शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
3
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
4
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
5
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
6
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
7
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
8
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
9
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
10
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
11
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
12
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
13
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
14
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
15
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
16
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
17
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
18
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!
19
निवडणुका जवळ आल्यावर आमच्यावर आरोप होतात; आता आमची बदनामी झाली, अजित पवारांची खंत
20
Digital Gold SEBI: डिजिटल गोल्ड खरेदी असाल, तर थांबा! ऑनलाईन सोने खरेदी करणाऱ्यांना सेबीचा सावधगिरीचा इशारा

तंटामुक्त गावांचे पुन:सर्वेक्षण गरजेचे

By admin | Updated: September 16, 2015 03:09 IST

महात्मा गांधी तंटामुक्त गाव समिती व पोलीस विभागात समन्वयच नसल्यामुळे या समित्यांच्या स्थापनेचा मूळ हेतू यशस्वी होताना दिसत नाही.

नियंत्रण सुटले : अवैध व्यवसायाचे प्रस्थ प्रचंड वाढलेपुसद : महात्मा गांधी तंटामुक्त गाव समिती व पोलीस विभागात समन्वयच नसल्यामुळे या समित्यांच्या स्थापनेचा मूळ हेतू यशस्वी होताना दिसत नाही. या समित्यांचे गावावरील नियंत्रण सुटल्याने गावात अवैध व्यवसायाचे प्रस्थ फोफावले आहे. त्यामुळे किमान पुरस्कार प्राप्त गावांचे पुनर्सर्वेक्षण करण्याची गरज निर्माण झाली आहे. गावात उद्भवणाऱ्या लहानसहान तंट्यांचे दंगल व मोठ्या भांडणात रुपांतर होऊ नये, गावातील वाद गावातच सामंजस्याने सोडविले जावे, नागरिकांच्या वेळ व पैशाची बचत व्हावी, गावात सामाजिक सलोखा कायम राहून शांतता टिकावी यासाठी राज्याच्या गृह विभागाने पुढाकार घेऊन महात्मा गांधी तंटामुक्त योजना सुरू केली. या योजनेत तंटामुक्त गाव समिती व पोलिसांच्या सहकार्याने गावातील अवैध व्यवसायातील समुळ उच्चाटन करणे, गावात निवडणुका अविरोध होण्यासाठी प्रयत्न करणे गावातील शासकीय जागांवरील अतिक्रमण थांबविणे, तसेच गावात सामाजिक, आर्थिक, राजकीय व सांस्कृतिक एकता टिकून राहावी आदी कामांसाठी तंटामुक्त गाव समित्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. शासनाने ठरवून दिलेल्या अटी व शर्तीनुसार काम करणाऱ्या तंटामुक्त समित्यांना लोकसंख्येच्या निकषांवर पुरस्कारही देण्यात आले. पुरस्काराची राशी ग्रामपंचायतींच्या खात्यावर जमा होताच तंटामुक्त समिती अध्यक्ष व निमंत्रकांचा ग्रामपंचायत कमिटीला विसर पडलेला दिसतो. त्यांना विश्वासात न घेताच सरपंच, सचिवांनी ठरवून दिलेले निकष धाब्यावर बसवून नियमबाह्य खर्च करणे सुरू केले आहे. या प्रकारामुळे तंटामुक्त समित्यांची गावातील पकड सैल झाली व गावात पुन्हा एकदा अवैध धंदे फोफाऊ लागल्याचे दिसून येते. गावागावात सट्टा व्यावसाय मोठ्या प्रमाणात आबाल-वृद्धांपासून पांढरपेशे व युवा वर्ग यामध्ये ओढल्या जात आहे. तंटामुक्त समित्या मात्र शांत दिसत आहेत. (तालुका प्रतिनिधी)