शहरं
Join us  
Trending Stories
1
१९ तारखेला अत्यंत स्फोटक माहिती उघड होणार, ज्यानं भाजपा नेत्यांची फजिती होईल; संजय राऊतांचा दावा
2
महायुतीत एकनाथ शिंदेंची कोंडी; मुंबईत भाजपानं शिंदेसेनेला केवळ ५२ जागांचा दिला प्रस्ताव?
3
टीम इंडियाला मल्टीप्लेक्समध्ये पाहून सगळचे चकीत झाले...; मैदानातील सगळेच धुरंधर 'धुरंधर' पहायला गेलेले...
4
Crime: बुरखा न घातल्यानं पती संतापला, पत्नीसह पोटच्या २ मुलींना संपवलं; मृतदेह पुरले खड्ड्यात!
5
कोण आहे डोनाल्ड ट्रम्प यांची होणारी सून...! मंगळवारीच उरकला साखरपुडा, दोघे भारतातही येऊन गेलेले...
6
उद्धव-राज विरुद्ध भाजप-शिंदेसेना असाच सामना; १३८ मराठी बहुल मतदारसंघ या निवडणुकीत ठरणार निर्णायक
7
सरकार आणखी एका बँकेतील हिस्सा विकण्याच्या तयारीत; खात्यात येणार २१०० कोटी, सध्या आहे ९५% हिस्सा
8
'उद्याच्या तेजस्वी पहाटेसाठी!' रितेश देशमुखचा छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेतील पहिला लूक समोर
9
"महापालिका निवडणूक लुटण्याचे वाटे केले गेले"; अंजली दमानियांचा निशाणा, महायुतीवर भडकल्या
10
प्रसिद्ध दिग्दर्शक आणि पत्नीच्या हत्या प्रकरणाला नवं वळण, पोलिसांनी लेकालाच केली अटक
11
निवडणुका जाहीर होताच तापले युती अन् आघाडीचे राजकारण; महाराष्ट्रात काही ठिकाणी गणित बिघडणार
12
अमेरिकन शेअर बाजारात मोठा बदल! नॅस्डॅक २४ तास ट्रेडिंग सुरू करण्याच्या तयारीत; भारतीय गुंतवणूकदारांवर काय होणार परिणाम?
13
अमेरिकेत पॅलेस्टिनसह इतर ७ देशांतील नागरिकांना प्रवास बंदी; डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय
14
Stock Market Today: सुस्त सुरुवातीनंतर सेन्सेक्स-निफ्टीमध्ये किंचित वाढ; ICICI Bank, Nestle, HDFC Bank मध्ये घसरण
15
महालक्ष्मी व्रत उद्यापन: ४ गुरुवार नेटाने केलेल्या महालक्ष्मी व्रताचे १८ डिसेंबर रोजी उद्यापन कसे करावे? वाचा विधी
16
'१२ लाख सैनिकांची गरज काय? त्यांना दुसरे काम लावा'; पृथ्वीराज चव्हाण यांनी स्पष्टच सांगितलं
17
आई मंदिराबाहेर फुले विकायची...! आयपीएलने मुलाला बनविले 'करोडपती', वडील मैदानावर...
18
LIC ची कोणत्या कंपनीत किती गुंतवणूक? सरकारनं दिली महत्त्वाची माहिती; टाटा, रिलायन्स, अदानीसह कोणत्या कंपन्या?
19
अंबरनाथमध्ये भाजपाचे उमेदवार पवन वाळेकर यांच्या कार्यालयावर गोळीबार; घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद
20
मुंबई-दिल्ली एक्स्प्रेसवेवर भीषण अपघात! धडक होताच उडाला भडका, तीन जणांचा आगीत झाला कोळसा
Daily Top 2Weekly Top 5

वैद्यकीय अधिकाऱ्यांची आरोग्य केंद्रांकडे पाठ

By admin | Updated: February 7, 2015 23:31 IST

ग्रामीण जनतेच्या आरोग्याची जबाबदारी असलेल्या पुसद तालुक्यातील सर्वच प्राथमिक आरोग्य केंद्रांकडे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी पाठ फिरविल्याचे दिसत आहे. रात्री-बेरात्री तर

