शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाममध्ये दहशतवाद्यांना केली मदत, दिला आश्रय, दोघे अटकेत, तपासातून धक्कादायक माहिती समोर
2
बॉम्ब फोडूनही अमेरिका काही करू शकली नाही! ३७ तास हवेतच होते ६ बी२ बॉम्बर..., इराण म्हणतेय...
3
आतापर्यंत इस्रायली हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा जाणून थक्क व्हाल! खामेनेई सैनिकांकडूनही जोरदार प्रत्युत्तर
4
जगाचे 'लॉजिस्टिक्स' बदलणाऱ्या अवलियाचे निधन! मालवाहतुकीसाठी पहिल्यांदाच केला असा प्रयोग
5
पुढच्या ५ वर्षांत इराण अणुबॉम्ब बनवेल! अमेरिकेच्या हल्ल्यानंतर औवेसी म्हणाले, "तिथले कोट्यवधी भारतीय..."
6
"अमेरिकेच्या हल्ल्यानंतरही आमचे अणुऊर्जा प्रकल्प सुरक्षित"; इराणने दिली माहिती, ट्रम्प यांचा दावा फेटाळला
7
अमेरिकेने अणुकेंद्रांवर केलेल्या हल्ल्याचा इराण कसा घेणार बदला, केवळ इस्राइललाच लक्ष्य करणार की...
8
खोट्या बातम्यांवर बसणार आळा; कर्नाटक सरकारने आणला 'फेक न्यूज' कायदा, ७ वर्षांपर्यंतची शिक्षा
9
Iran Israel Conflict Explained: युद्धाच्या आगीत तेल पेटणार, भारतावर कसा परिणाम होणार?
10
भगवे झेंडे घेऊन रस्त्यावर उतरणे म्हणजे हिंदुत्व नव्हे; नितीन गडकरींची भूमिका
11
अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराण संतापला; इस्रायलवर डागली 30 क्षेपणास्त्रे, अनेक शहरांमध्ये भीतीचे वातावरण
12
VIDEO: इराणवर हल्ले सुरुच; अमेरिकेने दिलेली लढाऊ विमाने इस्रायलने केली नष्ट
13
"जंगल का कानून..."; अणुकेंद्रांवरीर हल्ल्यानंतर, इराणचा भारतमार्गे अमेरिकेला 'मेसेज'; घेतली मोठी शपथ!
14
NEET परीक्षा का बरे होत नसेल हो नीट?
15
इस्रायल सोडा अमेरिका-युरोपलाही घाबरत नाही; पण 'या' गटासमोर इराणला झुकावेच लागते!
16
‘त्या’ बेकायदा कृत्यांमध्ये कायद्याचे रक्षकच सहभागी; वसई-विरारमधील बांधकामप्रकरणी उच्च न्यायालयाने राज्य सरकारला झापले
17
इराणच्या अणुकेंद्रांवर अमेरिकेने टाकलेले बंकर बस्टर बॉम्ब एवढे आहेत विध्वंसक, अशी आहेत त्यांची वैशिष्ट्ये
18
तीन भाषा शिकण्यासाठी खेळाच्या तासात कपात; हिंदी शिकवण्यावरुन सुप्रिया सुळेंची CM फडणवीसांकडे मागणी
19
पुढच्या आठवड्यात बाजारात १२ कंपन्यांचे IPO, १५,८०० कोटींची उलाढाल! तुमच्यासाठी 'ही' सुवर्णसंधी!
20
Maharashtra Rainfall: पश्चिम महाराष्ट्रात जोरदार पाऊस, विदर्भात अजून प्रतीक्षा

दिग्रसमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादीत काट्याची टक्कर

By admin | Updated: October 11, 2014 02:19 IST

सुरुवातीला शिवसेनेकडून विक्रमी मताधिक्याचे अंदाज वर्तविण्यात आलेल्या दिग्रस मतदारसंघात राष्ट्रवादीच्या उमेदवाराने कडवे आव्हान उभे केले आहे.

