शहरं
Join us  
Trending Stories
1
“उद्धव ठाकरे सत्तेत कमी विरोधी पक्षात जास्त राहिले, कारखाने वाचवण्यासाठी सत्ता नको”: राऊत
2
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारतीय रेल्वेचा मोठा निर्णय, उधमपूर-जम्मू-दिल्ली विशेष ट्रेन चालवणार
3
Operation Sindoor Live Updates: राज्यांना आपत्कालीन अधिकारांचा वापर करण्याची परवानगी, गृह मंत्रालयाचा निर्णय
4
जगा आणि जगू द्या..; मेहबूबा मुफ्तींचे रडत-रडत भारत आणि पाकिस्तानच्या प्रमुखांना आवाहन
5
भारतीय सेनेचा 'सुपर हीरो', पाकिस्तानच्या नाकीनऊ आणलं! काय आहे 'आकाश'मध्ये खास?
6
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर RSSची मोदी सरकारच्या पाठीवर कौतुकाची थाप, भारतीय सैन्याचे केले अभिनंदन
7
Gold Price 9 May : भारत-पाक तणावादरम्यान सोन्याच्या दरात पुन्हा घसरण, खरेदीपूर्वी पाहा काय आहेत नवे दर?
8
India Pakistan War: 'आमचे पंतप्रधान भित्रे, ते मोदींचे नाव घ्यायला घाबरतात'; पाकिस्तानी खासदाराने त्यांच्याच सरकारला सुनावले
9
"सत्याला अभिनय करु नको असं सांगितलंय", महेश मांजरेकरांचा लेकाबद्दल खुलासा, म्हणाले- "ट्रोल केल्यावर मी..."
10
India Pakistan Vidoe: पाकिस्तानने डागलेली उखळी तोफ थेट घरावर, क्षणात दिसेनासं झालं, बघा काय घडलं?
11
यशस्वी जैस्वालचा यू-टर्न ! गोवा नव्हे, मुंबई संघाकडूनच क्रिकेट खेळणार... काय दिलं कारण?
12
हसतं-खेळतं कुटुंब उद्ध्वस्त! पाकिस्तानच्या गोळीबारात जुळ्या भावंडांचा मृत्यू
13
पाक लष्कर प्रमुखाला मिळाली विशेष 'पॉवर'; पाकिस्तानी सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
14
लग्नाच्या अवघ्या १५व्या दिवशीच नवरीनं उडवली सासरची झोप; नवरदेवालाही लावला चुना अन्...  
15
Mumbai: टाटा मेमोरियल हॉस्पिटलला बॉम्बने उडवून देण्याची धमकी; भारत- पाकिस्तान तणावादरम्यान मेल
16
उद्यापासून महाराष्ट्रातील या ठिकाणी पेट्रोल पंपावर UPI पेमेंट बंद; कारण काय? जाणून घ्या...
17
तुमच्या मुलांच्या उच्च शिक्षणासाठी आर्थिक नियोजन कसे करावे? महागाई लक्षात घेऊन 'या' टिप्स फॉलो करा
18
India Pakistan: 'ये कोई तरीका है भीख मांगने का'; भारताच्या 'पीआयबी'ने पाकिस्तानची उडवली खिल्ली 
19
मागे कोण उभं आहे बघा, शवपेट्यांना लपटलेले झेंडे बघा; भारताने जगाला दाखवला पाकचा खरा चेहरा
20
Operation Sindoor वर मुकेश अंबानींचं वक्तव्य, पंतप्रधानांचा उल्लेख करत केलं 'हे' वक्तव्य 

शेतजमिनीवर संमतीशिवाय थाटले तहसील कार्यालय

By admin | Updated: December 7, 2014 22:58 IST

कुठलाही कायदेशीर करार, विक्री चिठ्ठी, खरेदी खत अथवा दानपत्र लिहून न घेता एका शेतकऱ्याच्या शेतजमीनीवर ताबा करून त्यावर तहसील कार्यालय, भूमीअभिलेख, कोषागार आणि

