शहरं
Join us  
Trending Stories
1
शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांना योग्य भाव का मिळत नाही? नितीन गडकरी यांनी कारण सांगितले
2
अखेर बीएसएनएल नेटवर्क बदलणार, देशभरात या तारखेला 4G सेवा सुरु करण्याची घोषणा
3
"बेबी, आय लव्ह यू, तू खूप...", स्वयंघोषित बाबा रात्रभर पाठवायचा अश्लील मेसेज, ३५ मुलींचा छळ
4
डोळ्यांत मिरची पूड ओतली, नंतर साडीने लेकाचा गळा आवळला अन्...; जन्मदात्री आई इतकी क्रूर का झाली?
5
जगातील दुसरे सर्वात श्रीमंत व्यक्ती लॅरी एलिसन ९५% संपत्ती दान करणार; काय आहे अट?
6
कमाल झाली राव! आता QR कोड नाही, तर फक्त अंगठ्याने करा पेमेंट; काय आहे ThumbPay?
7
भारताच्या हाती लागली मोठी शक्ती, धावत्या रेल्वेतून शत्रूवर मिसाईल डागता येणार; अग्नी प्राइमची चाचणी यशस्वी...
8
मुंबई पोलीस कॉन्स्टेबलच्या मृत्यूचं गूढ उकललं; ४ महिन्यांनी हत्येचा खुलासा, 'त्या' पत्रावर संशय
9
बाहुबली नेते राजा भैय्या यांच्या मुलांनी आईवर केले गंभीर आरोप, म्हणाले, "आमच्या घरात…’’  
10
ललिता पंचमी व्रत २०२५: शुक्रवारी इच्छापूर्तीसाठी 'असे' करा ललिता पंचमीचे व्रत; टाळा 'ही' एक चूक!
11
"हो मला बाबा व्हायचंय...", ५९व्या वर्षी सलमान खानला हवंय मूल, म्हणाला...
12
इथेनॉलचा डंख: सेकंड हँड कार, ती पण पेट्रोलची घेत असाल तर हा विचार जरूर करा...; २०२२ पूर्वीची घ्याल तर...
13
पहलगाम हल्ला: दहशतवाद्यांना मदत केलेला आरोपी सुरक्षा दलाच्या जाळ्यात; ऑपरेशन महादेवला मोठं यश
14
काश्मीर मुद्द्यावरून अमेरिकेचा पाकिस्तानला धक्का! पंतप्रधान मोदी-ट्रम्प भेटीबद्दलही केले मोठे विधान
15
'अशा' कमाईवर विशेष टॅक्स सूट नाही; कर सवलत मिळालेल्यांना थकबाकी भरावी लागणार, पण एक दिलासा...
16
"पैशाचं सोंग आणता येत नाही, मग सरकार शेतकऱ्यांना जीवन संपवू देणार का?’’, विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
17
एअरस्पेसमध्ये रशियाचा 'डिजिटल हल्ला'; स्पेनच्या संरक्षण मंत्र्यांच्या विमानाच्या जीपीएसमध्ये बिघाड, युरोपमध्ये खळबळ
18
महाराष्ट्रातील बेस्ट पर्यटन स्थळे क्लिक करा, ५ लाख जिंका; शासनाची अनोखी स्पर्धा, काय आहेत अटी?
19
नवरात्री २०२५: शुक्रवारी ललिता पंचमी, ३ शुभ योगासह, भद्रा राजयोगात ७ राशींचा भाग्योदय
20
लडाखमधील भडकलेल्या आंदोलनाचं पाकिस्तान कनेक्शन? सोनम वांगचूक यांच्या दौऱ्याबद्दल उपस्थित होताहेत शंका

पाणी शुद्धतेची काळजी घ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2015 00:05 IST

सध्या पावसाळ््याचे दिवस सुरू आहे. ग्रामीण भागात पाणी प्रदूषित होण्याची शक्यता अधिक असते.

दिग्रस : सध्या पावसाळ््याचे दिवस सुरू आहे. ग्रामीण भागात पाणी प्रदूषित होण्याची शक्यता अधिक असते. या दूषित पाण्यामुळे डायरिया, काविळ, टायफाईड आदी साथीचे आजार पसरण्याची भीती असते. यासाठी नागरिकांनी पाणी शुद्धतेची काळजी घ्यावी, पाणी उकळून, गाळून घेऊन त्यात जीवन ड्रॉप द्रावण टाकावे, असे आवाहन येथील आरोग्य विभागाच्यावतीने करण्यात आले आहे. तालुक्यातील नळयोजनेसह ग्रामीण भागातील विहिरी आणि हातपंपाच्या शुद्धतेबाबत प्रभावी उपाययोजना दिसत नाही. अनेक जलस्त्रोत घाणेरड्या ठिकाणी आहे. त्यामुळे पाणी शुद्धिकरण करणे आवश्यक आहे. पाण्यामध्ये ब्लिचिंग पावडर टाकूण क्लोरिनेशन करणे गरजेचे आहे. पाण्याची नियमित ओटी टेस्ट घ्यावी, गावामध्ये असणाऱ्या नाल्या वाहत्या कराव्या, डबकी साचणार नाही याची काळजी घ्यावी, पिण्याचे पाणी घेण्यासाठी डवल्याचा वापर करावा, जेवणापूर्वी हात स्वच्छ धुवावे, बाहेरील पाणी पिण्याचे टाळावे, उघड्यावरील शिळे अन्न खाऊ नये, पाण्यच्या स्त्रोतापासून १०० फुटाच्या अंतरावर खताचे खड्डे असल्यास त्याची विल्हेवाट लावावी, आदी सूचना केल्या आहे. याउपरही जलजन्य रोगाचे रुग्ण आढळून आल्यास अंगणवाडी सेविका किंवा अशा स्वयंसेविकांना माहिती द्यावी. तसेच जवळच्या दवाखाण्यात जाऊन रुग्णांची तपासणी करावी. उपहारगृहे, खानावळ, बसस्थानक आदी ठिकाणचे पाण्याचे साठे निरजंतुक राहतील याची काळजी घ्यावी. ग्रामीण नळयोजनेच्या टाक्या नियमित स्वच्छ करावे असे आवाहन करण्यात आले आहे. (वार्ताहर)