शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Updates Live: मध्य रेल्वेची ठाणे ते सीएसएमटी दरम्यानची वाहतूक पूर्णपणे बंद
2
मिठी नदी धोक्याच्या पातळीवर; नदीलगतच्या कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवलं, बीकेसीत पाणी साचण्याची शक्यता
3
ट्रम्प यांना भेटायला गेलेल्या झेलेन्स्कींनी मेलानियांसाठी पाठवले खास पत्र; काय आहे या पत्रात?
4
आज उपराष्ट्रपती पदासाठी उमेदवाराची घोषणा करणार 'I.N.D.I.A.'? ही 3 नावं शर्यतीत!
5
'हिंदुस्तान झिदाबाद...' तिरंग्यासाठी लंडनमध्ये पाकिस्तानींशी भिडल्या भारतीय तरुणी, पाहा VIDEO
6
पैसे दुप्पट करते ही सरकारी योजना; ५ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळेल १० लाखांचा गॅरंटीड रिटर्न, पाहा डिटेल्स
7
पतीच्या निधनामुळे खचलेल्या तिच्या आयुष्यात 'तो' आला अन् मोठा झटका देऊन गेला! तरुणीसोबत घडलं असं काही की...
8
LIC ची मोठी घोषणा! बंद पडलेल्या पॉलिसी पुन्हा सुरू करण्याची सुवर्णसंधी; विलंब शुल्कातही मोठी सूट
9
मुंबईतील सर्व सरकारी कार्यालयांना सुट्टी; खासगी कंपन्यांना वर्क फ्रॉम देण्याच्या सूचना, शाळा, कॉलेज बंद
10
रोनाल्डोचा साखरपुडा आणि सौदीचे ‘रहस्य’! स्थानिकांना वेगळा नियम आणि स्टारला वेगळा न्याय, का?
11
ठाकरे बंधू किंवा महायुती कुणीही निवडणूक जिंकली तरी बेस्ट कर्मचाऱ्यांना न्याय मिळेल का?
12
चिपळुणात वाशिष्ठी नदीने ओलांडली इशारा पातळी; पूरसदृश स्थितीमुळे कामाशिवाय घराबाहेर न पडण्याची सूचना
13
"२६ जुलैचा जलप्रलय, तुम्ही मला...", वीणा जामकरने सांगितली ज्योती चांदेकरांची भावुक आठवण
14
ट्रम्प यांच्यासोबतच्या बैठकीनंतर पुतिन यांना आली भारताची आठवण, डायल केला पंतप्रधान मोदींचा नंबर; सगळंच सांगितलं!
15
Pune Traffic: पुण्यात सकाळपासून मुसळधार! शहरात प्रचंड वाहतूककोंडी, प्रमुख मार्गांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा
16
"झोया अख्तर बड्या बापाची मुलगी...", 'गलीबॉय'साठी ऑडिशन द्यायला सांगितल्याने भडकल्या उषा नाडकर्णी
17
AI क्राईम प्रिडिक्शन सिस्टम: गुन्हेगारांना पकडण्यासाठी आता 'हा' देश घेणार आर्टिफिशियल इंटेलिजन्सची मदत
18
किरकोळ तेजीसह शेअर बाजार उघडला, 'या' स्टॉक्सनं तेजीसह केली कामकाजाला सुरुवात
19
FD-RD सर्व विसरा! हा आहे LIC चा जबरदस्त प्लान; आयुष्यभर पडेल पैशांचा पाऊस, टेन्शचा होईल 'The End'
20
आयटी कंपनीने ८०% कर्मचाऱ्यांना एकाचवेळी कामावरुन काढलं; कारण वाचून हैराण व्हाल

शिक्षक संचमान्यतेचे गुऱ्हाळ सुरूच

By admin | Updated: February 27, 2017 00:51 IST

प्रत्येक विद्यार्थ्याकडे योग्य लक्ष देऊन अध्यापन करता यावे, यासाठी शिक्षकांची संचमान्यता केली जाते.

