शहरं
Join us  
Trending Stories
1
३१ जानेवारीपर्यंत निवडणुका पार पाडा; सर्वोच्च न्यायालयाचा आदेश, राज्य निवडणूक आयोगाला सुनावले खडेबोल
2
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मानले पंतप्रधान मोदींचे आभार!
3
"इथं काम करणं आता कठीण..."; रस्त्यांवरील खड्डे अन् वाहतूक कोंडीमुळे बंगळुरूतील कंपनी शिफ्ट होणार
4
Crime: "माझ्या बहिणीपासून दूर राहा", वारंवार समजावूनही मित्र ऐकत नव्हता; मग...
5
Today's Horoscope : शेअर्स बाजारात लाभ होईल, आर्थिक स्थिती सुधारेल; वाचा तुमचे आजचे राशीभविष्य काय?
6
मोदी हाच जगातील सर्वांत मोठा ब्रँड; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : भाजप कार्यकर्त्यांचा ब्रँड निर्माण करून देणारा पक्ष
7
अभियांत्रिकीचे यंदा विक्रमी १ लाख ६६ हजार प्रवेश; कॉम्प्युटर, आयटी, एआयच्या ८८ टक्के जागा भरल्या
8
छगन भुजबळांना कोर्टाचा दणका, बेनामी मालमत्तेचा खटला पुन्हा चालविण्याचे आदेश
9
परशुराम महामंडळाच्या अध्यक्षांना दिला मंत्रिदर्जा; अजित पवार गटाचे आशिष दामले आहेत अध्यक्ष
10
विना‘आधार’ आडमुठेपणा...ती नामुष्की निवडणूक आयोगामुळे सरकारवर ओढवेल
11
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका तीन टप्प्यांत? जाणून घ्या सविस्तर
12
एकनाथ शिंदेंवरील टीकेला प्रत्युत्तर देणार; खा. नरेश म्हस्के यांचा मंत्री नाईकांना अप्रत्यक्ष इशारा
13
परवाना मिळण्याआधीच मोडले नियम; ई-बाईकऐवजी चक्क पेट्रोलवरील गाडी हजर
14
रेसकोर्सवरील थीम पार्कवर पुन्हा ‘इव्हेंट’; काम सुरू होईपर्यंत कार्यक्रमांसाठी देणार भाड्याने
15
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
16
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
17
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
18
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
19
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
20
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक

गावच्या राजकारणात दहा हजार इच्छूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2020 05:00 IST

जिल्ह्यात ९८० ग्रामपंचायतींमध्ये पुसद तालुक्यात सर्वाधिक १०५ ग्रामपंचायतींची निवडणूक पार पडत आहे. त्याकरिता बुधवारी या ठिकाणी सर्वाधिक गर्दी उसळल्याचे चित्र पाहायला मिळाले. सर्वच तालुक्यांमध्ये ऑफलाइन प्रक्रियेमुळे उमेदवारी अर्ज दाखल करणाऱ्यांची संख्या वाढली होती. उमेदवारी अर्ज दाखल करताना सर्व्हर डाऊन असल्यामुळे जातवैधता प्रमाणपत्रासाठीही स्लीप जोडण्यासाठी मुभा देण्यात आली होती.

ठळक मुद्देग्रामपंचायत निवडणूक : शेवटच्या दिवशी अर्ज भरण्यासाठी उसळली उमेदवारांची झुंबड

