शहरं
Join us  
Trending Stories
1
Chandra Grahan: कोल्हापूरच्या खगोलप्रेमींनी अनुभवली ब्लड मूनची अद्भुत दृश्यं, एकदा पहाच...
2
टोयोटाकडून मोठी घोषणा! फॉर्च्युनरची ३.४९ लाखांनी किंमत तुटली, क्रिस्टा तर मार्केट खाणार...
3
अख्खी आंदेकर फॅमिली मोस्ट वाँटेड; आयुष कोमकर खून प्रकरणात बंडू आंदेकरसह १३ जणांवर गुन्हे 
4
एकनाथ शिंदेंनी पाडले अजित पवारांच्या राष्ट्रवादीला खिंडार; महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षच फोडला, उद्या प्रवेश
5
Lalbaugcha Raja Visarjan Video: चंद्रग्रहणाला काही मिनिटे शिल्लक असताना...; रात्री ९ वाजता लालबागच्या राजाचे विसर्जन
6
नूतनीकरण ऑक्टोबरमध्ये...! इन्शुरन्स कंपन्या आतापासूनच १८ टक्के जीएसटीवाला हेल्थ प्रिमिअम पाठवू लागल्या
7
'पीएम मोदी देशाचे शत्रू ', ट्रम्प टॅरिफचा उल्लेख करत मल्लिकार्जुन खरगेंचे टीकास्त्र
8
ठाणे : जिल्हा न्यायाधीशांच्या शासकीय घरातील स्लॅब कोसळला; न्यायाधीशांची पीडब्ल्यूडीविरोधात पोलिसांत तक्रार
9
गुंडगिरीचा कळस! माजी सरपंचावर जीवघेणा हल्ला; लाेखंडी राॅड, स्टंपने २२ मिनिटे मारहाण
10
इस्रायलने अचानक एअरस्पेस बंद केली; नेमके काय घडतेय... गाझा पट्टी की आणखी काही...
11
लव्ह स्टोरीचे बिंग फुटण्याची भीती; पोलिस भरती अकॅडमीच्या संचालकांनेच केले विद्यार्थ्याचे अपहरण
12
लहान मुलांना सनरुफ उघडून देताय? महिंद्रा ३XO चा व्हिडीओ पहाल कर, थरकाप उडेल...
13
ऐन पौर्णिमेलाच चंद्र झाकोळला; चंद्रग्रहणाला सुरुवात, रात्री ११ वाजता लाल रंगात दिसणार...
14
ओबीसी आणि मराठा आरक्षणावर राज्य सरकार ठाम; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची स्पष्टोक्ती
15
“मनोज जरांगे पाटील मराठा समाजाचे नुकसान करतायत, स्वतःचे महत्त्व वाढावे...”; कुणी केली टीका?
16
धुळे हळहळले! रील स्टार शुभम सिंघवी याच्या दुचाकीला अपघात, जागेवरच मृत्यू
17
अवघ्या १५०० रुपयांत बनावट आधारकार्ड, दोन हजार लोकांना 'त्यानं' बनवलं मूर्ख! पोलिसांनी कसं पकडलं?
18
नऊवारी, फेटे अन् ढोल ताशे! जर्मनीच्या ड्युसलडॉर्फमध्ये उत्साहात साजरा झाला गणेशोत्सव!
19
भंडाऱ्याची उधळण अन पुष्पवृष्टी, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीला दिमाखदार मिरवणुकीने निरोप!
20
दहशतवाद्यांना पाकिस्तानची साथ; भारताने पाडलेल्या लष्कर-ए-तैयबाच्या मुख्यालयाचे बांधकाम पुन्हा सुरू

यवतमाळात पाणी आणा, रस्ते वाचवा अन् गुन्हेगारी थांबवा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2018 22:06 IST

एकीकडे टंचाईत पाणी आणण्याच्या नावाखाली यवतमाळातील प्रत्येक रस्ता फोडून टाकण्यात आला आहे. त्यामुळे एकीकडे पाण्यासाठी हाल अन् दुसरीकडे रस्त्यावरून चालण्याचे बेहाल आहेत. त्यातच प्रशासनाची जरबच संपल्याने गुन्हेगारी प्रचंड वाढली आहे.