सुरुवातीला शिवसेनेकडून विक्रमी मताधिक्याचे अंदाज वर्तविण्यात आलेल्या दिग्रस मतदारसंघात राष्ट्रवादीच्या उमेदवाराने कडवे आव्हान उभे केले आहे. येथे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काट्याची टक्कर होण्याची चिन्हे आहेत.या मतदारसंघात १३ उमेदवार रिंगणात आहेत. मात्र शिवसेना, राष्ट्रवादी, भाजपा व काँग्रेस या चार प्रमुख पक्षात स्पर्धात आहे. जातीय समीकरण व मतविभाजन यावरच विजयाचे गणित अवलंबून आहे. ज्या उमेदवाराला या फॅक्टरचा फायदा होईल त्याचा विजय निश्चित मानला जात आहे.मतदारसंघाच्या फेररचनेपूर्वी जुन्या दारव्हा मतदारसंघ काँग्रेसचा बालेकिल्ला समजला जायचा. १९६७ आणि १९७८ या दोन टर्मची निवडणूक सोडली तर १९६२ पासून काँग्रेसचेच वर्चस्व राहिले आहे. माणिकराव ठाकरे यांनी सलग २० वर्षे या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले. त्यानंतर मात्र २००४ च्या निवडणुकीत शिवसेनेच्या संजय राठोड यांनी त्यांचा पराभव केला. नंतर या मतदारसंघाची फेररचना झाली. दिग्रस, दारव्हा, नेर हे तालुके मिळून दिग्रस मतदारसंघ झाला. २००९ मध्ये संजय देशमुख यांचा संजय राठोड यांनी पराभव केला, दोनही टर्ममध्ये सत्ता नसूनही स्थानिक विकास निधी व अन्य निधी राठोड यांनी खेचून आणला. चांगला जनसंपर्क हा त्यांचा प्लस पॉर्इंट समजला जातो. गेल्या दहा वर्षात या भागात आमदार संजय राठोड यांनी शिवसेनेचे चांगले नेटवर्क तयार केले. त्याचाच फायदा त्यांना या निवडणुकीत होताना दिसतो आहे. या निवडणुकीत त्यांची उमेदवारी निश्चित असल्यामुळे त्यांनी फार पूर्वीपासून तयारी केली होती. आघाडीमध्ये हा मतदारसंघ काँग्रेसच्या वाट्यावर होता. परंतु गृहमतदारसंघ असतानासुद्धा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे किंवा त्यांचे पूत्र राहुल ठाकरे हे या ठिकाणी लढण्यास उत्सुक नव्हते. प्रमुख नेत्यांच्या अशा या भूमिकेमुळे या मतदारसंघात निवडणूक एकतर्फी होईल, असे चित्र सुरुवातीला होते. त्यानंतर ऐन निवडणुकीच्या तोंडावर आघाडी आणि महायुती तुटली. भाजपने प्रा.अजय दुबे यांना उमेदवारी दिली. काँग्रेसने दुसऱ्या फळीतील देवानंद पवार यांना उमेदवारी दिली. राष्ट्रवादीने वसंत घुईखेडकर यांना संधी दिली. या मतदारसंघावर बंजारा व कुणबी समाजाचे प्राबल्य आहे. परंतु गेल्या दोनही निवडणुकीत कुणबी-मराठा उमेदवार असतानाही संजय राठोड यांना बंजारासह कुणबी व इतर मतांचा पाठिंबा मिळाला होता. पण यावेळी राष्ट्रवादीने शिवसेनेसमोर आव्हान उभे केले. निवेदने, बॅनर, पोस्टर रॅली, कॉर्नर सभा, डोअर टू डोअर प्रचार यावर भर दिला जात आहे शिवसेनेला मोठ्या सभांची प्रतीक्षा आहे. राष्ट्रवादीने अजित पवार, खासदार तारीक अन्वर, अल्पसंख्यांक आयोगाचे अध्यक्ष मुनाफ हकीम यांच्या सभा घेतल्या. उर्वरित दोन प्रमुख उमेदवारही चांगला जोर लावून आहे. भाजपाचे प्रा.अजय दुबे गावागावात जाऊन आपली भूमिका मांडण्याचा प्रयत्न करीत आहे.