शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला घरात घुसून मारले! १०० हून अधिक दहशतवादी ठार; पहलगाम हल्ल्याचा घेतला बदला
2
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
3
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निवडले ‘सिंदूर’ नाव; दडले आहेत कोणते पाच अर्थ? 
4
भारताच्या हल्ल्याला प्रत्युत्तरासाठी पाकची लष्कराला परवानगी
5
अर्ध्या तासात दहशतवादी भुईसपाट; ९ तळ उद्ध्वस्त; लष्करातील नारीशक्तीचे जगाला दर्शन
6
संपादकीय: याद राखा, हिशेब चुकता होईल! पाकिस्तान काय करेल आणि काय नाही...
7
पाकला धडा शिकवलाच, कायदेही मोडले नाहीत! एलओसी पार न करताच शत्रूवर मारा... 
8
सिंदूर, सोफिया अन् व्योमिका... नावात काय नाही, नावातच सारे दडलेले होते...
9
पाकिस्तान प्रतिहल्ला करेल?-शक्यता नाकारता येत नाही!
10
मुत्सद्देगिरी आणि सैन्यदलांचं निर्विवाद यश!
11
प्रवाशांना ‘बेस्ट’ची रिअल-टाइम सुविधा; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उपक्रमाचे उद्घाटन 
12
१८ विमानतळांवरील कामकाज तात्पुरते बंद; एकट्या इंडिगोने सुमारे १६० उड्डाणे रद्द केली
13
सीमावर्ती जिल्ह्यांमधील १४ जिल्ह्यांत सर्व शाळा बंद; ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पंजाब, राजस्थान आणि जम्मूत सूचना जारी  
14
विनाअपघात एसटी बस चालकांना बक्षीस देणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती
15
चंद्रावर उमटणार भारतीय अंतराळवीराचे पदचिन्ह
16
राज्यात गारपिटीची, तर मुंबईत मुसळधारेची शक्यता; मध्य महाराष्ट्र व मराठवाड्याला इशारा
17
रोहितने ‘तो’ निर्णय तेव्हाच घेतलेला? गंभीर आलेला, पण रोहित शर्मा अनुपस्थित होता... 
18
रोहित शर्माने घेतली कसोटीतून तडकाफडकी निवृत्ती; इंग्लंड दौऱ्यात मिळणार होता डच्चू...
19
गोष्ट मिठी नदीच्या न उपसलेल्या गाळाची..., गाळाने भरले भ्रष्ट अभियंत्याचे खिसे; चौकशीतून स्पष्ट 
20
उद्धव ठाकरे ‘धनुष्यबाणा’साठी पुन्हा सक्रिय; याचिकेवर सुनावणी घेण्याची मागणी

शिक्षक समायोजनाचे त्रांगडे

By admin | Updated: November 25, 2014 23:02 IST

शिक्षक आहे तेथे विद्यार्थी नाही आणि विद्यार्थी आहे तेथे शिक्षक नाही, अशी विरोधाभासी स्थिती जिल्ह्यात निर्माण झाली आहे. जिल्हा परिषद शाळांवरील शिक्षकांचे समायोजन रखडल्याने विद्यार्थ्यांचे

जिल्हा परिषद : कुठे रिक्त तर कुठे ठरताहेत अतिरिक्त यवतमाळ : शिक्षक आहे तेथे विद्यार्थी नाही आणि विद्यार्थी आहे तेथे शिक्षक नाही, अशी विरोधाभासी स्थिती जिल्ह्यात निर्माण झाली आहे. जिल्हा परिषद शाळांवरील शिक्षकांचे समायोजन रखडल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. जिल्ह्यात तब्बल ९५ शिक्षकांची आवश्यकता असताना शिक्षण संचालकांनी कोणताच निर्णय घेतला नाही. यवतमाळ जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात सध्या रिक्त जागेचे त्रांगडे कायम आहे. उमरखेड आणि महागाव तालुक्यात शिक्षकांची तब्बल १०९ पदे रिक्त आहे. शिक्षक नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. अनेक गावातील पालकांनी आक्रमक पवित्रा घेत शाळांना कुलूप ठोकण्याची तयारी चालविली आहे. कार्यरत शिक्षक दोन-दोन वर्ग सांभाळत आहे. अनेक ठिकाणी तर एका शिक्षकावर तीन-तीन वर्ग सांभाळण्याची वेळ येते. महागाव, उमरखेडमध्ये अशी स्थिती असताना तीन तालुक्यात मात्र शिक्षक अतिरिक्त आहे. कळंब, बाभूळगाव, दारव्हा या तालुक्यात २३ शिक्षक अतिरिक्त आहे. मात्र या अतिरिक्त शिक्षकांचे रिक्त ठिकाणी समायोजन करण्यात आले नाही. सप्टेंबर महिन्यात पदनिर्धारण करण्यात येते. परंतु तेही झाले नाही. त्यामुळे अतिरिक्त शिक्षकांना रिक्त जागेवर हलविण्याचा अधिकार जिल्हा परिषद शिक्षण विभागाला नाही. अगदी साधी प्रक्रिया केवळ काही चुकांमुळे अतिशय वेळ खाऊ झाली आहे. या सर्व प्रकारात विद्यार्थ्यांचे मात्र नुकसान होत आहे. जिल्हा परिषद शाळांची स्थिती सुधारावी म्हणून स्थानिक लोकप्रतिनिधी आणि आमदार नेहमी घसा कोरडा करतात. परंतु समायोजनासाठी कुणीही पुढाकार घेत नाही. यामुळे जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांचे भवितव्य अंध:कारमय होत आहे. (कार्यालय प्रतिनिधी)