शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
2
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
3
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
4
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
5
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
6
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामपंचायतींना कर गोळा करण्याचे टेंशन

By admin | Updated: December 16, 2014 23:01 IST

केंद्र आणि राज्य शासनाकडून ग्रामंपचायतीच्या विकासासाठी अनेक योजना राबविण्यात येतात. या योजनाचा लाभ घेण्यासाठी गृह आणि पाणीकर वसूलीची अट घातली जाते. ग्रामपंचायतीकडून कर

यवतमाळ : केंद्र आणि राज्य शासनाकडून ग्रामंपचायतीच्या विकासासाठी अनेक योजना राबविण्यात येतात. या योजनाचा लाभ घेण्यासाठी गृह आणि पाणीकर वसूलीची अट घातली जाते. ग्रामपंचायतीकडून कर वसूल केला जात नसल्याने विकासाच्या योजनांचा लाभ मिळत नाही. २०१४-१५ या आर्थिक वर्षात १८ कोटी आठ लाखांच्या उद्दिष्टापैकी केवळ सहा कोटी ८१ लाख ४८ हजार ४६० इतकीच वसूली झाली आहे. त्यामुळे चालु वर्षातही विकासाच्या योजनांना कात्री लागणार असे चित्र निर्माण झाले आहे. जिल्हा परिषदेतंर्गत एक हजार २१० ग्रामपंचायती आहेत. यामध्ये उमरखेड तालुक्यातील इंदिराग्राम आणि नागपूर, आर्णी तालुक्यातील सुभाषनगर या तीन ग्रामपंचायती नव्याने अस्तित्वात आल्या आहेत. त्यांच्याकडून कर वसूलीला सुरूवात झालेली नाही. शासकीय योजनेच्या वैयक्तीक लाभासाठी गृह आणि पाणी कराची पावती जोडणे बंधकारक करूनही ग्रामपंचायतीकडून कर वसूली केली जात नाही. केवळ विविध योजनेचे वैयक्तीक लाभार्थी गरज पडली तेव्हा कराचा भरणा करतात. त्यामुळे कराच्या थकबाकीची रक्कम वाढत आहे. २०१३-१४ या आर्थिक वर्षातील १० कोटी ६८ लाख १६ हजार ३६२ रुपये कर अद्यापही थकीत आहे. त्यावर नव्या कर वसुलीचा भार वाढला आहे. ग्रामपंचायातीकडून कर वसुलीसाठी कोणतीच कार्यवाही केली जात नसल्याने ही स्थिती निर्माण झाली आहे. यवतमाळ तालुक्यात चार कोटी १३ लाख, राळेगाव दोन कोटी ७७ लाख थकीत आहेत. वणी दोन कोटी ६३ लाख, पांढरकवडा दोन कोटी ११ लाख, पुसद एक कोटी ७७ लाख, बाभुळगाव एक कोटी ६९ लाख, दारव्हा एक कोटी ८ आठ लाख, झरी एक कोटी ४२ लाख, मारेगाव एक कोटी ११ लाख, घाटंजी एक कोटी ५८ लाख, महागाव एक कोटी ६० लाख, दिग्रस एक कोटी २४ लाख, नेर सहा कोटील ६९ लाख, कळंब एक कोटी २० लाख इतका कर थकला आहे. पर्यावरण संतुलित ग्राम समृद्धी योजनेचा लाभ घेण्यासाठी ग्रामपंचायतीची कर वसुली ही ६५ टक्केच्यावर असणे आवश्यक आहे. दुर्दैवाने बहुतांश ग्रामपंचायती या निकषाची पूर्तता करत नसल्याने सर्वांगीण विकास शक्य असणाऱ्या योजनांच्या लाभापासून वंचीत राहत आहेत. (कार्यालय प्रतिनिधी)