शहरं
Join us  
Trending Stories
1
लालू प्रसाद यादवांच्या मुलीचा खळबळजनक आरोप! रोहिणी म्हणाल्या "तेजस्वीने मला घरातून बाहेर..."
2
Rohini Aacharya: लालू प्रसाद यादवांच्या घरात ज्यांच्यामुळे सुरू झालं 'महाभारत', ते संजय यादव कोण?
3
मुंबईत मोठी दुर्घटना! भायखळ्यातील बांधकाम सुरू असलेल्या इमारतीजवळ मातीचा ढिगारा कोसळला; २ मजुरांचा मृत्यू, ३ जखमी
4
दिल्ली ब्लास्ट प्रकरण : आता पठानकोटमधून आणखी एका डॉक्टरला अटक, अल-फलाह विद्यापीठात केली होती नोकरी
5
IPL 2026: प्रितीच्या पंजाबनं ग्लेन मॅक्सवेलला दाखवला ठेंगा! कोच रिकी पाँटिंगनं सांगितली आतली गोष्ट
6
इराण देशभरातील लोकांच्या मोबाईल फोनवर 'इमरजन्सी अलर्ट' का पाठवत आहे?
7
अमेरिकेत महागाई वाढली, डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफवर घेतला यू-टर्न; भारताला मोठा फायदा होणार
8
जी मोटारसायकल चोरली, तिच्यावरच गेला जीव; मिरज रोडवर चोर ठार, कसा घडला अपघात?
9
Amravati Crime: छायाचा घरी येणाऱ्या विश्वंभरवर जडला जीव, पती प्रमोदची देवी दर्शनानंतर केली हत्या; लंघुशंकेसाठी थांबली अन्...
10
चुकूनही करू नका 'हे' काम, क्षणार्धात तुमचा मोबाईल फोन होऊ शकतो हॅक! गुगलने काय इशारा दिला?
11
नोकरी सोडून आयपीएस अधिकारी उतरले बिहार निवडणुकीच्या मैदानात; मराठमोळ्या लांडेंना किती मिळाली मते?
12
मशिदीचा पत्ता, मोबाइल SIM, थायलंड टूर अन्...! डॉ. शाहीन संदर्भात मोठा खुलासा; डॉ परवेझला कशासाठी नेलं होतं कानपूरला?
13
दिल्ली स्फोटापूर्वी उमर घाबरला होता, नवीन सीसीटीव्हीमध्ये खुलासा, दोन्ही फोन कुठे लपवले?
14
Ravindra Jadeja : जड्डूनं केली विक्रमांची 'बरसात'! WTC मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
"रडायचं नाही लढायचं! बिहार निकालानं खचून जाऊ नका; मुंबई महापालिकेवर काँग्रेसचा झेंडा फडकवा"
16
Travel : नवीन वर्ष परदेशात सेलिब्रेट करायचा विचार करताय? 'या' देशांमध्ये होऊ शकते खिशाला परवडणारी ट्रीप!
17
'भाजपाला फायदा करून देण्याची सुपारी घेतलीय का?'; काँग्रेसच्या स्वबळाच्या निर्णयावर शरद पवार गट नाराज
18
कुटुंबासोबतचे संबंधच तोडले, लालू प्रसाद यादवांच्या मुलीने आरोप केलेले रझीम कोण, राजदमध्ये काय घडलं?
19
अल फलाह युनिव्हर्सिटीवर क्राईम ब्रांचचा बडगा, UGC च्या तक्रारीवरून २ FIR दाखल
20
"अल्लाह करे भारत..."; नौगाम ब्लास्टवर फारूक अब्दुल्ला यांचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाले?
Daily Top 2Weekly Top 5

दहा महिन्यानंतरही ६० हजार शेतकरी कर्जमाफी बाहेर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2018 23:33 IST

शासनाने कर्जमाफीची घोषणा करून आता दहा महिने उलटले तरी जिल्ह्यातील ६० हजार शेतकरी अद्यापही कर्जमाफी प्रक्रियेच्या बाहेरच आहेत. आकडेवारीतील तफावतीने त्यांची नावे ग्रीन यादीत आलीच नाही.

