शहरं
Join us  
Trending Stories
1
संन्यस्त खड्ग नाटकावरुन पुण्यात वंचितच्या कार्यकर्त्यांचा राडा; यशवंत नाट्यगृहात घोषणाबाजी, पोलिसांचा फौजफाटा तैनात
2
IND vs ENG : इंग्लंडच्या सलामीवीरांची 'नौटंकी'! टीम इंडियाचा 'सेनापती' गिलनं असा काढला राग (VIDEO)
3
'फ्यूल कंट्रोल स्विच'संदर्भात ही एक गोष्ट ऐकली असती तर अहमदाबाद विमान अपघात टळला असता? FAA नं 2018 मध्येच दिला होता इशारा
4
इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी सम्राज्ञी! तिनं अमांडा अनिसिमोव्हाला रडवलं! १९८८ नंतर पहिल्यांदाच असं घडलं
5
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने वाईट वाटलं आणि घरी निघून गेलो,पण पुन्हा..."; रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट
6
मायक्रोसॉफ्टने AI वापरून वाचवले ४,२०० कोटी; पण १५,००० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं
7
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
8
४०० प्लस धावांसह इंग्लंडच्या मैदानात रिषभ पंतचा 'भीम पराक्रम'! MS धोनीलाही जमलं नाही ते करून दाखवलं
9
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
10
मुलगी म्हणतेय, 'माझ्यावर हॉस्टेलमध्ये अत्याचार झाला'; वडील म्हणाले, 'ती कारमधून पडली'
11
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
12
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
13
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
14
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
15
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
16
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
17
गुरु-चंद्र-राहुचा वसुमान ग्रहण योग: ७ राशींना भरभराट, भाग्योदय; पैसा-प्रतिष्ठा, कल्याण होईल!
18
सात वर्षांपूर्वीच दिला होता ७३७ जेटमधील स्विचच्या समस्येबद्दल इशारा; एअर इंडिया विमान अपघाताला ठरले कारण?
19
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
20
पंतची कडक फटकेबाजी! चौकारासह जोफ्राचं स्वागत अन् स्टोक्सला उत्तुंग षटकार मारत साजरी केली फिफ्टी

जिल्ह्याला १५४५ कोटींच्या पीककर्ज वाटपाचे लक्ष्य

By admin | Updated: June 4, 2014 00:23 IST

खरीप हंगाम काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. शेतकर्‍यांची मशागतीसोबतच बी-बियाण्यांसाठी लगबग सुरू झाली आहे. शेतकर्‍यांना खरीप हंगाम चांगला घेता यावा म्हणून जिल्हा प्रशासनाच्यावतीने १५४५ कोटींच्या

यवतमाळ : खरीप हंगाम काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. शेतकर्‍यांची मशागतीसोबतच बी-बियाण्यांसाठी लगबग सुरू झाली आहे. शेतकर्‍यांना खरीप हंगाम चांगला घेता यावा म्हणून जिल्हा प्रशासनाच्यावतीने १५४५ कोटींच्या पीककर्ज वाटपाचे नियोजन करण्यात आले आहे. शेतकर्‍यांच्या मागणीप्रमाणे जिल्ह्यात पीककर्ज वाटपास प्रारंभ करण्यात आला आहे. पीककर्जासोबतच रबी हंगामासाठी ४८ कोटीचे नियोजन असून या वर्षी ३५५ कोटी रुपयांचे मुदती कर्जही विविध बँकांच्यावतीने दिले जाणार आहे.खरीप हंगामात शेतकर्‍यांना पीककर्जाचा मोठा हातभार लागत असतो. बहुतांश शेतकरी पीककर्जाची उचल करत असल्याने शेतकर्‍यांच्या संभावित आकडा लक्षात घेता दरवर्षी पीककर्जाचे नियोजन केले जाते. यावर्षी १५४५ कोटी रुपयाच्या पीककर्ज वाटपाचे नियोजन करण्यात आले आहे. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक सर्वाधिक म्हणजे ६२१ कोटी इतक्या पीककर्जाचे वितरण करणार आहे. त्या खालोखाल विदर्भ क्षेत्रीय ग्रामीण बँक १२0 कोटी रुपयाचे कर्ज वितरित करणार आहे. राष्ट्रीयीकृत बँकांमध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया ३५३ कोटी, सेंट्रल बँक ऑफ इंडिया १३४ कोटी, बँक ऑफ महाराष्ट्र १0९ कोटी, युनियन बँक ऑफ इंडिया ६६ कोटी, अलाहाबाद बँक २५ कोटींच्या पीककर्जाचे वितरण करणार आहे. खरीप हंगामात जिल्ह्यातील विविध २0 राष्ट्रीयीकृत बँका शेतकर्‍यांना एकूण ८0३ कोटी रुपयांचे पीककर्ज देणार आहे.रबी हंगामातही ४८ कोटी रुपयांच्या पीककर्जाचे नियोजन करण्यात आले आहे. शेतकर्‍यांना राष्ट्रीयीकृत व सहकारी बँकांच्यावतीने दरवर्षी मुदती कर्जाचेही वितरण करण्यात येते. यावर्षी बँकांना या कर्जाचे वितरणाचेही उद्दिष्ट देण्यात आले आहे. त्यात राष्ट्रीयकृत बँक २0३ कोटींचे कर्ज वितरित करतील. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक १२७ कोटी तर विदर्भ क्षेत्रीय ग्रामीण बँक २५ कोटी रुपयांचे मुदती कर्ज वाटप करतील. खरीप हंगामात १५४५ कोटी, रबी हंगामात ४८ कोटी मुदती कर्ज असे यावर्षी एकूण १९४८ कोटी रुपयांचे कर्ज वितरित केल्या जाणार आहे.  शासनाने पीककर्जाचे नियोजन केले असले तरी, बहुतांश बँका कर्ज देण्यास टाळाटाळ करतात. शेतकर्‍यांना यात त्रास सहन करावा लागतो. याकडे लक्ष देण्याची गरज आहे.(वार्ताहर)