शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी तेव्हा त्याच रूममध्ये होतो..."; ट्रम्प यांच्या युद्धविरामासंदर्भातील दाव्यावर एस जयशंकर यांची अमेरिकेतून पहिली प्रतिक्रिया
2
ट्रम्प यांना मोठं यश, अमेरिकन सिनेटमध्ये 'वन बिग ब्यूटीफुल बिल' मंजूर; आता नवीन पक्ष स्थापन करणार इलॉन मस्क?
3
मोहम्मद शमीला हायकोर्टाचा झटका, पत्नी-मुलीला दर महिन्याला द्यावे लागणार लाखो रुपये; सात वर्षांचं कर्जही...! 
4
धक्कादायक...! धावत्या ट्रेनमध्ये टीसीला कपडे फाडून मारहाण! एलटीटी-हटिया एक्सप्रेसमधील घटना
5
“मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळे करायची ताकद कुणाच्या बापात नाही”; CM फडणवीसांचे ठाकरेंना उत्तर
6
शशी थरूर भाजपमध्ये प्रवेश करणार? निशिकांत दुबे यांचा मोठा खुलासा, स्पष्टच बोलले
7
डोंबिवलीचे आमदार झाले भाजपाचे नवे प्रदेशाध्यक्ष! कल्याण डोंबिवलीत यंदा महापौर कोणाचा?
8
RSS स्वयंसेवक ते BJP प्रदेशाध्यक्ष; ‘अशी’ आहे रवींद्र चव्हाण यांची राजकीय कारकीर्द
9
“शक्तिपीठ रद्द करण्याची सरकारला सुबुद्धी मिळो, पांडुरंगाला साकडे घालणार”: राजू शेट्टी
10
Ravindra Chavan BJP: रवींद्र चव्हाण भाजपाचे नवे 'कॅप्टन'! महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी बिनविरोध निवड
11
पत्नी म्हणाली 'रात्रीच्या वेळी तरी मोबाईल बाजूला ठेवा'; पतीला आला राग! पुढे त्याने जे केलं, ते ऐकून होईल संताप 
12
तो टीम इंडियाचा प्रॉब्लेम!; दुसऱ्या टेस्टआधी बेन स्टोक्सनं पंतसंदर्भातही केलं मोठं वक्तव्य
13
Bengaluru stampede: "चेंगराचेंगरीला RCBच जबाबदार"; लवादाचा निर्णय, म्हणाले- "पोलिसांकडे जादूचा दिवा नाही..."
14
बुमराह भाई इज डेफिनेटली....! गिलनं हिंट दिली की, इंग्लंडला 'गुमराह' करण्याचा डाव खेळलाय?
15
Viral Video : स्वतःच्याच लग्नात नवरा हे काय करून बसला! व्हायरल व्हिडीओ बघून नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली
16
उत्तराखंडात पावसाचे थैमान, मराठी पर्यटक अडकले; DCM शिंदे मदतीस सरसावले, फोनवरुन साधला संवाद
17
Raja Raghuwanshi : १६ लाखांचे दागिने, सिलोम, सोनमचा कट; राजा रघुवंशी हत्याप्रकरणाच्या तपासाची बदलली दिशा
18
अपूर्ण राहिलं शेफाली जरीवालाचं हे स्वप्न, पती पराग त्यागीसोबत बनवला होता प्लान
19
'२०-२५ वर्षे तरी दिल्लीत जागा नाही', योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल भाजप खासदाराचे मोठे विधान
20
“CM देवेंद्र फडणवीस विकासकामे करणारी व्यक्ती”; भाजपात प्रवेश करताच कुणाल पाटलांनी केले कौतुक

ग्रामपंचायतींना कर गोळा करण्याचे टेंशन

By admin | Updated: December 16, 2014 23:01 IST

केंद्र आणि राज्य शासनाकडून ग्रामंपचायतीच्या विकासासाठी अनेक योजना राबविण्यात येतात. या योजनाचा लाभ घेण्यासाठी गृह आणि पाणीकर वसूलीची अट घातली जाते. ग्रामपंचायतीकडून कर

यवतमाळ : केंद्र आणि राज्य शासनाकडून ग्रामंपचायतीच्या विकासासाठी अनेक योजना राबविण्यात येतात. या योजनाचा लाभ घेण्यासाठी गृह आणि पाणीकर वसूलीची अट घातली जाते. ग्रामपंचायतीकडून कर वसूल केला जात नसल्याने विकासाच्या योजनांचा लाभ मिळत नाही. २०१४-१५ या आर्थिक वर्षात १८ कोटी आठ लाखांच्या उद्दिष्टापैकी केवळ सहा कोटी ८१ लाख ४८ हजार ४६० इतकीच वसूली झाली आहे. त्यामुळे चालु वर्षातही विकासाच्या योजनांना कात्री लागणार असे चित्र निर्माण झाले आहे. जिल्हा परिषदेतंर्गत एक हजार २१० ग्रामपंचायती आहेत. यामध्ये उमरखेड तालुक्यातील इंदिराग्राम आणि नागपूर, आर्णी तालुक्यातील सुभाषनगर या तीन ग्रामपंचायती नव्याने अस्तित्वात आल्या आहेत. त्यांच्याकडून कर वसूलीला सुरूवात झालेली नाही. शासकीय योजनेच्या वैयक्तीक लाभासाठी गृह आणि पाणी कराची पावती जोडणे बंधकारक करूनही ग्रामपंचायतीकडून कर वसूली केली जात नाही. केवळ विविध योजनेचे वैयक्तीक लाभार्थी गरज पडली तेव्हा कराचा भरणा करतात. त्यामुळे कराच्या थकबाकीची रक्कम वाढत आहे. २०१३-१४ या आर्थिक वर्षातील १० कोटी ६८ लाख १६ हजार ३६२ रुपये कर अद्यापही थकीत आहे. त्यावर नव्या कर वसुलीचा भार वाढला आहे. ग्रामपंचायातीकडून कर वसुलीसाठी कोणतीच कार्यवाही केली जात नसल्याने ही स्थिती निर्माण झाली आहे. यवतमाळ तालुक्यात चार कोटी १३ लाख, राळेगाव दोन कोटी ७७ लाख थकीत आहेत. वणी दोन कोटी ६३ लाख, पांढरकवडा दोन कोटी ११ लाख, पुसद एक कोटी ७७ लाख, बाभुळगाव एक कोटी ६९ लाख, दारव्हा एक कोटी ८ आठ लाख, झरी एक कोटी ४२ लाख, मारेगाव एक कोटी ११ लाख, घाटंजी एक कोटी ५८ लाख, महागाव एक कोटी ६० लाख, दिग्रस एक कोटी २४ लाख, नेर सहा कोटील ६९ लाख, कळंब एक कोटी २० लाख इतका कर थकला आहे. पर्यावरण संतुलित ग्राम समृद्धी योजनेचा लाभ घेण्यासाठी ग्रामपंचायतीची कर वसुली ही ६५ टक्केच्यावर असणे आवश्यक आहे. दुर्दैवाने बहुतांश ग्रामपंचायती या निकषाची पूर्तता करत नसल्याने सर्वांगीण विकास शक्य असणाऱ्या योजनांच्या लाभापासून वंचीत राहत आहेत. (कार्यालय प्रतिनिधी)