शहरं
Join us  
Trending Stories
1
Bihar Assembly Election Result 2025 Live Updates: बिहारचा नवा मुख्यमंत्री कोण? आज लागणार निकाल
2
आजचे राशीभविष्य, १४ नोव्हेंबर २०२५: सन्मान वाढेल, नोकरीत प्रगती होईल, बोलण्यावर संयम ठेवा!
3
नितीशराज की तेजस्वी पर्व? बिहारचा आज फैसला
4
नगरपरिषद-नगरपंचायत निवडणुकांसाठी शिवसेनेचे प्रभारी जाहीर; DCM एकनाथ शिंदेंकडून घोषणा
5
मुंब्रा रेल्वे अपघात; ‘त्या’ दोन अभियंत्यांना कोणत्याही क्षणी अटक? अटकपूर्व जामीन कोर्टाने फेटाळला
6
३ राजयोगात उत्पत्ति एकादशी २०२५: ७ राशींना शुभ, उच्च पद मिळेल; अकल्पनीय लाभ, अनपेक्षित यश!
7
रेल्वे प्रवाशांना पुन्हा खिंडीत गाठणार? ‘वर्क टू रुल’साठी सेंट्रल रेल्वे कर्मचारी करणार आंदोलन
8
दिल्ली हल्ल्यापूर्वी पैसा आला कुठून? एनआयएसोबत ईडी करणार चौकशी, गृह मंत्रालयात उच्चस्तरीय बैठकीत झाला निर्णय
9
मराठी अधिकारी करणार दिल्लीच्या स्फोटाचा तपास, कोण आहेत ते?
10
द. आफ्रिकेच्या फिरकीपुढे परीक्षा, पहिली कसोटी ईडनवर आजपासून, ‘डब्ल्यूटीसी’मध्ये स्थान बळकट करण्याची भारताकडे संधी
11
व्हाइट कॉलर टेरर मॉड्यूल : काश्मिरात १३ ठिकाणी छापे
12
वाचवा, वाचवा..! ट्रक क्लिनरची मदतीसाठी याचना, कार पूर्णपणे जळून खाक
13
नवले पूल पुन्हा 'डेथ स्पॉट'; कंटेनर अपघातातील ९ मृतांमध्ये एका कुटुंबाचा समावेश
14
गोळ्या झाडून व्यावसायिकाचा खून करणाऱ्या संशयितांच्या शोधात पाच पथके रवाना
15
नवले पुलावर मृत्यूचा तांडव..! कंटेनर ट्रॅव्हलवर पलटी, कार पेटली, आठ जणांचे बळी
16
दिल्ली कार बॉम्बस्फोटानंतर अल-फलाह विद्यापीठावर कारवाई, सदस्यत्व रद्द
17
इराणच्या जनतेत पसरलीये संतापाची लाट! खामेनींकडे फिरवली पाठ; नेमकं कारण काय?
18
लाल किल्ला ब्लास्ट : एक-दोन नव्हे, तब्बल 32 कारचा होणार होता वापर; दहशतवाद्यांनी आखला होता 'बाबरीचा' बदला घेण्याचा भयंकर कट
19
कारमधील सीएनजीचा स्फोट...? दोन कंटेनरमध्ये कार सापडून लागली आग 
20
अजून किती निष्पाप लोकांचे बळी घेणार? प्रशासन ठोस उपाययोजना कधी करणार? स्थानिकांचा सवाल
Daily Top 2Weekly Top 5

तूर लागवड ते खरेदीचा ‘तेजस्विनी’ प्रकल्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2019 21:25 IST

ग्रामीण भागात कृषी उत्पादनावर प्रक्रियाच होत नाही. व्यापारी त्याचा गैरफायदा घेतात. यावर मात करण्यासाठी नेरचा तेजस्विनी प्रकल्प सरसावला आहे. तूर लागवड ते खरेदीपर्यंतचे काम करणाऱ्या या प्रकल्पामुळे ४८ गावांतील महिलांच्या कामांना उभारी मिळाली आहे.

ठळक मुद्देनेरच्या महिलांचा उपक्रम : ४८ गावांना मिळाली उभारी, थेट मार्केटिंगने फायदा

लोकमत न्यूज नेटवर्कनेर : ग्रामीण भागात कृषी उत्पादनावर प्रक्रियाच होत नाही. व्यापारी त्याचा गैरफायदा घेतात. यावर मात करण्यासाठी नेरचा तेजस्विनी प्रकल्प सरसावला आहे. तूर लागवड ते खरेदीपर्यंतचे काम करणाऱ्या या प्रकल्पामुळे ४८ गावांतील महिलांच्या कामांना उभारी मिळाली आहे.नेर तालुक्यातील तेजस्विनी प्रकल्पाने राज्यापुढे एक ओळख निर्माण केली आहे. पै-पै गोळा करणाºया या महिलांनी बचतगट स्थापन केला. या बचतगटाचे २०१६ मध्ये लोकसंचालित साधन केंद्र सुरू करण्यात आले. नेर तालुक्यातील साडेतीन हजार महिला या गटाशी जुळल्या आहेत. त्या दरमहा साडेतीन लाख रुपयांची बचत करीत आहेत. बचतीच्या अंतर्गत कर्जाच्या माध्यमातून वितरण करण्यात येते. त्यावर केवळ दीड टक्काच व्याज आकारले जाते. व्याजाची रक्कम बचत खात्यात गोळा होते. हे व्याज महिला वाटून घेतात. यामुळे पूर्वी सावकाराकडे हात पसरणाºया महिलांना आता बचतगटातूनच कर्ज मिळते. २०१७ मध्ये महिला आर्थिक विकास महामंडळाचे जिल्हा अध्यक्ष डॉ. रंजन वानखडे यांच्या मार्गदर्शनात तूरडाळ प्रकल्प साकारण्यात आला. प्रकल्पात अ‍ॅटोमायझेशन मशिन बसविण्यात आली. यामुळे तुरडाळीला आकर्षक पॅकींग शक्य झाले. येथील तूरडाळीला अ‍ॅमेझॉननेही मागणी नोंदविली आहे. हा प्रकल्प साकारल्यामुळे ४८ गावांतील शेतकऱ्यांना थेट फायदा झाला आहे. लोकसंचालित केंद्राच्या कृषीसेवा केंद्रातूनच ते बियाणे खरेदी करतात आणि हंगाम संपल्यानंतर याच महिलांकडून तुरीची खरेदी करण्यात येते. त्यांना कृषी उत्पन्न बाजार समितीमधील हमीदर गावातच मिळतो.असे आहे व्यवस्थापन मंडळया केंद्रातील व्यवस्थापन मंडळाच्या अध्यक्ष म्हणून पुष्पा गेडाम तर सचिव म्हणून सुनिता संतोष गडपायले काम पाहत आहेत. उपजीविका समन्वयक म्हणून भारती रणदिवे तर सहयोगिनी म्हणून माया मेश्राम, मिना वानखडे, रेखा वंजारी, जयमाला खडसे, अंजू रंगारी काम पाहत आहेत.