शहरं
Join us  
Trending Stories
1
Dadar Kabutarkhana: दादरमध्ये जोरदार राडा! कबुतरखान्यावरील ताडपत्र्या आंदोलकांनी हटविल्या, पोलिसांसोबत झटापट
2
भारतीय वृत्तसंस्थेच्या पत्रकाराने भारताच्या आरोपावर प्रश्न विचारला, अन् ट्रम्प यांचे तोंड बंद झाले...
3
RBI Repo Rate: रेपो रेट म्हणजे काय रे भाऊ? तो वाढल्यानं का वाढतो तुमचा EMI? जाणून घ्या
4
Video : दुचाकीवर हेल्मेट घालणं टाळता? हा व्हिडीओ बघाल तर पुढच्यावेळी घरातूनच हेल्मेट घालून बाहेर पडाल! 
5
RBI MPC Meeting: रिझर्व्ह बँकेकडून रेपो दर 'जैसे थे', ईएमआयमध्ये कोणताही बदल होणार नाही
6
ट्रम्प यांनी जपानला फसवलंय, आता भारताची पाळी..; चिनी एक्सपर्टनं अमेरिकेचा असा केला पर्दाफाश
7
प्रियकरासोबत संबंध बनवताना प्रायव्हेट पार्टला इजा; महिलेने मुंबई पोलिसांना गंडवलं, सत्य भलतेच निघाले
8
दुसरा श्रावण गुरुवार: फक्त १० मिनिटे ‘अशी’ स्वामी सेवा करा; चिंतामुक्त व्हा, पुण्यच लाभेल!
9
वाहन विमा नाही? मग भरा पाचपट दंड...! ड्रायव्हिंग लायसन्स नूतनीकरणासाठीही नवीन अटी
10
पाकिस्तानी दहशतवादी रशियाच्या मदतीला! युक्रेनविरोधात लढत असल्याचा झेलेन्स्कींचा दावा
11
फक्त रशियचां तेल नाही, तर 'या' ३ कारणामुळे डोनाल्ड ट्रम्प यांचा तिळपापड; भारताला पुन्हा धमकी
12
'पाच महिन्यात पाच युद्ध थांबवली आता...'; ट्रम्प यांनी पुन्हा घेतले भारत आणि पाकिस्तानमधील युद्धबंदीचे श्रेय
13
भारतावर २४ तासांत ‘टॅरिफ बॉम्ब’? अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पुन्हा बरळले, म्हणाले...
14
आजचे राशीभविष्य, ०६ ऑगस्ट २०२५: आर्थिक लाभ, लोकप्रियतेत वाढ; मान-सन्मानाचा दिवस
15
हिंगोली रेल्वेस्टेशनवरील उभ्या बोगीला आग; संपूर्णतः जळून खाक
16
Share Market Today: शेअर बाजाराची पुन्हा रेड झोनमध्ये सुरुवात; 'या' स्टॉक्सचा घसरणीसह सुरू झाला व्यवहार
17
राजा रघुवंशी २.०; बॉयफ्रेंडसोबत थाटायचा होता संसार, पत्नीने पतीला जंगलात बोलावलं अन्...
18
कोणताही नवा चित्रपट नाही, तरीही सर्वात श्रीमंत; जुही चावलानं कशी बनवली ₹४,६०० कोटींची संपत्ती
19
मोठी बातमी: महादेव मुंडे खून प्रकरणातील माहिती देणाऱ्यास बक्षीस; एसआयटीकडून गोपनीयतेची हमी
20
Hiroshima Day : ६ ऑगस्ट १९४५चा 'तो' दिवस सुरू होताच 'लिटिल बॉय' पडला अन् अवघ्या जगाने विध्वंस पाहिला!

