला आमंत्रित केल्यामुळे ट्रोल झालेल्या नीरज चोप्रानं लिहिली भलीमोठी पोस्ट
19
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
20
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त

माणसांचा बाजार अन् कष्टाचा लिलाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2022 05:00 IST

सकाळी ८ वाजतापासून ते १० वाजतापर्यंत हे कामगार चौकात रोजगार मिळावा म्हणून उभे असतात. प्रत्येकजण रोजगारासाठी आतूर असतो. कुणीतरी एखादा मालक रोजमजूर हवा म्हणून या चौकात येताे. तो कंत्राटदाराशी सौदा करताे. त्यानंतर कामासाठी आवश्यक ते मजूर घेऊन मालक परत निघताे. मात्र, तेथे गोळा झालेल्यांपैकी मोजक्याच हातांना काम मिळते. इतरांना रोज मजुरीसाठी प्रतीक्षा करावी लागते. 

रूपेश उत्तरवारलोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : ‘विंचवाचे बिऱ्हाड पाठीवर’ असते असे म्हणतात. तीच गत मजूर वर्गाची झाली आहे. गावात काम मिळत नाही म्हणून यवतमाळलगतच्या गावातील काही मजूर पहाटेच येथील कामगार चौकात गोळा होतात. आपल्याला रोजगार देण्यासाठी कुणी तरी नक्की येईल म्हणून कामगार  दोन ते तीन तास ताटकळत बसतात. मात्र प्रत्येकांच्या वाट्यालाच रोजंदारी मिळेलच, याचा नेम नसतो. त्यांना दररोजच्या भाकरीची कायम चिंता असते. अनेकांना तर काम न मिळाल्याने रिकाम्या हाताने गावी परत जावे लागते.यवतमाळातील कामगार चौक म्हणून प्रसिद्ध असलेल्या पूनम चौक आणि वडगाव नाक्यावर दररोज पहाटेपासून मजुरांची गर्दी पहायला मिळते. सकाळी ८ वाजतापासून ते १० वाजतापर्यंत हे कामगार चौकात रोजगार मिळावा म्हणून उभे असतात. प्रत्येकजण रोजगारासाठी आतूर असतो. कुणीतरी एखादा मालक रोजमजूर हवा म्हणून या चौकात येताे. तो कंत्राटदाराशी सौदा करताे. त्यानंतर कामासाठी आवश्यक ते मजूर घेऊन मालक परत निघताे. मात्र, तेथे गोळा झालेल्यांपैकी मोजक्याच हातांना काम मिळते. इतरांना रोज मजुरीसाठी प्रतीक्षा करावी लागते.   यवतमाळलगतच्या बाभूळगाव, कळंब, घाटंजी, नेर, दारव्हा तालुक्यातील मालखेड, सावर, गळव्हा, जवळा, नेर, मंगरूळ, माणिकवाडा, चाणी, कामठवाडा, चिकणी, लिंगा, बोरजई यांसह अनेक गावातून मजूर या ठिकाणी भल्या पहाटेच हजर होतात. पहाटेपासूनच मजुरांची यवतमाळकडे धाव सुरू होते. त्याकरिता प्रत्येक मजूरदार कुटुंबाची पहाटेच धावपळ सुरू होते. दुचाकी, टेम्पो, टॅक्सी, एसटी यांसारख्या वाहनाने कामगार यवतमाळात दाखल होतात. त्यामुळे पहाटेपासूनच सुसाट वेगाने यवतमाळचे रस्ते हाऊसफुल्ल झाल्याचे चित्र पहायला मिळते. 

आधी गांधी चौक आता पूनम चौक, वडगाव नाकाकामगार चौकाला एक इतिहास आहे. प्रारंभी गांधी चौकात कामगारांची गर्दी होत  होती. आता हे ठिकाण बदलून पूनम चाैक आणि वडगाव नाक्यावर गेले आहे. या दोन्ही ठिकाणी ते गोळा होतात. कारण हेच ठिकाण त्यांच्या घरची चूल पेटविते. मजुरी लागल्यास, चूल पेटते. मजुरी न लागल्यास रिकाम्या हाताने परत जाताना पुन्हा उद्याची चिंता सतावत असते. 

 ठेकेदाराला द्यावे लागते परसेंटेज यवतमाळात येणाऱ्या प्रत्येक मजुराला काम मिळाल्यावर ठेकेदाराला परसेंटेज द्यावे लागते. मात्र, काम न मिळाल्यास रिकाम्या हाताने परतावे लागते. त्याची शाश्वती ठेकेदार घेत नाही. अनेक कामगार कामाच्या शोधात दुपारपर्यंत ठाण मांडून बसतात. तोपर्यंत काम न लागल्यास घरी परतात. परतताना चिमुकल्यांसाठी ‘भातकं’ नेण्यासाठीही त्यांच्याकडे पैसे नसतात.

 

टॅग्स :Unemploymentबेरोजगारी