शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
2
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
3
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
4
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
5
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक इनिंग; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
6
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
7
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
8
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
11
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
12
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
13
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
14
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
15
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
16
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
17
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
18
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
19
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
20
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या

गावच्या राजकारणात दहा हजार इच्छूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2020 05:00 IST

जिल्ह्यात ९८० ग्रामपंचायतींमध्ये पुसद तालुक्यात सर्वाधिक १०५ ग्रामपंचायतींची निवडणूक पार पडत आहे. त्याकरिता बुधवारी या ठिकाणी सर्वाधिक गर्दी उसळल्याचे चित्र पाहायला मिळाले. सर्वच तालुक्यांमध्ये ऑफलाइन प्रक्रियेमुळे उमेदवारी अर्ज दाखल करणाऱ्यांची संख्या वाढली होती. उमेदवारी अर्ज दाखल करताना सर्व्हर डाऊन असल्यामुळे जातवैधता प्रमाणपत्रासाठीही स्लीप जोडण्यासाठी मुभा देण्यात आली होती.

ठळक मुद्देग्रामपंचायत निवडणूक : शेवटच्या दिवशी अर्ज भरण्यासाठी उसळली उमेदवारांची झुंबड

लोकमत न्यूज नेटवर्क यवतमाळ : जिल्ह्यातील ९८० ग्रामपंचायतींच्या निवडणुका १५ जानेवारीला पार पडणार आहेत. या निवडणुकांकरिता उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी बुधवार हा शेवटचा दिवस होता. ऑनलाइन प्रक्रिया बंद पडल्याने निवडणूक आयोगाने ऑफलाइन अर्ज दाखल करण्याची मुभा दिली. यामुळे शेवटच्या दिवशी चौपट गर्दी वाढली. अर्ज स्वीकारण्यासाठी वेळ वाढविण्यात आला. यामुळे रात्री उशिरापर्यंत उमेदवारी अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू होती. २९ तारखेपर्यंत आठ हजार ४९० उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केले. शेवटच्या दिवशी गर्दी वाढल्याने उमेदवारांची संख्या दहा हजारांच्यावर पोहोचण्याची शक्यता वर्तविली जात आहे. जिल्ह्यात ९८० ग्रामपंचायतींमध्ये पुसद तालुक्यात सर्वाधिक १०५ ग्रामपंचायतींची निवडणूक पार पडत आहे. त्याकरिता बुधवारी या ठिकाणी सर्वाधिक गर्दी उसळल्याचे चित्र पाहायला मिळाले. सर्वच तालुक्यांमध्ये ऑफलाइन प्रक्रियेमुळे उमेदवारी अर्ज दाखल करणाऱ्यांची संख्या वाढली होती. उमेदवारी अर्ज दाखल करताना सर्व्हर डाऊन असल्यामुळे जातवैधता प्रमाणपत्रासाठीही स्लीप जोडण्यासाठी मुभा देण्यात आली होती. तर ज्या उमेदवारांनी ऑनलाइन प्रक्रिया पार पाडली, त्याकरिता अवास्तव पैसे संगणक केंद्र चालकांनी उमेदवारांकडून घेतले. याप्रकरणी उमेदवारांनी संताप नोंदविला. शिवाय पूर्वीपासूनच ऑफलाइन स्वरूपाची प्रक्रिया पार पाडायला हवी होती, अशी प्रतिक्रिया अनेकांनी व्यक्त केली. या निवडणुकीमध्ये सत्ताधारी पक्षासोबतच नवख्यांना संधी मिळाली आहे. ऑफलाइन प्रक्रियेने अनेक इच्छुकांना शेवटच्या दिवशी अर्ज दाखल करता आले. यामुळे ज्या ग्रामपंचायती बिनविरोध होणार होत्या, त्या ठिकाणी आता चुरशीची लढत पाहायला मिळणार आहे. शिवाय प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये उमेदवारांची संख्या वाढलेली दिसणार आहे.  या निवडणुकीसाठी १४ लाख २० हजार ४४७ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहे. काही नवोदित मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहे. यामुळे ग्रामपंचायतीमध्ये चित्र बदलण्याची स्थिती आहे.  गाव विकासाचा अजेंडा घेऊन प्रत्येक पॅनल ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये उतरला आहे. नवख्यांना संधी देण्याचे काम सत्ताधारी पक्षाकडून आणि विरोधी गटाकडूनही होत आहे. या निवडणुकीमध्ये महिला बचत गटांची भूमिका गावपातळीवर महत्त्वाची राहणार आहे. बचत गटांच्या महिलांनाही उमेदवारी देण्यात आली आहे. याशिवाय वोट बँक म्हणूनही त्यांच्याकडे पाहिले जात आहे. तर गावातील तरुण वर्गाला आपल्या पॅनलकडे आकर्षित करण्यासाठी तरुण उमेदवाराला उमेदवारी देण्यात आली आहे.सर्वच पक्ष निवडणुकीच्या रिंगणात  ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये पक्षांना बंदी असली तरी सर्वच पक्ष या निवडणुकीमध्ये उतरले आहेत. मुक्त चिन्ह घेऊन हे उमेदवार निवडणूक लढणार आहेत. या निवडणुकीमध्ये नवीन समीकरण पाहायला मिळणार आहे. स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांनी विविध समीकरणांचा वापर ग्रामपंचायतीवर केला आहे. यामुळे या उमेदवारांना राष्ट्रीय पक्षांचे चिन्ह नसले तरी स्थानिक मुक्त चिन्हांवर ही निवडणूक लढली जाणार आहे.  ग्रामपंचायत विकास कामांसाठी वित्त आयोगाचा निधी मोठ्या प्रमाणात थेट वळता होत आहे. यामुळे जिल्हा परिषद, पंचायत समितीपेक्षाही सर्वाधिक महत्त्व ग्रामपंचायत निवडणुकीला आले आहे. लोकसंख्येच्या आधारावर विकास कामांचा निधी थेट ग्रामपंचायतीला वळता होत आहे. यामुळे प्रत्येक पॅनल आपण विकास घडवून आणू, असे आश्वासन देत आहे.

१५ जानेवारी रोजी फैसलाजिल्ह्यातील ९८० ग्रामपंचायतींमध्ये बिनविरोध निवडणूक घडवून आणण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, अनेक इच्छुकांनी निवडणुकीसाठी अर्ज भरले. यामुळे १५ जानेवारीला उमेदवारांच्या भाग्याचा फैसला होणार आहे. या ग्रामपंचायतीमध्ये तीन हजार ७३ जागांसाठी २९ डिसेंबरपर्यंत आठ हजार ४९० अर्ज दाखल झाले होते. ३० तारखेला हा आकडा अंतिम व्हायचा होता. उमेदवारांची ही संख्या १० हजारांवर पोहोचण्याचा अंदाज आहे. एका प्रभागामध्ये एका जागेसाठी तीन ते चार उमेदवार उभे राहण्याची चिन्हे आहेत. ३१ तारखेला अर्जांची छाननी आहे. ४ जानेवारीला नामनिर्देशन परत घेतले जाणार आहे. यानंतर ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार आहे.

 

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतElectionनिवडणूक