शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत धर्मशाळा नाही की कुणीही यावे अन् स्थायिक व्हावे, आश्रयाच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाचे परखड मत
2
आजचे राशीभविष्य २० मे २०२५ : थकबाकी मिळण्यास, व्यापारातील वसुली होण्यास उत्तम दिवस
3
जगबुडी नदीत कार कोसळून मुंबईच्या पाच जणांचा मृत्यू, वडिलांच्या अंत्यविधीसाठी जाताना मुलीचा अंत
4
चार कोटींचे आंबे अमेरिकेने नाकारले; फेकून देण्याची वेळ
5
आंतरजातीय/धर्मीय अल्पवयीन जोडप्यांनाही सुरक्षा, जिल्ह्यांतील विश्रामगृहात राहणार विशेष कक्ष
6
कोरोनाने डोके वर काढताच ठाणे पालिका ‘अलर्ट’; हाँगकाँग, सिंगापूरमुळे खबरदारी, रुग्णालय सज्ज
7
ज्योतीची एनआयए, आयबीकडून चौकशी
8
विधानभवनच्या गेटवर आग; सहा मिनिटांत आटोक्यात
9
मुंबईच्या स्मशानात २ वर्षांत ४ लाख क्विंटल लाकडं जाळणार; पर्यावरणवाद्यांनी सुचवला मोक्षकाष्ठचा पर्याय, राेजगारही मिळेल 
10
मोठी बातमी! छगन भुजबळांची महायुती सरकारमध्ये घरवापसी! सकाळी दहा वाजता मंत्रि‍पदाचा शपथविधी
11
ज्योती मल्होत्राच्या मोबाईलममध्ये ISI च्या शाकिरचा नंबर कोणत्या नावाने? पाकिस्तानमध्ये भेटलेले ते दोन अधिकारी कोण?
12
MI vs DC : वानखेडेचं मैदान मारा अन् Playoffs चं तिकीट मिळवा! मुंबई इंडियन्स फक्त एक पाऊल दूर, पण...
13
SRH नं पंतच्या LSG चा खेळ केला खल्लास! आता MI अन् DC मध्ये प्लेऑफ्सची चुरस
14
शस्त्रसंधीची चर्चा भारत-पाकिस्तानमध्येच, डोनाल्ड ट्रम्प यांचा काहीही संबंध नाही; विक्रम मिस्रींनी संसदीय समितीला सगळं सांगितलं
15
IPL 2025 : भर मैदानात अभिषेक अन् दिग्वेश यांच्यात वाजलं; नेमकं काय घडलं? (VIDEO)
16
'काश्मीरला जा आणि लष्कराच्या छावणीचे फोटो घेऊन ये"; ISI एजंटने भारतातील गुप्तहेराला कोणते काम दिले होते?
17
साताऱ्यात चीड आणणारी घटना! चुलत भावाकडून १३ वर्षीय बहिणीवर अनेकदा बलात्कार
18
राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेतृत्वात लवकरच बदल दिसेल; रोहित पवारांचं विधान
19
कॅपिटल गेन टॅक्स काय असतो, कोणत्या प्रकारे आणि किती द्यावा लागतो? सगळं गणित समजून घ्या
20
लातूर : पाठीमागून येणाऱ्या दुचाकीची भयंकर धडक; आई, मुलासह जावयाचा मृत्यू

नेर तालुक्यात तलाठी कार्यालये बेवारस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2019 21:27 IST

नागरिकांची कामे सुलभ व्हावी यासाठी तालुक्यात बांधण्यात आलेली तलाठी कार्यालये बेवारस आहेत. तालुक्यात कुठेही तलाठ्यांचा या कार्यालयात प्रवेश झाला नाही. त्यामुळे या कामांवर खर्च करण्यात आलेले कोट्यवधी रुपये व्यर्थ जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

ठळक मुद्देनागरिकांत असंतोष : टुमदार इमारतींवरील कोट्यवधी रुपयांचा खर्च व्यर्थ जाण्याची भीती

लोकमत न्यूज नेटवर्कनेर : नागरिकांची कामे सुलभ व्हावी यासाठी तालुक्यात बांधण्यात आलेली तलाठी कार्यालये बेवारस आहेत. तालुक्यात कुठेही तलाठ्यांचा या कार्यालयात प्रवेश झाला नाही. त्यामुळे या कामांवर खर्च करण्यात आलेले कोट्यवधी रुपये व्यर्थ जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे.ग्रामीण भागातील नागरिकांना तलाठी एका जागेवर उपलब्ध व्हावा यासाठी कार्यालये उभी करण्यात आली आहे. ३६ ग्रामपंचायतींमध्ये निवास आणि कार्यालय अशी दुहेरी सुविधा असलेली इमारत बांधण्यात आली. प्रत्येक इमारतीवर १९ लाख रुपयांपर्यंतचा खर्च करण्यात आला. सध्या तरी याचा वापर सुरू झालेला नाही.तलाठी उपलब्ध होत नसल्याची ओरड नागरिकांमधून होते. त्यामुळेच शासनाने तलाठी कार्यालये बांधली. तलाठ्यांनी याच ठिकाणाहून कामे करावी, असे आदेश देण्यात आले. परंतु अद्याप तरी त्याठिकाणी तलाठी रुजू झालेले नाही. बेवारस असलेल्या या कार्यालयांवर आता समाजकंटकांनी ताबा घेतला आहे. मटका-जुगार खेळण्यासाठी या वास्तू उपयोगात आणल्या जात आहेत. काही आंबटशौकिनांनीही याचा वापर केला आहे. यावर कुणाचेही नियंत्रण नसल्याने तलाठ्यांच्या प्रवेशापूर्वीच ही कार्यालये भंगण्याची चिन्हे दिसू लागली आहे.सुविधा नसल्याची ओरडनवीन बांधण्यात आलेल्या तलाठी कार्यालयांमध्ये परिपूर्ण सुविधा नसल्याची ओरड तलाठ्यांमधून होत आहे. किचन, हॉल, कार्यालय आणि इतर सर्व बाबी याठिकाणी उपलब्ध आहे. आणखी याठिकाणी काय सुविधा असाव्या, असा प्रश्न नागरिकांकडून विचारला जात आहे.