शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

किराणा दुकानातून वाईन विक्रीच्या निर्णयाने होणार अनेक संसार उद्‌ध्वस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2022 05:00 IST

किराणा दुकान हे पारिवारिक दुकान म्हणून ओळखले जाते. लहानांपासून मोठ्यांपर्यंत  प्रत्येकजण या दुकानामध्ये जात असतो. अशाठिकाणी वाईनची विक्री झाली तर दारूड्यांना सहजच दारू मिळणार आहे. आज वाईन विक्री होईल, उद्या छुप्या मार्गाने त्याचठिकाणी दारूही विकली जाईल. अधिक नफा मिळतो म्हणून दुकानदारही याच वस्तू विकेल. यातून कुटुंब व्यवस्था मोडकळीस येईल. वाईन विक्रीचा निर्णय सरकारने बदलावा, असे मत महिलांनी नोंदविले.

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : किराणा दुकान आणि माॅलमध्ये वाईनची विक्री करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. या निर्णयाला गावखेड्यापासून शहरापर्यंत प्रचंड विरोध होत आहे. अनेक महिलांनी यावर संतापजनक प्रतिक्रिया नोंदवत ‘सरकारचे डोके ठिकाणावर आहे का?’ असा संतप्त प्रश्न विचारला आहे. किराणा दुकान हे पारिवारिक दुकान म्हणून ओळखले जाते. लहानांपासून मोठ्यांपर्यंत  प्रत्येकजण या दुकानामध्ये जात असतो. अशाठिकाणी वाईनची विक्री झाली तर दारूड्यांना सहजच दारू मिळणार आहे. आज वाईन विक्री होईल, उद्या छुप्या मार्गाने त्याचठिकाणी दारूही विकली जाईल. अधिक नफा मिळतो म्हणून दुकानदारही याच वस्तू विकेल. यातून कुटुंब व्यवस्था मोडकळीस येईल. वाईन विक्रीचा निर्णय सरकारने बदलावा, असे मत महिलांनी नोंदविले. 

काय आहे राज्य सरकारचा निर्णय?- किराणा दुकान आणि माॅलमध्ये वाईन विक्री करण्यासाठी राज्य शासनाने मान्यता दिली आहे. यामुळे किराणा दुकानात वाईन सहज उपलब्ध होणार आहे. 

महिला नेत्यांना काय वाटते?

सरकारच्या या निर्णयाबद्दल जनमानसात अतिशय वाईट प्रतिक्रिया उमटत  आहेत. किराणा दुकान सोडून अनेक ठिकाणी वाईन विक्री करता येते. किराणा दुकान हे पारिवारिक दुकान आहे. याठिकाणी वाईनची विक्री नको.            - वनमाला राठोड, जिल्हाध्यक्ष, महिला कॉंग्रेस 

गृहिणी आणि सर्वसामान्य महिला म्हणून या निर्णयाला माझा विरोध आहे. सरकारने या निर्णयाचा फेरविचार करायला हवा. पक्षपातळीवरही फेरविचाराचे संकेत मिळत आहेत. हा निर्णय चुकीचा आहे.          - सारिका ताजने, जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी कॉंग्रेस

हा निर्णय किशोरवयीन मुलांना बिघडवणारा आहे. दुकानांमध्ये जाणारी ही मुले पुढे जाऊन व्यसनाच्या अधिन होतील. यामुळे समाजावर त्याचा वाईट परिणाम होईल. हा निर्णय रद्द करायला हवा.         - वैशाली खोंड, महिला सरचिटणीस, भाजप

किराणा दुकानात  वाईनची विक्री केली तर सर्वसामान्य नागरिकाला जगणे कठीण होईल. जनतेला धोका  होईल. मद्यपी लोकांची सोय होईल. गावाची शांतताही भंग होईल. शासनाने या निर्णयाचा फेरविचार करावा.         - मंदा गाडेकर, जिल्हा संघटिका, शिवसेना

महिला सामाजिक कार्यकर्त्या काय म्हणतात?

वाईन म्हणजे दारू नव्हे, असे खोटे सांगितले जात आहे. त्यात १४ टक्के अल्कोहोल आहे. ज्यामुळे हळूहळू व्यक्ती दारूच्या आहारी जाईल. हा निर्णय रद्द करावा.    - सादिया निकहत, अध्यक्ष, जमाअत-ए-इस्लामी हिंद  

सरकारला केवळ डोळ्यासमोर पैसा दिसतो आहे. जनसामान्यांच्या संसाराचे कुठलेही सोयरसूतक नाही. सरकारचं डोकंच ठिकाणावर नाही. हा सर्वाधिक घातक निर्णय आहे. - प्रज्ञा चौधरी, सामाजिक कार्यकर्त्या.

 

टॅग्स :liquor banदारूबंदीGovernmentसरकार