शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमदार माजलेत असं बाहेर म्हटलं जातंय, राजकारणाच्या पलीकडे जाणार की नाही?"; CM फडणवीसांनी विरोधकांना सुनावलं
2
जयंत पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार?; CM फडणवीस विधानसभेतच बोलले, म्हणाले, 'हे कठीणच झालंय'
3
बाजार गडगडला! एकाच दिवसात गुंतवणूकदारांचे २.५७ लाख कोटी बुडाले, फक्त 'हे' ५ शेअर्स वाढले
4
चीनकडून कोण चोरतंय रेअर अर्थ मेटल? का उडालीये ड्रॅगनची झोप, काय आहे प्रकरण?
5
"पटोलेंनी उल्लेख केलेली व्यक्ती काँग्रेसचीच"; हनी ट्रॅपची कुठलीही तक्रार नसल्याचे CM फडणवीसांचे स्पष्टीकरण
6
"ये लातों के भूत हैं, बातों से मानेंगे नहीं...!"; मोहरम आणि श्रावणाचा उल्लेख करत मुख्यमंत्री योगींचं मोठं विधान
7
"विधानसभेतील राडा हा जाणीवपूर्वक दहशत निर्माण करण्याचा प्रकार’’, बाळासाहेब थोरात यांची टीका 
8
"जितेंद्र आव्हाड राजकारणातून बाहेर पडले तर मला आवडेल, कारण...", पत्नी ऋता नेमकं काय म्हणाल्या?
9
सोन्या-चांदीच्या दरात मोठा बदल, १० ग्रॅमसाठी किती खर्च करावा लागणार; चांदीत ₹१३०० ची तेजी
10
Sara Ali Khan : फॅट टू फिट! ९६ किलो वजनाच्या साराने कसं कमी केलं तब्बल ४५ किलो वजन? 'हे' आहे टॉप सीक्रेट
11
'करेंगे दंगे चारों ओर', महाराष्ट्र विधानसभेतील हाणामारीवर कुणाल कामराने टीका केली; व्हिडीओ व्हायरल
12
Lunchbox Recipe: झटपट तयार होणारी 'पडवळ करी' एकदा ट्राय करा, दोन घास जास्तच जातील!
13
पाकव्याप्त काश्मीरमध्ये दिसला मसूद अजहर; आता बिलावल भुट्टो आपला शब्द खरा करणार का?
14
विदेशी सट्टेबाजांचा वायदे बाजारावर डाव, छोट्या गुंतवणूकदारांनो सजगतेनं करा बचाव!
15
विधिमंडळ परिसरात धक्काबुक्की प्रकरणी विधानसभा अध्यक्षांनी निर्णय दिला, दोषींवर होणार अशी कारवाई 
16
सोन्याची झळाळी कमी होणार, चांदीची चमक मात्र वाढणार; १३ टक्क्यांच्या तेजीचा अंदाज, किती जाऊ शकतो भाव?
17
शाहरुख खानच्या मेकअप रुमबाहेर काढला फोटो, मराठी अभिनेत्रीने व्यक्त केला आनंद
18
"मोदींच्या नेतृत्वाखाली २०२९ निवडणूक लढवावी लागणे ही भाजपची मजबुरी"; भाजप खासदाराचे विधान
19
रेफ्रिजरेटर आणि वॉशिंग मशीन मार्केटमध्ये रिलायन्सची एन्ट्री, १०० वर्ष जुनी अमेरिकन कंपनी केली खरेदी
20
Narendra Modi : "बिहारला लुटलं, बदला घेतला..."; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा काँग्रेस-राजदवर जोरदार हल्लाबोल

सांग सांग भोलानाथ पाऊस पडेल काय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2021 05:00 IST

९६ टक्के म्हणजे चार लाख २२ हजार ५९७ हेक्टरवर कापसाचा पेरा झाला आहे. जून-जुलै महिन्यातील पावसामुळे पिकांची स्थितीही चांगली होती. मात्र, ऑगस्ट महिन्यात पावसाने ओढ दिली.  ऑगस्ट महिन्यात ३ तारखेला जिल्ह्यात सरासरी ११.०१ मिमी झालेला पाऊस वगळता तब्बल १५ पैकी १४ दिवस कोरडे गेले. त्यामुळे आता शेतकऱ्यांना पिकांची चिंता वाटू लागली आहे. पाऊस लांबल्यास नुकसानीची भीती आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्ह्याचे खरिपाचे एकूण सरासरी क्षेत्र नऊ लाख १६ हजार ८१ हेक्टर एवढे असताना यंदा तब्बल आठ लाख ४३ हजार ६४ हेक्टर म्हणजेच सरासरीच्या ९२ टक्के क्षेत्रावर पेरण्या झाल्या आहेत. मात्र, मागील १५ दिवसांपासून पावसाने ओढ दिल्याने पिके करपू लागली असून, जिल्हाभरातील शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. यंदा जून महिन्यात जोरदार पाऊस झाला. त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरण्यांना सुरुवात केली. यंदा सरासरी क्षेत्राच्या ९२ टक्के क्षेत्रावर पेरण्या झाल्या असून, जिल्ह्यात सोयाबीनचा सर्वाधिक म्हणजे सरासरीच्या १०३ टक्के पेरा झाला आहे. सोयाबीनचे दोन लाख ७६ हजार ८३६ हेक्टर इतके सर्वसाधारण क्षेत्र असताना प्रत्यक्षात दोन लाख ८३ हजार ८७२ हेक्टरवर सोयाबीनची पेरणी झाली आहे, तर चार लाख ४० हजार ८९४ हेक्टर इतके कापसाचे सरासरी क्षेत्र असताना याच्या ९६ टक्के म्हणजे चार लाख २२ हजार ५९७ हेक्टरवर कापसाचा पेरा झाला आहे. जून-जुलै महिन्यातील पावसामुळे पिकांची स्थितीही चांगली होती. मात्र, ऑगस्ट महिन्यात पावसाने ओढ दिली.  ऑगस्ट महिन्यात ३ तारखेला जिल्ह्यात सरासरी ११.०१ मिमी झालेला पाऊस वगळता तब्बल १५ पैकी १४ दिवस कोरडे गेले. त्यामुळे आता शेतकऱ्यांना पिकांची चिंता वाटू लागली आहे. पाऊस लांबल्यास नुकसानीची भीती आहे.

जून महिन्यात समाधानकारक पाऊस झाला. त्यानंतर जुलै महिनाही चांगला गेला. मात्र, पावसाने ओढ दिल्याने पिकाबाबत चिंता वाढली आहे. पाऊस लांबल्यास नुकसान होईल.       - अंकुश रोहणकर, शेतकरी

सुरुवातीच्या समाधानकारक पावसामुळे यंदा मुबलक उत्पन्नाची अपेक्षा आहे. मात्र, पावसामुळे चिंता वाढली आहे. ऑगस्ट महिन्यात पाऊसच झालेला नाही. सध्या पाण्याची गरज आहे.    - अरुण निकम

जून-जुलै महिन्यात चांगला पाऊस झाला होता. मात्र, जुलैअखेरपासूनच पावसाने ओढ दिली आहे. सध्या पिकांना पाण्याची गरज आहे. मात्र, पुढच्या दोन-तीन दिवसांत पाऊस होण्याचा अंदाज आहे. तरीही ज्यांच्याकडे सिंचन उपलब्धता आहे, त्यांनी पाणी द्यावे.     - राजेंद्र माळोदे, जिल्हा कृषी विकास अधिकारी

 

 

टॅग्स :Rainपाऊसagricultureशेती