आॅनलाईन खेळखंडोबा : परीक्षेच्या तोंडावर दुरुस्तीचा सोपस्कार अविनाश साबापुरे  यवतमाळ प्रत्येक विद्यार्थ्याकडे योग्य लक्ष देऊन अध्यापन करता यावे, यासाठी शिक्षकांची संचमान्यता केली जाते. परंतु, गेल्या दोन वर्षांपासून शिक्षकांची संचमान्यता कुचकामी ठरत आहे. परीक्षा तोंडावर आली तरी अनेक शाळांना योग्य प्रमाणात शिक्षक मिळाले नाही. आता ऐन परीक्षेच्या तोंडावर शिक्षण संचालकांनी संचमान्यतेत दुरुस्ती करण्याचा देखावा निर्माण केला आहे. राज्यातील शाळांमधील शिक्षकांचे प्रमाण विद्यार्थ्यांच्या संख्येनुसार योग्य राखण्यासाठी संचमान्यता केली जाते. त्यासाठी पूर्वी एखाद्या शाळेत किती विद्यार्थी आहेत, याची पर्यवेक्षकीय यंत्रणेकडून प्रत्यक्ष पाहणी केली जात होती. मात्र आता शाळांनी सरल प्रणालीत भरलेल्या माहितीवरच विश्वास ठेवून संचमान्यता केली जात आहे. परिणामी, गेल्या दोन शैक्षणिक सत्रांतील संचमान्यतेत प्रचंड चुका झाल्या आहेत. संचालनालयाने शिक्षणाधिकाऱ्यांच्या लॉगीनवर उपलब्ध करून दिलेल्या संचमान्यतेवर हजारो शाळा असमाधानी आहेत. २०१५-१६ आणि २०१६-१७ या दोन शैक्षणिक सत्रांतील संचमान्यता चुकीची असल्याचा उलगडा शिक्षण संचालनालयाला झाला आहे. आता विनाअनुदानित शाळांना २० टक्के वेतन अनुदान देण्याची प्रक्रिया सुरू करण्याचे निर्देश शासनाने दिले. मार्च एडिंगपूर्वी वेतनअनुदान वितरित करण्याचे निर्देश आहे. परंतु, संचमान्यता दुरुस्त केल्याशिवाय वेतन अनुदान देता येणे शक्यच नाही. आणि अनुदान वितरित केले नाही किंवा व्यपगत झाल्यास कारवाईचा बडगा संचालकांसह शिक्षणाधिकाऱ्यांवर उगारला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे ऐन परीक्षेच्या तोंडावर संचमान्यता दुरुस्तीचे शिबिर २७ फेब्रुवारीपासून पुण्यात घेण्यात येत आहे. यात पहिल्या दिवशी पुणे, अमरावती, २८ रोजी कोल्हापूर, नागपूर, २ मार्चला मुंबई, औरंगाबाद आणि ३ मार्चला नाशिक, लातूर विभागातील संचमान्यतांमध्ये दुरुस्ती करण्यात येणार आहे. त्यासाठी २०१२ ते २०१७ या पाच शैक्षणिक सत्रांतील विद्यार्थीसंख्या, मान्य पदे, पायाभूत पदे आदी माहिती घेऊन शिक्षणाधिकाऱ्यांना पुण्यात बोलावण्यात आले आहे. संचमान्यता करूनही गेल्या दोन वर्षांत विद्यार्थ्यांना योग्य प्रमाणात शिक्षक मिळाले नाही. यंदा संपूर्ण सत्र संपल्यानंतर ऐन परीक्षेच्या काळात एखाद्या शाळेला शिक्षक मिळाला तरी विद्यार्थ्यांना त्याचा उपयोग काय, असे प्रश्न निर्माण झाले आहेत. आता संचमान्येत दुरूस्ती कधी होते, याकडे लक्ष आहे.