शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
आजचे राशीभविष्य- १६ सप्टेंबर २०२५: मित्रांचा सहवास लाभेल, पण घरातील वातावरण बिघडण्याची शक्यता
3
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
4
'पूरग्रस्तांना प्रत्येकाने शक्य ती सर्व मदत करावी', राहुल गांधींच्या सूचना, प्रत्यक्ष गेले बांधावर
5
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
6
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
7
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
8
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
9
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
10
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
11
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
12
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
13
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
14
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
15
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
16
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
17
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
18
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
19
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
20
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”

शिक्षकांचा ईओ कार्यालयात ठिय्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2017 23:23 IST

जिल्ह्यातील विविध शिक्षण संस्थांच्या शाळांमध्ये अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांचे समायोजन झाले. मात्र, त्यातील बहुतांश शिक्षकांना समायोजित शाळेत रूजूच करून घेण्यात आले नाही.

ठळक मुद्देवेतन अडले : समायोजनानंतर केवळ १२ शिक्षक होऊ शकले रूजू

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्ह्यातील विविध शिक्षण संस्थांच्या शाळांमध्ये अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांचे समायोजन झाले. मात्र, त्यातील बहुतांश शिक्षकांना समायोजित शाळेत रूजूच करून घेण्यात आले नाही. आता त्यांच्या वेतनाचा प्रश्न गंभीर झाला असून या शिक्षकांनी गुरुवारी शिक्षणाधिकारी कार्यालयात ठिय्या दिला.२०१६-१७ या शैक्षणिक सत्रात जिल्ह्यात ५० शिक्षक अतिरिक्त ठरले. त्यातील ४४ जणांचे विविध शिक्षण संस्थांच्या शाळांमध्ये समायोजन करण्यात आले. तर ६ शिक्षकांच्या जागाच नसल्याने त्यांना विभागस्तरावरील समायोजनासाठी पाठविण्यात आले. परंतु, ४४ जणांपैकी आतापर्यंत केवळ १२ शिक्षक नव्या शाळेत रूजू होऊ शकले. तर उर्वरित ३२ अतिरिक्त शिक्षक अद्यापही कोणत्याच शाळेत रूजू झालेले नाहीत. त्यामुळे त्यांचे वेतन अडलेले आहे. दररोज शिक्षणाधिकारी कार्यालयात चकरा मारूनही प्रश्न न सुटल्यामुळे गुरुवारी या शिक्षकांनी माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयात ठिय्या दिला.यावेळी शिक्षण संघर्ष समितीच्या अध्यक्ष संगीता शिंदे आणि विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष अरविंद देशमुख अशा दोन संघटनांच्या नेत्यांनी हा प्रश्न रेटला.अतिरिक्त शिक्षकांचे वेतन निघालेच पाहिजे, असे नारे यावेळी लावण्यात आले. शिक्षणाधिकारी उपलब्ध नसल्याने शिक्षकांनी शिक्षणाधिकाºयांच्या कक्षातच ठिय्या दिला. यावेळी शिक्षण संघर्ष समितीच्या संगीता शिंदे, विमाशीचे अरविंद देशमुख यांच्यासह रामकृष्ण जिवतोडे, मनोज जिरापुरे, निलिमा काळमेघ आदी उपस्थित होते.अखेर काढले पत्रवेतनाच्या मागणीसाठी शिक्षण संघर्ष समिती आणि विमाशीच्या पदाधिकाºयांनी थेट शिक्षणाधिकाºयांच्या कक्षात ठिय्या दिला. वेतनाचा प्रश्न निकाली निघत नाही तोवर इथून हटणारच नाही, अशी भूमिका शिक्षण संघर्ष समितीच्या अध्यक्ष संगीता शिंदे यांनी घेतली. त्यानंतर शिक्षणाधिकारी चिंतामण वंजारी यांनी लगेच पत्र जारी करून अतिरिक्त शिक्षकांचे नोव्हेंबरचे वेतन जुन्याच शाळेतून काढण्याचे आदेश दिले. तर आॅक्टोबरची देयकेही वेतन पथक अधीक्षकांकडे सादर करण्याचे आदेश दिले.