शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
4
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
5
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
6
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
7
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
8
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
9
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
10
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

शिक्षक संचमान्यतेचे गुऱ्हाळ सुरूच

By admin | Updated: February 27, 2017 00:51 IST

प्रत्येक विद्यार्थ्याकडे योग्य लक्ष देऊन अध्यापन करता यावे, यासाठी शिक्षकांची संचमान्यता केली जाते.

आॅनलाईन खेळखंडोबा : परीक्षेच्या तोंडावर दुरुस्तीचा सोपस्कार अविनाश साबापुरे  यवतमाळ प्रत्येक विद्यार्थ्याकडे योग्य लक्ष देऊन अध्यापन करता यावे, यासाठी शिक्षकांची संचमान्यता केली जाते. परंतु, गेल्या दोन वर्षांपासून शिक्षकांची संचमान्यता कुचकामी ठरत आहे. परीक्षा तोंडावर आली तरी अनेक शाळांना योग्य प्रमाणात शिक्षक मिळाले नाही. आता ऐन परीक्षेच्या तोंडावर शिक्षण संचालकांनी संचमान्यतेत दुरुस्ती करण्याचा देखावा निर्माण केला आहे. राज्यातील शाळांमधील शिक्षकांचे प्रमाण विद्यार्थ्यांच्या संख्येनुसार योग्य राखण्यासाठी संचमान्यता केली जाते. त्यासाठी पूर्वी एखाद्या शाळेत किती विद्यार्थी आहेत, याची पर्यवेक्षकीय यंत्रणेकडून प्रत्यक्ष पाहणी केली जात होती. मात्र आता शाळांनी सरल प्रणालीत भरलेल्या माहितीवरच विश्वास ठेवून संचमान्यता केली जात आहे. परिणामी, गेल्या दोन शैक्षणिक सत्रांतील संचमान्यतेत प्रचंड चुका झाल्या आहेत. संचालनालयाने शिक्षणाधिकाऱ्यांच्या लॉगीनवर उपलब्ध करून दिलेल्या संचमान्यतेवर हजारो शाळा असमाधानी आहेत. २०१५-१६ आणि २०१६-१७ या दोन शैक्षणिक सत्रांतील संचमान्यता चुकीची असल्याचा उलगडा शिक्षण संचालनालयाला झाला आहे. आता विनाअनुदानित शाळांना २० टक्के वेतन अनुदान देण्याची प्रक्रिया सुरू करण्याचे निर्देश शासनाने दिले. मार्च एडिंगपूर्वी वेतनअनुदान वितरित करण्याचे निर्देश आहे. परंतु, संचमान्यता दुरुस्त केल्याशिवाय वेतन अनुदान देता येणे शक्यच नाही. आणि अनुदान वितरित केले नाही किंवा व्यपगत झाल्यास कारवाईचा बडगा संचालकांसह शिक्षणाधिकाऱ्यांवर उगारला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे ऐन परीक्षेच्या तोंडावर संचमान्यता दुरुस्तीचे शिबिर २७ फेब्रुवारीपासून पुण्यात घेण्यात येत आहे. यात पहिल्या दिवशी पुणे, अमरावती, २८ रोजी कोल्हापूर, नागपूर, २ मार्चला मुंबई, औरंगाबाद आणि ३ मार्चला नाशिक, लातूर विभागातील संचमान्यतांमध्ये दुरुस्ती करण्यात येणार आहे. त्यासाठी २०१२ ते २०१७ या पाच शैक्षणिक सत्रांतील विद्यार्थीसंख्या, मान्य पदे, पायाभूत पदे आदी माहिती घेऊन शिक्षणाधिकाऱ्यांना पुण्यात बोलावण्यात आले आहे. संचमान्यता करूनही गेल्या दोन वर्षांत विद्यार्थ्यांना योग्य प्रमाणात शिक्षक मिळाले नाही. यंदा संपूर्ण सत्र संपल्यानंतर ऐन परीक्षेच्या काळात एखाद्या शाळेला शिक्षक मिळाला तरी विद्यार्थ्यांना त्याचा उपयोग काय, असे प्रश्न निर्माण झाले आहेत. आता संचमान्येत दुरूस्ती कधी होते, याकडे लक्ष आहे.