शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
3
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
4
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
5
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
6
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
7
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
8
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
9
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
10
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
11
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
12
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
13
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
14
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
15
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
16
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
17
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
18
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
19
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
20
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला

खेड्यांसाठी तरुणांची ‘टीम राष्ट्रनिर्माण’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2018 23:19 IST

शिकून चांगल्या नोकरीला लागलेल्या लोकांकडे समाजासाठी वेळच नसतो. पण अशा बहुतांश सुशिक्षित नोकरदारांच्या मनात ‘गावा’ने घर केलेले असते. गावाची आठवण येते, पण जाता येत नाही अशा द्विधामनोवस्थेत ते अडकतात.

ठळक मुद्देशहरी नोकरदार २३ जणांचा उपक्रम : पाच तालुक्यात वैचारिक साफसफाई

अविनाश साबापुरे।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : शिकून चांगल्या नोकरीला लागलेल्या लोकांकडे समाजासाठी वेळच नसतो. पण अशा बहुतांश सुशिक्षित नोकरदारांच्या मनात ‘गावा’ने घर केलेले असते. गावाची आठवण येते, पण जाता येत नाही अशा द्विधामनोवस्थेत ते अडकतात. पण राष्ट्रसंतांच्या विचारांचा पगडा असलेल्या २३ तरुणांनी मात्र ही मानसिक घालमेल संपवून स्वत:चेच नव्हे, तर पाच तालुक्यांतील गावांची भौतिक आणि वैचारिक साफसफाई सुरू केली आहे.टीम राष्ट्रनिर्माण विचारधारा अशा नावासह हे तरुण गेल्या चार महिन्यांपासून गावखेड्यांमध्ये काम करीत आहे. घाटंजी, यवतमाळ, पांढरकवडा, आर्णी, दारव्हा या तालुक्यांतील गावे बदलण्याचा विडा या टीमने उचलला आहे. विशेष म्हणजे, आपापल्या नोकऱ्या सांभाळून ही टीम काम करते.प्रत्येक शनिवारी एका खेड्याची निवड करून सर्व तरुण तेथे पोहोचतात. सायंकाळी ४ ते ६ वाजेपर्यंत हाती खराटा घेऊन ग्रामसफाई करतात. रात्री ७.३० पर्यंत भजनसंमेलन घेऊन गावकºयांपुढे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे विचार ठेवतात. रात्री आठ वाजता सामुदायिक प्रार्थना झाल्यावर हे तरुण कीर्तनकारांची भूमिका पत्करतात. रात्री ११ वाजेपर्यंत हे कीर्तनरुपी प्रबोधन सुरू असते. यात जीवनविकासासाठी शिक्षणाचे महत्त्व, व्यसनांमुळे जीवनात अंध:कार, कृषीतंत्र अशा विषयांवर हे तरुण गावकऱ्यांना मार्गदर्शन करतात. गावातून शिकून शहरात स्थायिक झालेले नोकरदार पुन्हा गावात येऊन आपल्यासोबत संवाद साधतात, हे बघून गावकºयांच्या मनात सकारात्मक उर्जा निर्माण होते, असा या तरुणांचा विश्वास आहे.गेल्या फेब्रुवारीपासून या उपक्रमाची सुरूवात घाटंजी तालुक्यातून करण्यात आली. आतापर्यंत डांगरगाव, पाटापांगरा, तिवसाळा, पंगडी, सायतखर्डा, पहापळ, वरझडी, सायखेडा, पांढुर्णा, मांजरी, कवठा, तळणी, वडगाव, कारेगाव, जरूर, कामठवाडा, शिवणी, करमना आदी गावांमध्ये हे तरुण पोहोचले आहेत.टीम आपल्यासाठी ग्रामसफाई करीत असल्याचे पाहून गावकरीही या उपक्रमात सहभागी होतात, हे विशेष. तर शेजारच्या खेड्यातील नागरिक ‘आमच्याही गावात या’ अशी गळ घालतात. नुकताच घाटंजी येथे झालेल्या प्रबोधन कार्यक्रमात यवतमाळचे खुशाल ठाकरे, डॉ. ताराचंद कंठाळे, डॉ. कोठारी, ललित काळे आदींनी या टीमची भेट घेतली.ही आहे ‘टीम राष्ट्रनिर्माण विचारधारा’शिवाजी सोयाम, मधुकर गेडाम, अविनाश राऊत, पांडुरंग किरणापुरे, कैलास बगमारे, विलास कोरांगे, गजानन चव्हाण, राजू विरदंडे, छगन पेंदोर, राजू कुंटलवार, सुरेश चौधरी, दिवाकर गेडाम, घनश्याम काटकर, गोवर्धन मेश्राम, प्रदीप जाधव, माणिकदास टोंगे, सुरेश बोपटे, श्रीराम तोडसाम, मोहन शेंडे, चंद्रकांत आडे, गणेश साबापुरे, विष्णू नेवारे, गजेंद्र ढवळे आदी या टीमचे सदस्य आहेत.

टॅग्स :Yavatmalयवतमाळ