शहरं
Join us  
Trending Stories
1
टॅरिफचे विघ्न, स्वदेशीचा मंत्र, अमेरिकेचे भारतावर अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ आजपासून, ४८ अब्ज डॉलर्सच्या निर्यातीला फटका
2
आजचे राशीभविष्य : बुधवार २७ ऑगस्ट २०२५; उत्पन्नापेक्षा खर्च वाढेल, आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल
3
भारत-पाकिस्तानसह ७ युद्धे मी थांबवली; ट्रम्प यांचा पुन्हा दावा
4
एका पक्षकाराला सकाळी, दुसऱ्याला दुपारी बोलावले अन् प्रकरण निकाली! राज्य माहिती आयोगाचा असाही कारभार
5
उच्च न्यायालयाने सुनावले, तरीही जरांगे मुंबईत आंदोलनावर ठाम! मुंबईकडे कूच करणारच, जरांगे यांचा इशारा
6
मेट्रो ४साठी फ्रान्समधील कंपनी बनविणार ३९ ड्रायव्हरलेस ट्रेनसेट
7
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
8
मिरारोडमध्ये सदनिकेचा स्लॅब पडून ४ वर्षाच्या बालकाचा मृत्यू; तिघे जखमी 
9
वेगवेगळ्या विचारसरणी असणे हा गुन्हा नाही : सरसंघचालक मोहन भागवत यांचं मत
10
जरांगे पाटलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने तरुणाला काळं फासलं; समर्थकांकडून तरुणाला मारहाण
11
मराठा आरक्षणासाठी ३५ वर्षीय तरुणाने केला आत्महत्येचा प्रयत्न; लातूर जिल्ह्यातील घटना
12
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
13
विकासकामांत तोडली जाणारी झाडे वाचवण्याचा अनोखा उपक्रम! पुण्यात 'वृक्ष पुनर्रोपण' अभियान
14
फोनमधील 'या' सेटिंग्ज बदलाल तर वाचेल बराच इंटरनेट डेटा! अनेकांना माहीत नाहीत सोप्या टिप्स
15
प्रेरणादायी अध्यात्मिक वक्त्या जया किशोरी यांच्या हस्ते होणार श्रीमंत भाऊसाहेब रंगारी बाप्पाची प्राणप्रतिष्ठा!
16
सिंहगडावर 'त्या' ५ दिवसांत काय काय घडलं? बेपत्ता झालेल्या गौतम गायकवाडने सांगितला थरार
17
काश्मीर खोऱ्यातील तीन मंडळांना गणेश मूर्ती प्रदान; पुनीत बालन यांच्यासह मानाच्या गणेश मंडळाचा स्तुत्य उपक्रम!
18
वैष्णोदेवी यात्रा मार्गावर मोठा अपघात; भूस्खलनामुळे ५ भाविकांचा मृत्यू, १४ जखमी
19
Vidarbha Weather Alert: पावसाचा विदर्भाकडे मोर्चा; अनेक ठिकाणी मुसळधार कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?
20
आणखी एक 'निक्की', हुंड्याने घेतला संजूचा जीव; मुलीसह स्वतःला पेटवलं, चिठ्ठीत म्हणाली...

जिल्ह्याला १५४५ कोटींच्या पीककर्ज वाटपाचे लक्ष्य

By admin | Updated: June 4, 2014 00:23 IST

खरीप हंगाम काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. शेतकर्‍यांची मशागतीसोबतच बी-बियाण्यांसाठी लगबग सुरू झाली आहे. शेतकर्‍यांना खरीप हंगाम चांगला घेता यावा म्हणून जिल्हा प्रशासनाच्यावतीने १५४५ कोटींच्या

यवतमाळ : खरीप हंगाम काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. शेतकर्‍यांची मशागतीसोबतच बी-बियाण्यांसाठी लगबग सुरू झाली आहे. शेतकर्‍यांना खरीप हंगाम चांगला घेता यावा म्हणून जिल्हा प्रशासनाच्यावतीने १५४५ कोटींच्या पीककर्ज वाटपाचे नियोजन करण्यात आले आहे. शेतकर्‍यांच्या मागणीप्रमाणे जिल्ह्यात पीककर्ज वाटपास प्रारंभ करण्यात आला आहे. पीककर्जासोबतच रबी हंगामासाठी ४८ कोटीचे नियोजन असून या वर्षी ३५५ कोटी रुपयांचे मुदती कर्जही विविध बँकांच्यावतीने दिले जाणार आहे.खरीप हंगामात शेतकर्‍यांना पीककर्जाचा मोठा हातभार लागत असतो. बहुतांश शेतकरी पीककर्जाची उचल करत असल्याने शेतकर्‍यांच्या संभावित आकडा लक्षात घेता दरवर्षी पीककर्जाचे नियोजन केले जाते. यावर्षी १५४५ कोटी रुपयाच्या पीककर्ज वाटपाचे नियोजन करण्यात आले आहे. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक सर्वाधिक म्हणजे ६२१ कोटी इतक्या पीककर्जाचे वितरण करणार आहे. त्या खालोखाल विदर्भ क्षेत्रीय ग्रामीण बँक १२0 कोटी रुपयाचे कर्ज वितरित करणार आहे. राष्ट्रीयीकृत बँकांमध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया ३५३ कोटी, सेंट्रल बँक ऑफ इंडिया १३४ कोटी, बँक ऑफ महाराष्ट्र १0९ कोटी, युनियन बँक ऑफ इंडिया ६६ कोटी, अलाहाबाद बँक २५ कोटींच्या पीककर्जाचे वितरण करणार आहे. खरीप हंगामात जिल्ह्यातील विविध २0 राष्ट्रीयीकृत बँका शेतकर्‍यांना एकूण ८0३ कोटी रुपयांचे पीककर्ज देणार आहे.रबी हंगामातही ४८ कोटी रुपयांच्या पीककर्जाचे नियोजन करण्यात आले आहे. शेतकर्‍यांना राष्ट्रीयीकृत व सहकारी बँकांच्यावतीने दरवर्षी मुदती कर्जाचेही वितरण करण्यात येते. यावर्षी बँकांना या कर्जाचे वितरणाचेही उद्दिष्ट देण्यात आले आहे. त्यात राष्ट्रीयकृत बँक २0३ कोटींचे कर्ज वितरित करतील. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक १२७ कोटी तर विदर्भ क्षेत्रीय ग्रामीण बँक २५ कोटी रुपयांचे मुदती कर्ज वाटप करतील. खरीप हंगामात १५४५ कोटी, रबी हंगामात ४८ कोटी मुदती कर्ज असे यावर्षी एकूण १९४८ कोटी रुपयांचे कर्ज वितरित केल्या जाणार आहे.  शासनाने पीककर्जाचे नियोजन केले असले तरी, बहुतांश बँका कर्ज देण्यास टाळाटाळ करतात. शेतकर्‍यांना यात त्रास सहन करावा लागतो. याकडे लक्ष देण्याची गरज आहे.(वार्ताहर)