शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
2
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
3
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
4
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
7
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
8
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
9
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
10
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
11
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
12
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
13
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
14
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
15
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
16
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
17
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
18
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
19
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
20
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...

तेली, लिंगायत, मराठा समाज मेळावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2018 22:22 IST

शहरात रविवारचा दिवस मेळाव्यांचा ठरला. एकाच दिवशी तेली, लिंगायत आणि मराठा समाजाचा मेळावा पार पडला. धकाधकीच्या युगात योग्य उपवर-वधू शोधणे अवघड झाले.

ठळक मुद्देउपवर-वधू परिचय : समाज जागृतीसाठी मेळावे काळाची गरज, राज्यभरातील समाजबांधवांची यवतमाळात गर्दी

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : शहरात रविवारचा दिवस मेळाव्यांचा ठरला. एकाच दिवशी तेली, लिंगायत आणि मराठा समाजाचा मेळावा पार पडला.धकाधकीच्या युगात योग्य उपवर-वधू शोधणे अवघड झाले. यावर मात करण्यासाठी रविवारी तेली समाज विवाह आणि सांस्कृतिक मंडळ, वीर शैव हितसंवर्धक मंडळ आणि मराठा समाजाच्यावतीने उपवर- वधू परिचय मेळावा घेण्यात आला. मेळाव्याला राज्यातील समाजबांधव उपस्थित होते.तेली समाज विवाह व सांस्कृतिक मंडळाचा मेळावा संताजी मंदिरात पार पडला. मेळाव्यात अध्यक्षीय भाषणात खासदार रामदास तडस यांनी उपवर-वधू परिचय मेळावे काळाची गरज असल्याचे सांगितले. काळानुरूप बदल समाजाने स्विकारावे, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी अनेक मांन्यवरांनी मनोगत व्यक्त केले. राज्यभरातून १२० उपवर-वधूंनी परिचय दिला. मंडळाचे अध्यक्ष महेश ढोले, आरोग्य विभागाचे उपसंचालक डॉ. नितीन आंबाडेकर, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष संध्याताई सव्वालाखे, माजी उपाध्यक्ष बाळासाहेब मांगुळकर, संजय आसोले, डॉ. दीपक शिरभाते, प्रमोद ढांगे, नारायण कपले, गणेश शिरभाते, जितंद्र हिंगासपुरे यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. विद्या चिंचोरे यांनी संचालन केले.वीर शैव हा कष्टकरी समाजलिंगायत समाजाला अल्पसंख्य दर्जा मिळावा म्हणून लढाई सुरू झाली आहे. वीर शैव समाज प्रामाणिक आणि कष्टकरी आहे. यामुळे इंग्लडच्या पार्लमेंट परिसरात भगवान बसवेश्वरांचा पुतळा उभारण्यात आला. लोकशाहीची स्थापना त्यांनी १२ व्या शतकात केली होती. त्याचाच हा गौरव आहे. मात्र देशवासीयांना त्यांची किंमत समजली नसल्याची खंत अ‍ॅड. अविनाश भोसीकर यांनी व्यक्त केली.ते येथील महात्मा बसवेश्वर सांस्कृतिक भवनात आयोजित वीर शैव लिंगायत समाज आंतरराज्यीय उपवर-वधू परिचय मेळाव्यात उद्घाटक म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी मनोहरराव कापसे होते. वीर शैव हित संवर्धक मंडळाचे अध्यक्ष डॉ. अशोक मेनकुदळे, वीर शैव सभा पुणेचे उपाध्यक्ष श्रीनिवास देशमुख, लिंगायत महिला मंडळाच्या अध्यक्ष स्मिता गाढवे, लिंगायत समाज कारंजाचे अध्यक्ष बाळासाहेब नंदे उपस्थित होते. यावेळी राज्यातील उपवर-वधूंनी परिचय दिला.मराठा आरक्षणाकडे दुर्लक्षसध्याचे सरकार मराठा आरक्षणाकडे डोळेझाक करीत आहे. या प्रकरणात तोडगा काढण्यासाठी नियुक्त वकील कमकुवत आहे. अभ्यास गटाची गतीही मंदावली आहे. या गतीने काम केले तर पुढील पाच वर्षे निकाल लागणार नाही. त्यासाठी मूक मोर्चा नव्हे, तर कानाखाली वाजवणारा मोर्चा हवा, असे प्रतिपादन उत्तमराव शेळके यांनी केले. मराठा समाजातर्फे आयोजित मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी खासदार भावना गवळी, माजी मंत्री संजय देशमुख, बाबासाहेब गाडे पाटील, सूर्यकांत गाडे पाटील, रवींद्र अरगडे, संजय काकडे, मनीषा जाधव, मंडळाचे अध्यक्ष अनिल वाघचोर, राहुल पवार, राम गायकवाड, उल्हास रणनवरे, बाळासाहेब मोहिते आदी उपस्थित होते.समाज जागृतीसाठी मेळावे काळाची गरज - मुधोजी राजेसमाज जागृतीसाठी मेळावे काळाची गरज असून वेळेचे गांभीर्य लक्षात घेऊन असे कार्यक्रम वरचे वर घ्यावे, असे मत मुधोजी राजे भोसले यांनी व्यक्त केले. मराठा समाजातर्फे बलवंत मंगल कार्यालयात आयोजित उपवर-वधू परिचय मेळाव्यात ते बोलत होते. यानंतर सामूहिक विवाह सोहळ्यांचे आयोजन करण्याचे आवाहनही त्यांनी केले. या परिचय मेळाव्यात २०० च्या वर उपवर-वधूंनी परिचय दिला. युवा मराठा बहुउद्देशीय संस्थेने या मेळाव्यासाठी परिश्रम घेतले.