शहरं
Join us  
Trending Stories
1
आयटी पार्क पुण्यातून बाहेर चालले..! अजित पवारांनी हिंजवडीच्या सरपंचांनाही सुनावले खडेबोल
2
Thailand- Cambodia Conflict :'सीमेवर प्रवास टाळा', थायलंड- कंबोडिया संघर्षादरम्यान भारताच्या पर्यटकांसाठी दूतावासाने सूचना दिल्या
3
कॉलेजला जाण्यापूर्वी हवी होती लीन बॉडी; ऑनलाईन ट्रेंड, लिक्विड डाएट बेतलं जीवावर, मुलाचा मृत्यू
4
आता सैनिकांसाठी अरबी भाषा आणि इस्लाम शिकणे अनिवार्य, इस्रायलचा मोठा निर्णय! कारण काय?
5
अरेरे! 'सैयारा' पाहून तुफान राडा; गर्लफ्रेंडसाठी थिएटरबाहेर भिडले २ तरुण, लाथा-बुक्क्यांनी मारहाण
6
Rain Update : ठाणे, रायगड, मुंबईत मुसळधार, ऑरेंज अलर्ट, पालघरसाठी रेड अलर्ट, भरती-ओहोटीबाबतही इशारा
7
५ वर्षांत १० पट वाढला TATA Sons चा नफा; समूहाच्या 'या' कंपनीनं केली सर्वाधिक कमाई, तुमच्याकडे स्टॉक आहे का?
8
'मला बुटाने मारा', सिद्धरामय्या अन् शिवकुमार यांच्या विशेष अधिकाऱ्यांमध्ये दिल्लीत हाणामारी; कारण काय?
9
शाहरुख फिटनेससाठी कोणते पदार्थ खात नाही? किती वाजता झोपतो? काय जेवतो? जाणून घ्या एका क्लिकवर
10
पहिल्यांदा नोकरी करणाऱ्यांना सरकार देणार १५ हजार रुपये; फक्त पूर्ण कराव्या लागतील 'या' २ अटी
11
"तुम्हाला आनंद देणाऱ्या गोष्टींवरदेखील खर्च करा..," राधिका गुप्ता यांनी दिला हृदयस्पर्शी सल्ला
12
आमदार रोहित पवारांच्या अडचणीत वाढ; मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीकडून मोठी कारवाई
13
महायुतीत २ मंत्र्यांमध्ये रंगलं मानापमान नाट्य; शिंदेसेनेचे मंत्री नाराज, भाजपा मंत्र्यांचा पलटवार
14
सुनील शेट्टीने 'हेरा फेरी ३'मधील परेश रावलच्या एंट्रीवर दिली प्रतिक्रिया, म्हणाली- "नजर लागते..."
15
२ मुलांना विष पाजलं, पत्नीचा गळा दाबला अन् मग पतीने...; एकाच कुटुंबातील चौघांची जीवनयात्रा संपली
16
धक्कादायक घटना! एक वर्षाच्या मुलाने नागाचा चावा घेतला, कोब्राचा मृत्यू झाला; पण मुलगाही...
17
पाकिस्तानने अमेरिकेसमोर TRF'वर सूर बदलला! म्हणाले, आम्हाला काही हरकत नाही', हुशारीही दाखवली
18
अल्पवयीन मुलीवर गँगरेप, प्रेग्नेंट असल्याचं कळताच जिवंत गाडण्याचा प्रयत्न; २ अटक तर १ आरोपी फरार
19
₹३० वरुन ₹३००० पार गेला हा शेअर; आता कंपनीनं मोठ्या गुंतवणुकीची केली घोषणा, तुमच्याकडे आहे का?
20
ना नुकसानीची भीती, ना पैसे बुडण्याची चिंता; 'या' स्कीममध्ये ₹१ लाख गुंतवून बनवू शकता २७ लाख रुपये

शिक्षक, दक्षता समितीवर आता कॉपीमुक्ती जबाबदारी

By admin | Updated: February 18, 2015 02:11 IST

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेतल्या जाणाऱ्या दहावी व बारावीच्या परीक्षेत विद्यार्थ्यांना वाचनासाठी १० मिनिटांपूर्वी प्रश्नपत्रिका देण्याचा ...

