शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

निसर्गाच्या लहरीपणाने कृषी अर्थव्यवस्था संकटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2022 08:00 IST

Yawatmal News दरवर्षी निसर्गाचा प्रकोप वाढत आहे. यावर मात करणारी हवामान विभागाची यंत्रणा यावर्षी सपशेल अपयशी ठरल्याची बाब पुढे आली आहे.

ठळक मुद्देपावसाळा एक महिने पुढे सरकला ७० टक्के पेरण्या अजूनही खोळंबल्या

रुपेश उत्तरवार

यवतमाळ : निसर्गाच्या लहरीपणाने संपूर्ण कृषी अर्थव्यवस्था धोक्यात आली आहे. महिना लोटला तरी जिल्ह्यातील अनेक भागात पाऊस बरसला नाही. ज्या भागात पाऊस बरसला त्या ठिकाणी अपुरा पाऊस होता. अशा ठिकाणी दुबार पेरणीचे मोठे संकट उभे ठाकले आहे. किमान २५ टक्के क्षेत्र यामुळे धोक्यात आले आहे. दरवर्षी निसर्गाचा प्रकोप वाढत आहे. यावर मात करणारी हवामान विभागाची यंत्रणा यावर्षी सपशेल अपयशी ठरल्याची बाब पुढे आली आहे. वारंवार वर्तविले जाणारे पावसाचे अंदाज सायंकाळपर्यंत विरले आहेत. यामुळे शेतकऱ्यांनाच आर्थिक फटका बसला आहे.

गतवर्षी हवामान विभागाचा अंदाज अक्षरश: खरा ठरला, अशी स्थिती होती. एका खासगी अभ्यासकांनी वारंवार भाकीत केले. त्यांना शेतकऱ्यांनी अक्षरश: डोक्यावर घेतले. याबाबत या खासगी अभ्यासकांनी काही ठोकताळे जाहीर कार्यक्रमात सांगितले. यामुळे शेतकऱ्यांचा पक्का विश्वास झाला आहे. याच अंदाजावर यावर्षी शेतकऱ्यांनी भरवसा ठेवला. शेत शिवारात पेरणी केली. प्रत्यक्षात भाकिताप्रमाणे पाऊस पडला नाही. वेधशाळेने वर्तविलेला अंदाजही दरवर्षीप्रमाणे फोल ठरला. जून महिन्यात १०० टक्के पाऊस पडेल, असा अंदाज होता. प्रत्यक्षात ५९ टक्केच पाऊस जिल्ह्यात कोसळला. हा पाऊस पेरणीकरिता पोषक नसल्याने या शेतशिवारात दुबार पेरणीचे संकट उभे ठाकले आहेत.

एकूण सिंचन क्षमतेच्या १९ टक्के सिंचन

मोठ्या आणि मध्यम प्रकल्पाच्या एकूण सिंचन क्षमतेच्या १९ टक्के क्षेत्रातच प्रत्यक्षात ओलीत होत आहे. दोन लाख हेक्टर क्षमता असताना केवळ ४० हजार हेक्टर क्षेत्रावर प्रकल्पाच्या माध्यमातून सिंचन होत असल्याची संपूर्ण स्थिती आहे. यासाठी अपुरे कॅनल कारणीभूत ठरले आहे. तर अनेक ठिकाणी कॅनॉलची डागडुजी रखडली आहे.

वाढत्या महागाईपुढे पीक कर्ज अपुरे

मजुरीचे दर १०० रुपयांवरून २५० रुपयांवर पोहोचले आहेत. खताच्या किमती १२०० रुपये पोत्यावरून १५०० रुपयांवर पोहोचल्या आहेत. सोयाबीन बियाण्यांचे दर ३२०० रुपयांवरून ४००० रुपयांवर पोहचले आहेत. फवारण्याच्या औषधाच्या किमती प्रचंड वाढल्या आहेत. महागाई प्रचंड वाढत आहे. याचवेळी मिळणारे पीक कर्ज मात्र अपुरे राहिलेे आहेत. यातून शेतकऱ्यांवर सावकाराकडे हात पसरण्याची वेळ आली आहे.

टॅग्स :agricultureशेती