शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

जवळा तलाठी कार्यालयात लागले दरपत्रक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2019 23:14 IST

तलाठी व शेतकरी यांचे नाते अत्यंत दृढ असते. गाव पातळीवर तलाठी अनेक कामे करतात. त्यांच्याकडून विविध प्रमाणपत्रे घ्यावी लागतात. मात्र अनेक ठिकाणी तलाठ्यांकडून आर्थिक लूट केली जाते, अशी ओरड असते.

ठळक मुद्देइतरांपुढे ठेवला आदर्श : अनेक कामांसाठी पैसेच लागत नाही, शेतकऱ्यांना मिळाला दिलासा

हरीओम बघेल ।लोकमत न्यूज नेटवर्कआर्णी : तलाठी व शेतकरी यांचे नाते अत्यंत दृढ असते. गाव पातळीवर तलाठी अनेक कामे करतात. त्यांच्याकडून विविध प्रमाणपत्रे घ्यावी लागतात. मात्र अनेक ठिकाणी तलाठ्यांकडून आर्थिक लूट केली जाते, अशी ओरड असते. याला छेद देत तालुक्यातील जवळा येथील तलाठ्याने प्रत्येक कामाचे दरपत्रक प्रकाशित करून पारदर्शीपणाचा प्रत्यय दिला आहे.शेतीशी संबंधित विविध प्रमाणपत्र, कागदपत्रे, सात-बारा, फेरफार, नाव नोंदणी, नाव काढणे आदी कामे गावपातळीवर तलाठी करतो. या कामांसाठी शेतकऱ्यांना तलाठ्यांकडे येरझारा माराव्या लागतात. ही कागदपत्रे आणि प्रमाणपत्रे देण्यासाठी शासनाने शुल्क ठरवून दिले आहे. मात्र शुल्क भरूही शेतकरी, नागरिकांना प्रमाणपत्रे मिळत नाही. परिणामी अनेकदा जादा पैसे मौजून प्रमाणपत्रे घ्यावी लागतात. त्यासाठीच अनेक तलाठी शेतकरी, नागरिकांना मुद्दाम त्रास देतात. अखेर हेलपाट्यांना त्रासून शेतकरी जादा पैसे देऊन काम करवून घेतात, असे सर्वत्र सांगितले जाते.अनेकदा तर तलाठ्यांच्या हाताखाली काम करणाºयांचेही खिसे भरावे लागतात. यातून आर्थिक लूट होते, अशी ओरड असते. यातून अनेकदा तलाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या तावडीतही सापडतात. मात्र त्यांची लाच घेण्याची प्रवृत्ती काही कमी होत नाही. फेरफारसाठी तर हमखास लाच द्यावी लागते, असा शेतकºयांचा अनुभव आहे. मात्र जवळा येथील तलाठी शाम रणनवरे यांनी शेतकºयांची आर्थिक पिळवणूक होऊ नये, त्यांना कोणत्या कामासाठी व प्रमाणपत्रासाठी नेमके किती शुल्क लागते, याची माहिती व्हावी म्हणून आपल्या कार्यालयात चक्क दरपत्रकच लावले. त्यातून अनेक कामांसाठी पैसेच लागत असल्याचे वास्तवही समोर आले. यामुळे शेतकºयांची पिळवणूक थांबली आहे.इतरांनी आदर्श घ्यावातलाठी रणनवरे यांच्या या कार्यपद्धतीचे कौतुक होत आहे. इतरही तलाठ्यांनी त्यांचा आदर्श घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. प्रत्येक तलाठ्याने आपल्या कार्यालयात शाम रणनवरे यांच्याप्रमाणे शासकीय दरपत्रक लावावे, अशी अपेक्षा तालुका सरपंच संघटनेचे अध्यक्ष अतुल देशमुख यांनीही व्यक्त केली आहे.