ठळक मुद्देआता सहनशक्ती संपली : सर्वसामान्यांची जिल्हा कचेरीवर धडक

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : एकीकडे टंचाईत पाणी आणण्याच्या नावाखाली यवतमाळातील प्रत्येक रस्ता फोडून टाकण्यात आला आहे. त्यामुळे एकीकडे पाण्यासाठी हाल अन् दुसरीकडे रस्त्यावरून चालण्याचे बेहाल आहेत. त्यातच प्रशासनाची जरबच संपल्याने गुन्हेगारी प्रचंड वाढली आहे. हा सर्व प्रकार तातडीने थांबवा, अशी आर्त हाक देत सोमवारी सर्वसामान्य यवतमाळकर नागरिकांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. विशेष म्हणजे, आम्ही पाणीही आणू शकलो नाही अन् रस्तेही वाचवू शकलो नाही, अशी हतबलता यावेळी अधिकाऱ्यांनी व्यक्त केली.यवतमाळ शहरातील तीव्र पाणीटंचाई, रस्त्यांच्या बेलगाम खोदकामांविरुद्ध गेल्या काही दिवसांपासून सर्वसामान्य जनतेच्या मनात असंतोष खदखदत आहे. शेवटी ‘आम्ही यवतमाळकर’ अशा नावाने सोमवारी नागरिकांनी एकत्र येत प्रभारी जिल्हाधिकारी चंद्रकांत जाजू यांची भेट घेतली. शासन कोणत्याही पक्षाचे असो, आम्हाला काही करायचे नाही. निदान प्रशासनाने तरी जनतेच्या हिताचे काम करावे, अशी विनवणी करण्यात आली.टँकरचे पाणी फिल्टर प्लान्टमध्ये टाकासमाजसेवेच्या नावाखाली टँकरद्वारे पाणी वाटप केले जात आहे. ते आरोग्याला अपायकारक आहे. शिवाय, पाणीवाटपावरून वाद उद्भवत आहेत. त्यामुळे सर्व टँकर आधी प्राधिकरणाच्या फिल्टर प्लान्टमध्ये एकत्र करावे. तेथून फिल्टर केलेलेच पाणी प्राधिकरणाच्या पाईपलाईनद्वारे घरोघरी पोहोचवावे, अशी प्रमुख मागणी यावेळी अ‍ॅड. जयसिंग चव्हाण, अमित मिश्रा आदींनी केली. तसेच टँकरच्या पाण्यावरून नगरसेवकांनाही टार्गेट केले जात असल्याची व्यथा यावेळी नगरसेवक सुजित राय, चंद्रशेखर चौधरी यांनी मांडली. पाणी न आल्यास कायदा व सुवव्यस्थाही बिघडण्याचा धोका असल्याचे जिल्हाधिकाºयांना सांगण्यात आले. पाणीसमस्या सोडविण्यासाठी शासन, प्रशासन व सर्वसामान्य नागरिक यांचे व्यासपीठ तयार करून चर्चा घडवावी, असा प्रस्ताव देवानंद पवार यांनी मांडला.दहा दिवसांचा अल्टिमेटमशहरात पाणीपुरवठा करण्याच्या विविध तारखा जाहीर करण्यात आल्या होत्या. त्या निघून गेल्या तरी पाणी पोहोचले नाही. आता आणखी १० दिवस आम्ही यवतमाळकर देतो. प्रशासनाला भिक लागली असेल तर आम्ही पैसाही देऊ. पण १० दिवसांत शहरात पाणीपुरवठा करा, अन्यथा सर्वसामान्य जनताच कायदा हाती घेईल आणि तीव्र स्वरुपाचे आंदोलन करू, असा इशारा जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आला.गुंडांना राजकीय संरक्षण कशाला?यवतमाळ शहरात गुन्हेगारी घटना दररोज घडत आहेत. प्रशासनाची पाहिजे तशी जरब उरलेली नाही. प्रशासनाच्या वतीने कारवाई केली जात असताना अनेक गुंडांना पक्षपातीपणे संरक्षण देण्याचे कामसुद्धा केले जात आहे. अनेक गुन्हेगारी घटनांमध्ये राजकीय हस्तेक्षेपही दिसत असल्याचा आरोप नागरिकांनी जिल्हाधिकाऱ्यांपुढे केला. केवळ एकाच पक्षाच्या मतदारांनी या शहरात राहावे का, केवळ ‘त्यांच्या’च कार्यकर्त्यांना येथे जगण्याचा अधिकार आणि इतरांनी काय गाव सोडून जावे का, असा सवाल विचारण्यात आला.