शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत ठाकरे बंधू युतीत शरद पवारांची राष्ट्रवादी सहभागी होणार?; २२ जागांचा देणार प्रस्ताव
2
नोकरी बदलणाऱ्यांना EPFO चा मोठा दिलासा! 'ब्रेक'बाबतचे नियम बदलले; आता शनिवार-रविवारची सुट्टी अडथळा ठरणार नाही
3
दादरमध्ये अजब प्रकार, एक तरुण या इमारतीवरुन त्या इमारतीवर मारतोय उड्या; पोलिसांची दमछाक
4
अमेरिकेतील नॉर्थ कॅरोलिनामध्ये जेट विमानाचा अपघात; संपूर्ण कुटुंबच उद्ध्वस्त
5
'...तर त्यांचा एक हात तोडून दुसऱ्या हातात दिला असता'; इम्तियाज जलील मंत्री संजय निषाद यांच्यावर संतापले
6
डेमोक्रेट्सच्या खासदारांनी जारी केले एपस्टीनचे ६८ नवीन फोटो; महिलेसोबत दिसले बिल गेट्स
7
मुंबई विमानतळाची गोपनीय माहिती चोरट्यांच्या हाती; ऐरोलीतील घटना : अदानी ग्रुपच्या मॅनेजरचा लॅपटॉप चोरीला
8
मी सर्वांसमोर तिला चुकीच्या पद्धतीने का किस करेल? ट्रोल झाल्यावर राकेश बेदींनी दिलं स्पष्टीकरण
9
उस्मान हादी यांच्या मृत्यूनंतर बांग्लादेश पेटला, कट्टरपंथांनी भारताचे नाव घेतले; शेख हसीना यांच्या सरकारला हादीनेच दिले होते हादरे
10
राज्यातील पहिले 'जेन झी टपाल' आयआयटी मुंबईत; कार्यालयामध्ये नवीन सुविधांसह डिजिटल सेवा
11
'या' कंपनीच्या गुंतवणूकदारांना ₹५५,५५० कोटींपेक्षा अधिकचा फटका; १६ महिन्यांत स्टॉक ८० टक्क्यांनी आपटला
12
'राहुल गांधींचं काम केलं, तुमचं नाही केलं तर लोक म्हणतील...'; नितीन गडकरींनी प्रियंका गांधींना खाऊ घातली स्पेशल डिश
13
Vijay Mallya : देशातून फरार, पण लंडनमध्ये मात्र जोरदार सेलिब्रेशन; ललित मोदीच्या घरी झाली विजय माल्ल्याची जंगी बर्थ डे पार्टी
14
आज होणार धमाका! महिलेच्या शरीरावर कांदबरीतील ओळीचं लिखाण, १८ वर्षीय मुलीचा इतका 'रेट' लावला
15
कोकाटेंचा राजीनामा स्वीकारला; सदनिका घोटाळ्यात अटक वॉरंट निघताच आधी खाती काढून घेतली अन् आता…
16
संपादकीय : सरकारच्या प्रतिमेचे काय? डागाळलेली प्रतिमा अन् सत्तेची अपरिहार्यता
17
विखुरलेले विरोधक : भाजपचा कॅल्क्युलेटर ऑन! भावनिक लाट ओसरली, आता गणिताची लढाई!
18
बांगलादेशात मोठा गोंधळ! बंडखोरांचा नेता हादी यांचा मृत्यू; दंगली उसळल्या, लोकांनी तोडफोड आणि जाळपोळ केली सुरू
19
"छापा नाही, केवळ रुटीन व्हेरिफिकेशन...", शिल्पा शेट्टीच्या वकिलांनी छापेमारीचं वृत्त फेटाळलं
20
आजचे राशीभविष्य, १९ डिसेंबर २०२५: आर्थिक लाभ होईल, कार्यालयात संघर्ष किंवा मतभेदाचे प्रसंग येतील
Daily Top 2Weekly Top 5