वैद्यकीय अधिकाऱ्यांची आरोग्य केंद्रांकडे पाठ

By admin | Updated: February 7, 2015 23:31 IST

ग्रामीण जनतेच्या आरोग्याची जबाबदारी असलेल्या पुसद तालुक्यातील सर्वच प्राथमिक आरोग्य केंद्रांकडे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी पाठ फिरविल्याचे दिसत आहे. रात्री-बेरात्री तर

पुसद : ग्रामीण जनतेच्या आरोग्याची जबाबदारी असलेल्या पुसद तालुक्यातील सर्वच प्राथमिक आरोग्य केंद्रांकडे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी पाठ फिरविल्याचे दिसत आहे. रात्री-बेरात्री तर सोडाच दिवसाही डॉक्टर भेटत नाही. त्यामुळे रुग्णांना सरळ पुसद शहर गाठावे लागते. अनेकदा अत्यवस्थ रुग्ण दगावण्याची भीती असते. मात्र या प्रकाराकडे कुणीही गांभीर्याने पाहात नसल्याने ग्रामीण रुग्णांचा जीव टांगणीला लागला आहे.पुसद तालुक्यात सहा प्राथमिक आरोग्य केंद्र आणि ४५ आरोग्य उपकेंद्र कार्यरत आहे. तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र म्हणजे असून अडचण आणि नसून खोळंबा झाले आहे. शासनाने या ठिकाणी सुसज्ज इमारत आणि डॉक्टर व कर्मचाऱ्यांसाठी शासकीय निवासस्थान उपलब्ध करून दिले आहे. परंतु डॉक्टरच मुख्यालयी राहात नाही, तेथे कर्मचाऱ्यांची गोष्टच वेगळी. या ठिकाणी गेलेल्या रुग्णांना तासन्तास खोळंबत बसावे लागते. त्या ठिकाणी असलेले परिचर, साहेब आता येतीलच, असे सांगतात. मात्र चुकून डॉक्टर आल्यावरही योग्य उपचार होईल, याची खात्रीच नसते. प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत असलेल्या गावांमध्ये भेटी देवून त्या गावातील रुग्णांची माहिती जाणून घेणे कर्मचाऱ्यांना बंधनकारक असते. परंतु उशिरा येणे आणि लवकर जाणे यामुळे कोणताही कर्मचारी गावखेड्यात फिरकताना दिसत नाही. रुग्णांनाच आरोग्य केंद्रात यावे लागते. सहा प्राथमिक आरोग्य केंद्रात १२ आरोग्य अधिकारी कार्यरत आहे. सर्वच्या सर्वच वैद्यकीय अधिकारी बाहेरगावाहून जाणे-येणे करतात. उशिरा येतातच. मात्र अनेकदा दवाखान्यात दर्शनही होत नाही. दवाखान्यात कोणालाही न सांगता वैद्यकीय अधिकारी ४ वाजताच्या आधीच निघून जातात. रात्री-अपरात्री या ठिकाणी रुग्ण आल्यास त्याच्यावर उपचारासाठी कोणी राहात नाही. दवाखान्याला रात्री कुलूप लावलेले असते. या केंद्रांतर्गत येणाऱ्या उपकेंद्रांचीही अशीच अवस्था आहे. परिचारिका मुख्यालयाच्या ठिकाणी राहात नाही. त्यामुळे रुग्णांना शहराचा रस्ता धरावा लागतो.वैद्यकीय अधिकारी पुसद, श्रीरामपूर, लक्ष्मीनगर या गावातून ये-जा करीत असतात. त्यामुळे शासनाच्या आरोग्य सुविधा जनतेपर्यंत पोहोचत नाही. आजही अनेक बालके लसीकरणापासून वंचित आहे. गरोदर मातांना वेळेवर माहिती व उपचार मिळत नाही. कुपोषित बालकांना केवळ अंगणवाडीतील पोषण आहारावर सोडून डॉक्टर मोकळे होतात. त्यांच्या पालकांना कधीही मार्गदर्शन केले जात नाही. ग्रामीण आरोग्य यंत्रणा पूर्णत: ढेपाळली असताना वरिष्ठांचेही नियंत्रण दिसत नाही. (तालुका प्रतिनिधी)