शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
2
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
3
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
4
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
5
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
6
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
7
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
8
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
9
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
10
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
11
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
12
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
13
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
14
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
15
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
16
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
17
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
18
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
19
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
20
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!

तंटामुक्त गावांचे पुन:सर्वेक्षण गरजेचे

By admin | Updated: September 16, 2015 03:09 IST

महात्मा गांधी तंटामुक्त गाव समिती व पोलीस विभागात समन्वयच नसल्यामुळे या समित्यांच्या स्थापनेचा मूळ हेतू यशस्वी होताना दिसत नाही.

नियंत्रण सुटले : अवैध व्यवसायाचे प्रस्थ प्रचंड वाढलेपुसद : महात्मा गांधी तंटामुक्त गाव समिती व पोलीस विभागात समन्वयच नसल्यामुळे या समित्यांच्या स्थापनेचा मूळ हेतू यशस्वी होताना दिसत नाही. या समित्यांचे गावावरील नियंत्रण सुटल्याने गावात अवैध व्यवसायाचे प्रस्थ फोफावले आहे. त्यामुळे किमान पुरस्कार प्राप्त गावांचे पुनर्सर्वेक्षण करण्याची गरज निर्माण झाली आहे. गावात उद्भवणाऱ्या लहानसहान तंट्यांचे दंगल व मोठ्या भांडणात रुपांतर होऊ नये, गावातील वाद गावातच सामंजस्याने सोडविले जावे, नागरिकांच्या वेळ व पैशाची बचत व्हावी, गावात सामाजिक सलोखा कायम राहून शांतता टिकावी यासाठी राज्याच्या गृह विभागाने पुढाकार घेऊन महात्मा गांधी तंटामुक्त योजना सुरू केली. या योजनेत तंटामुक्त गाव समिती व पोलिसांच्या सहकार्याने गावातील अवैध व्यवसायातील समुळ उच्चाटन करणे, गावात निवडणुका अविरोध होण्यासाठी प्रयत्न करणे गावातील शासकीय जागांवरील अतिक्रमण थांबविणे, तसेच गावात सामाजिक, आर्थिक, राजकीय व सांस्कृतिक एकता टिकून राहावी आदी कामांसाठी तंटामुक्त गाव समित्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. शासनाने ठरवून दिलेल्या अटी व शर्तीनुसार काम करणाऱ्या तंटामुक्त समित्यांना लोकसंख्येच्या निकषांवर पुरस्कारही देण्यात आले. पुरस्काराची राशी ग्रामपंचायतींच्या खात्यावर जमा होताच तंटामुक्त समिती अध्यक्ष व निमंत्रकांचा ग्रामपंचायत कमिटीला विसर पडलेला दिसतो. त्यांना विश्वासात न घेताच सरपंच, सचिवांनी ठरवून दिलेले निकष धाब्यावर बसवून नियमबाह्य खर्च करणे सुरू केले आहे. या प्रकारामुळे तंटामुक्त समित्यांची गावातील पकड सैल झाली व गावात पुन्हा एकदा अवैध धंदे फोफाऊ लागल्याचे दिसून येते. गावागावात सट्टा व्यावसाय मोठ्या प्रमाणात आबाल-वृद्धांपासून पांढरपेशे व युवा वर्ग यामध्ये ओढल्या जात आहे. तंटामुक्त समित्या मात्र शांत दिसत आहेत. (तालुका प्रतिनिधी)