शेतजमिनीवर संमतीशिवाय थाटले तहसील कार्यालय

By admin | Updated: December 7, 2014 22:58 IST

कुठलाही कायदेशीर करार, विक्री चिठ्ठी, खरेदी खत अथवा दानपत्र लिहून न घेता एका शेतकऱ्याच्या शेतजमीनीवर ताबा करून त्यावर तहसील कार्यालय, भूमीअभिलेख, कोषागार आणि

यवतमाळ : कुठलाही कायदेशीर करार, विक्री चिठ्ठी, खरेदी खत अथवा दानपत्र लिहून न घेता एका शेतकऱ्याच्या शेतजमीनीवर ताबा करून त्यावर तहसील कार्यालय, भूमीअभिलेख, कोषागार आणि अलिकडेच सभागृहाच्या बांधकामाला सुरूवात झाली आहे. यासाठी नगर पालिकेकडून बांधकामाची परवानगीही घेण्यात आली नाही. विशेष असे की, २७ वर्षांपूर्वी पांढरकवडा उपविभागीय दंडाधिकाऱ्यांनी ही शेतजमीन सदर शेतकऱ्याला देण्यात यावी असा आदेश दिला होता. मात्र या आदेशालाही केराची टोपली दाखविण्यात आली. घाटंजी येथील तहसील कार्यालय १९८० पूर्वी भाड्याच्या इमारतीत होते. त्यामुळे प्रशासनाने कार्यालयाच्या बांधाकामचा निर्णय घेतला. त्यावेळी घाटंजी येथील पारवा मार्गावर बापूराव गिनगुले यांची शेतसर्वे नं. ४/१ ही जमीन कार्यालयासाठी निवडण्यात आली. या जमीनीसाठी गिनगुले यांच्याशी बोलणी झाली. तेव्हा योग्य तो मोबदला आणि वारसाला नोकरी देण्याचा प्रस्ताव गिनगुले यांच्याकडे ठेवण्यात आला. जमिनीचा योग्य मोबदला मिळून मुलाला नोकरीही मिळेल या हेतुने त्यांनी होकार दिला. परंतु प्रशासनाने कुठलाही करारनामा व मोबदला न देताच त्यांच्या अज्ञानाचा फायदा घेऊन दोन हेक्टर ४३ आर जमिनीपैकी ०.४३ आर जमिनीवर तहसील कार्यालय बांधले. त्यानंतर उर्वरित जमीन ताब्यात घेतली. त्यामुळे १९८१ ते ८७ या कालावधित बापूराव गिनगुले यांनी मोबदला अथवा जमीन परत मिळावी यासाठी लढा चालविला. या काळात प्रशासनाने ११ आदेश काढले. त्यातील शेवटचा आदेश २९ आॅक्टोबर १९८७ ला पारीत करण्यात आला. पांढरकवड्याचे तत्कालिन उपविभागीय दंडाधिकारी यांनी दिलेल्या या आदेशात सर्व तोंडी करार रद्द करण्यात येऊन जमीन मालकाला त्याची जमीन परत द्यावी तसेच तहसील कार्यालयाचे बांधकाम झाल्याने दरमहा २० हजार रुपये या प्रमाणे भाडे द्यावे असे नमूद केले. मात्र या आदेशाला तब्बल २७ वर्ष उलटले तरीही जमिनीचा मोबदला अथवा ताबा मिळालेला नाही. दरम्यान शेतकरी बापूराव गिनगुले यांचे निधन झाले. आता त्यांचा मुलगा गणपत गिनगुले हे मोबदल्यासाठी लढा देत आहे. मात्र तहसीलदारांकडून यासंदर्भात कुठलीही कारवाई झाली नाही. तहसील कार्यालयानंतर त्यांच्या जमिनीवर भूमीअभिलेख कोषागार आणि अलिकडेच सभागृह बांधकाम करण्यात आले. यासंदर्भात गणपत गिनगुले यांनी मुख्यमंत्र्यांपासून तर आर्णीचे आमदार प्रा. राजू तोडसाम यांच्याकडे तक्रार दिली. तसेच न्याय देण्याची मागणी केली आहे. (स्थानिक प्रतिनिधी)