शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
2
Arjun Tendulkar Engagement :अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको, साराची खास मैत्रिण; सानिया चांडोकचे फोटो पाहा
3
Arjun Tendulkar Engagement : चांडोकांची लेक होणार सचिन तेंडुलकरची सून; मुंबईत पार पडला अर्जुन सानियाचा साखरपुडा
4
पुण्यात वाहतूक पोलीस आणि कॅब चालक यांच्यात वाद; शिवीगाळ करत मारहाण केली; व्हिडीओ व्हायरल
5
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
6
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
7
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
8
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
9
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
10
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
11
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
12
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
13
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
14
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
15
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
16
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
17
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
18
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
19
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
20
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 

निसर्गाच्या लहरीपणाने कृषी अर्थव्यवस्था संकटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2022 08:00 IST

Yawatmal News दरवर्षी निसर्गाचा प्रकोप वाढत आहे. यावर मात करणारी हवामान विभागाची यंत्रणा यावर्षी सपशेल अपयशी ठरल्याची बाब पुढे आली आहे.

ठळक मुद्देपावसाळा एक महिने पुढे सरकला ७० टक्के पेरण्या अजूनही खोळंबल्या

रुपेश उत्तरवार

यवतमाळ : निसर्गाच्या लहरीपणाने संपूर्ण कृषी अर्थव्यवस्था धोक्यात आली आहे. महिना लोटला तरी जिल्ह्यातील अनेक भागात पाऊस बरसला नाही. ज्या भागात पाऊस बरसला त्या ठिकाणी अपुरा पाऊस होता. अशा ठिकाणी दुबार पेरणीचे मोठे संकट उभे ठाकले आहे. किमान २५ टक्के क्षेत्र यामुळे धोक्यात आले आहे. दरवर्षी निसर्गाचा प्रकोप वाढत आहे. यावर मात करणारी हवामान विभागाची यंत्रणा यावर्षी सपशेल अपयशी ठरल्याची बाब पुढे आली आहे. वारंवार वर्तविले जाणारे पावसाचे अंदाज सायंकाळपर्यंत विरले आहेत. यामुळे शेतकऱ्यांनाच आर्थिक फटका बसला आहे.

गतवर्षी हवामान विभागाचा अंदाज अक्षरश: खरा ठरला, अशी स्थिती होती. एका खासगी अभ्यासकांनी वारंवार भाकीत केले. त्यांना शेतकऱ्यांनी अक्षरश: डोक्यावर घेतले. याबाबत या खासगी अभ्यासकांनी काही ठोकताळे जाहीर कार्यक्रमात सांगितले. यामुळे शेतकऱ्यांचा पक्का विश्वास झाला आहे. याच अंदाजावर यावर्षी शेतकऱ्यांनी भरवसा ठेवला. शेत शिवारात पेरणी केली. प्रत्यक्षात भाकिताप्रमाणे पाऊस पडला नाही. वेधशाळेने वर्तविलेला अंदाजही दरवर्षीप्रमाणे फोल ठरला. जून महिन्यात १०० टक्के पाऊस पडेल, असा अंदाज होता. प्रत्यक्षात ५९ टक्केच पाऊस जिल्ह्यात कोसळला. हा पाऊस पेरणीकरिता पोषक नसल्याने या शेतशिवारात दुबार पेरणीचे संकट उभे ठाकले आहेत.

एकूण सिंचन क्षमतेच्या १९ टक्के सिंचन

मोठ्या आणि मध्यम प्रकल्पाच्या एकूण सिंचन क्षमतेच्या १९ टक्के क्षेत्रातच प्रत्यक्षात ओलीत होत आहे. दोन लाख हेक्टर क्षमता असताना केवळ ४० हजार हेक्टर क्षेत्रावर प्रकल्पाच्या माध्यमातून सिंचन होत असल्याची संपूर्ण स्थिती आहे. यासाठी अपुरे कॅनल कारणीभूत ठरले आहे. तर अनेक ठिकाणी कॅनॉलची डागडुजी रखडली आहे.

वाढत्या महागाईपुढे पीक कर्ज अपुरे

मजुरीचे दर १०० रुपयांवरून २५० रुपयांवर पोहोचले आहेत. खताच्या किमती १२०० रुपये पोत्यावरून १५०० रुपयांवर पोहोचल्या आहेत. सोयाबीन बियाण्यांचे दर ३२०० रुपयांवरून ४००० रुपयांवर पोहचले आहेत. फवारण्याच्या औषधाच्या किमती प्रचंड वाढल्या आहेत. महागाई प्रचंड वाढत आहे. याचवेळी मिळणारे पीक कर्ज मात्र अपुरे राहिलेे आहेत. यातून शेतकऱ्यांवर सावकाराकडे हात पसरण्याची वेळ आली आहे.

टॅग्स :agricultureशेती