शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
2
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
3
मोठी बातमी! कबड्डी खेळाडू राणा बलाचौरिया यांच्या हत्येतील आरोपी चकमकीत ठार; दोन पोलिस जखमी
4
टोल नाके दुसरीकडे हलवा...; प्रदूषण कमी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या प्रशासनाला सूचना
5
दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; पिकअपला आग लागल्याने ३ जणांचा होरपळून मृत्यू
6
ऑनलाइन हेल्थ इन्शुरन्स घेताय? 'या' ५ चुका पडतील महागात; तुमचा क्लेम नाकारला जाऊ शकतो!
7
'सरन्यायाधीशांवर चप्पलफेक' यासारखे प्रकार परत घडू नयेत म्हणून सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
8
पाण्याच्या एक-एक थेंबासाठी तरसणार पाकिस्तान; भारतानंतर, आता अफगाणिस्तानचाही मोठा निर्णय
9
साताऱ्यातील ११५ कोटींच्या ड्रग्ज प्रकरणात शिंदे कनेक्शन? सुषमा अंधारेंचा उपमुख्यमंत्र्यांच्या भावावर गंभीर आरोप
10
"साताऱ्यातील ड्रग्ज प्रकरणात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे लागेबांधे असल्याने प्रकरण दडपण्याचा प्रयत्न’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा गंभीर आरोप 
11
मोदी सरकार नववर्षाला गोड भेट देणार! १ जानेवारीपासून सीएनजी आणि पीएनजी स्वस्त होणार
12
कुठल्याही क्षणी अटकेची शक्यता असताना माणिकराव कोकाटे पडले आजारी; लीलावती रुग्णालयात दाखल
13
वाल्मीक कराडला जामीन नाकारला; संतोष देशमुख हत्या प्रकरणात खंडपीठाचा मोठा निकाल
14
Motorola: ६.८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP सेल्फी कॅमेरा आणि बरेच काही; मोटोरोलाचा नवा फोन लॉन्च!
15
भयंकर! लग्नात वाजत होता DJ; १५ वर्षांच्या मुलीला सहन झाला नाही आवाज, हार्ट अटॅकने मृत्यू
16
मार्गशीर्ष शेवटचा गुरुवार २०२५: उंबरठ्यावर करा 'हा' छोटा उपाय; अष्टलक्ष्मीचा मिळेल आशीर्वाद!
17
“किडनी विकावी लागणे शेतकऱ्यांच्या अडचणींची परीसीमा, अतिशय दुर्दैवी”; सुप्रिया सुळेंची टीका
18
'आता निष्पक्ष निवडणुका राहिलेल्या नाहीत', राजदचे खासदार मनोज कुमार झा स्पष्टच बोलले
19
बाजारात सलग तिसऱ्या दिवशी घसरण! टाटा समुहाच्या 'या' कंपनीला सर्वाधिक फटका, IT सेक्टरचा आधार
20
ICC T20 Rankings : तिलक वर्माची उंच उडी! बटलरसह पाकिस्तानच्या साहिबजादा फरहानला फटका
Daily Top 2Weekly Top 5

दिग्रसमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादीत काट्याची टक्कर

By admin | Updated: October 11, 2014 02:19 IST

सुरुवातीला शिवसेनेकडून विक्रमी मताधिक्याचे अंदाज वर्तविण्यात आलेल्या दिग्रस मतदारसंघात राष्ट्रवादीच्या उमेदवाराने कडवे आव्हान उभे केले आहे.

सुरुवातीला शिवसेनेकडून विक्रमी मताधिक्याचे अंदाज वर्तविण्यात आलेल्या दिग्रस मतदारसंघात राष्ट्रवादीच्या उमेदवाराने कडवे आव्हान उभे केले आहे. येथे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काट्याची टक्कर होण्याची चिन्हे आहेत.या मतदारसंघात १३ उमेदवार रिंगणात आहेत. मात्र शिवसेना, राष्ट्रवादी, भाजपा व काँग्रेस या चार प्रमुख पक्षात स्पर्धात आहे. जातीय समीकरण व मतविभाजन यावरच विजयाचे गणित अवलंबून आहे. ज्या उमेदवाराला या फॅक्टरचा फायदा होईल त्याचा विजय निश्चित मानला जात आहे.मतदारसंघाच्या फेररचनेपूर्वी जुन्या दारव्हा मतदारसंघ काँग्रेसचा बालेकिल्ला समजला जायचा. १९६७ आणि १९७८ या दोन टर्मची निवडणूक सोडली तर १९६२ पासून काँग्रेसचेच वर्चस्व राहिले आहे. माणिकराव ठाकरे यांनी सलग २० वर्षे या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले. त्यानंतर मात्र २००४ च्या निवडणुकीत शिवसेनेच्या संजय राठोड यांनी त्यांचा पराभव केला. नंतर या मतदारसंघाची फेररचना झाली. दिग्रस, दारव्हा, नेर हे तालुके मिळून दिग्रस मतदारसंघ झाला. २००९ मध्ये संजय देशमुख यांचा संजय राठोड यांनी पराभव केला, दोनही टर्ममध्ये सत्ता नसूनही स्थानिक विकास निधी व अन्य निधी राठोड यांनी खेचून आणला. चांगला जनसंपर्क हा त्यांचा प्लस पॉर्इंट समजला जातो. गेल्या दहा वर्षात या भागात आमदार संजय राठोड यांनी शिवसेनेचे चांगले नेटवर्क तयार केले. त्याचाच फायदा त्यांना या निवडणुकीत होताना दिसतो आहे. या निवडणुकीत त्यांची उमेदवारी निश्चित असल्यामुळे त्यांनी फार पूर्वीपासून तयारी केली होती. आघाडीमध्ये हा मतदारसंघ काँग्रेसच्या वाट्यावर होता. परंतु गृहमतदारसंघ असतानासुद्धा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे किंवा त्यांचे पूत्र राहुल ठाकरे हे या ठिकाणी लढण्यास उत्सुक नव्हते. प्रमुख नेत्यांच्या अशा या भूमिकेमुळे या मतदारसंघात निवडणूक एकतर्फी होईल, असे चित्र सुरुवातीला होते. त्यानंतर ऐन निवडणुकीच्या तोंडावर आघाडी आणि महायुती तुटली. भाजपने प्रा.अजय दुबे यांना उमेदवारी दिली. काँग्रेसने दुसऱ्या फळीतील देवानंद पवार यांना उमेदवारी दिली. राष्ट्रवादीने वसंत घुईखेडकर यांना संधी दिली. या मतदारसंघावर बंजारा व कुणबी समाजाचे प्राबल्य आहे. परंतु गेल्या दोनही निवडणुकीत कुणबी-मराठा उमेदवार असतानाही संजय राठोड यांना बंजारासह कुणबी व इतर मतांचा पाठिंबा मिळाला होता. पण यावेळी राष्ट्रवादीने शिवसेनेसमोर आव्हान उभे केले. निवेदने, बॅनर, पोस्टर रॅली, कॉर्नर सभा, डोअर टू डोअर प्रचार यावर भर दिला जात आहे शिवसेनेला मोठ्या सभांची प्रतीक्षा आहे. राष्ट्रवादीने अजित पवार, खासदार तारीक अन्वर, अल्पसंख्यांक आयोगाचे अध्यक्ष मुनाफ हकीम यांच्या सभा घेतल्या. उर्वरित दोन प्रमुख उमेदवारही चांगला जोर लावून आहे. भाजपाचे प्रा.अजय दुबे गावागावात जाऊन आपली भूमिका मांडण्याचा प्रयत्न करीत आहे.