शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
3
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
4
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
5
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
6
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
7
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
8
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
9
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
10
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
11
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
12
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
13
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
14
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
15
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
16
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
17
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
18
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
19
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
20
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान

शेतकऱ्याच्या आत्महत्येचा तलाठी व लिपिकावर गुन्हा

By admin | Updated: June 24, 2015 00:06 IST

तालुक्यातील घोडधरा येथील शेतकरी आत्महत्या प्रकरणी तलाठी व तहसीलच्या लिपिकाविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा पांढरकवडा पोलिसांनी दाखल केला आहे.

घोडधराचे प्रकरण : चिठ्ठीत मात्र सरकार जबाबदार असल्याचा उल्लेखपांढरकवडा : तालुक्यातील घोडधरा येथील शेतकरी आत्महत्या प्रकरणी तलाठी व तहसीलच्या लिपिकाविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा पांढरकवडा पोलिसांनी दाखल केला आहे. गत ६ जून रोजी माधव तुकाराम गोडे यांनी विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली होती. मृत्यूपूर्व लिहिलेल्या चिठ्ठीत त्यांनी शासनास जबाबदार धरले होते. तालुक्यातील घोडधरा येथील माधव गोडे या वृद्ध शेतकऱ्याने ६ जून रोजी सकाळी ९ वाजता गावशिवारातील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली होती. या प्रकरणी सुरुवातीला पांढरकवडा पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद घेतली होती. तपासादरम्यान मृतक माधव गोडे यांच्या खिशातील प्लॉस्टिक पिशवीत गुंडाळून ठेवलेली स्वहस्ताक्षरातील चिठ्ठी पोलिसांना मिळाली होती. त्या चिठ्ठीमध्ये त्यांनी आपले नुकतीच आपल्यावर शस्त्रक्रिया झाली असून पुन्हा जनावर हाकताना पाय घसरून पडल्यामुळे डावा हात फ्रॅक्चर होऊन कंबरेला मार लागला. या सर्व बाबींकरिता खूप पैसे लागले. त्यामुळे आपण कर्जबाजारी झालो. त्यातच सायखेडा येथील मध्यवर्ती बँकेमार्फत आदिवासी सोसायटी तेलंगटाकळीकडून शेतीकरिता सन २००८-०९ मध्ये ७० ते ७५ हजार रूपयांचे कर्ज घेतले होते. सोबतच हात उसणवारीचे पैसे मिळवून आपल्यावर एक लाख ३० हजार रूपयापर्यंत कर्ज झाल्याचे नमूद होते. यामुळे कर्जाची परतफेड कशी करावी, या काळजीत ते राहात होते. त्याचप्रमाणे गेल्या दोन ते तीन वर्षांपासून शेतीत झालेली नापिकी व शेतीतून निघालेल्या पिकांना कमी भावामुळे माधव गोडे पूर्णत: खचून गेले होते. त्यांनी शासनाकडून वेळोवेळी जाहीर झालेल्या नापिकीचा मोबदला मिळेल, याची वाट पाहिली. मात्र कोणतीही कर्जमाफी, मोबदला गोडे यांना मिळाला नाही. त्यामुळे ते खचून गेले होते. त्यामुळे ‘आपल्या आत्महत्येस शासन जबाबदार राहील’, असे त्यांनी चिठ्ठीत लिहून ठेवले होते. परिणामी त्यांच्या मृत्यूप्रकरणी २२ जून रोजी त्यांचा मुलगा उमेश गोडे याने पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यावरून व तपासावरून येथील तहसीलमधील लिपीक एस.जी.भगत आणि तलाठी एम.डब्ल्यू.भगत यांना जबाबदार धरून त्यांनी शासनाकडून मिळालेल्या पैशापासून माधव गोडे यांना वंचित ठेवल्यामुळे त्यांनी आत्महत्या केल्याचा ठपका ठेवत या दोघांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (शहर प्रतिनिधी)चिठ्ठीत लिहिले वास्तवशेतकरी माधव गोडे यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत आजपर्यंत कर्जमाफी मिळण्याची वाट बघत होतो. मात्र कर्जमाफी मिळाली नाही. अखेर मी आत्महत्या करीत आहे, माझ्या आत्महत्येचा विचार करून इतर कर्जबाजारी शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी असे लिहिले होते. विदर्भातील शेतकऱ्यांचे वास्तव आपल्या चिठ्ठीत माधवने लिहिले होते.