शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीचे प्रदूषण रोखण्यासाठी चीनचा 'धक्कादायक' सल्ला! ३००० मोठे उद्योग बंद करण्याची सूचना; बीजिंगच्या धर्तीवर प्लॅन तयार?
2
Short Term Investment: केवळ एका वर्षासाठी गुंतवणूक करायचीये? 'हे' ५ पर्याय देऊ शकतात तुम्हाला जबरदस्त रिटर्न, जाणून घ्या
3
गृहकर्जावर होईल १८ लाख रुपयांपर्यंतची बचत! EMI कमी करण्यापेक्षा वापरावा लागेल 'हा' पर्याय
4
कोल्हापूर हादरलं! मुलानेच केली आई-वडिलांची हत्या; धक्कादायक कारण आले समोर
5
ICICI Prudential AMC IPO Listing: आयसीआयसीआय प्रूडेंशियल एएमसीच्या आयपीओनं केलं मालामाल; प्रत्येक शेअरवर मिळाला 'इतका' नफा
6
बांगलादेशात ISI सक्रीय, कंटरपंथींकडून जाळपोळ, हिंसाचार सुरू; भारताविरोधात पाकिस्तानचं षडयंत्र?
7
नोकरी बदलणाऱ्यांना EPFO चा मोठा दिलासा! 'ब्रेक'बाबतचे नियम बदलले; आता शनिवार-रविवारची सुट्टी अडथळा ठरणार नाही
8
Dolphin in Mumbai: मुंबईकरांना सुखद धक्का! वरळी सी फेसच्या समुद्रकिनाऱ्यावर डॉल्फिनची मस्ती, व्हिडीओ व्हायरल
9
मुंबईत ठाकरे बंधू युतीत शरद पवारांची राष्ट्रवादी सहभागी होणार?; २२ जागांचा देणार प्रस्ताव
10
VIDEO: दादरमध्ये अजब प्रकार, एक तरुण या इमारतीवरुन त्या इमारतीवर मारतोय उड्या; पोलिसांची दमछाक
11
Stock Market Today: शेअर बाजाराची जबरदस्त सुरुवात; Sensex ची ३३० अंकांनी उसळी; IT Stocks सुस्साट
12
अमेरिकेतील नॉर्थ कॅरोलिनामध्ये जेट विमानाचा अपघात; संपूर्ण कुटुंबच उद्ध्वस्त
13
'...तर त्यांचा एक हात तोडून दुसऱ्या हातात दिला असता'; इम्तियाज जलील मंत्री संजय निषाद यांच्यावर संतापले
14
'या' कंपनीच्या गुंतवणूकदारांना ₹५५,५५० कोटींपेक्षा अधिकचा फटका; १६ महिन्यांत स्टॉक ८० टक्क्यांनी आपटला
15
मुंबई विमानतळाची गोपनीय माहिती चोरट्यांच्या हाती; ऐरोलीतील घटना : अदानी ग्रुपच्या मॅनेजरचा लॅपटॉप चोरीला
16
मी सर्वांसमोर तिला चुकीच्या पद्धतीने का किस करेल? ट्रोल झाल्यावर राकेश बेदींनी दिलं स्पष्टीकरण
17
डेमोक्रेट्सच्या खासदारांनी जारी केले एपस्टीनचे ६८ नवीन फोटो; महिलेसोबत दिसले बिल गेट्स
18
Vijay Mallya : देशातून फरार, पण लंडनमध्ये मात्र जोरदार सेलिब्रेशन; ललित मोदीच्या घरी झाली विजय माल्ल्याची जंगी बर्थ डे पार्टी
19
उस्मान हादी यांच्या मृत्यूनंतर बांग्लादेश पेटला, कट्टरपंथांनी भारताचे नाव घेतले; शेख हसीना यांच्या सरकारला हादीनेच दिले होते हादरे
20
राज्यातील पहिले 'जेन झी टपाल' आयआयटी मुंबईत; कार्यालयामध्ये नवीन सुविधांसह डिजिटल सेवा
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांच्या मागणीनुसार पीक प्रात्यक्षिके घ्या

By admin | Updated: September 26, 2015 02:32 IST

पीक प्रात्यक्षिके घेताना पारंपरिक पिकांऐवजी शेतकऱ्यांच्या मागणीनुसार नवनवीन पिकांची प्रात्यक्षिके घ्या.

