शहरं
Join us  
Trending Stories
1
जगन्नाथ रथयात्रेत मोठी घटना टळली! १८ हत्तींचे नेतृत्व करणाराच हत्ती बिथरला, अन्...
2
Maharashtra Politics : "मला खूप आनंद झाला, सुरुवात चांगली झाली"; ठाकरे बंधूंच्या एकत्र मोर्चावर मनसे नेत्याने स्पष्टच सांगितलं
3
₹२ च्या मजुरीपासून ते ₹२००० कोटींच्या मालक; पद्मश्री मिळवणाऱ्या अकोल्याच्या कल्पना सरोज यांचा कसा होता प्रवास
4
"मराठी माणसाच्या हितासाठी..." मनसे प्रमुख राज ठाकरेंचा संजय राऊतांना फोन, काय झाला संवाद?
5
मोठी बातमी! हिंदी भाषेच्या सक्तीविरोधात ठाकरे बंधू एकत्र येणार, मुंबईत एकच मोर्चा काढणार, संजय राऊत यांची घोषणा
6
Sonam Raghuvanshi : आरोपींनी पोलिसांसमोर गुन्हा कबुल केला, पण न्यायाधीशांसमोर वेगळंच सांगितलं; राजा रघुवंशी प्रकरणात नवा ट्विस्ट
7
नोएल टाटांनी करुन दाखवलं! अशी कामगिरी करणारा टाटा ग्रुप पहिलाच भारतीय ब्रँड; दुसरा-तिसरा कोण?
8
Mumbai: पालकांनो लक्ष द्या! १ जुलैपासून तुमच्या मुलांना घ्यायला व सोडवायला शाळेची बस न येण्याची शक्यता
9
...म्हणून मुलांना जन्म देण्यास टाळाटाळ करताहेत भारतीय जोडपी, समोर आलं धक्कादायक कारण
10
मराठी समाज विभागलाय, मुंबईत उत्तर भारतीय महापौर बनवण्याची हीच वेळ; सुनील शुक्लानं मांडलं गणित
11
Harjit Kaur: दुचाकीवरून आले अन् धाडधाड गोळ्या झाडल्या, कुख्यात गुन्हेगाराच्या आईची भररस्त्यात हत्या
12
ट्रेनच्या तिकिटांपासून ते ATM मधून पैसे काढण्यापर्यंत; १ जुलैपासून बदलणार तुमच्या पैशांशी निगडित 'हे' ६ नियम
13
पुण्यातील महिलेला ५ कोटींची पोटगी मिळालेली; NRI च्या भानगडीत पडली आणि...
14
Maratha Reservation Supreme Court: मराठा आरक्षणावर आता जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात सुनावणी
15
शेअर बाजाराची ग्रीन झोनमध्ये सुरुवात, Sensex १५० अंकांनी वधारला; Tata Motors, Reliance, HCL Tech मध्ये तेजी
16
Prada : कोल्हापुरी चप्पलसाठी संभाजीराजे मैदानात; फेसबुक पोस्ट करुन केली मोठी मागणी
17
...तर दिल्ली-मुंबई टोल केवळ ३० रुपये लागेल; वार्षिक पास खरेदी करून २०० टोल ओलांडता येणार
18
बोगस लाभार्थी हटवले; केंद्राने ३ लाख कोटी रुपये वाचविले, ३१४ केंद्रीय योजनांची छाननी सुरू
19
रशिया भारताला आणखी S-400 क्षेपणास्त्रे कधी देणार? मोठी अपडेट आली समोर; कारणही सांगितले
20
शुभांशू ठरले अंतराळ स्थानकावर पाऊल ठेवणारे पहिले भारतीय; म्हणाले, 'लहान बाळासारख्या गोष्टी शिकतोय'

शेतकऱ्याच्या आत्महत्येचा तलाठी व लिपिकावर गुन्हा

By admin | Updated: June 24, 2015 00:06 IST

तालुक्यातील घोडधरा येथील शेतकरी आत्महत्या प्रकरणी तलाठी व तहसीलच्या लिपिकाविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा पांढरकवडा पोलिसांनी दाखल केला आहे.

