शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Rains: रायगडला मुसळधार पावसाचा तडाखा, २४ तासांत १२९.३ मिमी पावसाची नोंद, अनेक मार्ग ठप्प!
2
स्विस बँकांमध्ये भारतीयांच्या ठेवींमध्ये तीन पट वाढ! २०२१ नंतर विक्रमी पातळी गाठली
3
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
4
Air India Plane Crash: विमान अपघातातील २१५ मृतांची ओळख पटली, १९८ मृतदेह कुटुंबांकडे
5
Share Market Today: आधी फ्लॅट सुरुवात, नंतर Sensex ची २५५ अंकांनी उसळी; PSU बँकांमध्ये जोरदार खरेदी
6
इराणच्या अस्थिरतेला पाकिस्तान घाबरला! म्हणाला,'इस्रायली हल्ला आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन'
7
पॅन कार्ड बनवण्यासाठी आता आवश्यक झालं 'हे' डॉक्युमेंट, आधार लिंक करायची अखेरची तारीखही जाणून घ्या
8
झोपडपट्टीधारकांना मुंबईबाहेर काढू शकत नाही- मुंबई उच्च न्यायालय
9
Air India Plane Crash: एअर होस्टेस रोशनीच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार!
10
Eknath Shinde: "...हे पाप तुमचे आहे!" एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
11
आमिर खानसोबत फोटोसाठी पोझ देत होती जिनिलीया, बाजूला उभा राहून बघत होता रितेश, अन् मग...
12
"शिवसेनाप्रमुखांचा ब्रँड पुसून टाकण्याचा प्रयत्न कराल तर नामोनिशान पुसून टाकू"
13
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
14
Mumbai Local: मुंबईकरांचा प्रवास आणखी सुखकर होणार, रेल्वेमंत्र्यांची लोकल ट्रेनबाबत मोठी घोषणा
15
आजचे राशीभविष्य : २० जून २०२५; विनाकारण खर्च वाढतील, प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
16
रॅपिडो, उबर बाइक टॅक्सीविरुद्ध गुन्हा, नेमकं प्रकरण काय?
17
निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, भावुक झाली करिश्मा, मुलांना अश्रू अनावर
18
samruddhi mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर अपघातात दोघांचा मृत्यू, जीपचालकाला डुलकी लागल्याने दुर्घटना!
19
Bombay High Court: ‘त्या’ एसआरए योजनेत ३५ टक्के जागा खुल्या ठेवा
20
MSRTC: ऐन हंगामात एसटीकडे प्रवाशांची पाठ, उत्पन्नात मोठी घट!

शिक्षकांकडे झाडे मोजण्याचे काम

By admin | Updated: September 18, 2014 23:42 IST

शिक्षकांकडे निवडणुकीशिवाय दुसरे कोणतेही अशैक्षणिक कार्य दिले जाणार नसल्याचे शासनाने यापूर्वी घोषित केले होते. तथापि आता शिक्षकांकडे विद्यार्थ्यांच्या मदतीने गावातील झाडे मोजण्याचे

अहवाल देणार : वृक्ष लागवड, संवर्धन घोटाळावणी : शिक्षकांकडे निवडणुकीशिवाय दुसरे कोणतेही अशैक्षणिक कार्य दिले जाणार नसल्याचे शासनाने यापूर्वी घोषित केले होते. तथापि आता शिक्षकांकडे विद्यार्थ्यांच्या मदतीने गावातील झाडे मोजण्याचे काम देण्यात आले आहे़ आता शिक्षक संघटना याबाबत काय भूमिका घेते, याकडे शिक्षकांचे लक्ष लागले आहे़मागील तीन-चार वर्षांपासून शासनाने अनेक ग्रामपंचायतींना वृक्ष लागवड व वृक्ष संवर्धनासाठी मोठा निधी उपलब्ध करून दिला आहे. मात्र बहुतांश ग्रामपंचायतींनी या निधीचा दुरूपयोग केल्याचे शासनाच्या लक्षात आले आहेत़ ग्रामपंचायतींमध्ये एक तर निधीतून झाडे लावण्यात आली नाही, लावली असेल तर त्यापैकी एकही झाड सध्या अस्तित्वात नाही़ त्यामुळे गत चार वर्षांतील वृक्षसंवर्धन निधीच्या मोठ्या रक्कमेचा दुरूपयोग झाल्याचे दिसून येत आहे़ आता या वृक्ष घोटाळ्याची चौकशी करून त्याचा अहवाल सादर करण्याची जबाबदारी शाळांतील हरित सेनेचे प्रभारी शिक्षक व दोन विद्यार्थ्यांवर सोपविण्यात आली आहे़ शालेय परिसरात वृक्षारोपण करून वृक्ष संवर्धन करणे, तसेच समाजामध्ये पर्यावरणाविषयी जनजागृती करणे, यासाठी प्रत्येक शाळेत हरित सेना नावाने शिक्षक व विद्यार्थ्यांचा समूह तयार करण्यात आला आहे़ या समूहातील शिक्षक व विद्यार्थ्यांना वृक्ष लावगडीतील कोणतीही तांत्रिक माहिती अवगत नाही़ मात्र आता या शिक्षक व विद्यार्थ्यांना त्यांच्या परिसरातील गावांमध्ये मागील तीन वर्षांत लावलेली झाडे, त्यापैकी जीवंत असलेली झाडे, झाडांची उंची व त्यांची सद्यस्थिती याबाबतची माहिती संकलित करून ती १५ सप्टेंंबरपर्यंत प्रशासनाला सादर करावयाची आहे़ या संबंधी माहिती देण्यासाठी हरित सेना प्रभारी शिक्षकांची यवतमाळ येथील स्काऊट गाईड भवनात बैठक घेण्यात आली़ बैठक्ीला शिक्षणाधिकारी एस़जी़वसावे तसेच वन विभागाचे अधिकारी उपस्थित होते़ तालुका कृषी अधिकाऱ्यांतर्फे शिक्षकांना कोणत्या गावात कोणत्या वर्षी किती झाडे लावली गेली, याची माहिती दिली जाणार आहे़ त्यापैकी किती झाडे सध्या अस्तित्वात आहे, त्यांची उंची किती आहे, याचे संकलन विद्यार्थी व शिक्षकांना करावे लागणार आहे़ शिक्षकांना आतापर्यंत माणसे मोजणे, जनावरे मोजणे ही कामे देण्यात येत होती़ त्यासोबतच आता झाडे मोजण्याचे कामही देण्यात आल्याने त्यात गुंतलेल्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची शक्यता आहे़ याविषयीची सर्व तांत्रिक माहिती असणाऱ्या वन विभाग, सामाजिक वनीकरण विभाग व कृषी विभागाकडे कर्मचारी असताना या कामाची शिक्षक व विद्यार्थ्यांना जबाबदारी देणे योग्य नसल्याची कुजबूज शिक्षण वर्तुळात सुरू झाली आहे़ (स्थानिक प्रतिनिधी)