शहरं
Join us  
Trending Stories
1
"नो डाउट, भारतच जिंकला.. तेही अगदी ठासून!" अमेरिकन युद्धतज्ज्ञाचं 'सर्टिफिकेट', ४ मुद्दे महत्त्वाचे
2
India Pakistan conflict : मोठा खुलासा! तुर्कीचे सैनिक भारतावर ड्रोन हल्ला करत होते; सीमेपलिकडे काय घडत होते?
3
भारताविरोधातील कट उधळला! शोपियान चकमकीत ठार झालेल्या ३ दहशतवाद्यांकडून मोठा शस्त्रसाठा जप्त
4
'आली रे आली चीनची बारी आली'; आता मोदी सरकार चीनची नांगी ठेचण्याच्या तयारीत, प्रकरण काय?
5
अमेरिकेचा यू-टर्न; ज्या व्यक्तीला कुख्यात दहशतवादी घोषित केले, त्याचीच ट्रम्प यांनी घेतली भेट
6
Astro Tips: गुरुकृपेसाठी आणि सकल इच्छापूर्तीसाठी गुरुवारपासून सुरू करा औदुंबर पूजेचे व्रत!
7
FD वर व्याजासोबत ५ लाख रुपयांचे विमा कव्हर; ठेवीवर कर्ज घेण्याचीही सुविधा
8
तुम्ही फक्त एवढे काम करा, आम्ही पाकिस्तानातून स्वातंत्र होऊ; बलूचची भारताकडे मागणी
9
आई-वडील, बहीण आणि मावशीची केली हत्या, मग जाळले मृतदेह, आता कोर्टाने सुनावली अशी शिक्षा
10
Gold Rates 14 May : सोन्या-चांदीचे दर घसरले; खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याची नवी किंमत
11
बॅगा भरा अन् माघारी फिरा! मुंबई इंडियन्ससह या IPL फ्रँचायझी संघांचं टेन्शन वाढलं; कारण...
12
बापमाणूस! पत्नीच्या मृत्यूनंतर चिमुकल्या लेकीला सोबत घेऊन बाबा करतोय काम, पाणावले डोळे
13
"भारत १७ दिवसांत पुन्हा हल्ला करू शकतो, कारण..."; पाकिस्तानच्या बड्या नेत्याला धाकधूक
14
Meditation Tips: ध्यान करायचे आहे पण ध्यान लागत नाही? श्री श्री रविशंकरांनी सांगितले तीन नियम!
15
Online Admission Process : विद्यार्थ्यांनो आताच नोट करून ठेवा, 'या' तारखेपासून सुरू होणार अकरावीची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया 
16
"२२ दिवसांनी जेव्हा त्यांना व्हिडीओ कॉलवर पाहिलं तेव्हा मी त्यांना ओळखूच शकले नाही कारण..."
17
राहुल गांधींना दिलासा; नागरिकत्वाला आव्हान देणारी याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली
18
बांधावरून सहजच फेरफटका मारत होता शेतकरी; अचानक चमकले, ३६००० कोटींचे सोने सापडले...
19
BSE चं मार्केट कॅप १ लाख कोटींच्या पार, शेअरच्या किंमतीत विक्रमी तेजी
20
चीननंतर आता भारताची तुर्कीवर मोठी कारवाई; टीआरटी वर्ल्डच्या सोशल मिडिया हँडलबाबत मोठा निर्णय

शिक्षकांनी शेतकऱ्यांना आधार द्यावा

By admin | Updated: September 24, 2015 03:02 IST

शेतकऱ्यांचे मनोधर्य वाढवून त्यांना आधार देण्यासाठी जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालयाचे प्राचार्य, प्राध्यापक, शिक्षक..

आवाहन : प्राचार्य, प्राध्यापक, शिक्षकांसोबत चेतना अभियानावर अधिकाऱ्यांची चर्चायवतमाळ : शेतकऱ्यांचे मनोधर्य वाढवून त्यांना आधार देण्यासाठी जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालयाचे प्राचार्य, प्राध्यापक, शिक्षक यांनी बळीराजा चेतना अभियानाच्या माध्यमातून जनजागृतीसाठी पुढे यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांनी केले.बचत भवन येथे चेतना अभियानांतर्गत प्राचार्य, प्राध्यापक, शिक्षकांची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. बैठकीला जिल्हाधिकाऱ्यांसह मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मल्लीनाथ कलशेट्टी, निवासी उपजिल्हाधिकारी राजेश खवले, प्राथमिक शिक्षणाधिकारी सुचिता पाटेकर, माध्यमिक शिक्षणाधिकारी चिंतामण वंजारी, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य डॉ.रविंद्र आंबेकर आदी उपस्थित होते. यावेळी जिल्हाभरातून मोठ्या प्रमाणावर शिक्षक प्राध्यापक उपस्थित होते. शिक्षकांना समाजात फार मोठा मान आहे. विद्यार्थ्यांवर खऱ्या अर्थाने शालेय जीवनात शिक्षक उत्तम संस्कार करत असतो. या वयातच विद्यार्थ्यांमध्ये कणखर व लढाऊ वृत्ती निर्माण होणे आवश्यक आहे. शिक्षकांनी जिल्ह्यातील सर्व विद्यार्थ्यांना अशाप्रकारचे संस्कार द्यावे. यामुळे पुढे तो परिस्थितीचा सामना करेल, परंतु आत्महत्या करणार नाही. तसेच कुणाला करूही देणार नाही. यासाठी शिक्षकांनी गावागावात पालकांच्या सभाही घ्याव्या, असे जिल्हाधिकाऱ्यांनी प्राध्यापक शिक्षकांना सांगितले.शिक्षकांनी अभियानासाठी चेतना दूत म्हणून काम करावे. त्यांच्या समस्या, अडचणी समजून त्या सोडविण्यासाठी प्रयत्न करावे. शाळा, महाविद्यालयांमध्ये निबंध वत्कृत्व स्पर्धा आयोजित करून विद्यार्थ्यांना त्यांच्या भावना मांडण्यासाठी प्रोत्साहित करावे.चेतना अभियानांतर्गत शाळा स्तरावर पालकसभा व त्या माध्यमातून जनजागृती शेतकऱ्यांच्या मुलांसाठी विनामूल्य शिकवणी वर्ग, आदर्श शेतकऱ्यांच्या यशोगाथा इतरापर्यंत पोहोचविणे याबाबी अभियानांतर्गत शिक्षकांकडून होणे अपेक्षित असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. यावेळी अनेक शिक्षकांनी चर्चेत सहभागी होवून स्वयंस्फूर्तीने अभियानास सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. यावेळी शिक्षक, प्राध्यापक आदींची उपस्थिती होती. (वार्ताहर)