घोडधराचे प्रकरण : चिठ्ठीत मात्र सरकार जबाबदार असल्याचा उल्लेखपांढरकवडा : तालुक्यातील घोडधरा येथील शेतकरी आत्महत्या प्रकरणी तलाठी व तहसीलच्या लिपिकाविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा पांढरकवडा पोलिसांनी दाखल केला आहे. गत ६ जून रोजी माधव तुकाराम गोडे यांनी विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली होती. मृत्यूपूर्व लिहिलेल्या चिठ्ठीत त्यांनी शासनास जबाबदार धरले होते. तालुक्यातील घोडधरा येथील माधव गोडे या वृद्ध शेतकऱ्याने ६ जून रोजी सकाळी ९ वाजता गावशिवारातील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली होती. या प्रकरणी सुरुवातीला पांढरकवडा पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद घेतली होती. तपासादरम्यान मृतक माधव गोडे यांच्या खिशातील प्लॉस्टिक पिशवीत गुंडाळून ठेवलेली स्वहस्ताक्षरातील चिठ्ठी पोलिसांना मिळाली होती. त्या चिठ्ठीमध्ये त्यांनी आपले नुकतीच आपल्यावर शस्त्रक्रिया झाली असून पुन्हा जनावर हाकताना पाय घसरून पडल्यामुळे डावा हात फ्रॅक्चर होऊन कंबरेला मार लागला. या सर्व बाबींकरिता खूप पैसे लागले. त्यामुळे आपण कर्जबाजारी झालो. त्यातच सायखेडा येथील मध्यवर्ती बँकेमार्फत आदिवासी सोसायटी तेलंगटाकळीकडून शेतीकरिता सन २००८-०९ मध्ये ७० ते ७५ हजार रूपयांचे कर्ज घेतले होते. सोबतच हात उसणवारीचे पैसे मिळवून आपल्यावर एक लाख ३० हजार रूपयापर्यंत कर्ज झाल्याचे नमूद होते. यामुळे कर्जाची परतफेड कशी करावी, या काळजीत ते राहात होते. त्याचप्रमाणे गेल्या दोन ते तीन वर्षांपासून शेतीत झालेली नापिकी व शेतीतून निघालेल्या पिकांना कमी भावामुळे माधव गोडे पूर्णत: खचून गेले होते. त्यांनी शासनाकडून वेळोवेळी जाहीर झालेल्या नापिकीचा मोबदला मिळेल, याची वाट पाहिली. मात्र कोणतीही कर्जमाफी, मोबदला गोडे यांना मिळाला नाही. त्यामुळे ते खचून गेले होते. त्यामुळे ‘आपल्या आत्महत्येस शासन जबाबदार राहील’, असे त्यांनी चिठ्ठीत लिहून ठेवले होते. परिणामी त्यांच्या मृत्यूप्रकरणी २२ जून रोजी त्यांचा मुलगा उमेश गोडे याने पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यावरून व तपासावरून येथील तहसीलमधील लिपीक एस.जी.भगत आणि तलाठी एम.डब्ल्यू.भगत यांना जबाबदार धरून त्यांनी शासनाकडून मिळालेल्या पैशापासून माधव गोडे यांना वंचित ठेवल्यामुळे त्यांनी आत्महत्या केल्याचा ठपका ठेवत या दोघांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (शहर प्रतिनिधी)चिठ्ठीत लिहिले वास्तवशेतकरी माधव गोडे यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत आजपर्यंत कर्जमाफी मिळण्याची वाट बघत होतो. मात्र कर्जमाफी मिळाली नाही. अखेर मी आत्महत्या करीत आहे, माझ्या आत्महत्येचा विचार करून इतर कर्जबाजारी शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी असे लिहिले होते. विदर्भातील शेतकऱ्यांचे वास्तव आपल्या चिठ्ठीत माधवने लिहिले होते.