ठळक मुद्देआयटी विभागाच्या अहवालाची प्रतीक्षा : वनटाईम सेटलमेंटसाठी मुदतवाढ पण पैसे भरायची सोयच नाही

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : शासनाने कर्जमाफीची घोषणा करून आता दहा महिने उलटले तरी जिल्ह्यातील ६० हजार शेतकरी अद्यापही कर्जमाफी प्रक्रियेच्या बाहेरच आहेत. आकडेवारीतील तफावतीने त्यांची नावे ग्रीन यादीत आलीच नाही. कर्जमाफीच्या जाचक अटीचा फटका या शेतकऱ्यांना बसला आहे.जिल्ह्यातील दोन लाख ४० हजार शेतकरी कर्जमाफीस पात्र ठरले. जिल्ह्यात कर्जमाफीस पात्र ठरलेले जिल्हा बँकेचे एक लाख १३ हजार ५५७, राष्ट्रीयकृत बँकेचे ६७ हजार २७२ आणि ग्रामीण बँकेचे सात हजार ८३५ शेतकरी आहे. या शेतकºयांच्या खात्यात ९९४ कोटी ५६ लाख रुपयांची रक्कम वळती करण्यात आली आहे. यातील एक लाख ४८ हजार शेतकरी नवीन कर्ज मिळविण्यासाठी पात्र ठरले आहे.दुसरीकडे ६० हजार शेतकरी अद्यापही कर्जमाफीच्या प्रतीक्षेत आहेत. वनटाईम सेटलमेंट आणि मिसमॅचच्या यादीला ग्रीन सिग्नल न मिळाल्याने हे शेतकरी कर्जमाफीपासून दूर आहे. गतवर्षी जून महिन्यात मुख्यमंत्र्यांनी कर्जमाफीची घोषणा केली होती. तब्बल दहा महिन्याचा कालावधी लोटला तरी कर्जमाफीची भिजत घोंगडे आहे. आकडेवारीतील तफावतीमुळे या शेतकºयांची नावे ग्रीन यादीत आली नाही. मुंबईच्या आयटी विभागाकडे त्या संबंधीचा अहवाल बँकांनी पाठविला. मात्र तेथून अद्यापपर्यंत मान्यता मिळाली नाही. शेतकरी आपले नाव ग्रीन यादीत आहे काय, हे पाहण्यासाठी दररोज बँकेचे उंबरठे झिजवित आहे. बँक व्यवस्थापकांना माहिती विचारत आहे. परंतु त्यांच्या पदरी निराशाच पडत आहे.कर्जाची रक्कम ५०० कोटींच्या घरात६० हजार शेतकºयांमध्ये वनटाईम सेटलमेंट आणि मिसमॅचमधील शेतकऱ्यांचा समावेश आहे. दीड लाख रुपयाप्रमाणे ६० हजार शेतकऱ्यांचे कर्जमाफीचे ९०० कोटी रुपये होतात. यातील ३० टक्के शेतकरी मिसमॅच यादीत आहे. त्यामुळे दीड लाखांच्या आत कर्ज धरले तरी सरासरी ५०० कोटी रुपयांच्या कर्जमाफीचा पेच सध्या जिल्ह्यापुढे निर्माण झाला आहे.नवीन कर्जास विलंबदरवर्षी शेतकऱ्यांना खरीप पीक कर्ज एप्रिल महिन्यात दिले जाते. मात्र यावर्षी कर्जमाफीची घोषणा झाल्यानंतर कागदपत्रांची पूर्तता करण्यास विलंब होत आहे. त्यामुळे अर्धा एप्रिल महिना संपला तरी जिल्ह्यातील शेतकºयांना खरीप पीक कर्ज मिळाले नाही.