लोकमत न्यूज नेटवर्क यवतमाळ : जिल्ह्यातील ९८० ग्रामपंचायतींच्या निवडणुका १५ जानेवारीला पार पडणार आहेत. या निवडणुकांकरिता उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी बुधवार हा शेवटचा दिवस होता. ऑनलाइन प्रक्रिया बंद पडल्याने निवडणूक आयोगाने ऑफलाइन अर्ज दाखल करण्याची मुभा दिली. यामुळे शेवटच्या दिवशी चौपट गर्दी वाढली. अर्ज स्वीकारण्यासाठी वेळ वाढविण्यात आला. यामुळे रात्री उशिरापर्यंत उमेदवारी अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू होती. २९ तारखेपर्यंत आठ हजार ४९० उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केले. शेवटच्या दिवशी गर्दी वाढल्याने उमेदवारांची संख्या दहा हजारांच्यावर पोहोचण्याची शक्यता वर्तविली जात आहे. जिल्ह्यात ९८० ग्रामपंचायतींमध्ये पुसद तालुक्यात सर्वाधिक १०५ ग्रामपंचायतींची निवडणूक पार पडत आहे. त्याकरिता बुधवारी या ठिकाणी सर्वाधिक गर्दी उसळल्याचे चित्र पाहायला मिळाले. सर्वच तालुक्यांमध्ये ऑफलाइन प्रक्रियेमुळे उमेदवारी अर्ज दाखल करणाऱ्यांची संख्या वाढली होती. उमेदवारी अर्ज दाखल करताना सर्व्हर डाऊन असल्यामुळे जातवैधता प्रमाणपत्रासाठीही स्लीप जोडण्यासाठी मुभा देण्यात आली होती. तर ज्या उमेदवारांनी ऑनलाइन प्रक्रिया पार पाडली, त्याकरिता अवास्तव पैसे संगणक केंद्र चालकांनी उमेदवारांकडून घेतले. याप्रकरणी उमेदवारांनी संताप नोंदविला. शिवाय पूर्वीपासूनच ऑफलाइन स्वरूपाची प्रक्रिया पार पाडायला हवी होती, अशी प्रतिक्रिया अनेकांनी व्यक्त केली. या निवडणुकीमध्ये सत्ताधारी पक्षासोबतच नवख्यांना संधी मिळाली आहे. ऑफलाइन प्रक्रियेने अनेक इच्छुकांना शेवटच्या दिवशी अर्ज दाखल करता आले. यामुळे ज्या ग्रामपंचायती बिनविरोध होणार होत्या, त्या ठिकाणी आता चुरशीची लढत पाहायला मिळणार आहे. शिवाय प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये उमेदवारांची संख्या वाढलेली दिसणार आहे.  या निवडणुकीसाठी १४ लाख २० हजार ४४७ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहे. काही नवोदित मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहे. यामुळे ग्रामपंचायतीमध्ये चित्र बदलण्याची स्थिती आहे.  गाव विकासाचा अजेंडा घेऊन प्रत्येक पॅनल ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये उतरला आहे. नवख्यांना संधी देण्याचे काम सत्ताधारी पक्षाकडून आणि विरोधी गटाकडूनही होत आहे. या निवडणुकीमध्ये महिला बचत गटांची भूमिका गावपातळीवर महत्त्वाची राहणार आहे. बचत गटांच्या महिलांनाही उमेदवारी देण्यात आली आहे. याशिवाय वोट बँक म्हणूनही त्यांच्याकडे पाहिले जात आहे. तर गावातील तरुण वर्गाला आपल्या पॅनलकडे आकर्षित करण्यासाठी तरुण उमेदवाराला उमेदवारी देण्यात आली आहे.सर्वच पक्ष निवडणुकीच्या रिंगणात  ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये पक्षांना बंदी असली तरी सर्वच पक्ष या निवडणुकीमध्ये उतरले आहेत. मुक्त चिन्ह घेऊन हे उमेदवार निवडणूक लढणार आहेत. या निवडणुकीमध्ये नवीन समीकरण पाहायला मिळणार आहे. स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांनी विविध समीकरणांचा वापर ग्रामपंचायतीवर केला आहे. यामुळे या उमेदवारांना राष्ट्रीय पक्षांचे चिन्ह नसले तरी स्थानिक मुक्त चिन्हांवर ही निवडणूक लढली जाणार आहे.  ग्रामपंचायत विकास कामांसाठी वित्त आयोगाचा निधी मोठ्या प्रमाणात थेट वळता होत आहे. यामुळे जिल्हा परिषद, पंचायत समितीपेक्षाही सर्वाधिक महत्त्व ग्रामपंचायत निवडणुकीला आले आहे. लोकसंख्येच्या आधारावर विकास कामांचा निधी थेट ग्रामपंचायतीला वळता होत आहे. यामुळे प्रत्येक पॅनल आपण विकास घडवून आणू, असे आश्वासन देत आहे.

१५ जानेवारी रोजी फैसलाजिल्ह्यातील ९८० ग्रामपंचायतींमध्ये बिनविरोध निवडणूक घडवून आणण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, अनेक इच्छुकांनी निवडणुकीसाठी अर्ज भरले. यामुळे १५ जानेवारीला उमेदवारांच्या भाग्याचा फैसला होणार आहे. या ग्रामपंचायतीमध्ये तीन हजार ७३ जागांसाठी २९ डिसेंबरपर्यंत आठ हजार ४९० अर्ज दाखल झाले होते. ३० तारखेला हा आकडा अंतिम व्हायचा होता. उमेदवारांची ही संख्या १० हजारांवर पोहोचण्याचा अंदाज आहे. एका प्रभागामध्ये एका जागेसाठी तीन ते चार उमेदवार उभे राहण्याची चिन्हे आहेत. ३१ तारखेला अर्जांची छाननी आहे. ४ जानेवारीला नामनिर्देशन परत घेतले जाणार आहे. यानंतर ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार आहे.

 

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतElectionनिवडणूक