शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
2
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
3
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
4
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
5
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
6
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
7
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
8
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
9
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
10
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
11
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
12
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
13
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
14
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
15
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
16
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
17
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
18
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
19
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
20
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका

शिक्षकांनी शेतकऱ्यांना आधार द्यावा

By admin | Updated: September 24, 2015 03:02 IST

शेतकऱ्यांचे मनोधर्य वाढवून त्यांना आधार देण्यासाठी जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालयाचे प्राचार्य, प्राध्यापक, शिक्षक..

आवाहन : प्राचार्य, प्राध्यापक, शिक्षकांसोबत चेतना अभियानावर अधिकाऱ्यांची चर्चायवतमाळ : शेतकऱ्यांचे मनोधर्य वाढवून त्यांना आधार देण्यासाठी जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालयाचे प्राचार्य, प्राध्यापक, शिक्षक यांनी बळीराजा चेतना अभियानाच्या माध्यमातून जनजागृतीसाठी पुढे यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांनी केले.बचत भवन येथे चेतना अभियानांतर्गत प्राचार्य, प्राध्यापक, शिक्षकांची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. बैठकीला जिल्हाधिकाऱ्यांसह मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मल्लीनाथ कलशेट्टी, निवासी उपजिल्हाधिकारी राजेश खवले, प्राथमिक शिक्षणाधिकारी सुचिता पाटेकर, माध्यमिक शिक्षणाधिकारी चिंतामण वंजारी, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य डॉ.रविंद्र आंबेकर आदी उपस्थित होते. यावेळी जिल्हाभरातून मोठ्या प्रमाणावर शिक्षक प्राध्यापक उपस्थित होते. शिक्षकांना समाजात फार मोठा मान आहे. विद्यार्थ्यांवर खऱ्या अर्थाने शालेय जीवनात शिक्षक उत्तम संस्कार करत असतो. या वयातच विद्यार्थ्यांमध्ये कणखर व लढाऊ वृत्ती निर्माण होणे आवश्यक आहे. शिक्षकांनी जिल्ह्यातील सर्व विद्यार्थ्यांना अशाप्रकारचे संस्कार द्यावे. यामुळे पुढे तो परिस्थितीचा सामना करेल, परंतु आत्महत्या करणार नाही. तसेच कुणाला करूही देणार नाही. यासाठी शिक्षकांनी गावागावात पालकांच्या सभाही घ्याव्या, असे जिल्हाधिकाऱ्यांनी प्राध्यापक शिक्षकांना सांगितले.शिक्षकांनी अभियानासाठी चेतना दूत म्हणून काम करावे. त्यांच्या समस्या, अडचणी समजून त्या सोडविण्यासाठी प्रयत्न करावे. शाळा, महाविद्यालयांमध्ये निबंध वत्कृत्व स्पर्धा आयोजित करून विद्यार्थ्यांना त्यांच्या भावना मांडण्यासाठी प्रोत्साहित करावे.चेतना अभियानांतर्गत शाळा स्तरावर पालकसभा व त्या माध्यमातून जनजागृती शेतकऱ्यांच्या मुलांसाठी विनामूल्य शिकवणी वर्ग, आदर्श शेतकऱ्यांच्या यशोगाथा इतरापर्यंत पोहोचविणे याबाबी अभियानांतर्गत शिक्षकांकडून होणे अपेक्षित असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. यावेळी अनेक शिक्षकांनी चर्चेत सहभागी होवून स्वयंस्फूर्तीने अभियानास सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. यावेळी शिक्षक, प्राध्यापक आदींची उपस्थिती होती. (वार्ताहर)