यवतमाळ : कुठलाही कायदेशीर करार, विक्री चिठ्ठी, खरेदी खत अथवा दानपत्र लिहून न घेता एका शेतकऱ्याच्या शेतजमीनीवर ताबा करून त्यावर तहसील कार्यालय, भूमीअभिलेख, कोषागार आणि अलिकडेच सभागृहाच्या बांधकामाला सुरूवात झाली आहे. यासाठी नगर पालिकेकडून बांधकामाची परवानगीही घेण्यात आली नाही. विशेष असे की, २७ वर्षांपूर्वी पांढरकवडा उपविभागीय दंडाधिकाऱ्यांनी ही शेतजमीन सदर शेतकऱ्याला देण्यात यावी असा आदेश दिला होता. मात्र या आदेशालाही केराची टोपली दाखविण्यात आली. घाटंजी येथील तहसील कार्यालय १९८० पूर्वी भाड्याच्या इमारतीत होते. त्यामुळे प्रशासनाने कार्यालयाच्या बांधाकामचा निर्णय घेतला. त्यावेळी घाटंजी येथील पारवा मार्गावर बापूराव गिनगुले यांची शेतसर्वे नं. ४/१ ही जमीन कार्यालयासाठी निवडण्यात आली. या जमीनीसाठी गिनगुले यांच्याशी बोलणी झाली. तेव्हा योग्य तो मोबदला आणि वारसाला नोकरी देण्याचा प्रस्ताव गिनगुले यांच्याकडे ठेवण्यात आला. जमिनीचा योग्य मोबदला मिळून मुलाला नोकरीही मिळेल या हेतुने त्यांनी होकार दिला. परंतु प्रशासनाने कुठलाही करारनामा व मोबदला न देताच त्यांच्या अज्ञानाचा फायदा घेऊन दोन हेक्टर ४३ आर जमिनीपैकी ०.४३ आर जमिनीवर तहसील कार्यालय बांधले. त्यानंतर उर्वरित जमीन ताब्यात घेतली. त्यामुळे १९८१ ते ८७ या कालावधित बापूराव गिनगुले यांनी मोबदला अथवा जमीन परत मिळावी यासाठी लढा चालविला. या काळात प्रशासनाने ११ आदेश काढले. त्यातील शेवटचा आदेश २९ आॅक्टोबर १९८७ ला पारीत करण्यात आला. पांढरकवड्याचे तत्कालिन उपविभागीय दंडाधिकारी यांनी दिलेल्या या आदेशात सर्व तोंडी करार रद्द करण्यात येऊन जमीन मालकाला त्याची जमीन परत द्यावी तसेच तहसील कार्यालयाचे बांधकाम झाल्याने दरमहा २० हजार रुपये या प्रमाणे भाडे द्यावे असे नमूद केले. मात्र या आदेशाला तब्बल २७ वर्ष उलटले तरीही जमिनीचा मोबदला अथवा ताबा मिळालेला नाही. दरम्यान शेतकरी बापूराव गिनगुले यांचे निधन झाले. आता त्यांचा मुलगा गणपत गिनगुले हे मोबदल्यासाठी लढा देत आहे. मात्र तहसीलदारांकडून यासंदर्भात कुठलीही कारवाई झाली नाही. तहसील कार्यालयानंतर त्यांच्या जमिनीवर भूमीअभिलेख कोषागार आणि अलिकडेच सभागृह बांधकाम करण्यात आले. यासंदर्भात गणपत गिनगुले यांनी मुख्यमंत्र्यांपासून तर आर्णीचे आमदार प्रा. राजू तोडसाम यांच्याकडे तक्रार दिली. तसेच न्याय देण्याची मागणी केली आहे. (स्थानिक प्रतिनिधी)