शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
3
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
4
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
5
माजी पाकिस्तानी खासदार भारतात हलाखीच्या परिस्थितीत; कुल्फी विकून उदरनिर्वाह, कोण आहेत ?
6
माणुसकी म्हणून तरी आमच्या भावनांशी खेळू नका; पहलगामच्या राजकारणावर असावरीच्या आईची प्रतिक्रिया
7
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
8
देशाच्या सुरक्षेचा विषय असेल तर हेरगिरी करण्यात काय अडचण?; पेगाससवरुन सुप्रीम कोर्टाचा सवाल
9
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
10
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
11
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
12
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
13
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
14
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
15
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
16
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
17
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
18
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
19
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
20
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!

तूर लागवड ते खरेदीचा ‘तेजस्विनी’ प्रकल्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2019 21:25 IST

ग्रामीण भागात कृषी उत्पादनावर प्रक्रियाच होत नाही. व्यापारी त्याचा गैरफायदा घेतात. यावर मात करण्यासाठी नेरचा तेजस्विनी प्रकल्प सरसावला आहे. तूर लागवड ते खरेदीपर्यंतचे काम करणाऱ्या या प्रकल्पामुळे ४८ गावांतील महिलांच्या कामांना उभारी मिळाली आहे.

ठळक मुद्देनेरच्या महिलांचा उपक्रम : ४८ गावांना मिळाली उभारी, थेट मार्केटिंगने फायदा

लोकमत न्यूज नेटवर्कनेर : ग्रामीण भागात कृषी उत्पादनावर प्रक्रियाच होत नाही. व्यापारी त्याचा गैरफायदा घेतात. यावर मात करण्यासाठी नेरचा तेजस्विनी प्रकल्प सरसावला आहे. तूर लागवड ते खरेदीपर्यंतचे काम करणाऱ्या या प्रकल्पामुळे ४८ गावांतील महिलांच्या कामांना उभारी मिळाली आहे.नेर तालुक्यातील तेजस्विनी प्रकल्पाने राज्यापुढे एक ओळख निर्माण केली आहे. पै-पै गोळा करणाºया या महिलांनी बचतगट स्थापन केला. या बचतगटाचे २०१६ मध्ये लोकसंचालित साधन केंद्र सुरू करण्यात आले. नेर तालुक्यातील साडेतीन हजार महिला या गटाशी जुळल्या आहेत. त्या दरमहा साडेतीन लाख रुपयांची बचत करीत आहेत. बचतीच्या अंतर्गत कर्जाच्या माध्यमातून वितरण करण्यात येते. त्यावर केवळ दीड टक्काच व्याज आकारले जाते. व्याजाची रक्कम बचत खात्यात गोळा होते. हे व्याज महिला वाटून घेतात. यामुळे पूर्वी सावकाराकडे हात पसरणाºया महिलांना आता बचतगटातूनच कर्ज मिळते. २०१७ मध्ये महिला आर्थिक विकास महामंडळाचे जिल्हा अध्यक्ष डॉ. रंजन वानखडे यांच्या मार्गदर्शनात तूरडाळ प्रकल्प साकारण्यात आला. प्रकल्पात अ‍ॅटोमायझेशन मशिन बसविण्यात आली. यामुळे तुरडाळीला आकर्षक पॅकींग शक्य झाले. येथील तूरडाळीला अ‍ॅमेझॉननेही मागणी नोंदविली आहे. हा प्रकल्प साकारल्यामुळे ४८ गावांतील शेतकऱ्यांना थेट फायदा झाला आहे. लोकसंचालित केंद्राच्या कृषीसेवा केंद्रातूनच ते बियाणे खरेदी करतात आणि हंगाम संपल्यानंतर याच महिलांकडून तुरीची खरेदी करण्यात येते. त्यांना कृषी उत्पन्न बाजार समितीमधील हमीदर गावातच मिळतो.असे आहे व्यवस्थापन मंडळया केंद्रातील व्यवस्थापन मंडळाच्या अध्यक्ष म्हणून पुष्पा गेडाम तर सचिव म्हणून सुनिता संतोष गडपायले काम पाहत आहेत. उपजीविका समन्वयक म्हणून भारती रणदिवे तर सहयोगिनी म्हणून माया मेश्राम, मिना वानखडे, रेखा वंजारी, जयमाला खडसे, अंजू रंगारी काम पाहत आहेत.