शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
3
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
4
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
5
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
6
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
7
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
8
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
9
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
10
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
11
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
12
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
13
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
14
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
15
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
16
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
17
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
18
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
19
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
20
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान

उमरखेड तालुक्यात साथीच्या आजारांचे थैमान

By admin | Updated: June 23, 2015 00:30 IST

गेल्या काही दिवसांपासून झालेल्या पावसानंतर आता उमरखेड तालुक्यात साथीच्या आजारांची लागण झाली आहे.

औषधांचा तुटवडा : शेकडो रुग्णांची रुग्णालयात गर्दीउमरखेड : गेल्या काही दिवसांपासून झालेल्या पावसानंतर आता उमरखेड तालुक्यात साथीच्या आजारांची लागण झाली आहे. ग्रामीण भागात दररोज शेकडो रुग्ण रुग्णालयात येत आहे. परंतु वैद्यकीय केंद्रांमध्ये सोयी सुविधांचा अभाव असल्याने योग्य उपचार होताना दिसत नाही. उमरखेड तालुका आरोग्य कार्यालयांतर्गत येणाऱ्या ढाणकी, मुळावा, सोनदाबी, विडूळ, कोरटा, थेरडी या सहा प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत ३३ उपकेंद्र असून यामध्ये सध्या मोठ्या प्रमाणात रुग्ण दाखल होत आहे. संडास, उलटी, ताप आदींची लागण मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. परंतु आरोग्य कर्मचारी मुख्यालयी राहात नसल्यामुळे रुग्णांचे प्रचंड हाल होत आहे. यावर्षी मृग नक्षत्रात उमरखेड तालुक्यात चांगला पाऊस पडला. जमिनीत पाणी मुरले असून ते दूषित पाणी ग्रामीण भागातील नागरिक पिण्यासाठी वापरत आहे. या पाण्यावर शुद्धीकरणासाठी कोणतीही प्रक्रियेची सोय नाही. त्यामुळे रुग्णसंख्या वाढत आहे.ढाणकी, मुळावा, विडूळ, कोरटा, सोनदाबी, थेरडी या प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये दररोज शेकडो रुग्ण दाखल होत आहे. उपकेंद्रांमध्येही रुग्ण वाढले आहे. यामध्ये खरूस, गाजेगाव, कृष्णापूर, ब्राह्मणगाव, चातारी, बोरी, पिंपळदरी, धनज, तरोडा, पोफाळी, पळशी, कुपटी, मोरचंडी, जेवली, बिटरगाव, आकोली, विडूळ, देवसरी, धानोरा, खरूस खु., मार्लेगाव, बाळदी, सुकळी, पार्डी, कोरडा, भवानी, कुरळी, खरबी, दराटी आदी उपकेंद्रांतर्गत येणाऱ्या विविध गावांमध्ये डायरिया व उलटीची साथ दिसून येत आहे. विडूळ प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येणाऱ्या दिघडी येथे शेकडो रुग्णांना डायरियाची लागण झाल्याची माहिती आहे. त्या ठिकाणी आरोग्य विभागाचे कर्मचारी तळ ठोकूर आहे.उमरखेड शासकीय रुग्णालयातही रुग्णांची संख्या वाढली आहे. या रुग्णालयात सध्या सुनीता कदम, सोमा राठोड, शारदाबाई चव्हाण, सरस्वती चव्हाण, सुरेश लोमटे, अनुराधा राणे, वंदना घोंगडे, ललिता कानिंदे, फरहा शेख, राशद पठाण, रेखा कळसे, लक्ष्मण राणे आदी विविध गावातील रुग्ण दाखल झाले आहे. संडास, उलटी, डायरिया आदी आजारांसाठी लागणाऱ्या औषधींचा तुटवडा जाणवत आहे. ओआरएस पावडर अनेक रुग्णालयांमध्ये नाही. तसेच रात्रीच्या सुमारास कर्मचारीच उपस्थित राहात नसल्यामुळे रुग्णांवर योग्य उपचार होत नाही. अनेक रुग्ण नाईलाजास्तव खासगी रुग्णालयात उपचारार्थ जात आहे. ग्रामीण भागात पावसाचे प्रमाण जास्त असल्यामुळे साथीच्या रोगाची लागण झाली आहे. नागरिकांनी या बाबत काळजी घेणे गरजेचे आहे. तालुक्यात साथीच्या आजारांची लागण झाली असली तरी सरपंच, पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य यासह आमदार व इतर कुठल्याही लोकप्रतिनिधीचे याकडे लक्ष नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये रोष दिसून येत आहे. (शहर प्रतिनिधी)तालुक्यातील सर्व आरोग्य केंद्रांमध्ये पुरेसा औषधी साठा आहे. रुग्णांची योग्य व्यवस्था होत आहे. मुख्यालयी उपस्थित न राहणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल. नागरिकांना कोणताही त्रास असल्यास त्यांनी तालुका आरोग्य कार्यालयाकडे लेखी तक्रार करावी. - डॉ.जब्बार पठाणतालुका वैद्यकीय अधिकारी, उमरखेड