शहरं
Join us  
Trending Stories
1
Wang Kun: दारू नाही, पार्टी नाही, आहारही साधा...; तरीही प्रसिद्ध बॉडीबिल्डरचा वयाच्या ३० व्या वर्षी मृत्यू!
2
एक योजना महात्मा गांधी के नाम...! मनरेगाचं नाव बदलण्याच्या धामधुमीतच ममता बॅनर्जींची मोठी घोषणा
3
अमेरिकेकडून आणखी एक जहाजावर हल्ला, ४ जणांचा मृत्यू, व्हेनेझुएलाने घेतला मोठा निर्णय  
4
प्रज्ञा सातव यांच्या भाजपा प्रवेशावरून काँग्रेसची टीका; नेते म्हणाले, “हे स्वार्थी लोक...”
5
कार घेण्याचं स्वप्न आता होणार पूर्ण! पाहा कोणत्या बँकेत मिळतंय सर्वात स्वस्त 'कार लोन'
6
Vijay Hazare Trophy : IPL मधील 'अनसोल्ड' खेळाडूच्या कॅप्टन्सीत खेळणार KL राहुल! करुण नायरलाही 'प्रमोशन'
7
पळपुट्या विजय माल्याच्या वाढदिवसानिमित्त ललित मोदीने दिली जंगी पार्टी, सोशल मीडियावर झाले ट्रोल
8
महायुतीच्या मुंबई 'फॉर्म्युला'तून राष्ट्रवादी आउट; भाजप-शिवसेनेचे १५० जागांवर एकमत; ७७ जागांसाठी खलबतं सुरू
9
अखेर BCCIने मान्य केली चूक, आता बदल होणार! पुढील ३१ दिवसांसाठी घेतला जाणार मोठा निर्णय
10
१५०० लोकसंख्येच्या गावात २७ हजार जन्मांची नोंद! यवतमाळमध्ये 'बर्थ सर्टिफिकेट'चा महाघोटाळा; मुंबई कनेक्शन उघड
11
द मुरुड फाईल्स! शिंदेसेना अन् काँग्रेसची पुन्हा एकदा हातमिळवणी, “आम्ही एकत्र आलोय ते...”
12
राखी सावंत पुन्हा रचणार स्वयंवर? सेलिब्रिटींना नाही तर राजकारण्यांना देणार आमंत्रण
13
उद्धव ठाकरेंची शिवसेना १२५ तर राज ठाकरेंची मनसे ९० जागांवर लढण्याची शक्यता; तिकडे भाजपाने शिंदेसेनेला ५० जागा ऑफर केल्या...
14
अदला बदली! माझं घर तुझं, तुझं घर माझं, होम-स्वॅपिंगचा नवा ट्रेंड; मोफत राहण्यासाठी भन्नाट 'जुगाड'
15
जिथे INS विक्रांतचा तळ, जवळच अणुकेंद्र, तिथे उडत उडत पोहोचला चिनी हेर, असा सापडला जाळ्यात
16
SMAT 2025 Final Live Streaming : पुण्याच्या मैदानात रंगणार फायनलचा थरार! ईशान किशन कॅप्टन्सीत इतिहास रचणार?
17
पोर्टफोलिओ करा स्ट्रॉन्ग! ऑटोपासून हेल्थकेअरपर्यंत 'हे' ५ शेअर्स देणार बंपर परतावा; पाहा सविस्तर विश्लेषण
18
७.५ कोटी प्रवाशांना लाभ, १६४ सेवा, भारतीयांसाठी ‘वंदे भारत’ वरदान; मेक इन इंडियाचा चमत्कार!
19
"युती झाली नसती तर शिंदेसेनेत..."; मंत्री प्रताप सरनाईक यांचं भाजपा महायुतीबाबत मोठं विधान
20
अति घाई, संकटात नेई! स्कूटी-कारची जोरदार धडक; Video पाहून तुम्हीच सांगा चूक नेमकी कोणाची?
Daily Top 2Weekly Top 5

संस्थानच्या जमिनीवर थाटली सिमेंट कंपनी

By admin | Updated: July 1, 2015 00:15 IST

दत्त शिखर संस्थान माहूर (जि.नांदेड) च्या वणी तालुक्यातील शिंदोला येथे असलेल्या सुमारे १०० हेक्टर जमिनीवर ...