पुसद : ग्रामीण जनतेच्या आरोग्याची जबाबदारी असलेल्या पुसद तालुक्यातील सर्वच प्राथमिक आरोग्य केंद्रांकडे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी पाठ फिरविल्याचे दिसत आहे. रात्री-बेरात्री तर सोडाच दिवसाही डॉक्टर भेटत नाही. त्यामुळे रुग्णांना सरळ पुसद शहर गाठावे लागते. अनेकदा अत्यवस्थ रुग्ण दगावण्याची भीती असते. मात्र या प्रकाराकडे कुणीही गांभीर्याने पाहात नसल्याने ग्रामीण रुग्णांचा जीव टांगणीला लागला आहे.पुसद तालुक्यात सहा प्राथमिक आरोग्य केंद्र आणि ४५ आरोग्य उपकेंद्र कार्यरत आहे. तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र म्हणजे असून अडचण आणि नसून खोळंबा झाले आहे. शासनाने या ठिकाणी सुसज्ज इमारत आणि डॉक्टर व कर्मचाऱ्यांसाठी शासकीय निवासस्थान उपलब्ध करून दिले आहे. परंतु डॉक्टरच मुख्यालयी राहात नाही, तेथे कर्मचाऱ्यांची गोष्टच वेगळी. या ठिकाणी गेलेल्या रुग्णांना तासन्तास खोळंबत बसावे लागते. त्या ठिकाणी असलेले परिचर, साहेब आता येतीलच, असे सांगतात. मात्र चुकून डॉक्टर आल्यावरही योग्य उपचार होईल, याची खात्रीच नसते. प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत असलेल्या गावांमध्ये भेटी देवून त्या गावातील रुग्णांची माहिती जाणून घेणे कर्मचाऱ्यांना बंधनकारक असते. परंतु उशिरा येणे आणि लवकर जाणे यामुळे कोणताही कर्मचारी गावखेड्यात फिरकताना दिसत नाही. रुग्णांनाच आरोग्य केंद्रात यावे लागते. सहा प्राथमिक आरोग्य केंद्रात १२ आरोग्य अधिकारी कार्यरत आहे. सर्वच्या सर्वच वैद्यकीय अधिकारी बाहेरगावाहून जाणे-येणे करतात. उशिरा येतातच. मात्र अनेकदा दवाखान्यात दर्शनही होत नाही. दवाखान्यात कोणालाही न सांगता वैद्यकीय अधिकारी ४ वाजताच्या आधीच निघून जातात. रात्री-अपरात्री या ठिकाणी रुग्ण आल्यास त्याच्यावर उपचारासाठी कोणी राहात नाही. दवाखान्याला रात्री कुलूप लावलेले असते. या केंद्रांतर्गत येणाऱ्या उपकेंद्रांचीही अशीच अवस्था आहे. परिचारिका मुख्यालयाच्या ठिकाणी राहात नाही. त्यामुळे रुग्णांना शहराचा रस्ता धरावा लागतो.वैद्यकीय अधिकारी पुसद, श्रीरामपूर, लक्ष्मीनगर या गावातून ये-जा करीत असतात. त्यामुळे शासनाच्या आरोग्य सुविधा जनतेपर्यंत पोहोचत नाही. आजही अनेक बालके लसीकरणापासून वंचित आहे. गरोदर मातांना वेळेवर माहिती व उपचार मिळत नाही. कुपोषित बालकांना केवळ अंगणवाडीतील पोषण आहारावर सोडून डॉक्टर मोकळे होतात. त्यांच्या पालकांना कधीही मार्गदर्शन केले जात नाही. ग्रामीण आरोग्य यंत्रणा पूर्णत: ढेपाळली असताना वरिष्ठांचेही नियंत्रण दिसत नाही. (तालुका प्रतिनिधी)