शहरं
Join us  
Trending Stories
1
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
2
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
3
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
4
गीझर-हीटरमुळे तुमचे वीज बिल जास्त येतंय? या स्मार्ट टिप्स वापरून पैसे वाचवा
5
IPL 2026: ऑक्शनमध्ये चेन्नईचा मोठा डाव! १४ कोटी खर्च केले, पण परफेक्ट खेळाडू निवडला, धोनीची जागा घेणार?
6
BJP Assets: 2014 पूर्वी भाजपाच्या तिजोरीत किती पैसा होता? 11 वर्षांत किती वाढला? जाणून थक्क व्हाल!
7
आत्मनिर्भर भारताच्या दिशेने मोठे पाऊल, भारतातील पहिला स्वदेशी 64- बिट मायक्रोप्रोसेसर Dhruv64 लाँच
8
तब्बल ८ कोटी २० लाखांची बोली, दिल्ली कॅपिटल्सने संघात घेतलेला अकीब नबी दार कोण?
9
बाँडी बिचवर हल्ला करणाऱ्या साजिदचं भारताशी कनेक्शन समोर, २७ वर्षांपूर्वी सोडलं होतं हैदराबाद
10
आईने पाय धरले, तर वडिलांनी गळा आवळला; निवृत्त पोलिस अधिकाऱ्याने मुलीला संपवले, कारण...
11
Foldable Smartphones: सॅमसंग गॅलेक्सी ते गुगल पिक्सेलपर्यंत, यावर्षी लॉन्च झालेले प्रीमियम फोल्डेबल स्मार्टफोन!
12
"त्याला वर्षभर संधी, मला २-३ मॅचनंतर बाहेर काढलं..."; शुबमन गिलला संघाबाहेर न केल्याचा संताप
13
धोक्याची घंटा! फोन वाजला, उचलला पण समोरुन आवाजच नाही आला; Silent Calls चा नवा स्कॅम
14
मुंबईत महायुतीची बैठक संपली; भाजपा-शिंदेसेनेचा फॉर्म्युला ठरला, शेलारांनी आकडाही सांगितला
15
18 डिसेंबरपासून 'या' वाहनांवर बंदी! PUC शिवाय पेट्रोल नाही, 7 लाखांचा दंड; दिल्ली सरकारचा निर्णय
16
IPL 2026 Auction: Mumbai Indians ने घेतला पहिला खेळाडू; Rohit Sharma ला मिळाला नवा जोडीदार
17
वयोवृद्ध जोडपं दहशतवाद्याशी भिडलं, अखेरीस एकमेकांच्या मिठीत सोडले प्राण, बोरिस आणि सोफियाची थरारक कहाणी
18
मेस्सीचा इव्हेंट फसला, स्टेडियममध्ये मोठा गोंधळ झाला होता; बंगालच्या क्रीडामंत्र्यांना राजीनामा द्यावा लागला
19
IPL 2026 Auction: विस्फोटक फलंदाज आयपीएल २०२६ च्या मिनी ऑक्शनमध्ये अनसोल्ड, नाव ऐकून चकीत व्हाल!
20
बाई, हा काय प्रकार... LinkedIn वर फुल-टाइम गर्लफ्रेंडची व्हॅकन्सी, लोक विचारतात सॅलरी किती?
Daily Top 2Weekly Top 5

निसर्गाच्या लहरीपणाने कृषी अर्थव्यवस्था संकटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2022 08:00 IST

Yawatmal News दरवर्षी निसर्गाचा प्रकोप वाढत आहे. यावर मात करणारी हवामान विभागाची यंत्रणा यावर्षी सपशेल अपयशी ठरल्याची बाब पुढे आली आहे.

ठळक मुद्देपावसाळा एक महिने पुढे सरकला ७० टक्के पेरण्या अजूनही खोळंबल्या

रुपेश उत्तरवार

यवतमाळ : निसर्गाच्या लहरीपणाने संपूर्ण कृषी अर्थव्यवस्था धोक्यात आली आहे. महिना लोटला तरी जिल्ह्यातील अनेक भागात पाऊस बरसला नाही. ज्या भागात पाऊस बरसला त्या ठिकाणी अपुरा पाऊस होता. अशा ठिकाणी दुबार पेरणीचे मोठे संकट उभे ठाकले आहे. किमान २५ टक्के क्षेत्र यामुळे धोक्यात आले आहे. दरवर्षी निसर्गाचा प्रकोप वाढत आहे. यावर मात करणारी हवामान विभागाची यंत्रणा यावर्षी सपशेल अपयशी ठरल्याची बाब पुढे आली आहे. वारंवार वर्तविले जाणारे पावसाचे अंदाज सायंकाळपर्यंत विरले आहेत. यामुळे शेतकऱ्यांनाच आर्थिक फटका बसला आहे.

गतवर्षी हवामान विभागाचा अंदाज अक्षरश: खरा ठरला, अशी स्थिती होती. एका खासगी अभ्यासकांनी वारंवार भाकीत केले. त्यांना शेतकऱ्यांनी अक्षरश: डोक्यावर घेतले. याबाबत या खासगी अभ्यासकांनी काही ठोकताळे जाहीर कार्यक्रमात सांगितले. यामुळे शेतकऱ्यांचा पक्का विश्वास झाला आहे. याच अंदाजावर यावर्षी शेतकऱ्यांनी भरवसा ठेवला. शेत शिवारात पेरणी केली. प्रत्यक्षात भाकिताप्रमाणे पाऊस पडला नाही. वेधशाळेने वर्तविलेला अंदाजही दरवर्षीप्रमाणे फोल ठरला. जून महिन्यात १०० टक्के पाऊस पडेल, असा अंदाज होता. प्रत्यक्षात ५९ टक्केच पाऊस जिल्ह्यात कोसळला. हा पाऊस पेरणीकरिता पोषक नसल्याने या शेतशिवारात दुबार पेरणीचे संकट उभे ठाकले आहेत.

एकूण सिंचन क्षमतेच्या १९ टक्के सिंचन

मोठ्या आणि मध्यम प्रकल्पाच्या एकूण सिंचन क्षमतेच्या १९ टक्के क्षेत्रातच प्रत्यक्षात ओलीत होत आहे. दोन लाख हेक्टर क्षमता असताना केवळ ४० हजार हेक्टर क्षेत्रावर प्रकल्पाच्या माध्यमातून सिंचन होत असल्याची संपूर्ण स्थिती आहे. यासाठी अपुरे कॅनल कारणीभूत ठरले आहे. तर अनेक ठिकाणी कॅनॉलची डागडुजी रखडली आहे.

वाढत्या महागाईपुढे पीक कर्ज अपुरे

मजुरीचे दर १०० रुपयांवरून २५० रुपयांवर पोहोचले आहेत. खताच्या किमती १२०० रुपये पोत्यावरून १५०० रुपयांवर पोहोचल्या आहेत. सोयाबीन बियाण्यांचे दर ३२०० रुपयांवरून ४००० रुपयांवर पोहचले आहेत. फवारण्याच्या औषधाच्या किमती प्रचंड वाढल्या आहेत. महागाई प्रचंड वाढत आहे. याचवेळी मिळणारे पीक कर्ज मात्र अपुरे राहिलेे आहेत. यातून शेतकऱ्यांवर सावकाराकडे हात पसरण्याची वेळ आली आहे.

टॅग्स :agricultureशेती