चौकशीत शिक्कामोर्तब : माहूर येथील दत्त शिखर संस्थानयवतमाळ : दत्त शिखर संस्थान माहूर (जि.नांदेड) च्या वणी तालुक्यातील शिंदोला येथे असलेल्या सुमारे १०० हेक्टर जमिनीवर सिमेंट कंपनी थाटली गेल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणात विभागीय महसूल आयुक्तांकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे. माहूर संस्थानची शिंदोला येथे १०० हेक्टर एक आर इनामी जमीन आहे. नियमानुसार या जमिनीचे कोणत्याही कामासाठी संपादन होवू शकत नाही. या जमिनीला कुळही लावले गेले होते. मात्र देवस्थानाची ही इनामी जमीन १९८७ ला वणीच्या तत्कालीन उपविभागीय अधिकाऱ्यांनी सिमेंट कंपनीसाठी संपादित केली. त्यापोटी संस्थानला ६० टक्के तर कुळाच्या वारसदारांना ४० टक्के लाभ दिला गेला. दरम्यान, शासनाच्या ३० जुलै २०१० च्या आदेशानुसार संस्थानच्या बेकायदेशीररीत्या हस्तांतरित झालेल्या जमिनी पूर्ववत देवस्थानाच्या नावे करण्याची कार्यवाही सुरू झाली. सुरुवातीला या प्रकरणात वणी महसूल प्रशासनाने चुकीचा अहवाल शासनाला सादर केला होता. ही बाब निदर्शनास आल्यानंतर विभागीय आयुक्तांनी चौकशी समिती गठित करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना दिले. त्यानुसार समिती गठित होवून चौकशी झाली. या समितीचा अहवाल २२ जुलै २०१३ रोजी शासनाला सादर करण्यात आला. माहूर संस्थानची ही जमीन सिमेंट कंपनीच्या खानकामासाठी संपादित करण्यात आल्याचे व त्याच्या संपादन-हस्तांतरणाला कोणत्याही सक्षम अधिकाऱ्याची पूर्व परवानगी घेतली नसल्याचे अहवालात नमूद केले गेले. खासगी कंपनीकरिता केलेले या जमिनीचे संपादन-प्रक्रिया पूर्णपणे बेकायदेशीर व अधिनियमाविरुद्ध असल्याचे नमूद करण्यात आले. त्यात प्रमुख चार मुद्दे उपस्थित केले गेले. शासन सार्वजनिक कामाकरिता जमिनीचे भूसंपादन करू शकते, खासगी कंपनीसाठी नाही. संपादनासाठी पूर्वपरवानगी घेतली नाही. इनामी जमीन असूनही व भोगवटदार २ प्रकारात मोडूनही परस्पर हस्तांतरण केले गेले. या जमिनीच्या हस्तांतरणासाठी धर्मादाय आयुक्त मुंबई यांची परवानगी बंधनकारक असताना ती घेतली गेली नाही. या चार मुद्यांकडे चौकशी समितीने लक्ष वेधले. या प्रकरणात माहूर संस्थानच्या तत्कालीन नायब तहसीलदाराची भूमिकाही संशयास्पद वाटत असल्याचे तक्रारकर्ते गोपाल भारती यांनी ‘लोकमत’ला सांगितले. दोन वर्षांपासून चौकशी समितीचा हा अहवाल सादर झाला असूनही कारवाई झालेली नाही. त्यामुळेच गोपाल भारती यांनी आता आयुक्तालय व सचिवालयाकडे दाद मागितली आहे. (प्रतिनिधी)