वणी : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेतल्या जाणाऱ्या दहावी व बारावीच्या परीक्षेत विद्यार्थ्यांना वाचनासाठी १० मिनिटांपूर्वी प्रश्नपत्रिका देण्याचा निर्णय येत्या परीक्षेपासून मंडळाने घेतला आहे. सोबतच कॉपीमुक्त वातावरणात परीक्षा घेण्याची मोठी जबाबदारी शिक्षकांसोबतच आता दक्षता समितीवर सोपविण्यात आली आहे.दहावी, बारावी परीक्षेतील विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिकेतील सर्व प्रश्न सोडविण्याकरिता विषयनिहाय १ ते ३ तास वेळ निर्धारित करण्यात आला आहे. मात्र त्यापैकी काही वेळ प्रश्नपत्रिका वाचनात जात असल्याने उत्तरे लिहिण्यास वेळ अपुरा पडत असल्याची विद्यार्थ्यांची ओरड होती. शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी विद्यार्थ्यांची ही अडचण दूर करण्याची घोषणाही केली होती. त्यानुसार राज्य शिक्षण मंडळाने येत्या फेब्रुवारी व मार्चमध्ये होणाऱ्या बारावी व दहावीच्या परीक्षेत विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका वाचनासाठी निर्धारित वेळेव्यतिरिक्त १० मिनिटे अधिक वेळ देण्याची सूचना सर्व केंद्र संचालकांना एका परिपत्रकाद्वारे दिली आहे. या परिपत्रकानुसार ११ वाजता सुरू होणाऱ्या पेपरची प्रश्नपत्रिका विद्यार्थ्यांना १०.५० वाजता, तर ३ वाजता सुरू होणाऱ्या पेपरची प्रश्नपत्रिका विद्यार्थ्यांना २.५० वाजता देण्यात येणार आहे. मात्र प्रश्नपत्रिका हातात पडताच विद्यार्थ्यांना उत्तरे लिहिणे सुरू करता येणार नाही. केवळ प्रश्नपत्रिका वाचण्यासाठी हा वेळ देण्यात येणार आहे. आता ११ वाजता सुरू होणाऱ्या पेपरसाठी विद्यार्थ्यांना १०.३० ते १०.४० परीक्षा खोलीत प्रवेश देणे, १०.४० वाजता उत्तरपत्रिका, बारकोड स्टीकर यांचे वितरण करणे, उत्तरपत्रिका मिळताच विद्यार्थ्यांनी पान क्रमांक दोनवरील सूचना काळजीपूर्वक वाचण्याची सूचना खोली पर्यवेक्षक देतील. त्यानंतर १०.५० ला प्रश्नपत्रिकांचे वितरण केले जाईल व ११ वाजता उत्तरे लिहिण्यास सुरूवात करता येईल. अध्ययन अक्षमता असणारे, अपंग व सिकलसेल विद्यार्थ्यांना जादा वेळ देण्यात येणार आहे.परीक्षा केंद्राबाहेरील गोंधळावर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रत्येक केंद्र स्तरावर दक्षता समितीचे गठण करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. या समितीमध्ये सरपंच, उपसरपंच, पोलीस पाटील, तंटामुक्त गाव समितीचे पदाधिकारी व ज्यांचे पाल्य परीक्षेला बसले नाहीत, अशा पालकांचा समितीत समावेश राहणार आहे. परीक्षेपूर्वी दक्षता समितीची सभा घेऊन त्यांची कर्तव्ये व जबाबदाऱ्यांची जाणीव मुख्याध्यापकांनी करून देण्याच्या सूचना आहे. दक्षता समिती सदस्य केवळ केंद्राच्या बाहेरील गैरप्रकारावर लक्ष ठेवतील. परीक्षा संचालनात त्यांना कोणताही हस्तक्षेप करता येणार नाही. ‘गैरमार्गाशी लढा’ हा उपक्रम राबविण्यासाठी मुख्याध्यापक व केंद्र संचालकांना विविध निर्देशही देण्यात आले आहेत. (स्थानिक प्रतिनिधी)