सचिंद्र प्रताप सिंह : आत्मा नियामक मंडळाच्या बैठकीत अधिकाऱ्यांना दिल्या सूचनायवतमाळ : पीक प्रात्यक्षिके घेताना पारंपरिक पिकांऐवजी शेतकऱ्यांच्या मागणीनुसार नवनवीन पिकांची प्रात्यक्षिके घ्या. या पिकांमध्ये मिरची, हळद, तीळ, उडीद, मूग, टरबूज यासारख्या पिकांचा समावेश असावा, असे जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांनी सांगितले. गार्डन हॉल येथे आत्माच्या नियामक मंडळाची बैठक जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. त्यावेळी ते बोलत होते. बैठकीला आत्माचे प्रकल्प संचालक अनिल इंगळे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक विनय ठमके यांच्यासह तालुका कृषी अधिकारी, आत्माचे तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक, सहायक व्यवस्थापक तसेच कृषी विभागाचे अधिकारी उपस्थित होते. पारंपरिक पिकांसोबतच शेतकऱ्यांनी फळे व मसाला पिकेही घेणे आवश्यक आहे. यासाठी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना प्रोत्साहित करावे, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी बैठकीत केल्या. पीक प्रात्यक्षिक घेताना मिरची, हळद, तीळ, सोप, ओवा, उडीद, मूग, शेवगा, टरबूज आदी वननवीन पिकांची प्रात्यक्षिके घेतली जावी. यातून शेतकरी या नवीन पिकांकडे आकर्षित होतील. यासाठी कृषी विभागाने विशेष लक्ष दणे आवश्यक आहे, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. आत्मा योजनेंतर्गत प्रगतिशील, अनुभवी, नावीन्यपूर्ण शेतकऱ्यांच्या शेतावर प्रक्षेत्र उपक्रम राबविण्यासोबतच तालुकास्तरावर आत्मा समितीची बैठक दरमहिन्याला घेण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. कृषी क्षेत्राशी संबंधित अत्याधुनिक तंत्रज्ञान शेतकऱ्यांना दाखविण्यासाठी शेतकऱ्यांचे अभ्यासदौरे आयोजित करावे. फळ पिकांना अलीकडे फार महत्व आले आहे. शेतकऱ्यांना या पिकांचे चांगले प्रशिक्षण देणे आवश्यक आहे. रोजगार हमी योजनेअंतर्गत राबविण्यात येत असलेल्या फळझाड योजनेची माहिती अधिकाधिक शेतकऱ्यांना करुन देण्यात यावी. यासोबतच दुग्ध व्यवसायाकडे शेतकऱ्यांना आकर्षित करण्यासाठी दुग्ध व्यवसाय विभागाने शेतकऱ्यांचे प्रबोधन करण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या. यावर्षी जिल्ह्यात चांगला पाऊस झाला आहे. या पावसात विहीर पुनर्भरणाचा कार्यक्रम राबविल्यास तो यशस्वी होऊ शकतो. त्यामुळे तालुका कृषी अधिकाऱ्यांनी या कार्यक्रमाकडे जातीने लक्ष द्यावे, असे सांगून राष्ट्रीय फलोत्पादन अभियानांतर्गत रायपनिंग चेंबर तसेच हळद प्रक्रिया केंद्र उभारण्याची सूचना त्यांनी केली. आत्माचे प्रकल्प संचालक अनिल इंगळे यांनी यावेळी प्रकल्पाची माहिती दिली. (स्थानिक प्रतिनिधी)