शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
3
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
4
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
5
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
6
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
7
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
8
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
9
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
10
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
11
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
12
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
13
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
14
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
15
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
16
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
17
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
18
“कुणीही एकत्र येऊ शकते, पण मराठी माणूस हा पूर्णपणे भाजपाच्या पाठीशी उभा आहे”; कुणाचा दावा?
19
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
20
घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयची धडपड; बाजारात विकले तब्बल....अब्ज डॉलर
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांच्या खमक्या वर्दीला साहित्याचा हळवा स्पर्श

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2019 21:23 IST

धावपळीच्या अन् शुष्क जगातल्या पोलिसांनाही यवतमाळच्या अखिल भारतीय संमेलनाने साहित्याचा हळवा स्पर्श घडविला आहे. पोलिसी खाक्यावर ही साहित्य सुगंध दरवळला तरी कसा?

ठळक मुद्देचित्रकारितेचा स्टॉल, कविसंमेलन, पथनाट्यातही सहभाग

अविनाश साबापुरेलोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ (राष्ट्रसंत तुकडोजी महाराज साहित्यनगरी) : दंडुका, पिस्तुल, हातकड्या हेच त्यांच्या कामाचे साहित्य... चोरांची गर्दी आणि तक्रारदारांची अर्जी हेच त्यांचे संमेलन.. पण अशा धावपळीच्या अन् शुष्क जगातल्या पोलिसांनाही यवतमाळच्या अखिल भारतीय संमेलनाने साहित्याचा हळवा स्पर्श घडविला आहे. पोलिसी खाक्यावर ही साहित्य सुगंध दरवळला तरी कसा?पोलीस अधीक्षक कार्यालयालगतच साहित्य संमेलनासाठी ‘राष्ट्रसंत तुकडोजी महाराज साहित्यनगरी’ वसविण्यात आली आहे. या नगरीला चार भव्य प्रवेशद्वारे आहेत. त्यातील एक प्रवेशद्वार पोलीस नियंत्रण कक्षाच्या दारातून जाणारे आहे. या दारातून दररोज हजारो साहित्य रसिकांच्या दिवसभर येरझारा सुरू आहेत. शिवाय, प्रत्यक्ष संमेलनस्थळी ‘ड्यूटी’ लागलेले पोलीस कर्मचारीही खुश आहेत. तैनात असतानाच रसिकांशी साहित्य-गप्पा करता येत आहेत.सर्वात महत्त्वाचे म्हणजे, एका पोलीस कर्मचाऱ्याने चक्क चित्रकलेचा स्टॉलच संमेलनस्थळी लावला आहे. पोलीस म्हणून कठोर होणारे शेखर वांढरे यांनी चित्रकलेचा स्टॉल संमेलनात लावून रसिकांना सुखद धक्का दिला आहे. विशेष म्हणजे, त्यांचा स्टॉल संमेलनात असावा, यासाठी खुद्द पोलीस अधीक्षक एम. राज कुमार यांनी आयोजकांना सांगितले. ‘आदिवासी वारली चित्रकला’ हे त्यांचे दालन रसिकांची गर्दी खेचत आहे. अनेक रसिक त्यांना ही चित्रे विकत द्या म्हणून आग्रह धरत आहे. पण वांढरे म्हणतात, नाही हे फक्त प्रदर्शनासाठी आहे. विक्री केली तर रसिकांना काय दाखवू?लहानपणापासूनच त्यांना चित्रकलेचा छंद जडला. २००६ मध्ये त्यांची मुंबईत ‘ड्यूटी’ लागल्यावर त्यांनी जहांगीर आर्ट गॅलरीत भेट दिली आणि वारली चित्रकलेची ओढच लागली. आपल्या प्रमाणेच पुढच्या पिढीलाही चित्रकलेचा छंद लागावा म्हणून ते यवतमाळात कार्यशाळाही घेतात. वणी, राजूर, म्हसोलासारख्या गावात जाऊन ते विद्यार्थ्यांसाठी शिबिर घेतात. आजवर हजार मुलांनी त्यांनी प्रशिक्षण दिले. पोलिसांच्या धावपळीच्या जीवनातून ते पहाटे ४ वाजता उठून चित्र काढतात.याच साहित्य संमेलनात दोन पोलिसांमधील हळवा कवीही दिसला. यवतमाळ येथील प्रकाश देशमुख आणि दारव्हा येथील वंदना साळवे या दोन पोलीस कर्मचाºयांनी चक्क कविसंमेलनात जागा मिळविली. त्यांच्या रचनांनी रसिकही मंत्रमुग्ध झाले. तर महिला सेलच्या विजया पंधरे यांनी पथनाट्य सादर करून साहित्याचे प्रांगण खुश केले.

टॅग्स :Marathi Sahitya Sammelanमराठी साहित्य संमेलन