शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
2
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
3
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
4
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
5
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
6
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
7
१२४ वर्षांनंतर अक्षय तृतीया-चतुर्थी-रोहिणी नक्षत्र अन् बुधवारचा दुर्मीळ योग!
8
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
9
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
10
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
11
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
12
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
13
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
14
टी२० मुंबई लीगसाठी आयकॉन खेळाडूंची घोषणा; यादीत सूर्यकुमार, श्रेयससह ८ भारतीय खेळाडू
15
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
16
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
17
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
18
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
19
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
20
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल

तंटामुक्त गावांचे पुन:सर्वेक्षण गरजेचे

By admin | Updated: September 16, 2015 03:09 IST

महात्मा गांधी तंटामुक्त गाव समिती व पोलीस विभागात समन्वयच नसल्यामुळे या समित्यांच्या स्थापनेचा मूळ हेतू यशस्वी होताना दिसत नाही.

नियंत्रण सुटले : अवैध व्यवसायाचे प्रस्थ प्रचंड वाढलेपुसद : महात्मा गांधी तंटामुक्त गाव समिती व पोलीस विभागात समन्वयच नसल्यामुळे या समित्यांच्या स्थापनेचा मूळ हेतू यशस्वी होताना दिसत नाही. या समित्यांचे गावावरील नियंत्रण सुटल्याने गावात अवैध व्यवसायाचे प्रस्थ फोफावले आहे. त्यामुळे किमान पुरस्कार प्राप्त गावांचे पुनर्सर्वेक्षण करण्याची गरज निर्माण झाली आहे. गावात उद्भवणाऱ्या लहानसहान तंट्यांचे दंगल व मोठ्या भांडणात रुपांतर होऊ नये, गावातील वाद गावातच सामंजस्याने सोडविले जावे, नागरिकांच्या वेळ व पैशाची बचत व्हावी, गावात सामाजिक सलोखा कायम राहून शांतता टिकावी यासाठी राज्याच्या गृह विभागाने पुढाकार घेऊन महात्मा गांधी तंटामुक्त योजना सुरू केली. या योजनेत तंटामुक्त गाव समिती व पोलिसांच्या सहकार्याने गावातील अवैध व्यवसायातील समुळ उच्चाटन करणे, गावात निवडणुका अविरोध होण्यासाठी प्रयत्न करणे गावातील शासकीय जागांवरील अतिक्रमण थांबविणे, तसेच गावात सामाजिक, आर्थिक, राजकीय व सांस्कृतिक एकता टिकून राहावी आदी कामांसाठी तंटामुक्त गाव समित्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. शासनाने ठरवून दिलेल्या अटी व शर्तीनुसार काम करणाऱ्या तंटामुक्त समित्यांना लोकसंख्येच्या निकषांवर पुरस्कारही देण्यात आले. पुरस्काराची राशी ग्रामपंचायतींच्या खात्यावर जमा होताच तंटामुक्त समिती अध्यक्ष व निमंत्रकांचा ग्रामपंचायत कमिटीला विसर पडलेला दिसतो. त्यांना विश्वासात न घेताच सरपंच, सचिवांनी ठरवून दिलेले निकष धाब्यावर बसवून नियमबाह्य खर्च करणे सुरू केले आहे. या प्रकारामुळे तंटामुक्त समित्यांची गावातील पकड सैल झाली व गावात पुन्हा एकदा अवैध धंदे फोफाऊ लागल्याचे दिसून येते. गावागावात सट्टा व्यावसाय मोठ्या प्रमाणात आबाल-वृद्धांपासून पांढरपेशे व युवा वर्ग यामध्ये ओढल्या जात आहे. तंटामुक्त समित्या मात्र शांत दिसत आहेत. (तालुका प्रतिनिधी)